Wednesday, July 30, 2025

ऑपरेशन सिंदूर: अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला


अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध शेरखान आणि तवाकी सारखेच आहे. अमेरिकेच्या षड्यंत्रात पाकिस्तान नेहमीच अमेरिकेची मदत करत आला आहे. अफगाणिस्तान वर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तान ने विमानळे अमेरिकेला उधार दिले होते. सर्वप्रकारची सैन्य मदत ही केली होती. वैश्विक राजनीति मध्ये एक म्हण आहे, अमेरिकेपासून अमेरिकेच्या शत्रूला जेवढा धोका नाही त्यापेक्षा जास्त धोका मित्राला असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये ही हे दिसून आले. 

9 मेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जे डी वेंस ने भारताच्या पंतप्रधान मोदीजींना सूचना दिली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे. याबाबत एआई वरून मिळालेली माहिती 

"अमेरिकेला त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती मिळाली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर JD Vance यांनी 9 मेच्या रात्री पंतप्रधान मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांना फोनवरून कळवले की हा हल्ला लवकरच होऊ शकतो. भारताने ही चेतावणी अत्यंत गांभीर्याने घेतली आणि 10 मेच्या सकाळी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवर जोरदार हल्ला केला. या घटनाक्रमात JD Vance यांनी भारताला संभाव्य धोक्याची आधीच कल्पना दिली असेल. Vance यांनी अमेरिकेची भूमिका सहकार्यशील आणि सतर्क ठेवली. पाकिस्तानला रणनीतीक लाभ होऊ दिला नाही." 

पाकिस्तानचे  प्रधानमंत्री शहबाज शरीफ म्हणाले होते, आम्ही दहा तारखेला सकाळी साडे चार वाजता भारतावर मोठा हल्ला करणार होतो. पण रात्री  अडीच वाजता आमच्या विमानतळांवर ब्रह्मोस येऊन आपटले. आम्हाला वेळच मिळाला नाही. नुकसान टाळण्यासाठी विमाने सुरक्षित करणे आम्हाला गरजेचे वाटले. त्यामुळे भारताशी बदला घेणे शक्य झाले नाही. याशिवाय जगाचे सोडा मुस्लिम देशांचाही पाकिस्तानला पाठिंबा नाही, हे ही शरीफ यांना कळून चुकले होते. त्यांचा  मिसाईल आणि द्रोण हल्ला ही नाकाम झाला होता. त्यामुळे युद्धविरामाची मागणी करण्या व्यतिरिक्त कोणताही मार्ग त्यांच्या समोर नव्हता . 

भारताच्या सैन्याने निश्चित केलेली आतंकी आश्रय स्थळे आधीच उध्वस्त केली होती. पाकिस्तानला जर बदला घेण्याची दुर्बुद्धी झाली नसती, द्रोण आणि मिसाईल हल्ले केले नसते तर  7 मे ला सकाळीच ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले असते. भारताला ही युद्ध सुरू ठेवण्याचे कोणतेही कारण नव्हते. भारताने पाकिस्तानची युद्ध थांबविण्याची मागणी मान्य केली.  

भारताने 11/12 विमानतळांवर हल्ला केला. काही सुरक्षा विशेषज्ञांच्या मते यातल्या काही बेस वर अमेरिकी अस्त्र-शस्त्र ठेवलेले होते. हल्ल्यात ते नष्ट झाले. बहुतेक त्याचा राग तात्यांना आला असेल. तात्यांनी युद्धविरामाचे श्रेय घेऊन भारतात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भरपूर प्रयत्न केला. बाकी भारताला पूर्व माहिती देऊन अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला, हे नाकारणे शक्य नाही. 



Wednesday, July 23, 2025

मतदानाचा हक्क आमचा

बिहार मध्ये मतदाता सूची तपासल्या गेली. आतापर्यंत यादीत 22 लाख मृतातम्यांचे नावे, 7 लाख डुप्लीकेट मतदाता सापडले.  35 लाख मतदाता दिलेल्या पत्त्यावर सापडलेच नाही. 1 लाख मतदाता कोणत्याही पत्त्यावर नव्हते.  ही संख्या एवढी मोठी आहे, की संपूर्ण राज्याची निवडणूक प्रभावित करू शकते. यावरून सुचलेल्या काही ओळी: 

मृतांच्या आत्मा 
भटकतात जिथे. 
मतदानाचा हक्क
त्यांना आहे तिथे.  

घुसखोरांचे घाम 
गळतात जिथे.  
मतदानाचा हक्क 
आहे त्यांना तिथे.  

डुप्लीकेट मतदार  
वाढवी मतदान जिथे.  
मतदानाचा हक्क  
त्यांनाही आहे तिथे. 

संविधांनाचा रक्षणे साठी
लोकतंत्र वाचविण्यासाठी
मतदान यादी बदलू नका
सरकारी तालावर नाचू नका. 

बाकी प्रत्येक निवडणूक पूर्वी मतदाता यादी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नकली मतदान निवडणूक जिंकण्याचे एक अस्त्र आहे. विशिष्ट मतदाता याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. 







Monday, July 21, 2025

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

आपरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र  सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि  सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित. 

माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले. असे म्हंटताना त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी उत्तर दिले, भारताचे युद्धक विमाने पडली आणि तुला आनंद होत आहे. बाकी तात्या खरे बोलले, पाकिस्तान ने आपल्या आक्रमण करणार्‍या युद्धक विमानांना पाडले. वैमानिकांनी पेराशूट उघडले. ते पाकिस्तानच्या जमिनीवर उतरले. तिथून त्यांनी ओला-उबेर पकडली आणि ते भारतात परतले. तो म्हणाला, पटाईत काहीतरी बरगळू नको. मी म्हणालो, गाढवा मग काय म्हणू. विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. किमान एवढी तरी अक्कल तुला असायला पाहिजे. तू काही राजनेता नाही ज्याला असत्य प्रचार करून लोकांची मते घ्यायची आहे. काहींची इच्छा तर भारत पराजित झाला पाहिजे अशी होती. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने  विडियो टाकले असते.  या शिवाय भारतात शहीद होणार्‍या प्रत्येक सैनिकाला मानाची वंदना दिली जाते, एवढे माहीत आहे ना, तुला. आता त्याचे सूर बदलले. तो म्हणाला, मग तात्या खोटे का बोल्ले. मी उत्तर दिले, तात्या कोमात गेले आहे. किराणा हिल्स वर बहुतेक तात्यांचे आण्विक अस्त्रांचा साठा असू शकतो. भारताने किराणा हिल्स वर मिसाईल हल्ला केला नाही, असेच विधान केले असले तरी तिथल्या स्फोटांचे उपग्रह फोटो मीडियावर आहे. नंतर त्याच भागात जमिनीच्या आत अनेक भूकंप ही आले. नूरखान बेस वर ही जमिनी खाली असलेले शस्त्र भंडार ही नष्ट झाले. बहुतेक भारताने दाखविले पाकिस्तानचे अस्त्र भंडार सुरक्षित नाही. पण इथे ठेवलेले अस्त्र- शस्त्र भंडार तात्यांचे असेल तर तात्या कोमात जाणारच.  

पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ एका प्रेस कोन्फ्रेंस मध्ये म्हणाले होते, ते भल्या पहाटे भारतावर हवाई हल्ला करणार होते, त्या आधीच अडीच वाजता भारताने ब्रम्होस मिसाईलने आमच्या विमानतळांवर हल्ले केले. आम्हाला प्रतिकार करण्यासाठी 30 सेकंड ही नव्हते. भारताच्या हल्ल्यात तिथल्या हवाई पट्ट्या आणि तिथे उभी असलेली अनेक विमाने नष्ट झाली. त्यांची विमाने आक्रमण करण्यासाठी तैयारी करत असल्याने त्यांची विमाने असुरक्षित होती. किमान 30-40 विमानांना निश्चित नुकसान झाले असेल, खरी संख्या काही वर्षांनी पाकिस्तान उघडी करेलच. भारता जवळ शत्रूवर पिन पॉइंट आक्रमण करण्याची क्षमता पाहून तात्यांना धक्का बसणे स्वाभाविक होते. 

नुकतेच झालेल्या इजराईल आणि इराण युद्धात हजारून जास्त किमी दूरून येणार्‍या मिसाईल आणि द्रोण अमेरिकेचे आधुनिक डिफेंस सिस्टम थांबवू शकले नाही. दुसरी कडे 25-50 किमी दुरून येणारे द्रोण आणि मिसाईल भारताने रोखले.  ह्याचा आघात ही त्यांना जबरदस्त बसला असेल. 

बाकी तात्यांप्रमाणे भारतात ही अनेकांना दारुण धक्का बसला आणि त्यांचे ही मानसिक संतुलन बिघडले. भारताने 9 आतंकी तळ उध्वस्त केले. तिथे इतके आतंकी मेले की एक आतंकी म्होरक्या म्हणाला, "आम्ही प्रेत मोजता मोजता थकून गेलो. आमचे दुख कुणाला ही कळू शकत नाही". 11 विमान तळे उध्वस्त झाल्याने पुढील वर्षभर तरी पाकिस्तान पुन्हा गडबड करू शकत नाही. एवढे नुकसान झाल्यावर पाकिस्तान ने बदला न घेता युद्धविराम स्वीकार केला अर्थात सरेंडर केले/ तरीही आपले काही नेता "भारताने सरेंडर असा शब्द प्रयोग करतात". बहुतेक पाकिस्तानच्या दारुण पराजयाचे पाकिस्तानपेक्षा त्यांनाच जास्त दु:ख झाले असावे आणि ते ही तात्या प्रमाणे बरगळू लागले.   

बाकी आता भारतासोबत सर्व व्यापारीक सौदे बरोबरीच्या नात्याने करण्याची मानसिक तैयारी ही तात्यांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी तात्यांना कोमातून लवकर बाहेर यावे लागेल. पंतप्रधान मोदींच्या भारताला आता कुणीही हलके घेऊ शकत नाही. 



Thursday, July 17, 2025

काँवड़ यात्रेचे आर्थिक महत्व.

 

आपल्या प्राचीन ऋषींना माहीत होते, लक्ष्मी चंचल असते. जेवढ्या लवकर ती एका हातातून दुसर्‍या हातात जाईल, तेवढ्या जास्त लोकांना लक्ष्मीचा लाभ होतो. एक छोटेसे उदाहरण, एका किराणाच्या दुकानदाराला भूक लागली, त्याने 20 रु देऊन समोसा विकत घेतला. समोसा विकणार्‍याने तेच 20 रु देऊन पाव-भाव भाजी खाल्ली. पाव भाजीवाल्याने तेच 20 रु देऊन किराणाच्या दुकानदारा कडून पाव विकत घेतले. 20 रुच्या एकाच नोट ने 60 रूपयांचा धंधा केला. यालाच आर्थिक चक्र म्हणतात. हे आर्थिक चक्र जेवढ्या वेगाने फिरेल तेवढ्या जास्त लोकांना लक्ष्मीचा लाभ होतो. लोकांच्या घरात धन पडून राहिले तर आर्थिक चक्र ही फिरणार नाही. आपल्या सनातन धर्माच्या सर्व सणांचा आणि यात्रांचा उद्देश्य तिजोरीत साठलेले धनाचे वितरण समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचवून आर्थिक चक्र फिरण्याची गति वाढविणे आहे. आपले प्राचीन ऋषि मुनि हे उत्तम अर्थशास्त्री होते, असे ही म्हणता येईल.  

या वर्षी हरिद्वार मध्ये कांवड घेण्यासाठी किमान सहा ते सात कोटी लोक येणार असा अंदाज आहे. कांवड बांबूची असते आणि गंगेच्या पाण्यासाठी  प्लॅस्टिक, स्टील, पितळ इत्यादीं पासून बनलेल्या बाटल्या, घाघर इत्यादि ही कांवड मध्ये असतात. एक कांवड 500 ते 5000 रु पर्यन्तची असू शकते. एवढे लोक दोन आढवडयात हरिद्वारला येणार. ते पायी, बस, रेल्वे, कार, ट्रक, टेम्पो इत्यादि वाहनांचा वापर करून येणार. अधिकान्श 50 ते 250  किमी दूरून येतात.  काही 500 किमी दूर पर्यन्त  दुरून ही येतात. यातले अधिकान्श एक रात्र तरी हरिद्वार येथे थांबतात. इथल्या ढाबे, हॉटेल, धर्मशाळा इत्यादींना आर्थिक लाभ होतो. यानंतर कांवड घेऊन सर्व पायी त्यांच्या शहरांत/ गावी जाणार. अंदाजे एक यात्री चार दिवस पायी चालणार (हरिद्वारहून  50 ते 75 किमी चालत चार दिवसांत कांवड घेऊन यात्री दिल्ली पोहचतात) या सर्वांची राहण्याची सोय, चहा-पाणी आणि जेवणाची सोय जागो-जागी उभारलेल्या शिविरांत केली जाते. अंदाजे दरवर्षी लाखांच्या वर शिविर उभारले जातात. प्रत्येक ठिकाणी स्थानीय श्रीमंत लोक या शिविरांची व्यवस्था करतात. या शिविरांत किमान 20 ते 25 कोटी चहाचे कप, तेवढेच जेवणासाठी पानांच्या प्लेट्स, वाट्या इत्यादि लागणार. काही हजार हलवाई लागणार, जोडे चपलांच्या दुरूस्तीसाठी चांभार, डॉक्टर, मालीशवाले इत्यादि. या शिवाय शिविरात, देवांचे फोटो असतात. त्यांची पूजा होते. पूजेचे साहित्य हार, फुले धूप, दीप नैवेद्य इत्यादि ही लागतात. अधिकान्श शिविरांत भागवत कथा, जागरण होतात. त्यासाठी कथावाचक, भक्ति गीत गाणारे गायक, देवांचे सोंग घेणारे, डिजे, जनरेटर, विजेचे काम करणारे इत्यादि लोकांची गरज असते. रस्त्यात पडणारे ढाबे, चहाच्या दुकानदारांची ही कमाई होते. दूध, दही, भाजी-पाला, फळे इत्यादींची विक्रीही कांवड मार्गावर होते. स्थानीय शेतकर्‍यांना ही त्याचा लाभ होतो. 

कांवड नेणार्‍यांना ही तैयारी करावी लागते. दोन कपडे, उपरण, टॉवेल, इत्यादि ठेवण्यासाठी एक बॅग ही लागते.  सीमेंट आणि डाबर रास्ते आल्याने अधिकान्श कांवड यात्री कापडाचे जोडे किंवा चप्पल घालतात. त्या ही विकत घ्याव्या लागतात. शिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करूनच ते घरी परततात. ज्या-ज्या स्थानीय मंदिरात जलाभिषेक होतो त्या दिवशी भंडारा ही राहतो. अंदाजे एक कांवड यात्री कमीत-कमी 1000 रु यात्रेत खर्च करतो. या सर्वांचा विचार केला तर 20 ते 30 हजार कोटींचा आर्थिक व्यवहार या 15 दिवसांत निश्चित होत असेल. काही लाख लोकांना रोजगार ही या काळात मिळतो. त्यांच्या जवळ पैसा येणार आणि मग ते ही तो खर्च करणार. दुसर्‍या शब्दांत आर्थिक चक्र फिरण्याची गति वाढते आणि समाजाच्या सर्व स्तरांना त्याच्या लाभ मिळतो.

काही महाविद्वान म्हणतात, कांवड यात्रा करण्यात लोक एक आठवडा व्यर्थ करतात.  या महाविद्वान लोकांना कळत नाही  चार- पाच दिवस रस्त्यावर 50 ते 60 किमी रोज चालण्याने शारीरिक आणि मानसिक दृढता त्यांच्यात येते. परिस्थितीला न घाबरता सामोरे जाण्याची हिम्मत येते. रस्त्यात चालताना विभिन्न जाति पंथांच्या आणि वेगवेगळ्या प्रांतांच्या लोकांची भेटी गाठी होतात. शिविरांत श्रीमंत आणि गरीब एकत्र जेवतात. जमिनीवर खाली झोपतात.  यात्रेकरूंमध्ये मैत्री संबंध स्थापित होतात.  या सर्वांचा लाभ रोजगार, व्यापार आणि उद्योगात ही होतो. या शिवाय सामाजिक भेदभाव दूर करण्यात आणि आर्थिक समरसता निर्माण करण्यात अश्या यात्रांचे अनन्य महत्व  आहे. 

    

Monday, July 14, 2025

वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग

जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे. अज्ञानी माणूस आपली दरिद्रता दूर करण्याचा प्रयत्न सोडून दुसर्‍यांना दोष देत चुकीच्या मार्गावर चालू लागतो आणि दारिद्रयात जगत जीवन व्यर्थ घालवतो. समर्थ म्हणतात, 
 
विद्या नाही बुद्धि नाही. 
विवेक नाही साक्षेप नाही.
कुशळता नाही व्याप नाही. 
म्हणोन प्राणी करंटा.

समर्थ म्हणतात, ज्या व्यक्ति पाशी विद्या, बुद्धि, उद्योग, कुशलता, व्याप आणि विवेक नाही तो प्राणी करंटा होतो अर्थात आयुष्यभर दरिद्री राहतो. दुसर्‍या शब्दांत या ओवीत समर्थांनी आपल्याला संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग दाखविला आहे.  

समर्थ म्हणतात विद्या अध्ययन हा संपन्न बनण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. ज्या माणसाजवळ कोणतीही विद्या नाही तो करंटा राहणारच. वेदपाठी ब्राह्मणाला मोठ्या-मोठ्या यज्ञ कार्यांत बोलविले जाते. मोठी दक्षिणा मिळते. ज्या ब्राह्मणाला सत्यनारायणाची पोथी वाचून ही पूजा सांगता येणार नाही तो दरिद्री राहणारच. हाच संसाराचा नियम आहे. दुसरी पायरी उद्योग अर्थात कष्ट करण्याची तैयारी. विद्या अर्जित करण्यासाठी संबंधित विषयांच्या पोथ्या वाचाव्या लागतात. योग्य गुरु कडून समजून घ्याव्या लागतात. प्रश्नांची उत्तरे पाठ करावी लागतात. दहा-बारा तास रोज अभ्यास करावा लागतो. तेंव्हा काही डॉक्टर बनतात, काही आयएएस बनतात. काही सीए बनतात काही एमबीए करून मोठ्या- मोठ्या उद्योगांचे प्रशासनिक प्रमुख बनतात. कोट्यवधी पगार घेतात. समृद्ध बनतात. काही कारकून बनून मध्यम वर्गीय जीवन जगतात. बाकी ज्यांच्यात मेहनत करून ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता नाही, ते बेरोजगार आणि दरिद्री राहतात. चुकीच्या मार्गावर चालू लागतात.  काही चोरी-चकारी आणि गैरमार्गांचा अवलंबन करून जगण्याचा प्रयत्न करतात. काही सत्ता लोलुप नेत्यांच्या तालावर नाचतात. आंदोलनात भाग घेऊन तोडफोड ही करतात. अश्या तरुणांना कधी-कधी जेल मध्ये ही जावे लागते. त्यांचे आयुष्य उध्वस्त होतात. दु:ख आणि गरीबी त्यांच्या भाग्यात येते.  काही नैराश्याने ग्रस्त होऊन आत्महत्या ही करतात. असो. 

समर्थ म्हणतात उत्तम गुरु कडून ज्ञान प्राप्त करून काम भागत नाही. त्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी कुशलता ही लागते. उदाहरण, शिलाई केंद्रात जाऊन कपडे शिवण्याचे ज्ञान प्राप्त केल्या नंतर त्यात कुशलता ही प्राप्त करावी लागते. शिंपीला कुशलता प्राप्त करण्यासाठी एखाद्या उस्तादाच्या दुकानात काम करावे लागते. सरळ रेषेत शिलाई करण्यासाठी ही अनेक महीने अभ्यास करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असल्याने त्यानुसार माप घेणे आणि शिलाई करण्यासाठी कुशलता ही लागणारच. त्यासाठी उस्तादच्या मार्गदर्शनात निरंतर अभ्यास करावा लागतो. कपडे शिवण्यात कुशलता प्राप्त झाल्यानंतर वेगळी दुकान थाटता येते. बिना कुशलता प्राप्त केल्या, थेट दुकान उघडली तर ती काही महिन्यातच बंद होण्याची शक्यता जास्त.

समर्थ सारासार विचार करण्यासाठी विवेक बुद्धि वर ही जोर देतात. आता शिंप्याला दुकान उघडायची आहे. त्याला दुकानासाठी त्याच्यापाशी असलेल्या बजेट अनुसार मौक्याची जागा शोधावी लागणार. ज्या भागात दुकान उघडायची आहे, त्या भागातील दुकानाचे भाडे, सरकारी कर, बँकेचे व्याज, उत्तम शिलाई सामग्री वापरण्याचा खर्च उदा. दोरे, सुई, जीप बटन, लेस, इत्यादि, त्या भागातल्या लोकांची खर्च करण्याची क्षमता, किमान नफा किती ठेवला पाहिजे जेणे करून नुकसान होणार नाही इत्यादि. शिंप्याने या सर्वांचा विचार करूनच शिलाईचे रेट ठरविले पाहिजे. रेट कमी ठरविले तर नुकसान होईल. रेट जास्त ठेवले तर ग्राहक कमी येतील. रेट कमी ठेवण्यासाठी शिलाईचे सामान निम्न दर्जाचे वापरले तर ग्राहक तुटतील. विवेक आणि बुद्धीचा वापर करून  शिंप्याने योग्य जागी दुकान उघडली पाहिजे आणि गुणवत्तेशी प्रामाणिक राहिले पाहिजे. ग्राहकांशी गोड बोलले पाहिजे. शेवटी,  शिंप्याला ऊन असो की पाऊस, दररोज नियमित वेळेवर दुकान उघडावी लागेल आणि 12-12 तास उघडी ठेवावी लागेल. किमान एवढे केले तरी, थोड्या काळातच त्याला निश्चित प्रसिद्धी मिळेल. तो संपन्न आणि वैभवशाली होईल. थोडक्यात, संसारात संपन्न आणि वैभवशाली बनायचे असेल तर ज्ञान, कुशलता, सारासार विचार करण्याची विवेक बुद्धि ही पाहिजे. असो. 





Wednesday, July 9, 2025

विद्यार्थी: निराशा आणि आत्महत्या इत्यादि दोष कुणाचा

 

आज एक बातमी फेसबूक वर वाचली. दहावीच्या मुलाने आत्महत्या केली. त्याने आत्महत्येचे कारण एका कागदावर लिहले. मी "पासी" घेत आहे, कारण मास्तर माझ्यावर रागावले. मास्तर रागावले.  कारण काय असावे. या विषयावर ओळखीच्या  शिक्षिकांसोबत काही महीने आधी चर्चा केली होती.  

मी जेंव्हा शाळेत शिकत होतो. 11वी बोर्ड होता. नववी, दहावी आणि अकरावी तिन्ही वर्षांचा अभ्यासक्रम बोर्डाचा परीक्षेत येत होता.  एक-एक प्रश्न 15- 20 मार्कांचा राहायचा. मोठी उत्तरे लिहावी लागायची. छोटे प्रश्न फक्त 20 टक्के मार्क असलेले.अभ्यासाच्या तणावामुळे डिप्रेशन, हृदयाघात, आत्महत्या इत्यादि ऐकायला मिळत नव्हते. वर्ग शिक्षक ही मुलांना बदडत होते. आमच्या गणिताच्या शिक्षकाची छडी तर रोजच तुटायची. पण मास्तराने मारले म्हणून विद्यार्थी आत्महत्या करत नव्हते. 

पहिले कारण आजची दोषपूर्ण शिक्षण व्यवस्था.  पूर्वी 8वी बोर्ड असायचा. त्याच्या परीक्षा परिणाम ही 60 ते 70 टक्के असायचा. आठवीत नापास झालेले किंवा कमी मार्क असणारे पुढे शालेय शिक्षण घेत नसे. 60 टक्के विद्यार्थी जे नववीत प्रवेश घेत से त्यातले अधिकान्श विद्यार्थी विज्ञान, गणित आणि अंगरेजी सारखे विषय 9वीत घेत नसे. विद्यार्थ्यांवर असणारा अभ्यासाचा मानसिक तनाव बर्‍यापैकी कमी होत असे. मानसिक तणाव कमी असल्याने हृदयाघात किंवा मानसिक आजार होण्याची संभावना ही कमी होती. फक्त हुशार विद्यार्थी विज्ञान हा विषय नववीत घ्यायचे. मात्र आज देशांत 10+2 शिक्षण पद्धती आहे. दहावी पर्यन्त सर्वच विद्यार्थ्यांना बोर्डाने निर्धारित केलेले सर्व विषय घ्यावे लागतात. ज्या विद्यार्थाची गणित, इंग्लिश  आणि विज्ञानात गति नाही त्याला ही या विषयांचा अभ्यास करावा लागतो. या शिवाय  विद्यार्थ्यांना काही येत असो की नसो  पहिलीपासून पुढे ढकलण्याची सरकारी नीती. मला आठवते आमच्या गल्लीत माझ्या सोबतचा एक मुलगा दुसरीची वार्षिक परीक्षा अत्यंत काठावर पास झाला होता. त्याच्या आईने पुन्हा त्याला पुन्हा दुसरीत बसविले. त्याचा पाया मजबूत झाला.  पुढे वर्गात त्याचा पहिला नंबर येऊ लागला आणि तो डॉक्टर झाला.  प्राथमिक शाळेत असताना विद्यार्थ्यांना एखाद्या वर्गात पुन्हा बसविले तर वय लहान असल्याने विद्यार्थ्यांना वाईट वाटत नाही आणि त्यांची शैक्षणिक नीव ही मजबूत होते. पालक ही मुलाच्या शिक्षणाकडे  लक्ष देऊ लागतात.  पण आज दहावी पर्यन्त कुणालाही नापास केले जात नाही. दहावी आणि 12वीचा परीक्षा परिणाम  ही 90 टक्क्यांचा वर असतो. अर्थात पहिलीत प्रवेश घेणार्‍या 100 पैकी 90 विद्यार्थी परीक्षा आणि पूरक परीक्षा देऊन 12वी पास होणार. (11 वी बोर्ड वेळी ही संख्या 50 पेक्षा जास्त राहायची नाही). हे असेच आहे जसे "इधर से आलू डालो उधर से सोना निकालो"। पहिलीत अडमिशन घ्या आणि 12वीचे प्रमाणपत्र ही घ्या. पण गाडी इथेच थांबत नाही. काही येत नसेल तरी आज स्नातक होणे ही कठीण नाही. मग ज्या तरूणांकडे डिग्री आहे पण ज्ञान नाही. असे तरुण बेरोजगार राहणार, तणावग्रस्त राहणार. त्यांना डिप्रेशन होणार. ते आत्महत्या करणार किंवा रस्त्यावर उतारणार. कीड लागलेल्या निरपयोगी प्रजेचे निर्माण आजच्या शिक्षण व्यवस्थेत आहे. वेगळा विषय आहे तरी तो आजच्या शिक्षण प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. देशातील एक प्रसिद्ध आयटी कंपनी आधी दोन महीने निवडलेल्या डिग्रीधारी तरुणांना पुन्हा प्रशिक्षण देते आणि नंतर परीक्षा घेते. त्यात उतीर्ण झालेल्या उमेदवारांना  नियुक्ती पत्र देते.

डिझाईनर चाइल्ड सिंड्रोम: मध्यम वर्गाला लागलेला हा गंभीर आजार आहे. या आजारचे कारणे, आम्ही गरीब होतो. उत्तम शिक्षण मिळाले असते तर कदाचित आयएएस, डॉक्टर, इंजीनियर इत्यादि झालो असतो. विदेशांत गेलो असतो.  सरकारी बाबू  असो,  आयटी वाले असो किंवा डॉक्टर, इंजीनियर ते प्राइवेट नौकरी करणारे, सर्वांना वाटते त्यांच्या न पूर्ण झालेल्या  इच्छा त्यांच्या एकुलता एक लेक पूर्ण करेल. ते परिवार नियोजन करतात एकच्या मूल जन्माला घालत नाही. त्याला प्रतिष्ठित आंग्ल शाळेत घालतात. महिना दहा ते वीस हजार फी भारतात. पहिली पासून ट्यूशन ही लावतात. नववी पासून  कोचिंग क्लासेस ज्यांची फी दोन ते पाच लाख पर्यन्त असते लावतात. त्यासाठी कर्ज ही घेतात. दिल्लीचे म्हणाल तर इथे सकाळी सातला निघलेला मुलगा शाळेतून दुपारी अडीच तीन पर्यन्त घरी येतो. जेवून तो पुन्हा क्लासला जातो. घरी येता-येता संध्याकाळचे सात  वाजतात. मग घरी  येऊन तो शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास, रीविजन इत्यादि करतो. प्रत्येक शाळेत साप्ताहिक मासिक परीक्षा होतात. मुलांवर नेहमीच अभ्यासाचा ताण असतो. रात्री एक-दोन वाजेपर्यंत ते अभ्यास करतात. रात्री कॉफी इत्यादि घेतात. झोप पूर्ण होत नाही. शारीरिक व्यायाम इत्यादि नसण्याने वजन वाढण्यासहीत अनेक आजार मुलांना लागतात. बाकी कितीही अभ्यास केला तरी ज्या  विषयाच्या 100 जागा असेल तर 100 मुलांनाच प्रवेश मिळेल. मुलालाही माहीत असते पालक त्यांच्यावर भरपूर खर्च करत आहे. पालकांना इच्छित परिणाम देण्यास असमर्थ ठरल्याने विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात. माझ्या ओळखीच्या एका मराठी दांपत्याचा एकुलत्या एक मुलाने दहावीत पहिल्या परीक्षेत चांगले मार्क्स आले नाही म्हणून गळ्यात फास लाऊन आत्महत्या केली. तर महाराष्ट्रात कमी मार्क्स आले म्हणून बापाने मुलीला रागाने मारले. मुलीचे प्राण गेले. आता बापाला कितीही दुख झाले असेल तरीही त्यांची मुलगी त्यांना परत मिळणार नाही. या आजाराने ग्रस्त पालक मुलांना आर्थिक गुंतवणूक समजतात. ते उत्तम नागरिक तैयार करण्याएवजी पैसा कमविणारी मशीन समजून गुंतवणूक करतात. जी मशीन खराब निघते ती कचरा पेटीत फेकली जाणारच. असे पालक मुलांचे आयुष्य उध्वस्त करतात. त्यांना आत्महत्या करण्यास विवश करतात. मुले ही स्वतला अभ्यास करण्याची मशीन समजतात आणि परिणाम पाहिजे तसा आला नाही तर ते आत्महत्या करतात किंवा डिप्रेशन मध्ये जातात. 

यावर उपाय अत्यंत सौपा आहे. पहिली पासून फक्त जे विद्यार्थी पुढच्या वर्षाचे शिक्षण घेण्याच्या लायकीचे आहे त्यांनाच पुढे जाऊ द्या. 60 किलो वजनी पैलवान 48 किलो वजनी पैलवान सोबत कुस्ती खेळत  नाही. तसेच ज्ञानाच्या बाबतीत आहे. 8वी बोर्ड पुन्हा सुरू केला पाहिजे. ग्रेस मार्क इत्यादि देणे बंद केले पाहिजे. 8वी बोर्डात पास होण्यासाठी किमान तीन विषयांत  50 टक्के मार्क असणे अनिवार्य केले पाहिजे. 10वी बोर्ड बंद केला पाहिजे. 9वीत विषय निवडण्याची स्वतंत्रता विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. 9वी पासून  गणित, विज्ञान आणि आंग्ल भाषेचे बंधन नसावे. पहिले दोन वर्ष  विषय बदलण्याची स्वतंत्रता ही दिली पाहिजे. पाच विषयांजागी आवडीच्या तीन विषयांत ही तो 12वी बोर्डची परीक्षा देऊ शकेल असा बदल शिक्षण पद्धतीत झाला पाहिजे. उदा. मला जर मराठी, हिन्दी आणि संस्कृत या तीन भाषा घेऊन 12वीची परीक्षा द्यायची असेल तर ती स्वतंत्रता मला मिळाली पाहिजे. 12वीत उतीर्ण होण्यासाठी 50 टक्के मार्कांची अट असायला पाहिजे. तीन विषय घेणार्‍यांना कौशल युक्त शिक्षण घेणे अनिवार्य असले पाहिजे. "इधर से आलू डालो उधर से डिग्री लो" हा प्रकार बंद झाला पाहिजे.  अनुपयोगी वस्तु काही कामाची नसते, हे कटू सत्य आहे. स्नातक झालेला तरुण स्वतच्या पायावर उभ्या राहण्याचा लायकीचा असला पाहिजे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या आत्महत्या  थांबणार नाही.  


Saturday, June 21, 2025

मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.

काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण  घ्यावे आणि उत्तम  पगारची नौकरी त्याला मिळावी. त्या मध्यम वर्गीय हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये सर्वच पालक मुलांशी आंग्ल भाषेत बोलत होते किंवा बोलण्याचा सराव करत होते. ही स्थिति पुण्याची मुंबईची नव्हे तर थेट मागासलेल्या चंद्रपुर सारख्या शहराची ही आहे.  पालकांना वाटते त्यांच्या मुलांना आंग्ल भाषेत महारथ प्राप्त झाली की त्यांना तात्यांच्या गावी  स्थायिक होण्यासाठी जाता येईल.  त्यासाठी पालक मुलांच्या शिक्षणासाठी कान्वेंट शाळा, तिथे नाही मिळाली तर इतर सीबीएससी शाळा निवडतात. सरकारी शाळांमध्ये तर मराठी  शासनाच्या जबरदस्ती मुळे शिकावी लागते. बाकी मराठी असो की हिन्दी दोन्ही विषयांत कमी मार्क्स मिळाले तरी पालकांना काहीही फरक पडत नाही. पण मुलांना आंग्ल भाषेत किमान 75 टक्के पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, असे मध्यमवर्गीय पालकांची इच्छा असते. 

दिल्लीत पूर्वी एक कहावत प्रसिद्ध होती " हाथ कंगन को आरसी क्या? पढे लिखे को फारसी क्या?" फारसी मुगलांच्या आणि नंतर ब्रिटिश काळात  रोजगार देणारी भाषा होती. सरकारी दफ्तरात फारसी चालायची. मराठी जर रोजगार देणारी भाषा बनली तर मराठी माणूस सोडा इतर ही भाषिक लोक ही मराठी शिकतील हे अत्यंत सौपे गणित आहे. त्यासाठी मराठी भाषेत उच्च दर्जाचे टेक्निकल शिक्षण देणे गरजेचे. ज्यांना मराठीच्या अस्मितेची चिंता आहे, हिन्दी विरोधाचा ड्रामा सोडून, मराठी भाषेत उच्च शिक्षण देण्यास सरकारला बाध्य करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने  ही उच्च शिक्षण क्षेत्रात, मग चिकित्सा असो की विज्ञानाच्या शाखा उदा. इंजीनियर ते वास्तुविद, किमान 50 टक्के जागा, फक्त मराठी माध्यमात शिक्षण देण्यासाठी आरक्षित केल्या पाहिजे. मराठीत उच्च शिक्षण घेणार्‍यांना महाराष्ट्रांत सरकारी खात्यांत, हॉस्पिटल इत्यादीत किमान 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे. मग पहा पालक स्वतहून त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांत घालू लागतील. बाकी ज्यांच्या मनात तात्यांच्या गावी जाण्याचे स्वप्न आहे ते निश्चित याला विरोध करतील. 

देशाला भाषा आणि प्रांत आधारावर तोडण्याचे प्रयत्न  गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रात ही राजनेता निवडणूक जिंकण्यासाठी भाषाई अस्मितेचा उपयोग करतात. आजकाल महाराष्ट्रात जे हिन्दी विरोधी आंदोलन सुरू आहे, ते फक्त राजनीतिक आहे. या घटकेला मुंबईत 22 टक्के एक गठ्ठा मते आहेत. मराठी लोकांच्या भावना भडकावून एम+एम  गाठजोड करून मुंबईत निवडणूक जिंकता येईल यासाठी हे सर्व सुरू आहे. या शिवाय उर्दूला दुसर्‍या भाषेचा दर्जा देण्याचा इरादा ही आहे. महाराष्ट्र शासनाने हिन्दीला लवकरच महाराष्ट्रची दुसरी राजभाषा घोषित केली पाहिजे नाहीतर भविष्यात हिन्दी एवजी उर्दू दुसरी भाषा घोषित केली जाईल. बाकी हिन्दी भारतात सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे. हिन्दी भाषेचा रोजगारसाठी निश्चित लाभ होतो. तिसरी भाषा म्हणून हिन्दी अवश्य शिकली पाहिजे. हिंदीची लिपि ही देवनागरी आहे. याशिवाय मराठी मुलांसाठी हिन्दी जड नाही कारण 90 टक्के शब्द एकसारखे आहेत. केंद्र सरकारच्या नौकरीतला अनुभव सांगतो मराठीतील 90 टक्के पत्र अनुवादसाठी जात नाही कारण अधिकान्श बाबूंना पत्रातील समस्या/ विषय कळतो.  


Thursday, June 19, 2025

21 जून योग दिवस : उद्यानातिल स्वास्थ्य साधक

(हा लेख लिहण्यापूर्वी उद्यानात सकाळी पाच ते आठच्या दरम्यान अनेक स्वास्थ्य साधकांशी  वार्तालाप केला आहे.)

माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले. त्याकाळी मोरीगेट ते यमुने पर्यन्त अनेक मोठी उद्याने होती. नंतर 35 वर्षे उत्तम नगर इथे राहिलो. जवळच्या जनकपुरी इथेही मोठे-मोठे उद्यान आहेत. बालपणापासून मला पासून उद्यानात फिरण्याची सवय आहे. गेल्या ऑगस्टच्या सुरवातीला ग्रेटर नोएडा इथल्या एका हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट झालो. मुलाला 22व्या माल्यावरचा फ्लॅट विकत घ्यायला भाग पाडले याचे एकमेव कारण या भागातील उद्यान बाल्कनीतून समोर दिसते. सकाळी उठल्यावर बाल्कनीत बसून चहा पिता-पिता उद्यानात फिरणार्‍यांना पाहून फिरण्याचा आनंद ही सहज मिळतो. हे उद्यान मोठे आहे,  पादचारी ट्रेक ही जवळपास एक किलोमीटरचा असेल. आठवड्यातून तीन ते चार दिवस तरी सकाळी उद्यानात फिरायला जातो.  उद्यानाचे तीन ते चार चक्कर मारतो. या उद्यानात किमान 250 चम्पाचे झाडे असतील. पूजेसाठी भरपूर फुल ही तोडतो, त्यामुळे सौ. प्रसन्न राहते. मला उद्यानात फिरताना समवयस्क आणि तरूणाशी गप्पा मारताना जाणवले, जिथे 20-25 वर्षांपूर्वी उद्यानात फक्त छोटी मुले खेळण्यासाठी, काही क्रिकेट खेळणारे आणि म्हातारे लोक उद्यानात फिरायला यायचे, आज मोठ्या संख्येत युवा शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी रोज सकाळी उद्यानात येतात. 

आजकाल उन्हाळा असल्यामुळे सकाळी 5 वाजण्यापूर्वी स्वास्थ्य साधक उद्यानात फिरायला येतात. अधिकान्श तरुण मुले कानाला स्पीकर लाऊन पादचारी ट्रेकवर धावतात किंवा जोरात चालतात. त्यात मुलींची आणि महिलांची संख्या ही भरपूर आहे. आमच्या सारखे सीनियर सिटीजन ही चालताना गप्पा मारत टाईमपास करतात. सकाळी आठ वाजे पर्यन्त उद्यानात लोकांची वर्दळ असते. हिवाळ्यात मात्र सकाळी दहा-अकरा पर्यन्त लोक उद्यानात फिरायला उद्यानात येतात. सुट्ट्यांच्या दिवशी सकाळी आठ नंतर क्रिकेट खेळणारी मुले येतात. या शिवाय एक संघाची शाखा इथे नियमित लागलेली दिसते. रोज पाच ते सात लोक असतात. पण रविवारी ही संख्या जास्त असते. सकाळच्या तीन-चार तासांत सात ते आठ जागी छोट्या-छोट्या ग्रुप मध्ये स्वास्थ्य साधक योग आणी व्यायाम करताना दिसतात. एक योग शिक्षक फी घेऊन योग शिकवितो. त्याच्याशी बोलताना कळले तो ग्राहकांच्या सुविधांनुसार ऑनलाइन कक्षा ही घेतो. बाकी आज त्याच्या सारखे हजारो योग शिक्षक ऑनलाइन किंवा ऑफ लाइन योग कक्षा घेतात. हजारो योग शिक्षकांना रोजगार आणि योगासाठी लागणारे साहित्यांचे उद्योग ही मोठ्या प्रमाणात देशात सुरू झाले आहे. 

या शिवाय एक योग कक्षा सकाळी पाचला सुरू होते आणि साडे सहा सात पर्यन्त चालते. पावसाळा असो किंवा घोर हिवाळा ही नियमित लागते. आजकाल किमान 25 ते 30 स्त्री पुरुष इथे योग आणि व्यायाम करताना दिसतात. ते महिन्यातून एकदा आर्यसमाज पद्धतीने हवन(यज्ञ) ही  करतात.  योगगुरूच्या प्रेरणेने देशात अश्या लाखाच्या जवळपास योग कक्षा चालतात. 

अधिकान्श लोकांचे उद्यानात येऊन फक्त फिरण्याएवजी योग आणि व्यायाम करण्याचे मुख्य कारण औषधांवर होणारा वाढता खर्च. आजच्या युवा पिढीला वाटते आजारी झाल्यावर लाखांच्या पॅकेजची नौकरी ही जाऊ शकते. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकडे तरुणांचा कल वाढत चालला आहे. जे उद्यानात येत नाही ते जिम मध्ये जातात.    

उद्यानाच्या दुसर्‍या बाजूला रस्त्यावर एक माणूस ठेल्यावर विभिन्न स्वास्थ्यवर्धक ज्युसेस विकतो. सकाळी तीन-चार तासांत त्याच्या भरपूर धंधा होतो. आजच्या घटकेला देशात हजारों ज्यूस विक्रेता सकाळी बाग-बगीच्यांच्या समोर स्वास्थ्यवर्धक ज्यूस इत्यादि विकतात. फार्मा कंपनीत काम करणार्‍या एक तरुण मुलगा सकाळी गप्पा मारताना, एका योग कक्षाकडे पाहत म्हणाला, योगगुरू मुळे लोकांची स्वास्थ्य प्रति जागरूकता वाढली आणि लोक योग आणि व्यायामाकडे लक्ष देऊ लागले आहे. त्यामुळे फार्मा कंपन्यांना दरवर्षी किमान लाख कोटींचे अंदाजे नुकसान होत आहे. भविष्यात हे वाढतच जाणार. आयएमए त्याच्या मागे झपाटलेल्या प्रेता सारखा लागलेला आहे, त्याचे मुख्य कारण हेच आहे.  गेल्या पंचवीस वर्षांत योगगुरू ने शेकडो योग शिविर घेऊन आणि आस्था चॅनल वर रोज नियमित अडीच तास योग कक्षा घेऊन लोकांमध्ये स्वास्थ्य प्रति जागृती वाढविली. त्यांच्या प्रयत्नांमुळे 21 जून हा जागतिक योगदिवस ठरला. आज  योग एक उद्योग झाला आहे आणि योग आधारित अनेक नवीन उद्योग आणि लाखो रोजगार ही निमित झाले आहे. योगदिवस  योगगुरू प्रति कृतज्ञता प्रगट करण्याचा दिवस ही आहे. 
   

Wednesday, June 4, 2025

तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार

आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्‍याने  ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर,  आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती. त्यांच्या उद्देश्य चीनचे केंद्रीय नेतृत्व कमकुवत करून जमले तर चीनचे तुकडे करण्याचा होता. पण चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी स्वतचे निजी स्वार्थ विसरून देश हितासाठी कठोर कार्रवाई केली. किमान दहा हजार लोकांना यमसदनी पाठविले होते अशी वाच्यता आहे. पण या घटनेनंतर चीन मधले सर्व लोकतंत्र समर्थक आवाज नष्ट झाले किंवा कठोरतापूर्वक दाबून टाकले. आज चीनचे युवा आंदोलन इत्यादि सोडून विकासाच्या कार्यात व्यस्त आहे. आज चीन आर्थिक आणि सैनिक महाशक्ती बनला आहे. जर चीन ने 24 जूनला कठोर कार्रवाई केली नसती तर काय झाले असते. रशियाचे उदाहरण आपल्या समोर आहे. त्या पूर्वी ही अमेरिकाने सीआयए मार्फत इराणच्या नेत्यांना आणि मीडियाला विकत घेतले होते. पंतप्रधान मोहम्मद मोसद्देकच्या विरोधात मोठ्या प्रमाणात दुष्प्रचार केला होता. त्याला सत्ता सोडण्यास भाग पाडले होते. रशियात ही अमेरिकेने तेच सूत्र वापरले.  अमेरिकाने शेकडो रशियन नेत्यांना विकत घेतले. त्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांशा वाढविल्या. मीडियाचा ही उपयोग केला. रशियाचे विभाजन झाले. शीत युद्धात अमेरिका विजयी झाला. फक्त काही लाख डॉलर खर्च करून. पुतीन सत्तेत आले, रशिया पुन्हा शक्तिशाली बनू लागला. आता सीआयए ने पुन्हा डॉलर, मीडिया आणि लालची नेत्यांचा वापर करून एका पाळीव कुत्र्याला यूक्रेनच्या सत्तेवर बसविले आणि त्याला रशियावर भुंकण्यासाठी सोडून दिले. यूक्रेन आणि रशिया युद्धाची किंमत मोजत आहे. दोन्ही देशांची कितीतरी ट्रीलियन डॉलरची संपत्ति नष्ट झाली असेल. दोन्ही कडचे हजारो सैनिक मरण पावले असतील. युक्रेन पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे आणि रशिया ही बर्‍यापैकी उध्वस्त झाला आहे. त्याच वेळी जर रशियाच्या शासकांनी कठोर निर्णय घेतला असता तर आज रशियाचे तुकडे दिसले नसते आणि संयुक्त रशिया अधिक उन्नत झालेला दिसला असता. जगात शांति ही असती. 

4 जून 1989च्या घटनेपासून भारताने काय शिकले पाहिजे. भारतात 1947 पासून लोकतंत्र आहे. भारताच्या राज्यांना भरपूर अधिकार आहे. मनात आले तर मुख्यमंत्री राज्यातले विकासाचे प्रोजेक्टस ही थांबवू शकतो. भारताच्या न्यायपालिकेचे बाबत तर काहीही बोलणे व्यर्थ आहे. न्यायाधीश तर स्वत:ला शासकच समजतात. लोकतंत्रच्या नावाने हे सर्व चालून जाते. भारतात ही अनेक नेत्यांच्या मनात स्वतंत्र देशाचे शासक होण्याची इच्छा आहे. त्यासाठी विदेशी मदत घेण्यात ही ते मागे पुढे राहणार नाही.  

गेल्या दहा वर्षांत भारताने अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांत भरपूर प्रगति केली आहे. भारताची प्रगति डीप स्टेटच्या डोळ्यांत खुपते. जॉर्ज सोरेस मार्फत डीप स्टेट ने  सत्तांतर करण्यासाठी किमान 7000 कोटी डॉलर भारतात खर्च केले, असे ऐकिवात आहे. डीप स्टेटने  मीडिया, एनजीओ इत्यादींच्या मदतीने किसान आंदोलनाच्या नावावर हजारों लोकांना  दिल्लीत घुसवून तियानानमेन सारखी परिस्थिति निर्माण करायची होती. पण भारताच्या शासकाने अत्यंत संयमी भूमिका घेऊन लाठीचा प्रयोग न करता आंदोलनकार्‍यांना दिल्ली बॉर्डर वर थोपवून ठेवले. हरियाणा निवडणूकीत जर भाजप पराजित झाली असती तर पुन्हा दिल्ली बॉर्डर वर ठाण मांडण्याचा आणि दिल्लीत घुसण्याचा हेतु तथाकथित आंदोलनकार्‍यांचा डाव होता. पण दिल्ली बॉर्डरला लागून असलेल्या हरियाणातील  मतदारांनी हे षड्यंत्र विफल केले. 

भविष्यात शासक कोणत्याही पक्षाचे का असेना, देशाला विभाजित करण्यासाठी सतांध नेत्यांचा, मीडिया, सोशल मीडिया इत्यादींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होईल. भविष्यात जर  तियानानमेन सारखे  दिल्लीत हजारो उपद्रवी घुसले तर त्यावेळच्या शासकांना कठोर निर्णय घ्यावाच लागेल. जर नाही घेतला तर रशिया प्रमाणे देशाचे तुकडे होतील. 4 जून 1989 आपल्याला हाच संदेश देतो. 


Monday, June 2, 2025

समर्थ विचार: कीर्तनकार आणि कीर्तन



हा लेख लिहाण्यापूर्वी अनेक विठू माऊलीचे गुणगान करणार्‍या आणि संतांच्या गाथा सांगणार्‍या वारकरी संप्रदायांच्या आणि इतर कीर्तनकारांचे कीर्तन यूट्यूब वर बघितले. कीर्तन बघताना मला जाणवले अनेक कीर्तनकारांना कीर्तनाचा उद्देश्य ही माहीत नाही. ते श्रोत्यांना प्रसन्न करण्यासाठी पांचट आणि राजनीतिक विनोद करतात. बहुतेक जास्त प्रसिद्धी आणि बिदागी साठी श्रोत्यांच्या मनोरंजनावर भर दिला जातो. ते संतांच्या कधी न केलेल्या चमत्कारांच्या गाथा ऐकवितात. आज महाराष्ट्रात आणि देशात कीर्तनाच्या माध्यमाने सत्य आणि धर्म मार्गावर चालण्याची आणि स्वधर्म रक्षणाची प्रेरणा देणारे कीर्तनकार कमीच. समर्थांनी दासबोधात कीर्तन कसे करावे, हे सांगितले असले तरी वारकरी कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनात समर्थांचा उल्लेख केलेला मला तरी दिसला नाही. काही कीर्तनकार तर कीर्तनाची आड  घेऊन जातिगत द्वेष वाढविण्याचे कार्य ही परोक्ष रूपेण करतात. त्या बाबत जास्त बोलत नाही. त्यांच्या दृष्टीने टाळ मृदंग वाजवून भगवंताचे गुणगान करणे म्हणजे कीर्तन. आजच्या लेखात कीर्तनकार कसा असावा आणि कीर्तन करण्याचा उद्देश्य काय असावा यावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. 

समर्थ म्हणतात, कीर्तनकाराची वेशभूषा स्वच्छ असली पाहिजे. त्याची आवाज उत्तम असली पाहिजे. त्याला नृत्य आणि संगीताचे थोडे बहुत ज्ञान असायला पाहिजे. कीर्तन करणार्‍याला कीर्तन करण्याचा उद्देश्य ही माहीत असला पाहिजे. त्यासाठीच समर्थ म्हणतात, नाना वचनें प्रस्ताविक. शास्त्राधारें बोलावीं. भक्ति ज्ञान वैराग्यलक्षण. नीती न्याय स्वधर्मरक्षण.  कीर्तनकाराने धार्मिक ग्रंथांचा अभ्यास आणि पाठांतर केले पाहिजे. कीर्तनकाराने वेद, उपनिषद, श्रुति आणि स्मृतिंची थोडी माहीत घेतली पाहिजे. किमान भगवद्गीता तरी वाचली पाहिजे. दासबोध आणि सत्यार्थ प्रकाश सारखे ग्रंथ अवश्य वाचले पाहिजे. ग्रंथांचा अभ्यास केल्याने किंवा नुसत्याच वाचनाने सुद्धा सनातन धर्माविषयी कीर्तनकाराच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन ही होईल आणि त्याला कीर्तन करताना ग्रंथातले उदाहरण देऊन श्रोत्यांच्या मनातील शंका ही दूर करता येतील. 

फक्त भगवंताच्या लीलांचे गुणगान आणि चमत्कारांचे वर्णन म्हणजे कीर्तन नव्हे. आपल्या ऋषींनी मानवी आयुष्याला चार आश्रमात विभाजित आहे. ब्रम्हचारी आश्रमात शिक्षा ग्रहण करणे, ग्रहस्थ आश्रमात धर्म मार्गावर चालत प्रचंड पुरुषार्थ करून सांसारिक भोग भोगणे, वानप्रस्थ आश्रमात संसारीक भोगापासून विमुक्त होण्याचा प्रयत्न करणे आणि नंतर संन्यास आश्रमात मोक्षाची वाटचाल करणे.  

कीर्तनकाराने कीर्तन असे केले पाहिजे की  श्रोत्यांच्या मनात भगवंता प्रति प्रेम आणि श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. त्यांच्या  मनात सकारात्मक ऊर्जा निर्मित झाली पाहिजे, पुरुषार्थ करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यांच्यात परस्पर प्रेम आणि सौहार्द उत्पन्न झाला पाहिजे. नीती आणि न्याय म्हणजे काय, हे श्रोत्यांना समजले पाहिजे. कीर्तनकाराने श्रोत्यांना स्पष्ट केले पाहिजे, भगवंत शरीर रूपी रथाला सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवितो, त्याच मार्गावर चालत सांसारीक आणि आध्यात्मिक मार्गात चालण्यासाठी पुरुषार्थ करणे हे जीवाचे कार्य आहे. भगवंत चमत्कार करत नाही. आपण जर धर्माच्या मार्गावर चालू तर प्रत्यक्ष भगवंत आपल्या रथाचे सारथी बनतील. कर्म हे आपल्यालाच करायचे आहे. कीर्तनकाराने, श्रोत्यांना भगवंताचे नियमित नामस्मरण केल्याने सांसारीक कार्यांत नियमितता कशी येते,  गुरुचरणी बसून विद्या अध्ययन करून ज्ञान कसे प्राप्त करावे, इत्यादींचे उदाहरण देऊन श्रोत्यांना सांगितले पाहिजे.  कीर्तन ऐकून श्रोत्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना मोक्षाच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा मिळाली तरच कीर्तन सार्थकी लागते. 

स्वधर्माच्या रक्षणाला समर्थ अधिक महत्व देतात. कारण धर्म जीवित राहील तरच धर्म तुमचे रक्षण करणार. त्यासाठीच समर्थांनी शोर्याचे प्रतिक मारुतीच्या मंदिरांची स्थापना आपल्या मठांत केली होती. आज ही अनेक आखड्यांत मारूतीचे मंदिर असते. असो. नुकतेच पहलगांव हल्यात एका ही व्यक्तीने आतंकींचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे मुख्य कारण कीर्तनकार मग ते भागवत कथा करणारे असो किंवा भगवती जागरण करणारे असो, श्रोत्यांना अधर्माविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणाच देत नाही. परिणाम, संत म्हणजे चमत्कार करणारे सिद्ध पुरुष अशीच श्रोत्यांची कल्पना झाली आहे. त्यांची पूजा अर्चना केल्याने सर्व संकटे दूर होतील अशीच आशा श्रोत्यांना असते.  अधर्माविरुद्ध संघर्ष न करण्याची प्रेरणा न मिळाल्याने  गत काळात आपली मंदिरे विध्वंस झाली. धर्माचा विध्वंस झाला. बहुधा देश आणि धर्माची अवस्था पाहूनच तुलसीदासांनी रामचरितमानसाची निर्मिती केली असावी. धर्माचा खरा अर्थ कळला पाहिजे याच साठी समर्थांनी दासबोधाची रचना केली. आजची परिस्थिति ही वेगळी नाही. आज कीर्तन करताना, कीर्तनकाराने स्वधर्म रक्षण करणारे छत्रपति, राणा प्रताप इत्यादींच्या शोर्याच्या एखाद्या गाथेचे अवश्य वर्णन केले पाहिजे. कीर्तन ऐकून श्रोत्यांना स्वधर्म रक्षणाची प्रेरणा मिळाली पाहिजे. मला एकाने विचारले तुमचा आवडता कीर्तनकार कोण? मी उत्तर दिले समर्थांनी कीर्तनकाराच्या जे गुण संगितले आहे ते ज्या माणसात आहे तो. ज्याला वेद, उपनिषद, स्मृति, श्रुति, षड दर्शन यांचे ज्ञान आहे. जो विरक्त सन्यासी आहे. ज्याला भगवद्गीता तोंडपाठ आहे. ज्याची आवाज आणि वाणी मधुर आहे. पंचवीस वर्षांपासून रोज सकाळी त्याचे कीर्तन अखंड सुरू आहे. जो श्रोत्यांना पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देतो, स्वस्थ आणि निरोग राहण्याचा मंत्र देतो. धर्म आणि सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.  ज्याचा प्रेरणेने आज देशातील हजारो उद्यानात योग कक्षा चालतात.  ज्याचा रूपात मला नेहमीच  समर्थांचे दर्शन होते. असो. 

 


 






 

 
 

Monday, May 26, 2025

म्हशीची कथा

म्हैस निळसर काळ्या रंगाची असते. काळ्या रंगाची महिमाच न्यारी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सृष्टी निर्मात्याला निळाई म्हणून संबोधित केले आहे. सृष्टीचे पालनहार विष्णुही श्याम रंगाचे आहेत. सृष्टीचे विनाशकर्ता भगवान शिव ही काळ्या रंगाचे आहेत. अर्थात ईश्वर किंवा गॉड हा काळ्या रंगाचा आहे. दुष्टांचा विनाश करणारी काळी माता ही श्याम  रंगाची आहे. काळ्या गायीला पवित्र मानल्या जाते.  म्हैस तर काळीच आहे. मग म्हशीच्या शरीरात देवतांचे निवास का नाही, म्हशीला कामधेनु प्रमाणे महत्व का नाही,  असे अनेक प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतात. पण एक कथा धार्मिक ग्रंथात आहे, महादेवाने महिषाचे रूप धारण केले होते. आज केदारनाथ मध्ये महादेवाच्या महिष स्वरूपाची पूजा होते. यमराज ही महिषावर स्वार होऊन पृथ्वी लोकातील प्राण्याचे प्राण हरतात. अर्थात काही प्रमाणात म्हशीला ही देवत्व प्राप्त झाले, असे म्हणता येईल. पण गायीशी तिची तुलना होऊ शकत नाही. कामधेनु समुद्र मंथनातून प्रगट झाली होती म्हणून गायीला देवांपेक्षा श्रेष्ठ दैवीय स्वरूप प्राप्त झाले. म्हैस तर पृथ्वी लोकातील, त्यात ही भारतातील मूळ प्राणी. हिंदीत म्हण आहे, "घर की मुर्गी दाल बराबर" म्हणून कदाचित म्हशीला दैवीय स्वरूप प्राप्त झाले नाही.  आज ही म्हैस भारतात काजिरंगा आणि छत्तीसगढच्या जंगलात मूळ जंगली स्वरुपात आढळते. असो. 

जंगलात राहणार्‍या म्हशीला पाळीव कोणी आणि केंव्हा केले. याबाबत अनेक कथा आहेत. राजा सत्यव्रताला स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. ऋषि विश्वामित्राने सत्यव्रतासाठी पृथ्वीवर प्रतिसृष्टी निर्मित केली. विश्वामित्राने जंगलात राहणार्‍या म्हशीला दुधासाठी पाळीव प्राणी बनविले. त्याचे मुख्य कारण म्हैस ही गायी पेक्षा जास्त दूध देते. म्हशीच्या दुधात स्निग्धता आणि प्रथिने जास्त असतात. म्हशीचे दूध प्राशन करून शरीर बलवान बनते. याशिवाय म्हैस शांत स्वभावाची असते. विश्वामित्राला हेच पाहिजे होते. चक्रवर्ती सम्राट नहुषपाशी म्हशीचे दूध प्राशन करून बलवान झालेले  सैन्य होते म्हणून त्याला स्वर्गाचे इंद्रपद मिळाले. सदेह स्वर्गात जाऊन इंद्रपदावर बसणारा एकमात्र मानव, हा सम्राट नहुष होता. म्हैस शक्तीची प्रतीक आहे. गाय मात्र दीन दुबळ्यांचे प्रतीक. राजाच्या प्रमुख राणीला राजमहिषी म्हणून संबोधित केले जाते. राजगौ म्हणून नाही. हीच आहे म्हशीची महत्ता. म्हशीचे दूध प्राशन करून पंजाब, हरियाणात पैलवान तैयार होतात. महाराष्ट्रात ही कोल्हापूर क्षेत्रे म्हशीचे दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तिथे ही पैलवान जास्त आहे. कोल्हापूर येथील म्हशीच्या दुधाची रबडी प्रसिद्ध आहे. तीन दिवस नृसिंहवाडी आणि कोल्हापुरात होतो. कोलेस्ट्रॉल वाढण्याची पर्वा न करता रोज म्हशीच्या दुधापासून बनलेल्या रबडी वर ताव मारला. सैन्यात जाण्याची इच्छा असणार्‍या, खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या  मराठी तरुणांनी म्हशीचे दूध अवश्य प्राशन केले पाहिजे. 

गाय म्हातारी झाली किंवा तिने दूध देणे बंद केले की तिला गोपालक गोशाळेत सोडतात. तिथे जागा नाही मिळाली की रस्त्यावर सोडतात. जिथे कचरा खात गाय शेवटची घटका मोजते. याशिवाय गो तस्कर आणि गो भक्त यांच्यात होणार्‍या हाणामारीत अनेकांचे प्राण ही जातात. 

म्हातार्‍या म्हशींची काळजी घेण्यासाठी गोशाळा प्रमाणे म्हैसशाळा नाही.  अधिकान्श म्हशी म्हातार्‍या होण्यापूर्वीच कसायांना विकल्या जातात.  आयुष्यभर दूध देणारी म्हैस ही, तिला कसायाला देणार्‍या कृतघ्न माणसाला,  मरण्यापूर्वी  काही हजार रुपये देऊन जाते. म्हशीला खरे गांधीवादी म्हणता येईल. म्हशीचे मांस आणि चर्म विकून भारताला भरपूर विदेशी मुद्रा मिळते. असो. 


Thursday, May 22, 2025

तोरई (दोडके) कोथिंबिर सूप




आज सकाळी सौ. मुगाची डाळ टाकून दोडक्याची भाजी बनवत होती. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 300 ग्राम, उरले होते. अचानक अनेक महिन्यांपासून सुप्त असलेला माझ्यातला पाकशास्त्री जागृत झाला. दोन दिवस आधीच आठवडी बाजारातून सौ. ने भरपूर कोथिंबिर ही आणली होती. डोक्यात विचार आला. आज आपण दोडके आणि कोथिंबिर सूप बनवू. सौ. ने नाश्त्यासाठी पोहे बनविले होते. कोथिंबिर कापल्या नंतर काड्या उरलेल्या होत्या. त्या सोबत जवळपास 50 ग्राम कोथिंबिर ही घेतली. स्वाद वाढविण्यासाठी एक टमाटो ही घेतला.  एक आल्याचा तुकडा ही घेतला. सर्व साहित्य कापून कुकर मध्ये टाकले. (घरी काळी मिरी नसेल तर एक हिरवी मिरची ही कापून कुकर मध्ये घालू शकता). कुकर गॅस वर ठेऊन दोन शिट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाल्यावर साहित्य मिक्सर मधून काढून भांड्यात टाकले. चार बाउल सूप झाले पाहिजे म्हणून अंदाजे पानी ही भांड्यात मिसळले. आता भांडे गॅस वर ठेऊन एक उकळी येऊ दिली. त्यात अर्धा चहाचा चमचा काळी मिरी, जिरा पाउडर आणि स्वादानुसार सेंधव मीठ टाकले. गरमागर्म सूप बाउल मध्ये टाकून त्यावर लोणी टाकले. नंतर एक फोटू काढला. पोहया सोबत हे सूप पिताना अत्यंत स्वादिष्ट लागले. लहान मुले ही हे सूप आनंदाने पिणार याची ग्यारंटी मी देऊ शकतो. 

टीप: घरात लोणी नसेल तर दुधावरची साय ही सुपात टाकली तरी स्वाद उत्तम लागेल. 









Tuesday, May 20, 2025

जागो ग्राहक: तुमच्या टमाटो केचप मध्ये टमाटो पेस्ट किती


आमच्या घरी पतंजलि टमाटो केचप येतो. महिन्यातून एकदा घरापासून 11 किमी दूर असलेल्या पतंजलि मेगास्टोर मधून महिन्याचा किराणा आणतो. टमाटो केचप ही तिथून विकत घेतो. पतंजलि टमाटो केचप मध्ये 28 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत फक्त 17 पैसे प्रति ग्राम. दुसरी कडे सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या किसान मध्ये 14.6 टक्के टमाटो  पेस्ट असते आणि किंमत 19 पैसे प्रति ग्राम. काही ब्रण्ड्स मध्ये तर आणखीन कमी टमाटो पेस्ट असते आणि किंमत जास्त असते. तुम्ही पण आपल्या घराचे टमाटो केचप तपासून बघा. 

काही दिवसांपूर्वी टमाटो केचप संपले. सोसायटीच्या बाहेर मार्केट आहे. तिथल्या दुकानदाराला विचारले. तो म्हणाला आम्ही पतंजलिचे समान ठेवत नाही. ते 15 टक्के पेक्षा जास्त मार्जिन देत नाही. इथले भाडे आणि रखरखवसाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो. दूध, दही, अन्न-धान्यात मार्जिन मिळत नाही. त्यामुळे इतर वस्तूंत किमान 25 टक्के मार्जिन मिळाले पाहिजे अशी अपेक्षा असते.  त्याचे म्हणणे खरे होते. नोएडात पतंजलि स्टोर गावांत आहेत. शहरी माल आणि मार्केट एखाद दुसरे असेल. दुकानदार फक्त जास्त विकणारी वस्तुसाठी कमी मार्जिन घेतील. उत्तम दर्जाचे उत्पाद विकण्यात त्यांचा किंचित ही उद्देश्य नसत. त्यांना ग्राहकांची काळजी मुळीच नसते. ग्राहक ही आळशी असतो तो कधीच पॅकेट वर लिहलेले वाचत नाही. तो फक्त ब्रॅंड पाहतो. पतंजलि आणि किसानच्या पॅकेटांचे चित्र खाली दिले आहे. तुम्हीच ठरवा कोणते केचप विकत घ्यायचे. 











Friday, May 16, 2025

कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या. सरकारचा मुख्य उद्देश्य देशात गायीच्या दूधाचे उत्पादन वाढविणे आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे होता. आज ही अनेक राज्यांत गाय पाळण्यासाठी सरकार अनुदान देते. गौ सेवा केल्याने शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारले. दूध आयात कमी झाला. आज आपण दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात ही करतो. देशात १९ कोटी गायी आहेत त्यात 5 कोटी विदेशी आणि संकर गायी आहेत. त्यात 13 कोटी गायी दूध देणार्‍या आहेत. दुधाचे उत्पादन 2014-15 मध्ये 146.3 एमटी होते जे वाढून 23-24 मध्ये 239.2 एमटी झाले. दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात 2014 मध्ये 141.39 मिलियन युएस डॉलर होता तो 23-24 मध्ये वाढून 272.64 मिलियन डॉलर झाला. देशात अमूल, मदर डेअरी, नंदिनी सारखे मोठे ब्रॅंड तैयार झाले. कोट्यवधी शेतकर्‍यांना त्याच्या लाभ झाला. असो 

आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे. आज ही आपण  यज्ञ हवन आणि धार्मिक समारंभात आपण गायीच्या गोवार्‍यांच्या उपयोग करतो. पूर्वी आणि आज ही गावांत घर शेणाने सावरतात. पावसाळ्यानंतर घराच्या भिंतींचा रखरखाव करण्यासाठी ही शेणाचा उपयोग होतो. गायीच्या शेणापासून, उदबत्ती, धूप, संभ्राणी कप, हवन कप, दिवे इत्यादि पूजा सामग्री बनतात.  आता तर भिंती रंगविण्याचे पेंट ही शेणा पासून बनू लागले आहेत. 

शंभर वर्षांपूर्वी आणि आज ही भारतात ग्रामीण भागात आणि जगात अनेक भागांत घरांच्या निर्मिती साठी माती आणि शेणाचा वापर होतो. काही वर्षांपूर्वी अशोक नगर जवळ एका मराठी जमींदाराच्या शेताला भेट दिली होती. बाहेर भयंकर गरमी होती पण शेतात असलेल्या मातीच्या (माती आणि बांबू वापरुन पूर्वी घरे बनत होती) आणि वरती मातीची  कौलारू छत)  घरात वातावरण थंड होते. मातीच्या घरांच्या निर्मिती आणि रखरखावचा खर्च अत्यंत कमी असतो. या शिवाय भूकंप इत्यादि आल्या तरी तुमचे प्राण वाचण्याची शाश्वती. आज गायीच्या शेणापासून वीट,टाईल्स बनतात. शेणापासून बनलेल्या वैदिक प्लास्टरचा आणि पेंटचा उपयोग केला तर घराचे तापमान बाहेरपेक्षा आठ ते दहा डिग्री कमी राहते.  घराच्या निर्मितीचा खर्च ही कमी येतो. याशिवाय ज्याच्या कडे गाय आहे. तो गोबर गॅसचा वापर करू शकतो आणि खत तर बाई प्रॉडक्ट म्हणून तैयार होणारच. घरासाठी शेणाचा वापर पर्यावरणाला पोशाक ही आहे आणि खर्च वाचविणारा ही आहे.  

आज अधिकान्श शेतकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. सरकारी ही रासायनिक खतांवर भारी भरकम अनुदान देते.  पण जेवढा शेतकर्‍यांचा खर्च वाढत जातो तेवढे उत्पादन मिळत नाही. या शिवाय कितीही रासायनिक शेती केली तरी दर दोन किंवा तीन वर्षानी प्रति हेक्टर 12 ते 15 टन शेण खत विकत घेऊन  शेतात टाकावे लागते. किमान तीस ते 50 हजार खर्च करावा लागतो. 

देसी गायीच्या गौ मूत्रात असंख्य सक्रिय संयुगे असतात. मुख्यत: नाइट्रोजन, युरिया आणि खनिज इत्यादि ज्यांचा वापर खत आणि कीटनाशक बनविण्यात वापर होतो. गौ मूत्रात तांबे, लोह आणि जास्त सारखी खनिजे सापडतात जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. गायीच्या शेणात ही असंख्य संयुगे असतात. नायट्रोजन, फास्फोरस, पोटाशीयम असतात. असंख्य सूक्ष्मजीव असतात जे मातीच्या आरोग्यासाठी आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. शेतीत गौ मूत्र आणि शेणाच्या वापराने शेत जमीन सुपीक आणि समृद्ध होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते. एखाद वर्षी पाऊस कमी झाला तरी शेती होऊ शकते. पण यांच्या जास्त वापराने जमिनीचा पोत बिघडतो. कालांतरात जमीन नापीक होते. जमिनीतील पानी ही प्रदूषित होते. कृषि वैज्ञानिकांच्या मते विशेषकरून रासायनिक खतांचा वापर कमी झाला नाही तर भविष्यात जमिनीतील पानी पिण्याचे सोडा ओंघोळीच्या लायकीचे राहणार नाही. आज रासायनिक खतांचा आणि किट नाशकांचा परिणाम शेतकर्‍यांना भोगावा लागतो आहे. एक तर  शेतीचा खर्च वाढला दूसरा लाखो शेतकरी कॅन्सर ग्रस्त  होतात.  पंजाबातून बिकानेरला जाणार्‍या गाडीचे नावच कॅन्सर ट्रेन पडले आहे. रासायनिक खत आणि किटनाशक वापरुन पिकावलेले अन्न ही विषाक्त असते. अश्या अन्नाचे सेवन करून कोट्यवधी लोक दरवर्षी रोगग्रस्त होतात. हजारो कोटी उपचारावर खर्च होतात. आज हजारो शेतकरी पुन्हा गोमय आधारित शेतीकडे वळत आहे किंवा स्वत:च्या वापरासाठी उपयोग करत आहे. 

आयुर्वेदात रूग्णांच्या उपचारासाठी पंचगव्याचा वापर होतो. गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो. आज मोठ्या प्रमाणात गौ मूत्रावर संशोधन सुरू आहे. फिनायाल एवजी घरात  गोनायलने  (डिस्टील गो मूत्र आणि पाणी,  कडू लिंब, निलगिरी, वज आणि पाईन तेल पासून) फरशी पुसली तर किटाणू आणि जिवाणू पासून सुरक्षा ही मिळते आणि अपायकरक ही नसते. आज हजारो गोशाला गोनायल, आंघोळीचे साबण आणि गो अर्क बनवितात.  एका स्वदेशी कंपनी ने 100 कोटीहून जास्त रुपयांचे गो अर्क आणि गोनायल गेल्या वर्षी विकले. शेतकर्यांना ही गोमूत्र विकून एका लीटरचे पाच ते दहा रुपये  सहज मिळतात. गेल्यावर्षी   गोमय  निर्मित वस्तूंचा 400 कोटींचा निर्यात आपण केला. 

जर गोपालक आणि शेतकर्‍याने गोमयचा आर्थिक दृष्टीकोणातून उपयोग केला तर गौ मूत्र आणि शेण यातून विभिन्न जीवनावश्यक उपयोगी पदार्थांची निर्मिती करून  गायीच्या दुधापेक्षा जास्त कमाई करू शकतो.  शेतकरी एक गाय पाळून किमान एक हेक्टर शेतीत गौ मूत्र आधारित किटनाशकांचा  आणि शेण आधारित खतांचा उपयोग करून खर्च वाचवू शकतो. जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जमिनीची सुपीकता आणि पाणी धरण करण्याची क्षमता वाढवू शकतो. जास्त नफा मिळवू शकतो. 

गायीच्या गौ मूत्र आणि शेणाचे आर्थिक महत्व आपल्या ऋषींना माहीत होते म्हणून ते म्हणाले   "गोमय वसते लक्ष्मी


Friday, May 2, 2025

समर्थ विचार: पाद सेवन भक्तिचे सांसारिक महत्व


पाद सेवन तेंचि जाणवें.
काया वाचा मनोभावें. 
सद्गुरूचे पाय सेवावे. 
सद्गतीकारणे.  
(दासबोध ४/२)

पाद सेवन भक्ति म्हणजे गुरूचे पाय चेपणे नव्हे. समर्थ म्हणतात सद्गुरूने दिलेल्या मंत्राचा अर्थात ज्ञानाचा, काया वाचा मनोभावे जप करणे अर्थात त्यावर मनन चिंतन करणे. प्राप्त ज्ञानाचा उपयोग कसा  करवा हे जाणून घेणे. सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाचा संसारीक जीवनात आणि अध्यात्माच्या प्रवासात उत्तम रीतीने वापर केल्यानेच आध्यात्मिक आणि संसारीक मार्ग सुकर होतो. समर्थ पुढे म्हणतात,  
 
जें अभ्यासें अभ्यासितां नये.
जें साधनें असाध्य होये. 
तें हें सद्गुरूविण काये. 
उमजों जाणे. 
(दासबोध ४/२०)

अभ्यास करून, पुस्तके वाचून, यूट्यूब, एआईची मदत घेऊन ज्ञान प्राप्ती होऊ शकते. पण ज्ञानाचा वापर कसा करावा हे कळू शकत नाही. त्यासाठी त्या क्षेत्रातील सद्गुरू शोधावा लागतो आणि त्याच्या कडून ज्ञानाचा सांसारिक पक्ष  शिकवा लागतो. त्यासाठी  भगवद्गीतेत, भगवंत म्हणतात: 

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: || 34 ||

आयटीआय मधून एकाने ऑटोमोबाइल मध्ये डिप्लोमा घेतला. लगेच गराज उघडून तो गाड्या ठीक करू शकणार का? उत्तर नाही. त्याला त्या क्षेत्रातील उत्तम उस्तादाकडे जावे लागेल. श्रद्धापूर्वक त्याची सेवा करावे लागेल. विनम्रतेने प्रश्न विचारून मनातील शंका दूर करून घ्यावा लागतील.  या साठी त्याला सतत उस्तादच्या सांधित्यात राहावे लागेल. त्याला रोज 18 तास काम करावे लागले तरी त्याने ते पूर्ण श्रद्धेने केले पाहिजे. तेंव्हाच त्याला उस्ताद कडून कामाचे बारकावे शिकायला मिळेल. त्यानंतरच तो स्वत:चे गराज उघडून गाड्या दुरुस्तीचे काम उत्तम रीतीने करू शकेल. 

डॉक्टर असो, वकील असो किंवा किराण्याची दुकान उघड्याची असेल,  सर्वांना सद्गुरूची (त्या क्षेत्रातील जाणकार) सेवा करून प्राप्त विद्येचा उपयोग कसा करवा हे शिकावे लागते. सद्गुरूच्या चरणी बसूनच  सांसारिक उन्नतीचा मार्ग आपल्याला सापडतो. हेच पाद सेवन भक्तीचे सांसारिक महत्व आहे.   




Monday, April 21, 2025

समर्थ विचार: ग्रंथ वाचल्या शिवाय नाव ठेवणारा मूर्ख असतो

समूळ ग्रंथ पाहिल्याविण. 
उगाच ठेवी जो दूषण. 
गुण सांगतां पाहे अवगुण. 
तो एक पढत मूर्ख. 
(दासबोध: 2.10.26)

समर्थ म्हणतात कोणत्याही ग्रंथाची समीक्षा करण्यापूर्वी तो ग्रंथ वाचला पाहिजे. उत्तम गुरूंकडून त्या ग्रंथातील शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतर त्या ग्रंथाची समीक्षा केली पाहिजे. ग्रंथातील गुण आणि दोष इत्यादीचे चिंतन आणि मनन करून, त्या ग्रंथाचा सार ग्रहण केला पाहिजे. त्या ग्रंथातील गुण आपल्याला घ्यायचे आहे आणि दोष टाकून द्यायचे आहे. 

कबीर दास ही म्हणतात:  

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय.
सार -सार को गहि थोथा देई उड़ाय.

ज्या प्रमाणे धान्यातील भूसा, कचरा, खड़े इत्यादि धान्यातून वेगळे करण्यासाठी सूपाला हाताने जोरात फटकारावे लागते. हाताने सूप फटकारताना  डोक्याचा आणि डोळ्यांचा वापर ही करावा लागतो. तसे नाही केले तर कचर्‍या सोबत धान्य सूप फटकारताना उडून जाईल.  

आपले अधिकान्श ग्रंथ अत्यंत प्राचीन असल्याने आणि त्या वेळी प्रिंटिंग प्रेसचे अस्तित्व नसल्याने, अनेक सुलेखकांनी त्यात भेसळ केली आहे. ती चांगली आणि वाईट दोन्ही आहे. त्यामुळे प्राचीन ग्रंथ वाचताना, कबीरदासचा हा दोहा नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे. माझा एक दलित कबीरपंथी सहकारी होता. मनुस्मृती बहुतेक ब्राह्मणांनी दलितांना गुलाम बनविण्यासाठी लिहली असावी असे त्याचे मत होते. पण त्याला वाचण्याची आवड होती. एक दिवस लाईब्रेरीतून मनुस्मृती आणून त्याला वाचायला दिली आणि म्हंटले,  कबीरदासच्या नजरेतून या पुस्तकातील गुण दोष वेगळे करून तुझे मत मला सांग.  काही दिवसांनी त्याने पुस्तक परत केले आणि म्हणाला बहुतेक धर्म आणि दलित विरोधी नेताच मनुस्मृतीचा विरोध करतात. त्याच्या विचारात झालेल्या बदलाने मी ही आश्चर्यचकीत झालो.

आपल्या देशात बिना वाचता ज्या ग्रंथला जाळल्या जाते तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती, स्त्री, पुरुष, ब्राह्मण, शूद्र सर्वांना शिक्षणाचा अधिकार देते. गुरुकुलांत शिक्षण प्रारंभ करताना ब्रम्हचारी आणि ब्रम्हचारिणी सर्वांचा यज्ञोपवीत होत असे. सर्वांना स्नान संध्याचा अधिकार होता.  आज ही माझ्या माहीत प्रमाणे आर्यसमाज गुरुकुलांत आणि बाबा रामदेवच्या शाळांत सर्वांचा यज्ञोपवीत होतो. यू ट्यूब वर व्हिडिओ दिसतील. शिक्षणानंतर योग्यते अनुसार वर्ण ठरत असे. त्याकाळी ब्राम्हण कुळात जन्मलेला विद्यार्थी ही शूद्र होत असे आणि शूद्र ही ब्राम्हण होत होता. उदा. रत्नाकर ते वाल्मिकी, वैश्या पुत्र सत्यकाम जाबाली आणि महामुनी व्यास तर धीवर कन्येपासून विवाह बाहय संबंधातून उत्पन्न झाले होते. आपल्या संविधानात जाती जन्मानुसार आहे. आज शूद्र  ब्राम्हण बनू शकत नाही. मनुस्मृती शिक्षणात भेदभाव करत नाही. वयाच्या आठ वर्षांनंतर सर्व मुलांनी गुरुकुलात राहावे असा निर्देश मनुस्मृतीत आहे. बाल विवाहाचा ही निषेध मनुस्मृतीत आहे. रजस्वला झाल्यानंतर 36 महिन्यांनंतर अर्थात वयाच्या 16 वर्षांनंतरच  स्त्रीचा  विवाह झाला पाहिजे अशी व्यवस्था मनुने दिली आहे. विवाह पूर्वी स्त्रीचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे होते. मनुने विधवेला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार दिला आहे. पुत्र प्राप्त करण्याचा अधिकार ही दिला आहे. महाभारतात तो कुंतीने वापरला ही आहे. मनुस्मृती तर एकाच अपराधासाठी शुद्राला सर्वात कमी दंड  (कारण तो बुद्धीने न्यून आहे), त्याच्या आठ पट जास्त वैश्याला, 32 पट जास्त क्षत्रियाला आणि 64 पट ब्राह्मणाला. राजाला तर सहस्त्र पट जास्त. इत्यादि इत्यादि. तो जिज्ञासु असल्याने मनुस्मृती वाचून त्याचा दृष्टीकोण बदलला. त्याचे विचार बदलले. 

बाकी मूर्ख माणसांना धान्यात असलेले तांदूळ, गहू दिसणार नाही. त्यांना फक्त कचरा, खडे, दगड इत्यादि दिसतात आणि ते सर्व धान्य उडवून लावतात. तसेच ग्रंथांना नावे ठेवणारे आणि ग्रंथांना जाळणारे असतात. बाकी दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी म्हंटले आहे, ज्याचा मनात जैसा भाव,  तसेच फळ ग्रंथ वाचून मिळते.


Saturday, April 19, 2025

समर्थ विचार: तमोगुणी भक्ति म्हणजे जिवंतपणे नरक यातना भोगणे

मानवीय जीवनाचे उद्दीष्ट धर्म मार्गावर चालत अर्थार्जन करणे, त्या धनाचा उपयोग स्वतच्या परिवारसाठी आणि समाज कल्याणसाठी करणे, हळू-हळू भौतिक सुखांचा त्याग करत अध्यात्माची वाटचाल करून मोक्षाची प्राप्ती करणे. धर्म मार्गावर चालण्यासाठी स्वस्थ शरीर आणि मन पाहिजे. पुरुषार्थ करण्याची क्षमता पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगति करण्यासाठी नानाविध धार्मिक ग्रंथांचे श्रवण आणि मनन करावे लागते, उत्तम गुरूंकडून समजून घ्यावे लागते आणि आचरणात उतरवावे लागते. या साठी पुरुषार्थ हा करावाच लागतो.तेंव्हाच आध्यात्मिक क्षेत्रात साधकाची प्रगति होते. आध्यात्मिक मार्गावर चालण्यार्‍या साधकाला आत्मसंतोष रूपी स्वर्ग सुखाची प्राप्ती तर याच जीवनात  होते

पण माणूस स्वभावाने आळशी असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात पुरुषार्थ करू शकत नाही. मग तो भौतिक आणि आध्यात्मिक जगात  प्रसिद्धीसाठी  सौपा आणि तामसिक मार्ग निवडतो. त्याला वाटते शरीराला कष्ट देणार्‍या तामसिक मार्गाचा अवलंबन करून या लोकात सहज स्वर्ग सुख भोगता येते आणि मोक्षाची प्राप्ती ही होते. 

समर्थांनी दासबोधातील दुसर्‍या दशकातील सहाव्या समासात भगवंताला प्रसन्न करण्यासाठी किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी  शरीराला त्रास देण्याच्या प्रकारांचे वर्णन केले आहे. उदा. गळ टोचून घेणे, निखर्‍यावरून चालणे, जिभेला टोचून घेणे, देवतेले जीभ अर्पित करणे, डोक्यावर पेटलेल्या सरक्या ठेऊन चालणे, एक हात सदैव उंच ठेऊन वाळवून घेणे, स्वत:ला गळ्या पर्यन्त जमिनीत पुरून घेणे इत्यादि इत्यादि. काही तामसिक भक्त आपले शिर देवतेला अर्पित करून देतात तर काही देवाच्या दारी निराहार राहून प्राण त्याग करतात. अश्या तामसिक भक्तांना आत्महत्येचे पाप भोगावे लागते. नुकताच कुंभ मेला पूर्ण झाला. समर्थांनी वर्णन केलेले सर्व तामसिक प्रकार या मेळाव्यात  दिसले.   

अनेक महीने एक हात सतत उंच ठेवला तो वाळून जाईल. शरीराला कष्ट होईल. ईश्वराची प्राप्ती होणार नाही. देवतेला जीभ कापून अर्पित केल्याने साधक आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. याच प्रमाणे नाना प्रकारे शरीराला कष्ट दिल्याने साधकाला शारीरिक कष्ट होईल. जीवंतपणी नरक यातना सोसाव्या लागतील. ईश्वर प्राप्ती निश्चित होणार नाही. मोक्ष प्राप्तीचा प्रश्नच येत नाही. त्याला उदर निर्वाहासाठी काही काळ दान-दक्षिणा अवश्य मिळेल. अश्या अनेक तामसिक मार्गावर चालणार्‍या साधकांना काही काळानंतर पश्चाताप होतो. पण अधिकान्शांच्या बाबतीत वेळ निघून गेलेली असते. जीर्ण शरीर आणि मनाने पुरुषार्थ करणे ही शक्य होत नाही. उरलेल्या आयुष्यात फक्त नरक यातना त्यांच्या नशिबी येतात. 




 

Monday, April 14, 2025

स्वप्नाची टीम: दोन लघु कथा

 

फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्‍या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला. पण त्याच्या काही फायदा होणार नव्हता. त्याचा त्रिफळा उडालेला होता. राजेश आऊट झालेला होता. तो पेवेलियन मध्ये परतला. त्याच्या फ्रेंचाईसच्या मालकिणीने त्याच्या कडे पाहून थंब्स अप केले. राजेशने ही तिच्या कडे पाहत एक स्माईल दिले. 

रात्री बेडरूम मध्ये राजेश आपल्या बायकोला म्हणाला, राणी तुझ्या स्वप्नाचे फार्म हाऊस घेण्याची इच्छा आज मी पूर्ण केली. 

(2)

राजेशचा त्रिफळा उडाला आणि राजूने डोक्यावर हात मारला. राजू स्वत:ला बुद्धिमान समजत होता. लीग खेळणार्‍या सर्व खेळाडुंचे आंकडे त्याला माहीत होते. कोणता खेळाडू, कोणत्या गोलंदाजाविरुद्ध चांगला खेळतो, कोणत्या मैदानात चेंडू कसा येतो इत्यादींचे त्याने उत्तम रीतीने अध्ययन केले होते. त्याच आधारावर तो  दररोज स्वप्नील टीम बनवायचा. प्रत्येक मॅच संपल्यावर आपल्या चुका  शोधायचा. त्याने आकड्यांच्या आधारावर आजच्या फायनल मॅचसाठी स्वप्नील टीम निवडली होती. आज एक कोटी जिंकण्याची त्याला शंभर टक्के खात्री होती. मॅच संपला. निवडणूकीच्या सर्व्हे प्रमाणे त्याचे अंदाज या वेळी ही चुकले होते. या सीझन मध्ये कर्ज घेऊन त्याने लाखो रुपये स्वप्नील टीम वर खर्च केले होते. लोकांचे कर्ज कसे चुकविणार, बायको मुलांचे पोट कसे भरणार... या यक्ष प्रश्नांचे उत्तर त्याच्यापाशी नव्हते. न कळत त्याची पाऊले रेल्वे लाइनच्या दिशेने चालू लागली.....



Friday, April 11, 2025

काळाजी गरज: मेकाले नव्हे कौशल युक्त गुरुकुल शिक्षण पाहिजे

  


आजच्या शिक्षणाचे दोन वाक्यात वर्णन करता येते. पहिले वाक्य विषय पाठ करा. दुसरे वाक्य पाठ केलेले कागदावर लिहा किंवा टंकित करा. याचे एक उदाहरण एकदा एक मुनि  जंगलातून जात होते. मुनिला शिकारीच्या जाळ्यात अटकलेले काही पोपट दिसले. मुनिने पोपटांना जाळ्यातून मुक्त केले. मुनि ने विचार केला, आज मी या पोपटांना शिकार्‍याच्या जाळ्यातून मुक्त केले. पण भविष्यात पुन्हा हे पोपट जाळ्यात अटकू शकतात.   मुनिने शिकारी पासून सावधान राहण्यासाठी पोपटांकडून पाठ करून घेतले, शिकारी येणार, जाळे टाकणार, त्यावर दाणे टाकणार, आम्ही दाणे खाणार नाही, शिकारीच्या जाळ्यात अटकणार नाही. पोपटांना हे पाठ झाले याची खात्री झाल्यावर मुनि आपल्या मार्गाने निघून गेले. दुसर्‍या दिवशी शिकारीने पुन्हा जाळे  लावले, त्यावर दाणे टाकले. पोपट जाळ्याकडे पाहत जोरात बोलू लागले, शिकारी आला, जाळे टाकले, त्यावर दाणे टाकले, आम्ही दाणे खाणार नाही. असे ओरडत सर्व पोपट दाणे खाण्यासाठी जाळ्यावर उतरले. मुनिने पोपटांकडून पाठांतर करून घेतले होते पण प्रात्यक्षिक ज्ञान दिले नव्हते.   

आपल्या देशातील मैकाले शिक्षण व्यवस्थेत 90 टक्के शिक्षण यातच येते. सरकारी नौकरी सोडून कुठेही कौशल रहित  शिक्षणाचा उपयोग नाही. 21 वर्षे (18+3) वर्ष शिक्षण घेऊन ही अधिकान्श तरुणांसमोर पुढे काय कराचे हा भला प्रश्न चिन्ह असतो. कारण त्यांच्यापाशी कोणत्याही विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान नसते.  मग शिक्षण कसे असावे हा प्रश्न मनात येणार. याचे उत्तर अथर्ववेदात गुरुकुलात प्रवेश करताच विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार केले पाहिजे यात सापडते.

आचार्य उपनयमानो ब्रह्मचारिणं कृणुते गर्भमन्तः

तं रात्रीस्तिस्र उदरे बिभर्ति तं जातं द्रष्टुमभिसंयन्ति देवाः

अथर्व० ११।५।३


शब्दार्थ : आचार्य उपनयन संस्कार करून शिष्याला गुरुकुलात प्रवेश देतो. ज्या प्रमाणे आई आपल्या उदरात गर्भाचे पोषण करते तसेच आचार्य तीन रात्री शिष्याचा सांभाळ करतो. त्यानंतर त्याचा पुन्हा जन्म होतो. त्या तेजस्वी ब्रह्मचारीला आशीर्वाद देण्यासाठी देवता/ विद्वान जन तिथे येतात.

इथे तीन रात्र हा शब्द महत्वपूर्ण आहे. रात्र म्हणजे अज्ञान. अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण. त्यासाठी तीन प्रकारचे ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक विद्यार्थीला गरजेचे.  अज्ञानी ब्रम्हचारी हा पशु समान असतो. आचार्यचे पहिले कार्य आपल्या शिष्यावर उत्तम संस्कार करणे. विद्यार्थी, धैर्यवान, क्षमाशील, संयमी, शरीर आणि मन शुद्ध ठेवणारा, चोरी करणारा, असत्य बोलणारा, इंद्रियांवर नियंत्रण असलेला अर्थात हिंसा, द्वेष, लोभ, मोहांपासून दूर राहणारा, मानवीय गुणांनी संपन्न असा निर्मित झाला पाहिजे. अशक्त शिष्य ज्ञान प्राप्त करण्यात असमर्थ ठरतो. गुरुकुलांत ब्रम्हचारी  शारीरिक व्यायाम, योग, प्राणायाम कार्याचे. त्यांचे शरीर आणि मन दोन्ही सदृढ झाल्याने ज्ञान  प्राप्त करण्यासाठी  परिश्रम  ते करू शकत होते.  ज्ञान प्राप्ती नंतर  पुरुषार्थ करून धर्म मार्गावर चालत अर्थ अर्जित करून, संसारीक भोग भोगून, मोक्षाच्या वाटेवर चालण्याची क्षमता निर्मित करणे ही गुरूचे कार्य. गुरुकुलातून ज्ञान प्राप्त करून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना सर्व साधुवाद देतीलच.  याचे उदाहरण, वैदिक गुरुकुलात शिकलेले स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण आपल्या समोर प्रत्यक्ष आहेत.

गांधीवादी लेखक धर्मपाल यांनी मेकाले पूर्व भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती त्यांचा उल्लेख आपल्या "रमणीय वृक्ष' (The Beautiful Tree) या पुस्तकात केला आहे. यात विलियम अडम्स, जी.डब्लू लिटणर सहित अनेक ब्रिटीश अधिकार्यांनी १८२० ते १८४० च्या कालखंडात पंजाब, मुंबई, बिहार, ओडिशा आणि चेन्नई प्रांतात केलेले भारतीय शिक्षणाचे दस्तावेज आहेत. या दस्तावेजानुसार काही निष्कर्ष मी काढण्याचा प्रयत्न केला.

शिक्षण सर्व जातीतल्या मुलांसाठी खुले होते. मद्रास प्रांतात तिन्नेवेली जिल्ह्यात शुद्रांची संख्या ८४ टक्के तर, सेलम मध्ये ७०टक्के होती.  ब्राम्हणांची मुले ते ६व्या वर्षी तर शुद्रांची ते वर्ष झाल्यावर शिक्षण सुरू करायची. प्राथमिक शिक्षण ज्यात विद्यार्थी  स्थानीय भाषा, गणित, गो पालन, कृषि आणि त्या वेळचे सामान्य ज्ञान प्राप्त करायचे. आजच्या हिशोबाने वी पास झाल्यानंतर विभिन्न प्रकारचे कौशल धातू विद्या, लोह, तांबा पितळ, स्वर्ण इत्यादी. लाकडाचे कार्य, दगडावर शिल्प, तलावांची निर्मिती, स्थापत्य कला, साबण निर्मिती, विभिन्न प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती, इत्यादी इत्यादि. या शिवाय व्याकरण, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र आयुर्वेद आणि  औषधी निर्मिती, सांख्य, साहित्य, तंत्र शास्त्र ही शिकवल्या जात असे. शिष्याला विषय100 टक्के आत्मसात झाल्या शिवाय त्याचे शिक्षण पूर्ण होत नसे. गुरुकुलांत शिक्षणाचा उद्देश्य विद्येचा व्यावहारिक पक्ष ही शिष्याने आत्मसात केला पाहिजे हा होता. त्या विषयाच्या विद्वानांकडून प्रात्यक्षिक ज्ञान  विद्यार्थी घेत असे. एक विद्यार्थी 8 वर्षांत ज्ञान प्राप्त करत असे तर दुसर्‍याला 16 वर्ष ही लगायचे१८२५ मध्ये चेन्नई प्रांतात ,५०,००० विध्यार्थी शिक्षा ग्रहण करायचे इंग्लेंड पेक्षा दुप्पट.बिहार आणि बंगाल मध्ये लाख गुरुकुल होते. १०० उच्च शिक्षा देणारे संस्था होत्या. वस्त्र, भोजन, निवारा इत्यादी सुविधा स्थानिक गावातील लोक पुरवायचे. अधिकांश शिक्षक ब्राह्मण कायस्थ असले तरी ३० जातींचे शिक्षक होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक त्याकाळी सर्वात  अंत्यज  समजणार्‍या चांडाळ जातीचे होते. दक्षिणेत ब्राम्हणेतर शिक्षकांची संख्या ७० टक्के पेक्षा जास्त होती. 

त्याकाळी अस्पृश्यता असली तरी शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले होते. मलबार जिल्ह्यात वैद्यक शास्त्र शिकणाऱ्या १९४ विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के शूद्र  होते. फक्त ३१ ब्राह्मण होते. तर खगोल शास्त्र शिकणाऱ्या ८०० पैकी फक्त १३१ ब्राम्हण होते. स्त्री शिक्षणाचे म्हणाल तर, ब्राम्हण मुली ३७ टक्के तर वैश्य शूद्र इत्यादी ११ ते १९ टक्के. त्याकाळी भारतात बहुतेक जगात सर्वात जास्त स्त्री शिक्षण होते. याचा अर्थ 1857 आधी जगात सर्वात जास्त साक्षरता भारतात  होती. 

1857 नंतर ब्रिटीशांना, फूट डालो आणि राज करो नीती राबवून जाती-जातीत वैमनस्य वाढविण्यासाठी खोटे प्रतीक आणि खोटा इतिहास जनतेच्या मनात रुजविणे गरजेचे होते. जुनी पाटी पुसल्या शिवाय नवे प्रतीक मनावर ठसवले जाऊ शकत नाही हे ब्रिटीशांना माहीत होते. त्यासाठी सर्व प्रथम भारतातील शिक्षण संस्थान नष्ट करण्याची गरज होती.  आपल्या शक्तीच्या जोरावर गुरुकुलांची आर्थिक नाळ कापून टाकली. सर्व गुरुकुलांना समाप्त केले. गावो-गावी असलेले 6 लाख गुरुकुल समाप्त झाले.  पुढील दोन पिढीत, अर्थात 50 वर्षांत, देशाची अधिकान्श जनता साक्षर पासून निरक्षर झाली. ब्रिटीशांना फक्त सरकारी कर्मचारी हवे होते  म्हणून  शाळा जास्त उघडल्या नाही. ज्या उघडल्या त्या ही मोठ्या शहरांमध्ये.  याचा सर्वात जास्त फटका आजच्या भाषेत म्हणाल तर ओबीसी आणि दलित समुदायला बसला. 90 टक्के दलित समुदाय निरक्षर झाला. ब्रिटीशांनी प्रचार माध्यम आणि खोट्या इतिहासाच्या माध्यमातून यासाठी उच्च वर्गाला जवाबदार ठरविले. उत्तर भारतात शिक्षण नष्ट झाले. थोड्या बहुत ब्राम्हण आणि वैश्य जनतेला घरात किमान साक्षर होण्याचे शिक्षण मिळत होते. फक्त दक्षिण भारतात, काही गुरुकुल विपरीत परिस्थितीत जिवंत राहिली. त्यामुळे वेदांचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान वाचले. आपले ज्ञान नष्ट झाल्याचे एक उदाहरण-  पाणीदार शहरांचा, गावांचा आणि घरांचा निर्माण करण्याची विद्या जवळपास नष्ट झाली. मी जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात राहत होतो तिथे पावसाचे सर्व पाणी बेड्यात (आंगणात) पडायचे. (आयताकार वाड्याच्या मध्यभागी बेडा होता). 30 फुट खोल असलेल्या हेंडपंपचे पाणी गोड असायचे. 150 पूर्वी पाण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर घरांची आणि नगरांची निर्मिती व्हायची. 1947 मध्ये दिल्लीची जनसंख्या 4 लक्ष होती आणि 500 वर तलाव होते.  आजच्या वास्तुविदांना हे ज्ञान नाही. गुरुकुल शिक्षण मेकाले शिक्षणपेक्षा जास्त उत्तम आणि व्यावहारिक होते, हे कळते.  

ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वेक्षणानुसार साक्षर भारतीयांना निरक्षर बनविण्याचे कार्य ब्रिटीशांनी मेकाले शिक्षण लादून केले.   आज जे स्वत:ला मागास म्हणवितात, अश्या जनतेला ब्रिटीशांनी निरक्षर आणि मागास  बनविले  हे ही कळते. 

भारताला स्वात्यंत्र मिळून 75 वर्ष झाली. अजूनही देशात मेकाले शिक्षण सुरू आहे. आज ही 18 वर्षाचा युवा कौशलहीन असतो. प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या उत्तम बाबी नवीन शिक्षण  व्यवस्थेत घेण्याचे गरजेचे आहे. आठवी नंतर 100 टक्के विद्यार्थ्यांना कौशल युक्त शिक्षण अनिवार्य करणे काळाजी गरज आहे.  बिना प्रात्यक्षिक शिक्षण देता स्नातक निर्माण करणे म्हणजे अशिक्षित बेरोजगार पैदा करणे.