Thursday, August 29, 2019

रामसेतु आणि अज्ञानी आयआयटीयन


भारतीय प्राद्योगिकी संस्थान (आईआईटी) खडगपूरच्या दीक्षांत समारोहात केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल "निशंक" यांनी म्हंटले रामसेतुचा निर्माण भारतीय अभियंतांनी  केला होता. मंत्र्याचे हे विधान अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या बहुतेक पचनी पडले नाही. कारण स्पष्ट आहे आपल्या प्राचीन इतिहास आणि ज्ञाना बाबतीतील त्यांची अज्ञानता.

ब्रिटिशांनी शिक्षा नीति तैयार करताना, आपल्या पूर्वजांचा इतिहास व ज्ञानाचा पाठ्यक्रमात समावेशच केला नाही. भारतीय लोकांच्या मनात हीन भावना निर्मित करून त्यांना राज्य करायचे होते. स्वतंत्रता प्राप्तीनतर  आपल्या इतिहासाला व ज्ञानाला पाठ्यक्रमात स्थान मिळाले पाहिजे होते. पण आंग्ल शिक्षित व हीन भावनेने ग्रस्त भारतीय विद्वानांनी आपल्याच पूर्वजांच्या इतिहास व ज्ञानाकडे दुर्लक्ष केले. परिणाम शिक्षण घेणारे विद्यार्थी मग ते आईआईटीयन का असेना,  त्यांना भारतीय इतिहासाची व ज्ञानाची माहिती कुठून मिळणार. 

धनुषकोडीपासून ते तलाईमन्नार (श्रीलंका)- अंदाजे २६-२७ किमीचे अंतर आहे. समुद्रात पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे. या उथळ समुद्री मार्गात अनेक छोटे-छोटे बेट आज हि विद्यमान आहेत. हा भूभाग म्हणजे प्राकृतिक निर्मित एक पुलच. अधिकांश पुरातत्ववेत्ता याच भागाला रामसेतु किंवा आदम ब्रिज म्हणतात. आज हि इथे नौकायन संभव नाही. रामायण काळात अर्थात ७५०० वर्षांपूर्वी तर समुद्र आजच्या तुलनेत जास्त उथळ होता. साहजिकच होते, समुद्रात नौकायन संभव नसल्याने श्रीरामाने या स्थानावर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. श्रीरामाच्या सैन्यातील भारतीय अभियन्तानी समुद्रावर पूल बांधला. या पुलावरून श्रीरामाचे सैन्य श्रीलंकेत पोहचले. म्हणून या पुलाला रामसेतु हे नाव पडले. 

वाल्मिकी रामायणात युद्धकांडातील २२व्या सर्गात समुद्रावर सेतु बांधण्याचे वर्णन आहे. वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून काही हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. दगड व लाकडांचा उपयोग करून समुद्रावर बांधलेल्या पुलाचे अवशेष  आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतरसापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता.   


वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न  झाले याचे वर्णन करणारे, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:


ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।

बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥


ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।

कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥


बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।

चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥


हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।

पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥



संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या-मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले.  हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.


समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।

सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥


दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।

वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥


मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।

पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥


संक्षिप्त अर्थ: कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी निर्माण सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत, वेली आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते.



वाल्मिकी रामायणात एवढे स्पष्ट वर्णन आहे, तरी हि तथाकथित विद्वान शंका घेतात यावरच मला नेहमी आश्चर्य वाटते.  याचे एकच कारण आपल्याच ज्ञानावर व इतिहासावर विश्वास नसणे हे असावे.





Friday, August 16, 2019

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची कार्यशैली - रिकाम्या जागेचे (स्पेस) महत्व

(मी सन १९९७ ते मार्च २०१५ पर्यंत पंतप्रधान कार्यालयात कार्य केले आहे. त्या अनुभावावावर आधारित)

समजा तुम्ही एका कागदावर १० ओळी टंकल्या. सर्व वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने ठीक आहेत. पूर्ण विराम स्वल्प विराम ही योग्य जागी आहे. अर्थात १०० टक्के बरोबर.  तरीही  किमान ३-४ ठिकाणी शब्दांच्या मध्ये  रिकामी जागा जास्त (एकाच्या जागी दोन स्पेस) असण्याची शक्यता असतेच. ह्या सुद्धा चुकाच, ज्या सामान्य वाचकांना दिसणार नाही. प्रधानमंत्री मोदीजींच्या नजरेतून हि रिकामी जागा (स्पेस) ही सुटत नाही.   

साउथ ब्लॉक मध्ये एक मोठा हाॅॅल जिथे ६ अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत स्टाफ बसायचा. माझा केबिन हि तिथेच होता. २०१४ची निवडणूक संपन्न झाली मोदीजी प्रथमच प्रधानमंत्री झाले. पहिल्याच आठवड्यात सकाळी अनेपक्षितपणे कुठल्याही पूर्वसूचना न देता प्रधानमंत्री दरवाजा उघडून हाल मध्ये आले. माझा केबिन सर्वात आधी होता. उभे राहून मोदीजींना अभिवादन केले. प्रथम त्यांनी  माझे नाव विचारले. नंतर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. कुठल्या अधिकारी सोबत, कामाची प्रकृती काय, त्यात येणाऱ्या समस्या, कोणकोणत्या अधिकार्यांचा व्यक्तिगत स्टाफ इथे बसतो, त्यांचे कार्य काय, इत्यादी. आपल्या परीने सर्व प्रश्नांचे उत्तर दिले. त्यानंतर मोदीजींनी एक-एक करून सर्वांना भेटले व त्यांच्या कार्यांंची माहिती घेतली. नंतर सर्वांना "अकबर बिरबलची" गोष्ट हि सांगितली. त्या गोष्टीचा सारांश  "मी अकबर बादशाह नाही. तुम्ही काम करा पण बीरबल बनण्याचा प्रयत्न करू नका".  पुढील एका आठवड्यात पंतप्रधान, प्रधानमंत्री कार्यालयातल्या सर्वच विभागात गेले व तेथील चतुर्थश्रेणी कर्मचारी, लिपिक पासून ते अनुभाग अधिकारी सर्वांशी त्यांच्या कार्यासबंधी चर्चा केल्या. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. 

तसे पाहता मोदीजी १२ वर्ष गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना सचीवालयीन कामाची इत्यंभूत माहित होतीच. प्रधानमंत्री कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांना कामाबाबतीत ब्रीफहि केले असेल. तरीही त्यांनी  प्रत्यक्ष कार्य करणार्या निम्नश्रेणीच्या कर्मचार्यांकडून हि कामाची माहिती घेतली.  

पंतप्रधान कुठली हि जनकल्याणाची योजना साकारताना पहिले त्या योजनेची सर्वस्तरांहून इत्यंभूत माहिती घेतात. योजनेच्या कार्यान्वयन करताना येणाऱ्या सर्व समस्यांची शेवटच्या स्तरावर चर्चा करून, सर्व शंकांचे समाधान झाल्यावरच, एका निश्चित अवधीत योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवितात. याचेच उदाहरण. असंभव वाटणारी गोष्ट, ३० कोटी जनधन खाते बँकांनी एका वर्षांत उघडले. गेल्या पाच वर्षांत उज्ज्वला योजना असो कि सुरक्षा बीमा योजना, रस्त्यांचे कार्य असो कि रेल्वेचे, सर्वच लक्ष्य निश्चित अवधीत पूर्ण झाले. याचे कारण पंतप्रधानांची कार्य शैली  "कुठलीही जागा रिकामी राहता कामा नये" प्रथम दृष्ट्या ती कितीही महत्वहीन वाटत असली तरीहि .  

Friday, August 9, 2019

अतिवृष्टीचे खरे कारण


(इंद्राचा दरबार)

इंद्रदेव(दाढी वाढलेल्या नारदा कडे बघत):  काय समाचार आहे जम्बुद्विपाचा आणि हि दाढी काहून वाढवली नारदा! त्या दाढीवाल्या सारखी दाढी वाढवून तुला काही  जम्बूद्विपाचे राज्य मिळणार नाही. 

नारद: देवराज कशाला हो थट्टा करतात. आषाढ गेला, अर्धा श्रावणहि गेला. पावसाचे टिपूसहि पडले नाही, भरतभूमीवर. नद्या कोरड्या पडल्या आहेत. विहिरी आटल्या आहेत. पावसा अभावी पीकहि जाळून खाक झाले आहे. अजून उशीर झाला तर कोट्यावधी पशु पक्षी आणि माणसेहि तहानेने व्याकूळ होऊन मरतील. आता तुम्हीच सांगा, जिथे प्यायला पाणी नाही तिथे दाढी करायला कुठून मिळणार. अनेक दिवस झाले मी आंघोळहि केली नाही आहे. अंगाचा घाण वास येऊ नये म्हणून फॉग शिंपडून थेट दरबारात आलो आहे. वरूण देवाच्या वादळ चालकांनी नेहमीप्रमाणे कामात दिंगराई केली आहे. एकदाचची  कठोर कार्रवाई करा त्यांच्या वर, नरकात धडा त्यांना.

इंद्रदेव: अरे! रे! नारदा, हे काय ऐकतो आहे मी. यावेळी तर तुमच्या सल्ल्यानुसार मी वरूण राजाला आदेश दिला होता. सर्व वादळ चालकांनी उन्हाळ्यातच भारतात जाऊन प्रत्यक्ष ग्राउंड रिअलीटीची तपासणी करावी.  तरीही एवढी कामात दिंगराई. बोलवा रे, वरुण देवाला. 
 
(वरूणदेव दरबारात येतात)

इंद्रदेव: वरुण देवा, पावसाळा अर्धा उलटला तरी तुम्ही भरतभूमीवर वादळांचे टेंकर पाठविले नाही. काय प्रकार आहे हा. 

वरुणदेव: महाराज क्षमा असावी, अजून वादळी टेंकर भारतात मी धाडू  शकलो नाही.  

इंद्रदेव: पण का?

वरूणदेव : याला जवाबदार नारद ऋषीच.  मी नको म्हणत असतानाहि त्यांच्या सल्ल्यानुसार वादळ चालकांना भारतात पाठविले. तिथे ते थेट इंद्रप्रस्थनगरीतील एका भव्य हिरव्यागार रम्य परिसरात वसलेल्या विश्विद्यालयात उतरले. तिथे त्यांची भेट आजादी गैंगशी झाली, त्याचेच परिणाम. "हमको चाहिये काम से आजादी, हमारा शोषण बंद करो, नियमानुसार काम करेंगे. ओवर टाईम नहींं करेंगे, जितना काम उतना दाम" नारे लावत लाल झंडा घेऊन माझ्या महाला बाहेर ठाण मांडून बसले आहेत. मी कितीही समजावले कि स्वर्गात प्रत्येकाने आपले कार्य जगाच्या कल्याणासाठी केले पाहिजे. पण कुणी ऐकायला तैयार नाही. 

इंद्रदेव: मागणी तरी काय आहे त्यांची.

वरूणदेव: महाराज ते म्हणतात, सोमरसाचा कोटा वाढवून द्या. वाढलेला कोटा आधी द्या. या शिवाय....

इंद्रदेव:  थांबलात का वरूणदेव एकदाचे कळू द्या कि आणखीन काय मागणी आहे त्यांची.  

वरूणदेव: त्यांची मागणी आहे, वादळ वाडीत फक्त भारतातून स्वर्गात आलेल्या बी ग्रेड अप्सरांचे नृत्य होतात. त्यांच्या वाडीतहि महिन्यातून किमान एकदा तरी इंद्रदेवाच्या खासमखास रंभा, उर्वशी इत्यादींचे नृत्य झाले पाहिजे.

इंद्रदेव (देव काही क्षण विचार करतात आणि डोक्यावर हात मारत म्हणतात): कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्या मागण्या मंजूर करतो. सोमरसाचा वाढलेला कोटा आत्ताच पाठवा आणि म्हणा त्वरित  कामाला लागा. आधी भरतभूमीवर पावसाचा बेकलाग पूर्ण करा. मग रंभेसोबत उर्वशीच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवतो वादळ वाडीत. 

वादळ चालकांची मागणी पूर्ण होताच. अक्खी सोमरसाची बाटली पोटात रिचवून पावसाळी कोटा पूर्ण करण्यासाठी वादळ चालक भरतभूमी वर पावसाचा मारा करू लागले. झिंगलेल्या अवस्थेत पाण्याचा मारा करताना कुठे किती पाउस टाकतो आहे, याचे भान त्यांना उरलेले नव्हते. त्यांना डोळ्यांसमोर  दिसत होती फक्त नृत्य करणारी रंभा आणि उर्वशी.

सोमरसाच्या नशेत धुंद होऊन पावसाच्या मारा करणार्या वादळ चालकांमुळे महाराष्ट्राच्या भूमीवर एकच हाहाकार माजला. मुंबई, पुणे कोल्हापूर छोटी-मोठी नगरे पाण्यात बुडाली. शेती उध्वस्त झाली, गुर-ढोर पाण्यात वाहून गेली. शेकडो लोकहि थेट स्वर्गात पोहचले. पण वादळ चालकांनी दोन महिन्यांचा बेकलाग एकाच  आठवड्यातच पूर्ण केला आणि गेल्या वर्षांचा बेकलोग हि पूर्ण करण्याच्या मोहिमे वर निघाले आहे.