Sunday, June 28, 2020

प्राचीन ज्ञानाचे पुनरुत्थान (डिजिटलीकरण) आणि प्रकाशन - पतंजलिचे महत्वपूर्ण योगदान



भारताची संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे. या हजारो वर्षांत इथे निर्मित झालेले ज्ञान मौखिक आणि लिखित परंपरेत सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न विद्वानांनी सतत केले. अधिकांश लिखित ज्ञान ताडपत्र इत्यादीवर पुस्तक स्वरुपात सुरक्षित ठेवले. विदेशी आक्रांतानी आपले ज्ञान नष्ट करण्याचा पुरजोर प्रयत्न केला. लाखो पुस्तके जाळून नष्ट केली.  तरीही कालप्रवाहात लाखो  ताडपत्री पाण्डूलिपी निश्चित जिवंत राहल्या असतील.  देशाला स्वतंत्रता मिळाली. पण दुर्भाग्य असेकि गुलामी मानसिकता असलेल्या काळ्या साहेबांचे राज्य भारतात आले. आपल्या प्राचीन ज्ञानाविषयी त्यांच्या मनात आदर कमीच.  विदेशी आक्रांतान्पासून आपले ज्ञान काही प्रमाणात वाचले पण काळ तर सर्वच नष्ट करणारा असतो. जीर्णशीर्ण पाण्डूलिपी किती काळ जिवंत राहणार. आपल्या सरकारी तंत्राने हि भारताचे प्राचीन ज्ञान सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न केले आहे. पण सरकारी तंत्राचीहि  'दिनभर चलेअढाई कोस' वाली  गत असते.


आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात डिजिटल स्वरूपात प्राचीन ज्ञान सुरक्षित केले जाऊ शकते. पण ते करणे अचाट मेहनतीचे कार्य आहे.  पाण्डूलिपी कुणापाशी आहेत त्याची माहिती मिळविणे. त्यांच्या पर्यंत कसे पोहचायचे. त्यांची परवानगी घेऊन, त्या जीर्णशीर्ण ताडपत्री पुस्तकांना दुरुस्त करणे. त्यासाठी भाषा विशेषज्ञ आणि दुरुस्ती कार्य करणाऱ्या तकनिकी लोकांची गरज.  त्यानंतर पांडूलिपींचे डिजिटलीकरण करणे आणि शेवटी त्यांना सुरक्षित ठेवणे.  ज्यांनी परत मागितली त्यांना परत करणे.  दुर्लभ आणि मूल्यवान ग्रंथांचे प्रकाशत करून प्राचीन ज्ञान जनतेसमोर आणणे, इत्यादी. ह्या सर्व कार्यांत   हजारो लोकांच्या अचाट मेहनत शिवाय,  वेळ आणि धनाचीहि गरज लागते. शिवाय गुलाम मानसिकता असलेले सरकारी तंत्र किंवा जनताहि तुमच्या कार्याचा गौरव करणार नाही. मीडियाही तुमच्या कार्याची माहिती जनतेला  देणार नाही. तरीही एका व्यक्तीने हे कार्य करण्याचा विडा उचलला.


त्रेता युगात महर्षी विश्वामित्र यांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. इंद्राचे सिंहासनहि  गदागदा हालविलें होते. या कलयुगातहि बहुतेक त्यांचाच अवतार स्वामी रामदेवच्या रूपाने भारतात प्रगट झाला असावा हें मला नेहमीच वाटते.  गुरुकुलात वेद शास्त्र संपन्न होऊन, हिमालयात तपस्या करून, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने भारताला पुन्हा उन्नतीच्या शिखरावर पोहचविणे हे त्यांचे स्वप्न. फूडपार्क पासून होणार २ टक्के नफा फक्त देशसेवेसाठी वापरायचा हा त्यांचा संकल्प.त्यात हि ७० टक्के फक्त रिसर्च आणि अनुसंधानावर. 
स्वामी रामदेवांनी कार्य हातात घेतले आणि मोठ्या प्रमाणावर हे कार्य करण्याचा निश्चय केला. आचार्य बाळकृष्णच्या नेतृत्वाखाली पतंजली युनिव्हर्सिटी आणि त्यांना मदत करणारे हजारो सहयोगी या कार्यात गुंतले. कुणालाही आश्चर्य वाटेल एवढे अचाट कार्य  ६० हजारच्यावर पाण्डूलिपी ज्यात ५० हजारांच्यार ताडपत्री स्वरूपात.  तब्बल १९ विषय - अलंकार शास्त्र, आयुर्वेद, ब्राम्हण ग्रंथ, दर्शन, धार्मिक ग्रंथ, ज्योतिष, काव्य, कोश, मंत्र, नीती ग्रंथ, पाकशास्त्र, पुराण, संस्कृत-साहीत्य, स्त्रोत्र, तंत्र, उपनिषद, वेद, व्रत, व्याकरण इत्यादी.  १४ भाषा- देवनागरी, शारदा, श्री, गुरुमुखी, फारसी, संस्कृत, उर्दू, बंगाली, मल्याळी, मराठी, नेपाली, ओडीया,तमिळ तेलगु. २६ लाखांहून जास्त पाने.

आता विचार करा  या अफाट कार्यासाठी हजारो  लोकांशी/ संस्थांशी  संपर्क करावा लागला असेल. अनेक भाषाविदांची मदत घ्यावी लागली. या पवित्र कार्यासाठी अधिकांशी विद्वानांनी कसले हि मानधन घेतले नाही. पण त्यांच्या येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च तर होताच.  शिवाय  पगारी कर्मचार्यांची फौजहि.  या कार्यातहि सरकारी तंत्र नेहमीप्रमाणे  उदासीन होता.  आमच्या जवळ असलेले प्राचीन  साहित्य तुम्हाला डीजीटलीकारण साठी काही काळासाठीहि देणार नाही आणि  हे वेगळे आम्ही केंव्हा करू, आमचे आम्हालाच माहित नसते. असो. 


डिजिटलीकरण नंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे पुस्तकांचे प्रकाशन. इथेहि समस्या होती.  एक-एक पुस्तकाच्या अनेक पाण्डूलिपी आणि पाठभेद.  विद्वानांच्या मदतीने प्रामाणिक प्रती तैयार करून एव्हढ्या कमी कालावधीत अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित केले. त्यांची नावे- सिद्धसार - संहिता (रविगुप्त- विरचित), योगशत्तम (अमितप्रभ्यम् - विरचित), योगशास्त्र-वैद्यवल्लभ (रुपनयन - विरचित), आयुर्वेद-महोदधी/ सुषेण-निघन्टु (सुषेण वैद्य- विरचित), भोजनकह्तुलम् (रघुनाथ सुरी -विरचित), अजीर्णमर्त मंजरी (काशिनाथ-विरचित), रुचिवधु- गल्- रत्नमाला (परप्रणव - विरचित), हरमेखला (मधुक-विरचित), योगरत्न समुच्चय (चंद्रात- विरचित), वैद्यशतश्लोकी (अवधान सरस्वती- विरचित), चंद्र निघन्टु/ मदनादी-निघन्टु (चंद्रनंदन-विरचित), हृद्यदीपक-निघन्टु (भोपदेव विरचित), राज- निघन्टु/ सोढलनिघन्टु (सोढल विरचित), मदनपाल -निघन्टु (नृप मदनपाल-विरचित), वैद्य प्रसारकम् (वैद्य गदाधर-विरचित ).

हे कार्य सतत चालणारे कार्य आहे. काळात विस्मृत झालेले ज्ञान विज्ञानाची पुस्तक रुपी रत्ने एका महाऋषीच्या प्रयत्नाने पुन्हा प्रगट होणार आहेत.  आपण त्यांच्या कार्याचा गौरव तर करीत नाही. पण इथल्या आसुरी प्रवृत्ती  मात्र पूर्ण शक्तीने त्यांच्यावर प्रहार करीत आहे.  या काळात आपले काय कर्तव्य आहे, हे आपल्याला कळले पाहिजे. असो.  खालील लिंकच्या  आणि आस्थावर या संबंधात पाहिलेल्या कार्यक्रमाच्या आधारावर हा लेख आहे.

https://www.patanjaliresearchinstitute.com/ayurvedic_manuscripts.php#










Saturday, June 27, 2020

काही गूढ क्षणिका


लांडग्याची मैत्री केली
शेतकऱ्याला मारले
कुंपणाने असे
शेतच खाल्ले.

अमृताचे कुंभ
सागरात फेकले
देवांना चषकात
हलाहल पाजले.

 "मायेच्या" पोटी
प्रजेशी फितुरी
मढयांवर त्याने
लोणी खाल्ले.

नागाने मणी
बेडुकाला दिली
बदल्यात त्याची
पिल्ले खाल्ली.

Monday, June 22, 2020

काही क्षणिका: मुखौटे


सत्याचा मुखौटा
चेहऱ्यावर लावला
असत्याचा प्रचार
जोमाने केला.

मुखौटाच्या मागे
अर्जुन लपला
विजय धर्माचा
रणी जाहला.

मुखौट्यांचा स्टॉक 
सदा जवळ बाळगा
कोठी, गाडी आणि पैका 
मुखौट्यांची सारी कृपा.

मुखौटा देवा
कलयुगाचा त्राता
वाहुनी तुळस - दूर्वा 
पूजा तयाची करा.

Saturday, June 20, 2020

सूर्यग्रहण: सावल्या - सावल्यातील अंतर


हिमाचलच्या लोकांशी घरोबा झाल्यामुळे हिमाचलच्या वारी होतच राहतात. असेच एका लग्नाला गेलो होतो.  मंडी जिल्ह्यात लोकांची घरे मोठी अर्थात १० ते २० खोल्यांची असतातच. लग्नकार्य घरातच होतात. लग्नकार्याच्या विधी दिवसभर चालणारे असल्यामुळे गप्पांच्या मैफिलसाठी भरपूर वेळ मिळतो. सहज सूर्यग्रहण हा विषय निघाला. एका सज्जन धार्मिक इंजिनिअर महोदयांनी सूर्यग्रहणाचा एक किस्सा सांगितला. हिवाळ्याचे दिवस होते. त्यांचे एक मराठी मित्र घरी आले होते.  शिक्षित आणि विज्ञानवादी विचारधारेचे मराठी सज्जन अंधश्रद्धा मूर्खमिलन समितीचे चाहतेही होते. बाहेर भयंकर थंडी असल्यामुळे बैठीकीच्या खोलीत फायर बॉक्समध्ये लाकडे जळत होती समोर १२ फूट दूर सोफ्यावर बसून  गप्पा मारताना सूर्यग्रहण हा विषय निघाला. विज्ञानवादी मित्र म्हणाले चंद्राची सावली आणि वादळाची सावली काहीच फरक नसतो. चंद्राच्या सावलीचा काहीही दुष्प्रभाव पडत नाही. इंजिनिअर सज्जन म्हणाले फरक असतो आत्ताच सिद्धकरून दाखवतो. त्यांनीं  एक ताट आणि एक छोटी वाटी मागवली. ताट फायरबॉक्सच्या समोर अश्यारितीने धरले की ताटाची सावली मित्राच्या अंगावर पडली. मित्राला विचारले काही फरक पडला का? मित्र म्हणाला हो, ताटाने उष्मा रोखल्यामुळे थोडी थंडी जाणवते आहे.  इंजिनीयर महोदयाने  छोटी वाटी मित्राला देत म्हंटले वादळाची पण सावली असते. वादळ जास्तीतजास्त पृथ्वीपासून दहा-बारा किलोमीटर उंचीवर असते. चंद्राच्या मानेने फारच जवळ. ही वाटी म्हणजे वादळ. आता वाटीला पोटाशी धरून ठेव आणि सांग काय फरक पडतो. मित्र म्हणाला काहीही फरक पडणार नाही.  इंजिनीयर महोदय विजयी मुद्रेने म्हणाले हा फरक सूर्यग्रहण आणि वादळाच्या सावलीतला आहे. एका मराठी माणसाची कशी जिरवली हा भाव ही त्यांच्या मुद्रेत दिसत होता. 

दोन वर्षांपूर्वी मला पँक्रियाचा टीबी  झाला. गंगाराम हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आशिष  कडून ट्रीटमेंट घेत होतो. एक दिवस त्यांना विचारले माझ्या घरी आणि कार्यालयातील ही स्वच्छता आहे. मी बाहेरचेही जास्त खात नाही तरीही मला टीबी का झाली? ते म्हणाले वातावरणात लाखो वायरस नेहमीच असतात. भारतासारख्या देशात तर टीबीसहित अनेक रोगांचे जीवाणू ही वातावरणमध्ये असतात. शरीराची प्रतिकारशक्ती त्यांच्याशी सदैव युद्ध करत राहते. काही क्षणांसाठी ही एखाद्या रोगणुप्रति ती कमी झाली की लगेच तो रोगाणु शरीरात वाढू लागतो. हे असेच आहे, जसे क्षणभराच्या नजरचुकीने एखादा आतंकवादी देशात घुसतो. सर्च ऑपरेशन करून त्याचा नायनाट करावा लागतो.  तसे न केल्यास देशात बॉम्बस्फोट इत्यादी होतात आणि लोकांचा जीव जातो.  तुम्हाला ही दहा बारा दिवस आणखीन उशीर झाला असता तर...असो.

वादळ वातावरणात आपल्या जवळ असतात. सूर्याच्या जीवनदायी किरणांना रोखण्याची क्षमता त्यात नसते. पण अंतरीक्षात विचरण करणाऱ्या पृथ्वीपासून लाखो किमी दूर असलेल्या चंद्रमामध्ये निश्चित असते त्यामुळे वादळांच्या आणि चंद्रमाच्या सावली फरक असतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर न जाणे योग्य. हे असेच आहे, जसे कारोनाच्या बचावासाठी गर्भवती स्त्री, वृद्ध आणि रोगी माणसांना घरात बसण्याचा सल्ला दिला गेला आहे. बाकी अंधश्रद्धा मूर्खमिलन बाबत काही न बोलणे योग्य.




Friday, June 12, 2020

साने गुरुजी आणि मी

आज साने गुरुजींची पुण्यतिथि. आजच्या दिवशी अर्थात 11 जून 1950 रोजी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती. बहुतेक गणपती उत्सवात श्यामची आई हा सिनेमा पाहिला होता आणि सिनेमा पाहताना ढसाढसा रडलोही होतो. साने गुरुजी कोण त्याबाबत प्रथम माहिती आईकडून मिळाली. पण एक प्रश्न मनात सतत घोंगावत होता एवढ्या मोठ्या माणसाने आत्महत्या का केली? त्याचे कारण काय असावे? दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही  नागपूरला जायचो. काका एका वृत्तपत्रात संपादक होते. नागपूर आणि विदर्भात प्रकाशित होणाऱ्या अधिकांश हिंदी पुस्तकांचे संपादनही ते करायचे. त्यासाठी राष्ट्रपती कलामच्या हातून राष्ट्रपती भवनात त्यांचा गौरवही झाला होता. नागपूरला काकांच्या घरी एक मोठी लायब्ररी होती. किमान दोन-तीन हजार पुस्तके तरी होती. बहुतेक त्यावेळी मी तेरा-चौदा वर्षांचा होतो. वाचण्याची आवडही होती. साने गुरुजींचे जीवन चरित्र वाचले. लहानपणीच वडिल गेले नंतर आई. अनेक कष्ट सहत सानेे गुरुजींनी शिक्षण पूर्ण केले. ते एमए झाले. शाळेत शिक्षकाची नोकरी केली. १९३० मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले. त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता विरोधात लढा दिला. राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. साधना साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. खडतर मार्गाने आयुष्याचा प्रवास करणारा व्यक्ती आत्महत्या करतो हे कधीच मनाला पटले नव्हते. एक दिवस काकांना हाच प्रश्न विचारला. ते म्हणाले साने गुरुजी कवी होते. भावनाप्रधान होते. देशाला स्वात्यंत्र मिळतात देश बदलेल असे त्यांना वाटत असावे. माणसाचे आयुष्य १०० वर्ष असेल तर राष्ट्राचे हजारो वर्ष असते. जे बदल माणसाच्या आयुष्यात एका वर्षात होतात त्या बदलांसाठी राष्ट्राला १०० वर्ष ही अपुरे पडतील. एकच उद्दीष्ट मनात ठेऊन अनेक पिढ्यांना खपावे लागते. देश स्वतंत्र झाला. भारतीय नेते सत्ताधीश झाले. सत्ता टिकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्वांचा उपयोग करावा लागतो. या सदा  चालत आलेल्या मार्गावर आजचे सत्ताधीश ही चालणारच. स्वतंत्रता मिळाली. देशात लाखो लोक दंगलीत मारल्या गेले.  महात्मा गांधींची हत्या झाली,. महाराष्ट्रात जतिगत घृणेचे राजकारण फोफावले. बहुतेक कवी हृदयाने पाहिलेले स्वप्न धुळीत मिळाले.  सत्याचा मार्ग काटेरी असतो त्यावर विपरीत परिस्थितीतही सतत चालणे प्रत्येकाला जमत नाही. काही सत्य मार्गाचा त्याग करतात. काही परिस्थितीशी समाझौता करत नाही अर्ध्यावरच प्राण सोडतात. काही विरलेच संघर्षाची ज्योत सतत तेवित ठेवतात.  निराश होऊन साने गुरुजींनी अर्ध्या रस्त्यावरच प्राण ठेवलेेेे. शेवटी काका म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत निराश व्हायचं नाही हे त्यांचे चरित्र वाचून शिकले पाहिजे.

Wednesday, June 10, 2020

मुखवटे


रंगमंचावर नाचती 
मुखवटे तालावर
सरड्याच्या.

मुखवट्या विना
न चाले व्यवहार
जगाचा.

हरवला मुखवटा
आरशात दिसला
चेहरा राक्षसाचा.