Tuesday, January 23, 2018

पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा



     
प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला कठोर तपस्या करावी लागली  अमीर खुसरो यांनी म्हंटले आहे:


खुसरो  रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए  इक रंग.

संसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे.  प्रेम म्हणजे आत्म्याचे  परमात्म्याशी  मिलन.  पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे. पद्मावत महाकाव्याची कथा संक्षेप मध्ये सांगताना  महाकवी जायसी म्हणतात 

तन चितउरमन राजा कीन्हा हिय सिंघलबुधि पदमिनि चीन्हा।
गुरू *सुआ जेई पन्थ देखावा बिनु गुरू जगत को निरगुन पावा?
नागमती यह दुनियाधंधा।बाँचा सोइ  एहि चित बंधा।।
राघव दूत सोई सैतानूमाया अलाउदीं सुलतानू।।

चित्तोडगढ हे माणसाचे शरीर आहे. रत्नसेन नावाचा आत्मा या शरीरात विराजमान आहे. त्याच्या मनात परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा आहे. गुरु बिना परमेश्वराची प्राप्ती संभव नाही.  हिरामन नावाचा पोपट हा गुरु आहे. तो रत्नसेनला मार्ग दाखवितो. सिंहल द्वीप हे प्रेमाने भरलेले हृदय आहे.  या सिंहल द्वीपात वाघ आणि बकरी एकाच घाटावर पाणी पितात.  अर्थात हे हृदय प्रेमाने भरलेले आहे. सात्विक बुद्धी रुपी पद्मावती तिथे निवास करते. शरीररुपी चित्तोड मध्ये तांत्रिक राघव चेतन नावाचा शैतान हि राहतो. त्याच्या पाशी मायावी शक्ती होत्या. तो चंद्र्माच्या कला हि आपल्या शैतानी मायेच्या शक्तीने बदलू शकत होता. पद्मावती चित्तोडला येते. राघव चेतन नावाच्या शैतानाला देश निकाला दिला जातो. अर्थात ज्या हृदयात सात्विक बुद्धी आहे तिथे शैतान निवास करू शकत नाही. अलाउद्दीन खिलजी हा भोग आणी विलासात बुडालेला संसारिक मायेने ग्रस्त मर्त्य मानव आहे. तो आरश्यात पद्मिनीला बघतो. आरसा हा आभासी आहे. मायावी जगाचे प्रतिक. आरश्यातील पद्मिनी हि आभासी. मोह आणि मायेने ग्रस्त अलाउद्दीन खिलजी आभासी पद्मिनीच्या प्राप्तीसाठी चित्तोडवर आक्रमण करतो. 

महाकाव्याच्या अंती गुरुचे मार्ग दर्शन, प्रेमपूर्ण हृदय आणि सात्विक बुद्धी (पद्मावती)च्या सहाय्याने शरीराचा त्याग केल्यावर आत्मा आणि परमात्म्याचे मिलन होते. अलौकिक प्रेमाचा विजय होतो. 

राजपूत स्त्रिया हवन कुंडात सर्वस्व अर्पण करतात, सती होतात. राजपूत योद्धा संपूर्ण चित्तोड गढाला अग्नीत अर्पण करतात व युद्धात प्राणांची आहुती देतात. सर्वस्व अर्पण केल्यावर त्यांना हि अलौकिक प्रेमाची प्राप्ती.  

संसारिक मोह मायेला सत्य समजणाऱ्या अलाउद्दीन खिलजी काय प्राप्त होते.  शरीर नष्ट झाल्या वर बाकी राहते फक्त शरीराची धूळ किंवा  चितेची राख. खिलजीच्या हाती राख आणि धूळी शिवाय काहीही येत नाही.  

सारांश भोग आणि विलासितेत बुडालेल्या संसारिक जीवाला मुक्ती नाही. अलौकिक प्रेमाची प्राप्ती त्याला होऊ शकत नाही. पद्मावतच्या माध्यमाने महाकाव्याची   महाकवी जायसी यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.  



सुआ : हिरामन पोपट 

Monday, January 22, 2018

प्रदूषण (13)- विषारी पुतळा



वाघीण म्हणाली 
छाव्याला 
माणूस म्हणजे 
विषारी पुतळा 
खाणारा त्याला 
नाहक मरणार.




टीप : हवा पाणी आणि अन्न सर्वच विषाक्त खाणार्या माणसाला खाणार्या आदमखोर प्राण्यांचे काय हाल होतील? वाघीण आई आपल्या छाव्याला तेच शिकविते आहे. 

Sunday, January 21, 2018

प्रदूषण (१२) माणूस


विषाची निर्मिती करतो 
विष आनंदाने पितो
सृष्टीच्या विनाशाची 
रोज इच्छा धरतो
माणूस.  



टीप: टूथपेस्ट पासून ते अन्न, वारा, पाणी सर्वच माणसाने प्रदूषित करून ठेवले. तो स्वत: विष पितो आहे आणि स्व:निर्मित विषाने पृथ्वीवरील प्राण्यांचा  विनाश करतो आहे. 

Tuesday, January 16, 2018

प्रदूषण (11)- जंगलात प्रलय





माणसाच्या पाऊल खुणा
जंगलात दिसल्या कावळ्याला
कांव कांव कांव
शेवटची  घटका मोजा
प्रलय आला प्रलय आला ।



टीप: एकदा माणसाचा प्रवेश जंगलात झाला, कि काही काळात ते जंगल नष्ट होते.  

Monday, January 15, 2018

प्रदूषण (३०) - कलयुगात मानवाचा अंत


गेल्या युगात मानव नावाचा अत्यंत बुद्धिमान असा प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होता. कठोर तप करून त्याने अनेक सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्या सिद्धींचा जोरावर तो आकंठ भौतिक सुखात बुडालेला होता. पृथ्वीवरच्या इतर जीवांची त्याला यत्किंचित हि पर्वा नव्हती. पण या वरही त्याचे समाधान झाले नाही. अजर-अमर होण्यासाठी त्याने पुन्हा कठोर तप सुरु केले. अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मनुजपुत्र तुझ्या कठोर तपस्येने मी प्रसन्न झालो आहे, काय पाहिजे तुला मागून घे, अमरतेचे वरदान सोडून. पण वर मागण्याआधी विचार कर. अहंकारने ग्रस्त मनुजपुत्र म्हणाला, मी काही राक्षसांच्या सारखा मूर्ख नाही. तुम्ही निर्मित केलेले भूचर, जलचर, नभचर, देव आणि दानव यांपैकी कोणताही जीव माझा वध करू शकणार नाही. पण मी ज्याच्यावर हात ठेवेल तो तक्षणी मरणार, असा वर द्या. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हंटले, आणि ते अदृश्य झाले.   

आता मी सर्व शक्तिमान, माझ्या शक्ती समोर देव, दानव सर्व  तुच्छ. म्हणतात नाविनाशकाले विपरीत बुद्धी. अहंकाराने ग्रस्त मनुजपुत्राची बुद्धी विपरीत झाली. त्याने सर्वप्रथम, प्राण्यांवर हात ठेवला. पृथ्वीवरील सर्व जीव-जंतू विलुप्त झाले. मग मानवाने झाडांवर हात ठेवला. सर्व वनस्पती नष्ट झाली. तहान लागली म्हणून मानवाने पाण्यात हात घातले, पाणी  मृत आणी विषाक्त झाले. वायूचा स्पर्श मानवालाच्या हाताला जाणविला. माणसाचा हाताचा स्पर्श होताच, वायुतून प्राणवायू निघून गेलीभूक, तहान आणि प्राणवायूच्या अभावाने, तडफडून-तडफडून कलयुगात मानवाचा दारूण अंत झाला. 


Saturday, January 13, 2018

प्रदूषण (१०)- शंकर



रोज कचरा  उचलतो 
त्याची  विल्हेवाट करतो 
धरतीला वाचविण्यासाठी 
रोज हलाहल पितो
शंकर .




टीप: तो कचर्याच्या ढिगाऱ्यातून, रिसायकल करण्यासाठी कचरा वेगवेगळा करतो.  कचर्यात वावरल्याने अनेक प्रकारच्या रोगांना सामोरे जावे लागते. दुसर्या शब्दांत तो रोज हलाहल पितो. पृथ्वी वरील मानव जीवन काही काळ आणखीन वाचविण्यासाठी. 

Friday, January 12, 2018

प्रदूषण (९)- कैन्सर ट्रेन




शेतात टाकले 
विषाक्त रसायने 
तिकीट कैंसर ट्रेनचे 
एडवान्स काढले. 


टीप:रोज बठिंडा पंजाब  येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला  जाते.  त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये  कैंसरग्रस्त शेतकरीच असतात.बीकानेर येथे कैंसरचे मोठे  हॉस्पिटल आहे. आता बठिंडायेथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.

Thursday, January 11, 2018

प्रदूषण (८) - वार्यावर स्वार - संजीवनी आणि स्मागी चेटकीण





वार्यावर पोहत  
संजीवनी आली
प्राण वाचले  
लक्ष्मणाचे 


वार्यावर पोहत 
स्मागी चेटकीण आली
प्राण हरले 
निष्पाप जनांचे.