Friday, March 30, 2018

प्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे



आषाढच्या मेघाने खाली वाकून जमिनीवर बघितले धुळीच्या आवरणा खाली दिसत होत्या गगनचुंबी ईमारती. आकाशात तेजाबी धूर ओकणाऱ्या असंख्य फैक्ट्ररीज व लाखोंच्या संख्येने रस्त्यावर धावणारी वाहने विषाक्त धूर सोडणारी. एक काळी रेखा हि त्याला दिसली, बहुतेक हीच यमुना असावी. मेघाला यक्षाने भरतखंडाच्या  राजधानीचे केलेले वर्णन आठवले. मेघाला प्रश्न पडला इथे खालचे काहीच व्यवस्थित दिसत नाही. अश्या परिस्थितीत यक्षप्रियाला शोधणार तरी कसे? आषाढच्या मेघाने जोरदार वर्षाव करून वातावरण स्वच्छ करण्याचा निश्चय केला. 

आकाशात विजेचा कडकडाट झाला. जोरात पाऊस सुरु झाला. आषाढचा पहिला पाऊस. धुळीने माघलेल्या वृक्ष-वल्लरी अमृताच्या नव्हे तर तेजाबी पावसात भिजल्या. हिरवी पाने काळी पडली. चातकाने चोंच उघडली. मृगाचे दोन थेंब, अमृताचे नव्हे तेजाबी पाणी, त्याच्या पोटात गेले. तो जमिनीवर येऊन पडला. काही क्षणात तडफडत-तडफडत तो कालवश झाला. तहान भागविण्यासाठी रस्त्यावर साचलेले पाणी पिऊन अनेक पक्षी, कोकिळा, साळुंकी, चिमण्या तडफडत-तडफडत मेल्या. 

आकाशात विजेचा कडकडाट ऐकून यक्षप्रियेचा आनंद गगनात मावेना. आषाढचा मेघ घेऊन येणार होता तिच्या प्रियकराचा संदेश. ती धावत पळत इमारतीच्या गच्ची वर पोहचली. तिने वर आकाशात बघितले, भला मोठा काळाकुट्ट मेघ  दिसला. आकाशात चमकणाऱ्या विजेला पाहून तिला वाटले, बहुतेक मला शोधण्यासाठीच या विजा चमकतात आहे. तिला प्रियकराचे बोलणे आठवले, प्रिये तू अंधारात हि विद्युतलते समान सुंदर दिसते. साक्षात रंभाच जणू. दिव्याची काय गरज. प्रियकराची आठवण येताच स्त्री सुलभ लज्जा तिच्या गालावर पसरली. ती अधिकच सुंदर दिसू लागली. काही क्षणात जोरात पाऊस सुरु झाला. ती आज पहिल्यांदाच आषाढच्या पावसात मनसोक्त भिजली. पण हे काय अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. असहनीय पीडा, आपला चेहरा जळतो आहे, असे तिला वाटले. ती कसेबसे आपल्या कक्षात आली. दर्पणात बघितले. तेजाबी पाण्याने तिच्या चेहऱ्यावर व शरीरावर जागो-जागी अनेक घाव केले होते. तिचा चेहरा तेजाबी पाण्यामुळे जळाळा होता. दर्पणात स्वतचा चेहरा बघून ती किंचाळली. अनेक चित्र-विचित्र विचारांचे वादळ तिच्या मनात उठले. आपला कुरूप चेहरा पाहून प्रियकराच्या मनात काय विचार येतील. त्याचे माझ्यावर पूर्ववत प्रेम राहील का? त्याने मला सोडून दिले तर. अखेर तिने कठोर निर्णय घेतला. 

पाऊस थांबला. वातावरण स्वच्छ झाले. पण खालील जमिनीवरचे दृश्य बघून आषाढच्या मेघाने धसकाच घेतला. वृक्ष-लता  तेजाबी पाण्याने जळून काळ्या पडलेल्या होत्या. अनेक पक्षी मृत झालेले दिसले. अरेSरे! माझ्या उदारातले अमृत समान पाणी वातावरणात पसरलेल्या तेजाबी धुळीत मिसळून विष समान झाले. अचानक त्याला यक्षप्रियेची आठवण आली, तीही प्रियकराच्या संदेशासाठी गच्चीवर आली असेल. मेघाने खाली चहूकडे पहिले.  एका इमारती कडे मेघाचे लक्ष गेले, बहुतेक यक्षाने वर्णन केलेली हीच ती इमारत. पण ईमारती खाली एवढी भीड का?  एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे कुरूप झालेला होता. लोक कुजबुज करत होते, हिचा नवरा परदेशी गेलेला आणि हिला पावसात भिजायला हौस. माहित नव्हते का हिला, सरकारने आधीच पावसापासून सावधान राहण्याचा अलर्ट दिला होता. एवढ्या टीवी, रेडियो वर घोषणा होतात. ऐकल्या नव्हत्या का हिने. एक म्हणाला सौंदर्य नष्ट झाल्यावर जगणार तरी कशी? आणिक कुणी म्हणाला आपण सर्वच या विषाक्त वातावरणात हळू-हळू रोज मरतो आहे. कुणालाच चिंता नाही. राजाच जवाबदार आहे, हिच्या मृत्यूला. जमलेले लोक सरकार विरोधात घोषणा देऊ लागले.  

आषाढच्या मेघ वरून सर्व काही बघत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला अतीव दुख झाले. या सर्वाला आपणच जवाबदार आहोत, असे त्याला वाटले. आता परतताना रामगिरी वर यक्षप्रियेचा संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार. काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला उदरातील पाणी घेऊन परत फिरावे व समुद्रात रिकामे करावे.  पण त्याला वरूण राजाचा आदेश आठवला. जमिनीवर काय घडत आहे, याची चिंता न करत दिलेले पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळुन पुढच्या प्रवासाला निघाला. 





Wednesday, March 28, 2018

प्रदूषण (२१): मय दानवाचा बदला


अर्जुनाने सैन्याचे निरक्षण केले. मशालची मशाल प्रज्वलित करून सज्ज होते. धनुर्धारी हि धनुष्यावर  प्रत्यंचा चढवून सज्ज होते. त्यांना कठोर आदेश होता. अग्नीच्या भीतीने खांडव वनातून पलायन करणारे जनावरे हिंस्त्र पशु असो किंवा हरिणाचे पिल्लू कुणालाही जीवित सोडायचे नाही. अर्जुनाने अग्निबाण सोडला, खांडव वनातल्या वनदेवीच्या काळजात खोलवर रुतला. सर्वत्र अग्नीचे डोंब आकाशी उसळले. हीच ती निशाणी. सैनिकांनी चोहूकडून खांडव वनाला अग्नीच्या हवाली केले. सैरवैर पळत जनावरे प्राण वाचवायला वनदेवीपाशी पोहचले. आजपर्यंत वनदेवीने जंगलातल्या प्राण्याची रक्षा केली होती. पण आज अर्जुनाचा अग्निबाण वनदेवीच्या  काळजात खोल रुतला होता तिचे सर्वांग जळत होते. त्या स्थितीही प्राण्यांना उद्देश्यून म्हणाली, बाळानो आज मी तुमची रक्षा करण्यास असमर्थ आहे. तुमचे हे बलिदान व्यर्थ नाही जाणार. कलयुगाची सुरुवात झाली आहे. पाशवी मानव जातीचा अंत आता जवळ आला आहे.  

खांडव वनाची राख-रांगोळी करून अग्नी शांत झाली. त्याच राखेतून एक विशाल काळी आकृती प्रगट झाली.  पृथ्वीवरील मानवांचा समूळ नाश हेच तिचे उद्देश्य. युधिष्ठिराने विचारले, कोण तू, या अग्निकांडात कसा वाचला.  ती आकृतीने  युधिष्ठिर व पांडवांना प्रणाम केला व म्हणाली, मी मय दानव, आपला गुलाम. आपल्या सेवेसाठी सदा सज्ज. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी जिवंत राहिलो आहे. आज्ञा करा. महाराज  युधिष्ठिर ने मय दानवला आज्ञा केली,  देवराज इंद्राच्या अलकापुरीहून सुंदर  इंद्रप्रस्थ नगरीचा निर्माण करा.  

मय दानवाने पर्वतांचे हृदय फोडले, जमीन खोदून काढली नानाविध खनिजे - लोखंड, कोळसा इत्यादी. सिमेंट कांक्रीटची गुगनचुंबी इमारते उभी राहिली. मय दानवाने पाताळातून काढले हलाहल विष. धाऊ लागली त्या  विषावर  नानाविध वाहने ओकीत विषाक्त धूर. अन्न, पाणी आणि वायूतही  पसरविले दानवाने हलाहल विष. युद्धात विजय मिळवून देण्यासाठी  निर्मिती केली विनाशक ब्रम्हास्त्रांची. मानवासाठी नष्ट केले त्यानी सर्व वनप्रांतर. जीर्ण झाले धरणीचे हिरवे वस्त्र. धरणी माता विव्हळत म्हणाली, काय करतो आहे रे मय दानवा, भीषण तापाने सर्वांगाची लाही-लाही होते आहे. मय दानव म्हणाला,  धीर धर माय, थोडी कळ सोस. लवकरच होणार आहे, मानवाचा अंत.  हिमालयाचे म्हणाला, वितळते आहे, माझे पांढरे शुभ्र वस्त्र. पाण्या विना तडफडून-तडफडून मरतील जमिनीवर राहणारे मानवासहित सर्व जीव जंतू. मय दानव अट्टहास करीत म्हणाला, पर्वतराज हेच पाहिजे आहे, मला. पाण्यासाठी होतील युद्धे, अन्नासाठी बंधू घेतील बंधूंचे प्राण. युद्धात वापरले जातील ब्रह्मास्त्र विनाशक. कुरुक्षेत्रात वाचले होते, पांडव पाच. पण आज कुणीच वाचणार नाही. कैलाशवासी शंकर जागे होतील. डमरूच्या तालावर सुरु होईल सृष्टी विनाशक तांडव नृत्य. संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून जाईल. शांत होईल धरणी मातेचा दाह. पुन्हा वनप्रांतरात नवचैतन्य प्रगट होईल.  नसणार फक्त पाशवी मनुष्य जाती. 

अचानक सौ.च्या आवाजाने खडबडून जागा झालो. किती वेळ झोपणार आज ऑफिसला जायचे आहे कि नाही. म्हणतात सकाळचे स्वप्न खरे होतात.  विचार करू लागलो, आपल्या अपरमित इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वयं विनाशाच्या मार्गावर चालत आहोत. पृथ्वीवरच्या सर्व जीवांना नष्ट करून आपण जिवंत राहू शकतो का?

सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराचे अस्तित्व आहे, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे आपल्या स्वार्थासाठी त्यांना नष्ट करण्याएवजी त्यांचे अस्तित्व  स्वीकार केले तरच मनुष्य हि या धरतीवर जीवेत शरद: शतम  अर्थात पृथ्वीवरील पूर्ण आयुष्य भोगू शकेल. १०० वर्ष जिवंत राहू शकेल.  


यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति
सर्वभूतेषु चात्मानं ततो विजुगुप्सते.
[ईशावास्य उपनिषद - (६)] 


 

बड़वानल: समुद्रातील अग्नी

Monday, March 26, 2018

प्रदूषण (२०)- हळू-हळू रोज मरतो मी



शेतात टाकले विष 
जेवणात घेतो विष
हळू हळू रोज मरतो मी.

पाण्यात टाकले विष  
पितो पाणी बोतलबंद
हळू हळू रोज मरतो मी

हवेत उडविले विष 
भिनले श्वासाश्वासांत   
हळू हळू रोज मरतो मी.


टीप: ५0 लाख वाहने दिल्लीत रोज हवेत विष ओकतात. जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक विष पाण्यात / थंड पेयांत टाकले जाते, जेणे करून ते कधी खराब होऊ नये. जेवणात हि आपण अन्नाच्या माध्यमातून किटनाशक, जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक रसायने घेतोच. रोज रोज विष पिण्याचा परिणाम भोगावाच लागेल, त्यातून कुणाचीही सुटका नाही. 


Saturday, March 24, 2018

भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा

(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप).


आज दिनांक २५..२०१८. दिल्लीत रामलीला मैदानात तथाकथित शेतकर्यांचा हितेशी अण्णा हजारे उपोषणावर बसले आहेत. त्यांची एक हास्यास्पद मागणी ६० वरील शेतकर्याला ५००० रुपये महिना पेन्शन मिळाली पाहिजे. आपल्या देशात अधिकांश शेतकरी अल्पभूधारक आणि पार्ट टाईम शेतकरी आहेत. किमान १० कोटी शेतकरी पेन्शन मागतील. वर्षाचे लाख कोटी कुठून येतील  कदाचित अण्णांना हि याचे उत्तर माहित नसेल.  दुसरी मांग उत्पादन लागत वर ५० टक्के नफा. कोण ठरविणार आणि कोण विकत घेणार. अण्णा सांगू शकत नाही. त्यांना  फक्त चमको नेतागिरी करायची आहे. 

आज शेतकरी समस्या म्हणजे, एमएसपी (गहू, धान, डाळी, ऊसाची इत्यादी). वीज माफी, कर्ज माफी. यासाठी धरणे, आंदोलने इत्यादी. कुठल्या हि वस्तूचा भाव 'मांग आणि पूर्ती' चा निर्दयी सिद्धांत ठरवितो.  या कठोर सिद्धांताच्या विपरीत जाण्याचा प्रयत्न केला तर भ्रष्टाचार नावाचा दैत्य जन्म घेतो. आपल्या शेतात काय लावायचे हे आज शेतकरी ठरवू शकत नाही. जगात अधिकांश देशांत किमान ३० टक्के शेतमाल प्रसंस्करीत होतो पण आपल्या देशात टक्के हि नाही. शेतकरी शेतातील तैयार माल हि रस्ते,रेल्वे वीज नसल्याने शीघ्र दूरवर पाठवू शकत नाही.  दुसरे काही लावले तर योग्य भाव मिळणार नाही. मजबूरीने शेतकरी अत्यंत कमी पाऊस येणाऱ्या भागात हि जमिनीतून खोलवरून पाणी काढून ऊस, धान आणि गहू इत्यादी लावतो. परिणाम भरलेल्या गोदामांमध्ये गहू, तांदूळ सडतो आणि साखर कारखान्यांना सरकारी अनुदान मिळतात, कर्ज माफी मिळते. मोठे घोटाळे होतात. परिणाम महाराष्ट्रात अनेक साखर सम्राट कोट्याधीश झाले   नेता हि झाले. स्वयंभू शेतकरी नेता हि आमदार आणि खासदार झाले.  

शेती असो उद्योग. रस्ते, रेल्वे आणि वीज या पायाभूत सुविधा दाराशी पोहचल्या पाहिजे. तीव्र्गतीने शेतमाल असो किंवा औद्योगिक माल एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचला पाहिजे. आज एका ठिकाणी शेतकरी टमाटर, गोबी इत्यादी रस्त्यावर फेकतो किंवा शेतातच नांगर फिरवितो तर दुसरीकडे दिल्ली मुंबईत ग्राहकला तीच वस्तू ५० रुपये किलोच्या कमी भेटत  नाही. कारण १००० किमी जायला ट्रकला किमान - दिवस लागतात. रेल्वे वर एवढा ओझे  आहे कि मालगाड्या दिवसातून १५० किमी हि चालत नाही. दुसरी कडे अमेरिकेत केलिफोर्नियाहून भाज्यांची गाडी न्युयॉर्क पर्यंत जाते. आपले दुर्भाग्य या स्वतंत्रता प्राप्त झाल्यावर अधिकांश सरकारांनी या बाबतीत जास्त लक्ष दिले नाही.  

भूतपूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी सरकारला सर्वप्रथम पायाभूत सुविधांच्या महत्वााची जाणीव झाली. सर्वप्रथम ग्रामीण रस्ते बनविण्याचे कार्य प्रधानमंत्री ग्रामीण योजनेच्या अखत्यारीत आणलें. आज लाखो किमी ग्रामीण रस्ते या योजने अंतर्गत बनले आहे. देशातील रस्त्यांना जोडण्यासाठी सुवर्ण चतुर्भूज योजनेत कार्य सुरु केले. रस्त्यांचे रुंदी कारण हि सुरु झाले. मालगाड्यांसाठी स्पेशल कारीडोर परीयोजानेवर कार्य सुरु झाले. सरकार बदलली आणि १० वर्ष रस्ते आणि रेल्वेचे विकास कार्य जवळपास थांबले. कदाचित त्या सरकारच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या. २०१४ नंतर पुन्हा सरकार बदलली. त्यावेळी ४००च्या वर रस्त्यांचे थांबलेले कार्य पुन्हा सुरु झाले. अनेक राज्य  सरकारांच्या अधीन रस्ते अर्थात स्टेट हाईवे NH अंतर्गत आणले. रस्ते रुंद करण्याची गती वाढली.  पूर्व -पश्चिम, उत्तर-पश्चिम रेल कारीडोर जोमात कार्य सुरु झालेले आहे. किमान कारीडोर पुढील वर्षांत पूर्णपणे सुरु होतील. हीच सरकार राहिली तर २०२४ पर्यंत चारी कारीडोर पूर्ण होतील हि आशा करता येईल. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग हि पूर्ण होईल मध्य महाराष्ट्रात रेल्वे हि पोहचेल. अर्थात हे सर्व झाले तर मालगाडी २४ तासांत १००० किमी ट्रक हि ७०० ते ८०० किमी गतीने धाऊ शकतील. 

गावांत वीज पोहचली पाहिजे आणि २४ तास मिळाली पाहिजे. या बाबतीत हि उदासीनता होती. आता सर्व गांवात वीज पोह्चोविण्याचें कार्य शीघ्र गतीने होते आहे. वीजेच्या बाबतीत भारताची रेंक जगात ७२ वरून २६ वर आली. अर्थात सरकार या बाबतीत निश्चितच गंभीर आहे.  २४ तांस ग्रामीण भागात वीज मिळाली पाहिजे या कडे सरकारने अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची अजून आवश्यकता आहे. वीज असेल तर ग्रामीण भागात शीतगृहे उभारता येतील. त्या शिवाय खाद्य प्रसंस्करण उद्योग विशेषकरून छोटे शेतकर्याने स्थापित केलेले उभे राहू शकत नाही.  शेतकर्यांचे वीजेचे माफ करण्या एवजी स्वस्तात सोलर सयंत्र ग्रामीण भागात पुरविले पाहिजे. जेणेकरून शेतकरी वीजेच्या बाबतीत परावलंबी राहणार नाही. 

या पायाभूत सुविधांचा शेतकर्यांना फायदा कसा होणार.हा प्रश्न येणारच. शेतकरी आपला शेतमाल कमी खर्चांत जास्त दूर पाठवू शकतो.  रस्ता वीज असेल तर ग्रामीण भागात हि खाद्य प्रसंस्करण उद्योग लागतील. शेतकरी आधी भाव ठरवेल आणि मग शेतात बियाणे पेरेल. एमएसपीची गरज भासणार नाही. आज रस्त्यांची आणी वीजेची समस्या काही अंशी दूर झाल्याने देशात खरोखर फूडपार्क निर्मित होऊ लागले आहेत. तेजपूर आसाम सारख्या जागी हि एक फूडपार्क सुरु झाला आहे. विदर्भात हि नागपूर येथे देशातील सर्वात मोठा फूडपार्क बहुतेक याच वर्षी सुरु होईल.  अनेक देशी-विदेशी मोठ्या कंपन्या अनेक छोट्या कंपन्या, शेतकरी समूह हि खाद्य प्रसंस्करण उद्योगात उतरत आहे. फ्रेट कारीडोर पूर्ण झाल्यावर या उद्योगाला अधिक गती मिळेल.  या शिवाय मोठ्या शहरांच्या ५०० किमी परीधीत राहणारा शेतकरी हि शेतातच भाजी-पाला धुऊन चिरून शहरी ग्राहकांना पाठवू लागतील. यात शेतकरी आणि ग्राहक दोघांचा फायदा होईल. 

आपले दुर्भाग्य स्वत:ला शेतकर्यांचे हितैषी समजणारे शेतकरी नेता असो, मुंबईत शेतकरी मोर्चा काढणारे असो किंवा अण्णा हजारे यांच्या मुखातून पायाभूत सुविधांबाबत एक हि शब्द निघालेला मी ऐकला नाही. अर्थात यांना शेतकर्यांशी काही हि सरोकार नाही.