Monday, August 23, 2021

दारुण अंत : राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपाल आणि दानिश सिद्दिकी

मंत्री रतिपाल आणि दानिश दोघांचा दारुण अंत झाला. दोघांची कथाही एक सारखी. पहिली कथा आहे रणथम्बौरचे राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपालची. दिल्ली सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीने रणथम्बौर वर आक्रमण केले. अनेक महीने झाले तरी रणथम्बौर दुर्ग शरण आला नाही. अल्लाउद्दीनच्या सेनेत रसदची टंचाई जाणवू लागली. त्याच्या मंत्र्यांनी सल्ला दिला. जर आपली अशी परिस्थिति आहे तर दुर्गात परिस्थिति यापेक्षा ही बिकट असेल. काफिर चंद चांदीच्या तुकड्यांसाठी देशाची गद्दारी करतात. हीच योग्य वेळ आहे, आपण दगाबाज काफिरांचा वापर करू शकतो. अल्लाउद्दीनचे गुप्तचर कामावर लागले. त्यांनी मंत्री रतिपालला  बूंदीची   लालच देऊन फोडले. मंत्री रतिपालाने दुर्गाच्या एका भागाची रक्षा करणार्‍या सेनापति रणमलला (काहींच्या मते हाही मंत्री होता) आपल्या षडयंत्रात शामिल केले. अल्लाउद्दीनचे सैन्य रणथम्बौर दुर्गात शिरले. महाराणी रंगादेवी, पौत्री देवल देवी सहित 12000 राजपूत स्त्रियांनी जौहर केले. पुरुषांनी केसरिया करून आपल्या प्राणांची आहुति दिली. अल्लाउद्दीनने  मंत्री  रतिपाल आणि रणमलचे डोके हतीच्या पायाखाली चिरडन्याचा आदेश दिला. अल्लाउद्दीन त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या राजाचे आणि राज्याचे झाले नाही तर आमचे काय होणार. तुमच्यासारख्या फितुरांसाठी हेच इनाम उचित आहे. 

दानिश सिद्दिकीचे म्हणाल विदेशात भारताविरुद्ध दुष्प्रचार करण्यासाठी विदेशी मालकांचा चाकर झाला. स्मशानात जळणार्‍या चित्ता म्हणजे करोनाने मेलेल्या लोकांचे फोटो, असा विदेशी मालकांना रुचणारा प्रचार. कश्मीर मध्ये 370 धारेचा गैर वापर करून जिहाद्यांनी  हजारो निर्दोष नागरिकांची हत्या केली. लाखो हिंदूंना घाटीतून पळवून लावले. रोशनी अक्टच्या तहत हजारो लोकांच्या घरदारावर कब्जा केला. जम्मू आणि लद्दाखच्या नागरिकांना गुलाम बनवून ठेवले होते. धारा 370 गेली. लद्दाख आणि जम्मूच्या नागरिकांना खर्‍या अर्थाने स्वतंत्रता मिळाली. काश्मिरी हिंदूंच्या मनात मायदेशी परतण्याची आशा बलवती झाली.  दानिश खरच फॉटोग्राफर असता तर लद्दाखच्या जनतेची प्रसन्नता दाखवू शकत होता. काश्मिरी हिंदूंचे आनंदाश्रू दाखवू शकत होता. पण भारत विरोधी विदेशी मालिकांना जे पाहिजे होते त्यासाठी दिहाडीवर दगड फेकणारे म्हणजे काश्मीरची जनता असे फोटो काढले. साहजिकच आहे त्याला बक्षिसी मिळाली. दानिश अफगाणिस्तानात गेला. बहुतेक तालिबानची विजय यात्रा कवर करायची असेल. पण त्याचे दुर्भाग्य तालिबानने त्याला पकडले. दानिश  पत्रकार होता हे माहीत असूनही तालिबानने त्याला  गोळीने उडविले. त्याचे डोके जीप खाली चिरडले अशी वाच्यता आहे. मला त्यात काहीच आश्चर्य वाटले नाही. चांदीच्या तुकड्यांसाठी गद्दारी करणार्‍यांना हेच बक्षीस मिळते. 


Tuesday, August 17, 2021

प्रतीक्षा

 

 शेवटची गाडीहि 

  निघून गेली 

तिच्या प्रतीक्षेत. 


उरला फक्त 

कोमजलेल्या 

फुलांचा सुगंध.

  






 



 

 

 




Monday, August 9, 2021

काही क्षणिका ९.८.२०२१

 

(१)

पिंपळाने सोडले 

गावाच्या पाऱ्याला. 

फ्लैट मध्ये आला 

मनी प्लांट झाला. 

(२)

वाळूचे मनोरे 

वार्यात उडाले.

भग्न स्वप्नाची

अधुरी कहाणी. 

(३)

कल्पनेला मिळेना 

  साथ सार्थ  शब्दांची.

कोरीच राहिली 

वही कवितेची.

 


 


 







Monday, August 2, 2021

ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते


आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः। 

पितरंच प्रयन्त्स्व:॥

ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य 

(ऋ. १०/१८९/१)

अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची चहूबाजूंनी परिक्रमा करते. 

ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच. 

गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते. इथे "गौः" शब्दाचा अर्थ पृथ्वीच का? हा प्रश्न मनात येईलच? याचे स्पष्टीकरण: 

वरील  ऋचाची ऋषिका सार्पराज्ञी आहे.

पहिली  देवता सार्पराज्ञी  आहे. आपली आकाशगंगाहि सर्पिल आहे. अंतरिक्षात ती सापासारखी कुंडली मारलेली अवस्थेत दिसते. बहुतेक ऋषिकाने आकाशगंगेला सार्पराज्ञी असे संबोधले असावेत. (अर्थात हा माझा निष्कर्ष).  

दुसरी देवता सूर्य आहे. भक्त हा आपल्या देवतेची परिक्रमा करतो, हि आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. ऋचेत गमन करणारी वस्तू सूर्याची चहूबाजूंनी परिक्रमा करत आहे. दृष्टा ऋषिका आपल्या पृथ्वीवरच राहणारी मानव होती. तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल म्हणून तिचे नावहि सार्पराज्ञी असे पडले असावे. तिला झालेल्या साक्षात्काराचे वर्णन तिने छंदबद्ध भाषेत वरील ऋचेत केले आहे. पृथ्वीसाठी "गौः" हा शब्द वापरला.  


टीप: ऋचेचा अर्थ वेद पोर्टल वरून घेतलेला आहे आणि आचार्य बालकृष्णच्या "वेदों शिक्षाएँ" या पुस्तकातून  पुन्हा तपासून पाहिला. 


.