Monday, February 9, 2026

मूर्ख लक्षणे : ओळख आणि उपाय

 

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या माध्यमातून संसारात सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून संसारीक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग लोकांना सांगितला आहे. सर्वांना वाटते की तो शहाणा आहे. आपण अनेकदा मूर्खासारखे वागतो, पण आपल्याला ते कळत नाही. मूर्खपणा सोडल्याशिवाय आपण सांसारिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात सफल होऊ शकत नाही.

मूर्खलक्षण समजावून समर्थांनी मूर्खांचे विविध लक्षणांचे अत्यंत सूक्ष्म वर्णन केले आहे. त्याचा सार खालीलप्रमाणे आहे:

घरातील वागणुकीत मूर्खत्व प्रकट होते, जेव्हा एखादा व्यक्ती आई-वडिलांशी विरोध करून फक्त पत्नीलाच सखी मानतो. पत्नी आणि मुलांसमोर आई-वडिलांना शिव्या देतो. परिणाम भविष्यात त्याला ही तेच भोगावे लागेल. घरातील लक्ष्मीऐवजी परस्त्रीवर प्रेम करतो. भविष्यात त्याची दशाधोबी का कुत्ता, घर का ना घाट कासारखी होईल. घरातील पूर्वापार चालत आलेल्या सनातनी परंपरांचा विरोध करून देव-पितरांचा अपमान करतो, आई-वडिलांना कमी लेखतोहे सर्व मूर्खत्वाचे लक्षण आहे. घरात दारिद्र्य असले तरी बाहेर पूर्वजांची/वडिलांची कीर्ती जो सांगतो, त्याची समाजात लोक खिल्ली उडवितात. त्याला मूर्ख म्हणतात.

समर्थ म्हणतात, घराबाहेरच्या वागणुकीत एखादा व्यक्ती श्रेष्ठांसमोर अहंकार दाखवतो, कारण नसताना हसतो, विवेक धरणे किंवा अनेकांशी वैर करतो. स्वकीयांना दूर ठेवून परक्यांशी मैत्री करतो, जागरणात जाऊन झोपतो, दुसऱ्याच्या घरी अतिशय जेवण करतो, व्यसनांत बुडून राहतो, आळशीपणात संतोष मानतोही मूर्खाची लक्षणे आहेत.

समर्थ पुढे म्हणतात, कामवासनेने निर्लज्ज होऊन मर्यादा सोडणे, रोग असूनही औषध घेणे, सोबतीशिवाय विदेश जाणे, मान मिळणाऱ्या ठिकाणी वारंवार जाणे, श्रीमंत नोकराच्या अंकित होणे किंवा कारण विचारता दंड देणे हीही मूर्खाची वागणूक आहे. एखादा व्यक्ती घरी विवेक सांगतो पण सभेत बोलताना लाजतो किंवा घाबरतो. श्रेष्ठ व्यक्तींशी फाजील सलगी करतो आणि आपले ज्ञान वाया घालवतो.

वरील दोषांपैकी अनेक दोष आपल्या मध्येही असतील. पण समर्थांनी फक्त मूर्खपणाची लक्षणे सांगितली नाहीत, तर ते दूर करण्याचा उपायही सांगितला आहे.

समर्थ म्हणतात, मूर्खत्व हे विवेकाच्या अभावी येते. म्हणून आपण प्रत्येक कृतीचा विचार करून योग्य-अयोग्य याचा निर्णय घेऊन मग कृती करावी किंवा बोलावे. यासाठी समर्थ सांगतात, आपण एकांतात बसून मनाचे परीक्षण केले पाहिजे. स्वतःच्या दोषांचा विचार करून त्यांचा त्याग करण्याचा उपाय शोधावा.

समर्थांनी दासबोधा मनाला योग्य दिशा देण्याचे मार्ग सांगितले आहेतवासना, अहंकार, लोभ यांवर नियंत्रण ठेवणे आणि सात्विक विचार स्वीकारणे. समर्थ म्हणतात, इंद्रियजनित मूर्खपणाचा नाश करण्यासाठी ईश्वरभक्ती हा सर्वोत्तम उपाय आहे. भक्तीने मन शुद्ध होते आणि आत्मज्ञान प्राप्त होते.

समर्थ म्हणतात, दुसऱ्यावर अवलंबून राहता परिश्रम करून स्वावलंबी व्हावे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मूर्खपणा दूर होतो. दररोज काही वेळ काढून आपल्या चुकीच्या कृतींचा विचार करून त्या कशा दूर करता येतील, याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व उपाय केले की हळूहळू का होईना, आपल्यातील मूर्खपणाचे दोष आपण दूर करू शकतो.

 

 

Thursday, February 5, 2026

धर्मराजचा न्याय: चोरी सोन्याच्या नाण्याची

 

भल्या पहाटे उगवत्या सूर्याचा सोनेरी प्रकाश अंगावर पडला की मन प्रसन्न होते. सकाळचे कोवळे ऊन हवेहवेसे वाटते. तसाच सोनेरी रंगाचा सुवर्ण माणसाला प्रिय असतो. सुवर्णाच्या कृपेने माणसाच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात—कपडे-लत्ते, टीव्ही, गाडी, बंगला. आणि जर अधिक सुवर्ण मिळाले, तर त्या बंगल्यात पत्नी रूपात जागतिक सुंदरीही मिळू शकते.

फार पूर्वीची गोष्ट आहे. एक अडाणी व अज्ञानी माणसाला रस्त्यावर सोन्याचे एक नाणे पडलेले दिसले. काहीही विचार न करता त्याने ते नाणे उचलले आणि आपल्या खिशात टाकले. थोड्या वेळाने दुसऱ्या माणसालाही रस्त्यात तेच नाणे दिसले. त्याने आजूबाजूला पाहिले. जवळपास कोणी माणूस नाही याची खात्री करून त्याने नाणे उचलून स्वतःच्या खिशात टाकले. आणखी काही वेळ गेल्यावर एक शिक्षित आणि विचारवंत माणूस तिथे आला. त्यालाही तेच नाणे दिसले. नाणे दिसताच त्याच्या मनात विचारांचे चक्र सुरू झाले—कुणाच्या खिशातून हे नाणे पडले असावे? त्याने चौफेर नजर टाकली, पण कुणीच दिसले नाही. आता काय करावे? नाणे उचलावे का? लगेच मनात दुसरा विचार आला—हे करणे योग्य नाही. दुसऱ्याची वस्तू उचलणे म्हणजे चोरी. छे-छे, दुसऱ्यांच्या वस्तूकडे ढुंकूनही पाहू नये. पण लगेचच दुसरा विचार आला—आलेली लक्ष्मी नाकारणे योग्य नाही. लक्ष्मीचा अनादर झाला तर ती कुपित होते आणि दारिद्र्यात खितपत पडावे लागते. त्याला एक जुनी कथा आठवली…

एकदा शंकर-पार्वती विमानातून जात असताना, शंकर म्हणाले, "तो पाहा खाली पृथ्वीवर जो माणूस दिसतो आहे, तो माझा प्रिय भक्त आहे. वादळ असो वा पाऊस, थंडी असो वा भाजणारा उन्हाळा—हा रोज सकाळी गावाच्या मंदिरात पूजा करतो आणि शंभर प्रदक्षिणा घालतो. याने आजवर स्वतःसाठी काहीही मागितले नाही, म्हणूनच मला तो प्रिय आहे." पार्वतीने खाली पाहिले. फाटके कपडे घातलेल्या त्या दरिद्री भक्ताला पाहून ती म्हणाली, "देवाधिदेव, त्याने काही मागितले नाही हे खरे, पण भक्ताची काळजी घेणे हे आपले कर्तव्य नाही का? विष्णू भगवान तर सतत भक्तांचे कल्याण करतात." शंकर म्हणाले, "हा भाग दुष्काळी आहे. इथे सर्वच लोक दरिद्री आहेत. हा मला सोडून परदेशी जाणार नाही. जोपर्यंत हा या गावात राहील, त्याचे दारिद्र्य दूर होणार नाही. तरीही तुझ्या आग्रहास्तव मी प्रयत्न करतो." शंकरांनी प्रदक्षिणेच्या मार्गात काही सोन्याची नाणी ठेवली. दरिद्री असूनही त्या ब्राह्मणाला नाण्यांना उचलण्याचा मोह झाला नाही. असो, शंकर त्याचे दारिद्र्य दूर करू शकले नाही.

विचारवंत माणसाने निर्णय घेतला—देवाने कृपा केली आहे, हे भगवंताचा कृपाप्रसाद समजून नाणे उचलायला काहीच हरकत नाही. त्याने नाणे उचलून खिशात टाकले.

योगायोगाने तिन्ही माणसे एकाच दिवशी मरण पावली. यमदूतांनी त्यांना धर्मराजासमोर उभे केले. धर्मराजाने पहिल्या माणसाचा हिशोब केला आणि म्हणाले, "तू एकदा सोन्याचे नाणे चोरले होतेस. तुला एक वर्ष नरकवासाची शिक्षा." तो म्हणाला, "मी चोरले नव्हते. रस्त्यावर सापडले होते. मी ते विकून काही दिवस मौज केली." धर्मराज म्हणाले, "ते नाणे तुझ्या मेहनतीचे नव्हते. म्हणून तुला शिक्षा."

दुसऱ्या माणसाला धर्मराजासमोर उभे केले. धर्मराज म्हणाले, "तुला पाच वर्षे नरकवासाची शिक्षा." तो म्हणाला, "मीही नाणे उचलले होते. दोघांना सारखी शिक्षा मिळायला हवी." धर्मराज हसले, "मूर्खा, त्याने नाणे उचलले, तू चोरले. तू चौफेर नजर टाकून खात्री केलीस की कुणी पाहत नाही. हे चोराचे लक्षण आहे."

विचारवंत माणसाला धर्मराजाने १०० वर्षे नरकवासाची शिक्षा सुनावली. तो म्हणाला, "मी तर भगवंताचा कृपाप्रसाद समजून नाणे घेतले. मी निर्दोष आहे. तुम्ही मनमानी शिक्षा देत आहात. मी तक्रार करीन, उपोषण करीन." धर्मराज रागावले, "हे भारत देश नाही जिथे कुणीही उपोषण करतो. हे धर्मराजाचे न्यायालय आहे. तू शिक्षित आहेस, तुला योग्य-अयोग्य समजते. तरीही तू चोरी केलीस आणि त्यात भगवंतालाही गोवलेस. तुझा गुन्हा मोठा आहे. तुला क्षमा नाही."

अशा प्रकारे धर्मराजाने तिघांचा न्यायनिवाडा केला

Tuesday, February 3, 2026

शोध अंतर्मनातील प्रेमाचं

 

खरं प्रेम शोधण्यासाठी तो घराबाहेर पडला. संध्याकाळच्या कुंद प्रकाशात-पायाखाली वाळलेली पाने चुरडत, तो चालत होता. त्याला अनुभवायचा होता प्रेमाचा खरा स्पर्श- जो शब्दांपलीकडचा होता. पण प्रेमाच्या वर्तुळाचे दुसरे टोक त्याला कधीच सापडलं नाही. तो आयुष्यभर कोरडाच राहिला… आणि खरं तर, कोणालाच सापडले आहे का?

हे जग म्हणजे  मोह, माया आणि वासनांचे भोवरे. आपण या भोवर्‍यांतच  गटांगळ्या खात राहतो. प्रेमाच्या गूढ, अथांग महासागरचा स्पर्श आपल्याला होतच नाही. तो अनुभवायचा असेल तर, गरज आहे अहंकाराने बंद झालेल्या हृदयाच्या कपाटांना उघडण्याची. जेव्हा हे कपाट उघडतील, तेव्हा प्रेमाचा प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसेल.

त्या प्रकाशात कळेल, जल, थल, नभ- संपूर्ण चराचर सृष्टीत फक्त एकच तत्त्व व्यापलेलं आहे. ते म्हणजे प्रेम.  प्रेम दृश्य ही आहे आणि अदृश्य ही आहे. ह्या प्रेमामुळे जगाचे अस्तित्व टिकून आहे.ते अनुभवायचं असेल, तर स्वतःच्या आत डोकवावं लागत, बाहेर ते कधीच मिळणार नाही. 

 

 

Friday, January 30, 2026

आंब्याच्या झाडवरचे सरडे

सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात.  (चाट जीपीटीच्या मदतीने बनविलेले चित्र)

 








सरकार
 बदलली तरी चेहरे जुनेच होते

टोपी बदलली तरी  नियत तीच होती.


रंग बदलणारे सरडेच   आंब्याच्या झाडावर होते.

जनतेच्या पैश्यांवरती त्यांचे डोळे खिळले होते.