Monday, February 16, 2026

पढतमूर्ख: "शब्दांचे ज्ञान, कृतीत अज्ञान"


समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या दशक दुसऱ्यातील समास दहाव्यात पढतमूर्खाची (शिकलेल्या मूर्खाची) लक्षणे आणि दोष अतिशय स्पष्टपणे सांगितले आहेत. हे दोष बाह्य विद्वत्ता असूनही अंतरी विवेक आणि सदाचार नसल्यामुळे उद्भवतात. अशा मूर्ख व्यक्तीला अभिमान वाढवतो; तो स्वतःची स्तुती करतो, इतरांचे दोष शोधतो, क्रोधाने कठोर बोलतो, परंतु स्वतःचे अवगुण त्याला दिसत नाहीत. अशा पढतमूर्खांसाठी समर्थ म्हणतात:
 
बहुश्रुत व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा अभिमान धरी ॥३॥
 
समर्थ रामदास सांगतात की काही पुस्तके पाठ करून शिक्षण घेतलेले तथाकथित उच्च शिक्षित लोक स्वतःला विद्वान समजू लागतात. परंतु ग्रंथातील सत्य आणि विवेक त्यांना कळलेले नसते. अशा पढतमूर्खांचे वर्णन करताना समर्थ म्हणतात:
 
समूळ ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दूषण
गुण सांगतां पाहे अवगुण तो एक पढतमूर्ख ॥२६॥
 
समर्थ म्हणतात, कोणत्याही ग्रंथाची समीक्षा करण्यापूर्वी तो ग्रंथ वाचला पाहिजे. उत्तम गुरूकडून त्या ग्रंथातील शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतरच त्या ग्रंथाची समीक्षा करावी. ग्रंथातील गुण-दोष यांचे चिंतन करून सार ग्रहण करावे. गुण स्वीकारावेत आणि दोष टाकून द्यावेत. पण पढतमूर्ख ग्रंथ पूर्ण वाचता किंवा अर्धवट वाचून, एखाद्या श्लोकावरून संपूर्ण ग्रंथाचा विरोध करतो. उदाहरणार्थ, मनुस्मृती जाळणाऱ्यांपैकी बहुतेकांनी तो ग्रंथ वाचलेलाच नसतो.
 
वर्तल्याविण शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी
पराधीन गोसावी तो एक पढतमूर्ख ॥३८॥

एखादा माणूस शास्त्र वाचतो, मोठमोठ्या सभा घेऊन ब्रह्म ज्ञानावर भाषण करतो, पण स्वतःच्या वर्तनात लोभ-क्रोध सोडत नाही . दुसरा एखादा साधू लोकांवर अवलंबून राहतो, प्रपंच हातातून निसटलेला असतो, पण परमार्थाचा साधा अंशही नसतो. \ तिसरा एखादा विद्वान देव- ब्राह्मणांचा द्वेष करतो, फक्त बोलण्यात ज्ञान दाखवतो, पण कृतीत नाही. अश्या सर्वांना समर्थांनी पढतमूर्ख म्हंटले आहे.
 
सारांश: पढतमूर्ख प्रपंचात बुडालेला असतो, स्त्री-कामवासनेला अधीन राहतो, देव-धर्माची निंदा करतो, ब्रह्मज्ञान फक्त तोंडाने सांगतो पण कृतीत आणत नाही, परकीय संगत करतो, व्यसन आणि आळसात रमतो, अतिथी-शरणागतांना त्रास देतो, मत्सर आणि द्वेष धरतो, अनीतीने पैसा कमावतो, भक्तीमार्ग सोडून स्वार्थासाठी ज्ञान वापरतो. परिणामी प्रपंच हातातून निसटतो आणि परमार्थ मिळत नाही.
 
समर्थ म्हणतात विवेक जागृत करून वर्तन सुधारले तरच ज्ञानाचा उपयोग होतो. विवेकाने वागणारा मनुष्य प्रपंचात अडकत नाही, तर परमार्थाकडे वाटचाल करतो. सद्गुण स्वीकारल्याने जीवन सुखी, शांत आणि अर्थपूर्ण होते. लोभ, क्रोध, द्वेष यांचा त्याग करून सत्य, करुणा, संयम यांचा स्वीकार केला तर जीवनाला दिशा मिळते. हेच सद्गुण मनुष्याला शहाणपणाकडे नेतात. अंतरी विवेक, साधना आणि सद्गुण असले तरच जीवन खरेच सुखी आणि अर्थसंगत होते.
 
 

Friday, February 13, 2026

गोटू : क्रिकेटच चेंडू आणि बालपण

 

तेंव्हा माझं वय सुमारे १२ वर्षांचं असेल. अर्थात, थोडा मोठा झालो होतो. खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो होतो. जुन्या दिल्लीत आमचं खेळायचं ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुनेपर्यंत पसरलेले विस्तीर्ण बाग.

मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठं मैदान होतं. मैदानाचा एक भाग स्टीफन कॉलेजचा होता, म्हणून त्या मैदानाला लोक ‘स्टीफन ग्राउंड’ म्हणायचे. सुट्टीच्या दिवसांत २५-३० क्रिकेट टीम्स तिथे खेळत असत. एवढ्या गर्दीत कोणत्या क्षणी डोक्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची कल्पनाही करता येत नसे.

आम्ही ५-६ मराठी मुले, काही मोहल्ल्यातली आणि दोन-चार मुस्लिम मुले, अशी आमची टीम असायची. सर्वच गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय असल्यामुळे प्रत्येकी १०-२० पैसे गोळा करून २-३ रुपये जमवून कॉर्कचा चेंडू विकत घ्यायचो. त्या वेळी क्रिकेटचा चेंडू १०-१४ रुपयांना मिळत असे.

श्रीमंत मुलं पांढऱ्या शुभ्र कपड्यांत, चांगल्या दर्जाच्या बॅट्ससह आणि खरी क्रिकेट बॉल घेऊन खेळायची. त्यांना पाहून आम्हाला इर्षा वाटणं साहजिकच होतं. क्रिकेटच्या चेंडूने खेळण्याची आपली इच्छा कधी पूर्ण होईल, असं वाटत नव्हतं.

एक दिवस मैदानात गोटू भेटला. माझ्याच वयाचा असेल. त्याच्याकडे २-३ क्रिकेटचे चेंडू होते. त्याच्या जवळ असलेल्या क्रिकेट बॉल्सची  क्वालिटी पाहून आम्हाला राहवलं नाही. सहज विचारलं, “कितीला देतो?”

तो म्हणाला, “१ रुपयापासून ५ रुपयांपर्यंतच्या बॉल्स आहेत. घ्यायच्या  असतील तर सांग.” माझ्या मित्राला शंका आली. त्याने विचारलं, “इतक्या स्वस्त बॉल्स कुठून आणतोस?”

गोटू ऐटीत म्हणाला, “DDCAमध्ये ओळख आहे. मॅच संपल्यावर जुने बॉल्स ओळखीच्या लोकांना स्वस्तात मिळतात. काही तर एक-दोन ओव्हरच वापरलेले असतात.” तो डझनच्या भावाने बॉल्स घेतो आणि मग ३-४ रुपयांना विकतो. थोडे जुने असतील तर १-२ रुपयांना. आम्हीही कधी १ रुपया, कधी दीड, तर कधी अगदी नवा कोरा बॉल ३ रुपयांना त्याच्याकडून विकत घेऊ लागलो.

गोटू क्रिकेटही चांगला खेळायचा. कधी-कधी सकाळी आमच्यासोबत खेळत असे. २-३ दिवसांनी कळलं की ‘गोटू’ हे त्याचं टोपण नाव आहे. खरं नाव असलम. तो बल्लीमारान भागात राहायचा.

हिवाळी सुट्टी लागली. गोटूने वादा करूनही बॉल आणून दिला नाही. नंतर कळलं की आमच्यासाठी ठेवलेला बॉल त्याने दुसऱ्या टीमला २ रुपयांना विकला होता. माझ्या मित्राने त्याला झापलं. अखेर त्याने सांगितलं की तो सकाळी ११ वाजता फिरोजशाह कोटला येथे जाणार आहे. बॉल मिळाले तर उद्या आणून देईल.

आमचा विश्वास बसला नाही. मी आणि माझ्या मित्राने ठरवलं की आपणही तिथे जाऊन पाहू, कुणाकडून तो बॉल घेतो. एकदा कळलं की आपणही थेट थोकात बॉल विकत घेऊ शकतो. आणि विकून पैसे कमवू शकतो.

सकाळी ११च्या सुमारास आम्ही पायी दिल्लीगेटवर पोहोचलो. त्या काळात फिरोजशाह कोटला स्टेडियम आजसारखं मोठं नव्हतं. एक रस्ता दिल्लीगेटहून राजघाटकडे जातो. एका बाजूला जुन्या दिल्लीची भिंत, मागे दरियागंज, समोर बाग. दुसऱ्या बाजूला फुटबॉल स्टेडियम, बस स्थानक आणि एक गल्ली सरळ स्टेडियमकडे जाते.

गोटू त्या गल्लीच्या टोकावर बसलेला होता. मैदानात मॅच सुरू होती. आम्हाला पाहताच तो म्हणाला, “धंद्याचा राज  जाणायला आला  का? विश्वास नाही माझ्यावर?”

मी म्हणालो, “विश्वास असता तर इथे आलो नसतो. आम्हाला फक्त बॉल पाहिजे.” तो म्हणाला, “सध्या मॅच सुरू आहे. थोडा वेळ इथे उन्हात बसावं लागेल.”

मी म्हणालो, “इतक्या दूरून मॅच पाहण्यापेक्षा झाडाखाली हिरवळीवर बसू.”तो हसला आणि म्हणाला, “अब आ ही गये हो, तो चुपचाप यहाँ बैठो और तमाशा देखो.”

थोड्याच वेळात फलंदाजाने एक जोरदार फटका मारला. चेंडू आमच्या दिशेने उसळत रस्त्यावर आला. गोटू जणू याच क्षणाची वाट पाहत होता. तो धावत गेला, बॉल उचलला आणि ओरडला, “भागो, भागो!”

आम्ही काही समजण्याच्या आत तो रस्ता पार करून पळत होता. आम्हीही त्याच्या मागोमाग धूम ठोकली. भिंतीसमोरच्या बागेत बरीच मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांची पर्वा न करता आम्ही भिंतीतल्या एका भेगेतून आत शिरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला.

गोटू हसत म्हणाला, “क्यों, मजा आया ना? अबे बेवकूफों की तरह बैठे क्यों रहे. थोडी अजूनच वेळ झाली असती तर पकडले गेलो असतो. खूप मार पडतो. कधी-कधी पोलिसांकडेही सोपवतात.”

मी विचारलं, “इतका धोका पत्करून तू बॉल चोरून विकतोस. मिळालेल्या पैशाचं काय करतोस?” काही क्षण तो माझ्याकडे पाहत राहिला. डोळे पाणावले. म्हणाला, “घरात माझ्यापेक्षा लहान दोन भाऊ आणि एक बहिण आहे. दोन वर्षांपूर्वी आई गेली. वडिलांनी दुसरी लग्न केले. संध्याकाळी वडील भाजीची रेडी लावतात. मी त्यांना मदत करतो. पण ते एक छदामही देत नाहीत. सावत्र आई भावंडांना नीट खायला देत नाही. वडिलांना काही सांगितलं तर ओरडतात, कधी हात उगारतात.”

“या जान-जोखिममध्ये टाकून मिळवलेल्या पैशांनी मी भावंडांना खायला आणतो. आईला न कळता.” पुढे काय बोलावं, हे त्या वयात मला कळलं नाही. मुकाट्याने घरी निघालो. जाताना त्याला वचन दिलं की आजची घटना कुणालाही सांगणार नाही. त्या हिवाळी सुट्टीत आम्ही वचन पाळलं. पुढच्या उन्हाळी सुट्टीत मात्र तो मोरीगेटच्या मैदानात दिसला नाही.

या वर्षी आयपीएलचा सामना पाहताना, कुणास ठाऊक, तब्बल ४२ वर्षांनंतर त्याची आठवण आली. काय करत असेल तो?

Monday, February 9, 2026

मूर्ख लक्षणे : ओळख आणि उपाय

 

समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या माध्यमातून संसारात सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून संसारीक आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग लोकांना सांगितला आहे. सर्वांना वाटते की तो शहाणा आहे. आपण अनेकदा मूर्खासारखे वागतो, पण आपल्याला ते कळत नाही. मूर्खपणा सोडल्याशिवाय आपण सांसारिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात सफल होऊ शकत नाही.

मूर्खलक्षण समजावून समर्थांनी मूर्खांचे विविध लक्षणांचे अत्यंत सूक्ष्म वर्णन केले आहे. त्याचा सार खालीलप्रमाणे आहे:

घरातील वागणुकीत मूर्खत्व प्रकट होते, जेव्हा एखादा व्यक्ती आई-वडिलांशी विरोध करून फक्त पत्नीलाच सखी मानतो. पत्नी आणि मुलांसमोर आई-वडिलांना शिव्या देतो. परिणाम भविष्यात त्याला ही तेच भोगावे लागेल. घरातील लक्ष्मीऐवजी परस्त्रीवर प्रेम करतो. भविष्यात त्याची दशाधोबी का कुत्ता, घर का ना घाट कासारखी होईल. घरातील पूर्वापार चालत आलेल्या सनातनी परंपरांचा विरोध करून देव-पितरांचा अपमान करतो, आई-वडिलांना कमी लेखतोहे सर्व मूर्खत्वाचे लक्षण आहे. घरात दारिद्र्य असले तरी बाहेर पूर्वजांची/वडिलांची कीर्ती जो सांगतो, त्याची समाजात लोक खिल्ली उडवितात. त्याला मूर्ख म्हणतात.

समर्थ म्हणतात, घराबाहेरच्या वागणुकीत एखादा व्यक्ती श्रेष्ठांसमोर अहंकार दाखवतो, कारण नसताना हसतो, विवेक धरणे किंवा अनेकांशी वैर करतो. स्वकीयांना दूर ठेवून परक्यांशी मैत्री करतो, जागरणात जाऊन झोपतो, दुसऱ्याच्या घरी अतिशय जेवण करतो, व्यसनांत बुडून राहतो, आळशीपणात संतोष मानतोही मूर्खाची लक्षणे आहेत.

समर्थ पुढे म्हणतात, कामवासनेने निर्लज्ज होऊन मर्यादा सोडणे, रोग असूनही औषध घेणे, सोबतीशिवाय विदेश जाणे, मान मिळणाऱ्या ठिकाणी वारंवार जाणे, श्रीमंत नोकराच्या अंकित होणे किंवा कारण विचारता दंड देणे हीही मूर्खाची वागणूक आहे. एखादा व्यक्ती घरी विवेक सांगतो पण सभेत बोलताना लाजतो किंवा घाबरतो. श्रेष्ठ व्यक्तींशी फाजील सलगी करतो आणि आपले ज्ञान वाया घालवतो.

वरील दोषांपैकी अनेक दोष आपल्या मध्येही असतील. पण समर्थांनी फक्त मूर्खपणाची लक्षणे सांगितली नाहीत, तर ते दूर करण्याचा उपायही सांगितला आहे.

समर्थ म्हणतात, मूर्खत्व हे विवेकाच्या अभावी येते. म्हणून आपण प्रत्येक कृतीचा विचार करून योग्य-अयोग्य याचा निर्णय घेऊन मग कृती करावी किंवा बोलावे. यासाठी समर्थ सांगतात, आपण एकांतात बसून मनाचे परीक्षण केले पाहिजे. स्वतःच्या दोषांचा विचार करून त्यांचा त्याग करण्याचा उपाय शोधावा.

समर्थांनी दासबोधा मनाला योग्य दिशा देण्याचे मार्ग सांगितले आहेतवासना, अहंकार, लोभ यांवर नियंत्रण ठेवणे आणि सात्विक विचार स्वीकारणे. समर्थ म्हणतात, इंद्रियजनित मूर्खपणाचा नाश करण्यासाठी ईश्वरभक्ती हा सर्वोत्तम उपाय आहे. भक्तीने मन शुद्ध होते आणि आत्मज्ञान प्राप्त होते.

समर्थ म्हणतात, दुसऱ्यावर अवलंबून राहता परिश्रम करून स्वावलंबी व्हावे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मूर्खपणा दूर होतो. दररोज काही वेळ काढून आपल्या चुकीच्या कृतींचा विचार करून त्या कशा दूर करता येतील, याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व उपाय केले की हळूहळू का होईना, आपल्यातील मूर्खपणाचे दोष आपण दूर करू शकतो.