Saturday, April 25, 2026

अमेरिका: युद्धाचा चतुर व्यापारी



दुसऱ्या
महायुद्धानंतरचा काही शांततेचा काळ वगळता, अमेरिका कोणत्या ना कोणत्या देशावर हल्ले करतच आली आहे. या युद्धांमध्ये अमेरिका अब्जावधी डॉलर्स खर्च करते, तरीही ती दिवाळखोर होत नाही; उलट तिची अर्थव्यवस्था अधिकच मजबूत होते. सध्या सुरू असलेले युद्धही अमेरिकन अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठीच असल्याचे दिसून येते.

अनेक राजकीय विश्लेषक ट्रम्प यांना 'बडबडे' किंवा अमेरिकेची प्रतिष्ठा विनाकारण पणाला लावणारे नेते मानतात. त्यांच्या मते, अमेरिकेने दीर्घकाळ चाललेली युद्धे कधीच जिंकली नाहीत. पण माझे मत असे आहे की, अमेरिका युद्ध 'जिंकण्यासाठी' लढतच नाही. या युद्धाच्या माध्यमातून अमेरिका इराणच्या पायाभूत सुविधांची (Infrastructure) एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडझड करेल की, इराणची तेलातून होणारी सर्व कमाई केवळ शस्त्रास्त्रांवर खर्च होईल. यामुळे अमेरिकेचे जागतिक आर्थिक वर्चस्व अबाधित राहते. याच कारणामुळे बहुतांश देश अमेरिकेच्या विरोधात जाण्याचे धाडस करत नाहीत आणि अमेरिकन कंपन्या त्या देशांमध्ये मोठा नफा कमावतात-मग त्या शस्त्रे बनवणाऱ्या कंपन्या असोत किंवा ग्राहकोपयोगी वस्तू विकणाऱ्या. भारतात युनिलिव्हर, नेस्ले, बंजे ऑईल, कारगिल, पेप्सी ते डॉमिनोजपर्यंतच्या कंपन्यांनी याच प्रकारे बाजारपेठेवर कब्जा केला आहे.
 
तेल: राजकारण आणि युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र
 
२५ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेली ही कहाणी एखाद्या थ्रिलर चित्रपटासारखी आहे, जिथे अमेरिकेने कच्च्या तेलाला (Crude Oil) युद्धाचे सर्वात मोठे शस्त्र बनवले. २५ फेब्रुवारीला जेव्हा तेलाच्या किमती ६८ डॉलरच्या आसपास होत्या, तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की ट्रम्प प्रशासनाचा एक निर्णय बाजारात आग लावेल. २८ फेब्रुवारीला 'ऑपरेशन एपिक फ्युरी' (Operation Epic Fury) अंतर्गत इराणवर झालेल्या हल्ल्यांनी किमतींना रातोरात रॉकेट बनवले. ट्रम्प यांच्या विधानांनी या आगीत तेल ओतण्याचे काम केले; कधी त्यांनी "इराणला धूळ चारण्याची" भाषा करून किमती १११ डॉलरच्या पार नेल्या, तर कधी "शांतता चर्चेचे" संकेत देऊन बाजाराला दिलासा दिला.
 
या काळात अमेरिकेने आपल्या तेलाच्या विहिरी पूर्ण क्षमतेने खुल्या केल्या आणि दररोज सुमारे ५० लाख बॅरल तेल निर्यात केले. २५ फेब्रुवारीच्या किमतींच्या तुलनेत, अमेरिकेने या लाटेवर स्वार होऊन सुमारे २४. अब्ज डॉलर्स (सुमारे .०५ लाख कोटी रुपये) कमावले. जर किमती युद्धापूर्वीच्या स्तरावर राहिल्या असत्या, तर ही कमाई . अब्ज डॉलर्सनी कमी झाली असती. म्हणजेच, या अस्थिरतेने अमेरिकन तेल कंपन्यांच्या खिशात मोठा 'विंडफॉल प्रॉफिट' (अतिरिक्त नफा) टाकला.
 
व्यापारी दृष्टिकोण: महाग तेल, मजबूत अमेरिका
 
'ऑपरेशन एपिक फ्युरी'वर अमेरिकेचा थेट लष्करी खर्च ३० ते ४७ अब्ज डॉलर्स (सुमारे . ते लाख कोटी रुपये) झाला असला आणि तो तोट्याचा व्यवहार वाटत असला, तरी ट्रम्प यांची 'अमेरिका फर्स्ट' नीती याला एक 'धोरणात्मक गुंतवणूक' (Strategic Investment) मानते. जेव्हा कच्चे तेल महाग होते, तेव्हा जागतिक पुरवठा साखळी आणि शिपिंगचा खर्च वाढतो. याचा थेट परिणाम अमेरिकेत येणाऱ्या विदेशी आयातीवर होतो, ज्यामुळे महागड्या विदेशी वस्तू अमेरिकन बाजारपेठेत आपली पकड गमावू लागतात.
 
तेलाच्या वाढलेल्या किंमती अमेरिकन मॅन्युफॅक्चरिंगसाठी 'अदृश्य टॅरिफ' (Hidden Tariff) म्हणून काम करणार, ज्यामुळे स्थानिक उद्योग स्पर्धात्मक बनतील  आणि परकीय अवलंबित्व कमी होणार. दुसर्‍या शब्दांत पेट्रोलसाठी मोजलेली प्रत्येक अतिरिक्त किंमत ही प्रत्यक्षात 'मेड इन USA' ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पादन पुन्हा देशात आणण्यासाठी (Reshoring) दिलेली 'प्रीमियम फी' आहे. त्याचबरोबर, महागड्या पेट्रोल-डिझेलमुळे इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि सौर ऊर्जा यांसारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक वाढणार.  देशांतर्गत लॉजिस्टिक्स आणि ऑटोमेशनलाही फायदा होणार, कारण आता कंपन्या परदेशाऐवजी अमेरिकेतच रोबोटिक्स आणि AI आधारित कारखाने उभारण्यास प्राधान्य देत आहेत.
 
संरक्षण उद्योग आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट

युद्धाचा सर्वात मोठा फायदा अमेरिकन संरक्षण उद्योगाला होतो. प्रत्येक शस्त्राची एक 'एक्स्पायरी डेट' असते. क्षेपणास्त्रे, बॉम्ब आणि रासायनिक गोळे हे एखाद्या औषधासारखे असतात ज्यांची साठवणूक मर्यादा (Shelf Life) असते. एका ठराविक काळानंतर त्यातील स्फोटके आणि सेन्सर्स निकामी होऊ लागतात. एखादे जुने क्षेपणास्त्र सुरक्षितपणे निष्क्रिय (Dismantle) करण्यासाठी त्याच्या निर्मिती मूल्याच्या ३०% ते ५०% खर्च येऊ शकतो. अशा स्थितीत त्यांचा युद्धात वापर करणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरते.
 
युद्धाचे मैदान हे कोणत्याही युद्धाभ्यासापेक्षा (Drill) उत्तम टेस्टिंग ग्राउंड असते. प्रत्यक्ष युद्धात शस्त्रांच्या परिणामकारकतेची जी माहिती (Data) मिळते, ती अब्जावधी डॉलर्स खर्च करूनही प्रयोगशाळेत मिळवता येत नाही.
 
ब्रँड व्हॅल्यू आणि पुनर्निर्माणाची बाजारपेठ
 
जेव्हा युद्धात अमेरिकन शस्त्रांची श्रेष्ठता सिद्ध होते, तेव्हा लॉकहीड मार्टिन आणि रेथियॉन सारख्या कंपन्यांना अब्जावधी डॉलर्सच्या नवीन ऑर्डर्स मिळतात. भारतासारख्या मोठ्या खरेदीदारांचा विश्वासही त्यांच्यावर वाढतो. गेल्या काही वर्षांत भारताने अमेरिकेकडून MQ-9B प्रेडिटर ड्रोन, MH-60R सीहॉक, अपाचे, चिनूक, P-8I देखरेख विमान आणि तेजससाठी GE-F414 जेट इंजिन यांसारख्या घातक शस्त्रांचे सौदे केले आहेत. भारताने आतापर्यंत अमेरिकेला सुमारे .८५ लाख कोटी रुपये (२२ अब्ज डॉलर्स) पेक्षा जास्त संरक्षण ऑर्डर्स दिल्या आहेत. ही गुंतवणूक केवळ भारतीय सैन्याला आधुनिक बनवत नाही, तर जागतिक स्तरावर अमेरिकन शस्त्रांच्या 'ब्रँड व्हॅल्यू'वर शिक्कामोर्तब करते.
 
शेवटी, ज्या देशाच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त होतात, तिथे युद्धांतर 'पुनर्निर्माणाचे' (Reconstruction) कंत्राटही बहुधा त्याच देशांच्या कंपन्यांना मिळते ज्यांनी युद्ध सुरू केले होते. सारांश हा की, हे युद्ध इराणला उद्ध्वस्त करो ना करो, पण अमेरिकन अर्थव्यवस्थेला नक्कीच मजबुती प्रदान करेल. हीच 'ट्रम्प काकां'ची खरी व्यापारी चाल आहे.

सारांश: हा लेख अमेरिकेच्या त्या धोरणाचे विश्लेषण करतो ज्यामध्ये युद्ध आणि जागतिक अस्थिरतेचा वापर आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी केला जातोकच्च्या तेलाच्या किमती वाढवून देशांतर्गत उत्पादनाला (Manufacturing) 'अदृश्य टॅरिफ'चा फायदा मिळवून देणे, जुनी शस्त्रास्त्रे युद्धात वापरून त्यांचा विल्हेवाट खर्च वाचवणे आणि नवीन ऑर्डर्सद्वारे संरक्षण क्षेत्राला गती देणे, ही सर्व एका सुनियोजित व्यापारी रणनीतीची सूत्रे आहेत

(टीप: या लेखातील संशोधन आणि आकडेवारीच्या विश्लेषणांत AI ची मदत घेण्यात आली आहे.)

Thursday, April 23, 2026

खोमनेईची कृपा: चुलीवरचे जेवण, गोवर्‍यांचे राशन

इराण युद्ध असेच सुरू राहिले तर: 

 

चुलीवरच्या जेवणासाठी

गरज नाही गावाला जायची।

खोमनेईच्या कृपेने आज

घरातच पेटली चूल रे।



मर्सडीज गाडीला पहा,

बैल कसे ओढतात भारी।

रुणझुण घंटा नाद ऐकू येतो,

आता पुन्हा साद देतो पुराणी।

 

गाय आणि गोबरचे राज्य

पुन्हा आले माझ्या देशा।

दुधापेक्षा गोबरला आज

भाव जास्त मिळाले बघा।

 

गोबराच्या गोवऱ्यांसाठी

सरकारी राशनचे दुकान।

लाकूडतोड्याला सापडली

आज सोन्याची कुऱ्हाड।

 

हे खोमनेईच्या कृपेचे फळ,

प्रगतीचे नवे रूप दिसले।

चूल, गोबर, बैलगाडी...

काळचक्र पुन्हा फिरले। 


 

 
 

 
गोबराच्या गोवऱ्यांसाठी आज उघडले दुकान राशांचे. लाकूडतोड्याचे भाग्य पुन्हा उजळले, मिळाली त्याला सोन्याची हो कुऱ्हाड.

Monday, April 20, 2026

धुरंधरचे गाणे आणि बायकोचा दंडा"

 

एक गायक होता, जो आयुष्यभर फक्त दुःख आणि वेदनांनी भरलेली गाणीच गात असे. तुटलेलं हृदय, दगा, उदासी आणि एकाकी रात्री - हे त्याच्या गाण्यांचे नेहमीचे विषय होते.

त्याच्या लग्नाची २५वी वर्षगाठ होती. सकाळपासूनच बायकोने स्पष्ट इशारा दिला होता, आज आनंदाचा दिवस आहे. कोणतंही नकारात्मक किंवा दुःखी गाणं म्हणू नकोस. नाहीतर बघून घेईन!”

संध्याकाळी पार्टीचे वातावरण खूप सुंदर होते. मित्र-नातेवाईक आले होते. रंगीबेरंगी दिवे, हास्य-विनोद, स्वादिष्ट पदार्थांचा सुगंध सर्वत्र पसरलेला होता, आणि सर्व अतिथी मौजमस्ती करत होते.

त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी गायकाला गाण्याची विनंती केली. त्याने आनंदी गाणी सुरू केली. लोक टाळ्या वाजवू लागले आणि म्हणाले, वाह! या वयातही आवाजात तीच जादू आहे!”

तेव्हा कोणीतरी धुरंधर सिनेमातील प्रसिद्ध गाणं म्हणायला सांगितलं: ना तो कारवां की तलाश है, ना हमसफर की तलाश है…”

बायकोचा इशारा आठवताच गायकाने ताबडतोब गाण्याचे बोल बदलले. “ना” च्या जागी “हाँ” घालून त्याने गाणं सुरू केलं:

हाँ आज कारवां की तलाश है… 

हाँ आज नए हमसफर की तलाश है…”



गाणं ऐकताच सारा हॉल टाळ्यांच्या आणि शिट्ट्यांच्या गजराने भरून गेला. त्याचा एक मित्र मोठ्याने ओरडला, अरे वा! या वयातही नवीन हमसफर हवा आहे! कमाल आहे भाऊ!”

हे बोल बायकोच्या कानावर पडताच तिचा राग सातव्या आकाशाला पोहोचला.

दुसऱ्या दिवशी गायक रुग्णालयाच्या बेडवर पडला होता. चेहऱ्यावर पट्ट्या, हात-पायात दुखापत. त्याला काहीच समजत नव्हतं की शेवटी काय झालं. त्याने तर बायकोचा सल्ला मानला होता, मग बायकोने तिच्या भावांसोबत मिळून त्याला मारहाण का केली?


Thursday, April 16, 2026

गुरुद्रोणाचार्य: कोचिंग क्लासेस आणि एकलव्य

 
हस्तिनापूरचे गुरुकुल त्या काळातील अत्यंत प्रतिष्ठित शिक्षण संस्था होती. हे विशाल गुरुकुल फक्त देशी-विदेशी राजकुमारांसाठी राखीव होते. गुरुकुलात सकाळी भाषा, गणित, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायव्यवस्था, राजकारण इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जात असे. दुपारनंतर गुरुकुलाच्या विस्तीर्ण मैदानावर अस्त्र-शस्त्रांचे कठोर प्रशिक्षण राजकुमारांना दिले जात असे. गुरुकुलाच्या काही अंतरावर धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र होते. त्या केंद्राचे प्रमुख आचार्य गुरु द्रोणाचार्य होते. हस्तिनापूर राज्याकडून त्यांना मान-सन्मानासह उत्तम वेतन मिळत होते. राजकुमारांना शिकवली जाणारी गूढ विद्या इतर कुणालाही शिकवायची नाही, ही अट होती. खासगी शिकवणी घेण्यास त्यांच्यावर बंदी होती.
 
गुरु द्रोणाचार्य आतून अत्यंत चतुर होते. त्यांचे मेहुणे कृपाचार्य सकाळी धनुर्विद्येचे प्रशिक्षण द्यायचे, पण प्रत्यक्षात द्रोणाचार्य सर्वांना प्रशिक्षण देत असत. त्यासाठी महिन्याकाठी मोठी गुरुदक्षिणा त्यांना मिळत असे. निषादराज हिरण्यधनूचा पुत्र एकलव्य हा कृपाचार्यांचा शिष्य होता.
 
हस्तिनापूर राज्यात दर चार वर्षांनी युद्धशस्त्रकलेची प्रतियोगिता होत असे. ही प्रतियोगिता सर्वांसाठी खुली होती. प्रथम पुरस्कार लाख सुवर्णमुद्रा होता, पण उत्तम प्रदर्शन करणाऱ्यांनाही अनेक पुरस्कार मिळत असे. याशिवाय भारतखंडातील राजे-महाराजे उत्तम प्रदर्शन करणाऱ्या प्रतियोगींना त्यांच्या राज्यांत नोकरी देत असत. त्यामुळे संपूर्ण भारतखंडातून हजारो प्रतियोगी या स्पर्धेत भाग घेत असत.
 
एका दिवशी अर्जुनाला वार्ता मिळाली की गुरु द्रोणाचार्य नियमभंग करून राजकुमारांच्या व्यतिरिक्त इतरांना धनुर्विद्येचे गूढ शिकवतात. हस्तिनापूरात अफवा पसरली होती की यावर्षी होणारी धनुर्विद्येची प्रतियोगिता द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य एकलव्य जिंकणार आहे.
 
अर्जुनाने ही वार्ता युधिष्ठिराला सांगितली. युधिष्ठिराने वेळ न गमावता हस्तिनापूर गुरुकुलाचे प्रमुख भीष्म पितामह यांच्याकडे गुरु द्रोणाचार्यांची तक्रार केली. पितामह भीष्मांनी द्रोणाचार्यांना जाब विचारला. द्रोणाचार्य म्हणाले, “एकलव्य हा माझा शिष्य नाही. मी पहाटे उठून धनुर्विद्येचा सराव करतो. त्यावेळी तिथे कुणीच नसते. कदाचित एकलव्य मला सराव करताना चोरून पाहत असेल.”
 
भीष्म पितामह म्हणाले, “याचा अर्थ एकलव्य चोरून विद्या ग्रहण करत होता.” विदुर म्हणाले, “पितामह, द्रव्य, वस्तू, जनावरे इत्यादी चोरीसाठी दंड देण्याची व्यवस्था आपल्या कायद्यांत आहे. पण विद्या चोरीसाठी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे एकलव्याला आपण दंड देऊ शकत नाही. चोरी गुरु द्रोणाचार्यांच्या विद्येची आहे. त्यांनाच शिक्षा ठरवू द्या.”
 
द्रोणाचार्य म्हणाले, “त्याने चोरून का होईना माझ्याकडून विद्या शिकली. त्यामुळे आता मी त्याचा गुरु झालो आहे. मी गुरुदक्षिणेत त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागतो.” भीष्म पितामहांनी सहमती दिली. एकलव्याने सहर्ष आपला उजव्या हाताचा अंगठा द्रोणाचार्यांना समर्पित केला. आता द्रोणाचार्य एकलव्याला उघडपणे धनुर्विद्या शिकवू लागले.
 
काही महिन्यांनी हस्तिनापूरमध्ये धनुर्विद्येची स्पर्धा भरली. भरतखंडातील हजारो स्पर्धकांनी त्यात भाग घेतला. साहजिकच कृपाचार्यांचे शिष्यही त्यात सहभागी झाले. प्रतियोगिता सुरू झाली. कर्णाने शंभर पैकी ९१ गुण मिळविले, तर अर्जुनाने ९२ गुण मिळवून कर्णाला मात दिली. आपणच प्रतियोगिता जिंकू, हा विश्वास अर्जुनाला होता. पण एकलव्याने ९५ गुण घेऊन अर्जुनाला मात दिली. सर्वांनी एकलव्याचा जयजयकार केला. अंगठा नसतानाही त्याने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले होते. एक लाख सुवर्णमुद्रा त्याने जिंकली. या क्षणाचा फायदा घेऊन दुर्योधनाने मिठी मारून त्याचे अभिनंदन केले.
अर्जुनाला वाटले गुरु द्रोणाचार्याने त्याला दगा दिला आहे. संध्याकाळी अर्जुनाने कृष्णाला विचारले, “अंगठा छाटल्यानंतरही हे कसे शक्य झाले?” कृष्ण म्हणाले, “मित्रा, तू बाण कसा चालवितोस?” अर्जुन म्हणाला, “मी तर्जनी आणि मधल्या बोटाने बाण पकडतो कारण ही बोटे दोरीला स्थिर पकड देतात आणि सोडताना बाणाची दिशा बिघडत नाही.” कृष्ण हसत म्हणाले, “गुरु द्रोणाचार्यांनी नियमांचे पालन करत ही सर्वांना मूर्ख बनविले. तू स्वतः डोळ्यांनी पाहिले की कृपाचार्यांचे सर्वच शिष्य उत्तम प्रदर्शन करत होते.”
 
आजही ही सरकारी शाळा असो किंवा महागड्या शाळांमध्ये शिकविणारे उत्तम शिक्षक निजी संस्थांमध्ये भारी भरकम फी घेऊन शिकवितात. तिथे शिक्षण घेणारे अधिकांश विद्यार्थी प्रतियोगी परीक्षेत पास होतात.

(काल बागेत फिरताना आमच्या सोसायटीतील एका शेजार्‍याने मला संगितले की त्याचा मुलगा एका महागड्या शाळेत शिकतो. त्या शाळेच्या बसेस ही एसी आहेत. तरीही त्याला कोचिंग लावावे लागले आहे. आश्चर्य म्हणजे त्या कोचिंग इंस्टीट्यूट मध्ये तोच शिक्षक शिकवतो जो शाळेत शिकवतो. - त्या वरुन सुचलेली कथा)

  

 

Saturday, April 11, 2026

उद्योग–व्यवसायासाठी व्यवस्थापनाचे नैतिक मार्गदर्शन

 समर्थ रामदास स्वामींचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे १७व्या शतकातील अमूल्य साहित्य आहेत, जे केवळ आध्यात्मिक नाहीत तर जीवनव्यवहार आणि नेतृत्वाचे उत्कृष्ट सूत्र आहेत. उद्योगातील व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन या ग्रंथांत आहे. या दोन्ही ग्रंथांत समर्थांनी उद्योगात सफलतेसाठी शिस्त, प्रेरणा आणि नैतिकतेवर भर दिला आहे. त्यांनी सांगितलेले व्यवस्थापनाचे त्रिकोणप्रयत्न, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठाखालील उदाहरणांसह मी आपल्या अल्प बुद्धीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

. प्रयत्न आणि शिस्त: अपयश टाळण्याचे सूत्र

"अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना

आपला अवगुण जाणवेना काहीं केल्यां "

(दशक १२, समास , ओवी ):

अपयशाचे कारण अविवेकी प्रयत्न; स्वदोष ओळखा. 

"मना पापसंकल्प सोडूनि द्यावा

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा " मनाचे श्लोक (श्लोक ):

रामदास म्हणतात जर दुकानदार जास्त नफ्यासाठी खोटे बोलून निकृष्ट दर्जाची वस्तू महागात विकेल, तर कधी ना कधी ग्राहकाला सत्य कळेल आणि तो पुन्हा त्या दुकानात येणार नाही. कारण काठ की हांडी फक्त एकदाच चढते.  दुकानदार GST आणि इतर कर वाचवण्यासाठी खोटे बिल देत असेल तर तो  कधीतरी  कायद्याच्या चक्रात अडकेल.  मानहानी होईल आणि त्याला जेलमध्ये ही जावे लागेल. परिणाम  संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त होईल. उद्योग धंदा करायचा असेल तर तो सत्याच्या आधारावरच केला पाहिजे.

. नम्रता आणि संवाद:  मनाच्या श्लौकांत समर्थ  म्हणतात,

"मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे

मना बोलणे नीच सोशीत जावें

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे "

दुकानदार असो की उद्योगपती, कर्मचाऱ्यांच्या चुका झाल्यावर त्यांच्यावर आरडाओरडा करण्याऐवजी नम्रतेने त्या चुका कशा सुधाराव्यात यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे. ज्यांनी चूक केली त्यांना तात्काळ काढून टाकण्या ऐवजी धैर्याने विचार करून त्यांचे मार्गदर्शन केले पाहिजे. नम्रतेने केलेले मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना प्रेरणा देते आणि व्यवसाय टिकवते.  उदाहरण: जर एखाद्या कर्मचाऱ्याने बिलिंगमध्ये चूक केली, तर त्याला रागावण्याऐवजी शांतपणे ती चूक दाखवून दुरुस्त करायला शिकवावे. पुढे अशा चुका टाळण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. यामुळे कर्मचारी सुधारतो आणि ग्राहकांचा विश्वासही टिकतो.

. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा: दीर्घकालीन यश

 "ज्या ज्याचा जो व्यापार तेथें असावे खबर्दार " (दासबोध दशक ११// १९):

समर्थ म्हणतात, व्यापारात नेहमी खबरदारी ठेवली पाहिजे. उदाहरण:  जर परचेस विभागातील अधिकारी लाच घेऊन उत्तम दर्जाच्या ऐवजी निकृष्ट दर्जाचे टोमॅटो आणतील, तर त्यापासून बनलेली सॉसही निकृष्ट दर्जाची बनेल. ग्राहकांना दर्जाहीन माल मिळाला तर ते तुमची सॉस विकत घेणे बंद करतील. म्हणून मालकाने डोळे उघडे ठेवून प्रत्येक कामावर लक्ष ठेवले पाहिजे. उत्पादनाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी मालकाने कारखान्यातील प्रत्येक भागावर; खरेदी, उत्पादन प्रक्रिया आणि विक्री; इत्यादींवर  बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. यासाठी त्याला स्वतःही कामात सहभागी व्हावे लागते. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात कामेविण राहू नये. मालक जर जाणीवपूर्वक लक्ष ठेवणारा असेल तर कर्मचारीही इमानदारीने काम करतील. ग्राहकांना दर्जेदार माल मिळाला तर त्यांचा विश्वास बसतो. परिणामी कंपनीची ब्रँड व्हॅल्यू वाढते आणि व्यवसायही अधिक यशस्वी होतो

 . शिकण्याची वृत्ती: मूर्खपणा दूर करणे

 "ऐसीं हें मूर्खलक्षणें श्रवणें चातुर्य बाणे

चित्त देउनियां शहाणे ऐकती सदा " (दशक / / ७२):

समर्थ म्हणतात, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पूर्वी त्या क्षेत्रात लोकांनी केलेल्या चुका नीट समजून घेतल्या पाहिजेत. त्या चुका पुन्हा करू नयेत, कारणदुसऱ्यांना काय समजते, मीच शहाणाहे मूर्खपणाचे लक्षण आहे. शहाणपण म्हणजे इतरांच्या अनुभवातून शिकणे, उत्तम सल्लागारांचे विचार ऐकणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे. त्यानंतर चातुर्याने ते मार्गदर्शन आपल्या उद्योगात लागू करणे आणि व्यवस्थित पद्धतीने राबवणे. यामुळे चुका टळतात, वेळ वाचतो आणि व्यवसाय अधिक मजबूत होतो. उदाहरण: एका नवीन स्टार्टअपने सुरुवातीच्या काळात गुणवत्ता नियंत्रण प्रणाली बसवली नव्हती. त्यामुळे ग्राहकांना एकसारख्या दर्जाचे उत्पादन देऊ शकले नाही. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आणि व्यवसायावर परिणाम झाला. मग तज्ञांचे ऐकून त्यांनी गुणवत्ता नियंत्रणावर लक्ष दिले. परिणामी त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला आणि ब्रँडवर विश्वास बसला.

समर्थ रामदासांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे व्यवस्थापनासाठी नैतिक मार्गदर्शन देणारे ग्रंथ आहेत. यात प्रयत्न आणि शिस्त यावर भर देऊन सत्याच्या आधारावर व्यवसाय करावा, अन्यथा अपयश निश्चित ठरते असे सांगितले आहे. नम्रता आणि संवादाने कर्मचाऱ्यांच्या चुका सुधाराव्यात, प्रशिक्षण मार्गदर्शनाने संघटना मजबूत होते. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणामुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो, ब्रँड टिकतो आणि व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी राहतो. तसेच इतरांच्या चुका ऐकून शहाणे होणे हेच खरे चातुर्य आहे; शिकण्याची वृत्ती व्यवसायाला दीर्घकालीन यश देते. अशा रीतीने हे ग्रंथ आधुनिक व्यवस्थापनात प्रयत्न, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठा या त्रिकोणातून यशस्वी आणि नैतिक नेतृत्वाचे सूत्र देतात।