Friday, June 5, 2026

अंधकारातून प्रकाशाकडे — कर्मबंधनातून मुक्तीची यात्रा

 


 
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तूंचि शोधुनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचित केले।
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥ (मनाचे श्लोक ११)
 
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, हे मना, जगात कोण असा आहे जो नेहमी सर्व प्रकारचे सुख भोगत आहे? (कोणीच नाही!) तू स्वतःच विचार कर आणि शोधून पाहा. हे मना, तूच पूर्वजन्मींच्या कर्मांचा संचय (पूर्वसंचित) केला आहेस. त्याचप्रमाणे (कर्मानुसार) जे भोग (सुख-दुःख) प्राप्त झाले आहेत, ते तुला भोगावेच लागणार आहेत. आता मनात प्रश्न येणार पूर्वसंचित कर्म कसे बदलावे. समर्थ म्हणतात:-
 
समर्थ रामदास स्वामी मनाला समजावत आहेत की, जगात कोणीहीसर्वसुखीनाही. सुखी-दुःखी होणे हे काळाचे चक्र आहे, जे सदैव चालत राहते. जे काही घडते, ते पूर्वकर्मांचे फळ आहे असे समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे. मनाने व्यर्थ रडणे किंवामाझ्याच बाबतीत असे का?” असे निरर्थक प्रश्न विचारणे सोडून द्यावे. प्रारब्ध कर्माचा स्वीकार केल्याने मन शांत होते आणि आत्मचिंतन सुरू होते. हा श्लोक कर्मयोग आणि समभाव शिकवतो. दुःख आले तरी मनाला त्यात बुडवून जाता, धीराने सामोरे जावे.
 
येथे मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की, पूर्वसंचित कर्म म्हणजे नेमके काय? गतजन्माचे कर्म की या जन्माचे? आपण गतजन्म पाहिलेला नाही आणि तो आपल्याला आठवतही नाही. परंतु, या जन्मातील आपली कर्मे आपल्याला चांगलीच ठाऊक असतात. "पूर्वसंचित कर्म" म्हणजेच "पूर्वी केलेले कर्म" असा अर्थ येथे आपण घेऊ शकतो. आपल्या पूर्वीच्या कृतींचा परिणाम आपल्याला भोगावाच लागतो.
 
महाभारतातील द्यूतसभेत द्रौपदीने स्वतःचा अपमान रोखण्यासाठी भीष्म पितामह, द्रोणाचार्य, विदुर आणि कृपाचार्य यांच्याकडे न्याय मागितला. परंतु त्या वेळी ते सर्वजण मौन राहिले. धर्मराज युधिष्ठिराने द्यूत खेळण्याचे निंदनीय कर्म केले होते, म्हणून तोही शांत राहिला. भीमाने गदा उचलली नाही आणि अर्जुनाने गांडीवही सरसावले नाही. प्रजेनेही या अन्यायाविरुद्ध बंड केले नाही. परिणामी, याचा फटका सर्वांनाच बसला. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर संपूर्ण कुरुवंशाचा विनाश झाला आणि १८ अक्षौहिणी सैन्य नाहक मारले गेले. हा प्रसंग आपल्याला दाखवतो की, अन्यायाच्या वेळी मौन बाळगणे हे देखील एक पापकर्मच आहे आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. जर प्रजा अन्यायी राजाला सहन करत असेल, तर त्याच्या दुष्कृत्यांचा परिणाम प्रजेलाही भोगावा लागतो.
 
आजच्या काळातही "पूर्वसंचित कर्म" या संकल्पनेचे परिणाम दिसून येतात. गाझातील काही लोकांनी दहशतवादी संघटना हमासला समर्थन दिले. हमासचा उद्देश विशिष्ट समाजाचा विनाश करणे हा होता, जे एक प्रकारे अधर्मकर्मच ठरते. जेव्हा त्यांच्याकडून निरपराध लोकांची हत्या केली गेली, तेव्हा त्या कृतीचा परिणाम भयंकर झाला. संपूर्ण गाझा उद्ध्वस्त झाला, हजारो लोक मारले गेले आणि लाखो विस्थापित झाले. त्यांच्या जीवनात दुःख, दारिद्र्य आणि असुरक्षितता आली. यावरून हेच स्पष्ट होते की, धर्माच्या मार्गावर राहणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि वर्तमानात योग्य कर्म करणे हेच जीवनाचे खरे तत्त्व आहे.
 
आता मनात प्रश्न येणार पूर्वसंचित कर्म कसे बदलावे. समर्थ म्हणतात:-
 
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा॥ (मनाचे श्लोक )
 
मनुष्याच्या सर्व कृती मनातील संकल्पातूनच जन्म घेतात. जर मन पापाचे विचार करत असेल, तर त्यातून वाईट कर्मे होतात आणि त्याचे फळ दुःखरूप मिळते. म्हणून समर्थ रामदास सांगतात की मनाने पापविचारांचा त्याग करून त्यांना मनात स्थान देऊ नये. त्याऐवजी सत्याचा, सत्कर्माचा संकल्प मनात दृढपणे धरावा. सत्यसंकल्प म्हणजे सत्य बोलणे, सत्य आचरण करणे, दया, सेवा, दान, नामस्मरण यांचा ध्यास घेणे. जेव्हा मन सतत सत्यसंकल्पात रमते तेव्हा मन शुद्ध होते आणि पूर्वसंचित कर्म शिथिल होतात.

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात:-
 
 उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः॥ (अध्याय , श्लोक )
 
मन हेच आपले सर्वात मोठे मित्र किंवा सर्वात मोठे शत्रू असते. जर आपण मनावर नियंत्रण ठेवले, त्याला सकारात्मक विचार, शिस्त, सद्गुण आणि आत्म-उन्नतीकडे वळवले तर ते मन आपले विश्वासू मित्र बनते. हे मन आपल्याला प्रेरणा देते, धैर्य देते, अडचणींमध्ये स्थिर ठेवते आणि यशाच्या मार्गावर नेते. दुसरीकडे, जर मनाला आवर घातला, त्याला काम, क्रोध, लोभ, मोह, आळस, नकारात्मक विचार किंवा व्यसनांमध्ये बुडू दिले तर ते स्वतःचेच शत्रू बनते. हे मनच आपल्याला कमकुवत करते, आत्मविश्वास कमी करते, अपयशाकडे नेते आणि शेवटी अधोगतीकडे घेऊन जाते.
 
पापसंकल्पाचा त्याग करून सत्यसंकल्प स्वीकारल्याने मन शुद्ध होते. शुद्ध मन सत्कर्माकडे वळते आणि पूर्वसंचित कर्म शिथिल होतात. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांचे भोगही बदलतात. याची अनेक ठोस उदाहरणे आपल्याला ग्रंथांत आणि इतिहासात दिसतात.
 
वाल्या कोळी हा क्रूरकर्मा होता; वाटसरूंना मारून लुटून तो आपला उदरनिर्वाह करत असे. परंतु, महर्षी नारदांचा उपदेश त्याला लाभला. त्याने चुकीचा मार्ग सोडून भक्तिमार्गाचा स्वीकार केला आणि तो पुढे 'वाल्मीकी ऋषी' झाला. साधना आणि भक्तीने त्याने आपले जीवन पूर्णपणे बदलले

अंगुलीमाल हादेखील एक भयंकर डाकू होता. त्याने शेकडो लोकांची हत्या करून त्यांच्या बोटांची माळ गळ्यात घातली होती. परंतु, जेव्हा गौतम बुद्ध त्याला भेटले, तेव्हा त्यांच्या शांत आणि करुणेने भरलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे अंगुलीमालाचे हृदयपरिवर्तन झाले. बुद्धांच्या मार्गदर्शनाने त्याने हिंसा सोडून धर्ममार्ग स्वीकारला आणि पुढे तो भिक्षू होऊन त्याला बुद्धत्वाची प्राप्ती झाली. हे उदाहरण दाखवते की, योग्य मार्गदर्शनाने आणि आत्मपरिवर्तनाने अगदी भयंकर अधर्म करणारा मनुष्यही बदलू शकतो.
 
इतिहासात सम्राट अशोकाचे उदाहरणही तितकेच महत्त्वाचे आहे. सत्तेसाठी त्याने आपल्या भावांची हत्या केली आणि कलिंग युद्धात अतोनात रक्तपात केला. परंतु, त्या युद्धानंतर त्याला तीव्र पश्चात्ताप झाला आणि त्याने शांती, अहिंसा धम्माचा मार्ग स्वीकारला. इतिहासात तो "देवनांप्रिय" म्हणून ओळखला गेला.

सारांश  

  • पापसंकल्पाचा त्याग करून सत्यसंकल्प स्वीकारल्याने मन शुद्ध होते.

  • शुद्ध मन सत्कर्माकडे वळते आणि पूर्वसंचित कर्म शिथिल होतात.

  • योग्य मार्गदर्शन आणि आत्मजागृतीने वाल्मीकी, अंगुलीमाल आणि अशोक यांसारख्या व्यक्तींनी जीवन परिवर्तन केले.


 
पूर्वसंचित कर्मफळे, जीव भोगी नित्यकाळा।
महाभारतातील उदाहरणे दिसती सर्व जगाला॥
नारदगुरु भेटला, वाल्या भक्ति मार्गी चालला।
वाल्मिकी ऋषी बनून तो कर्मबंधनातून मुक्त झाला॥
 
 

Tuesday, June 2, 2026

“गुरुकुलांचा उजेड आणि ब्रिटीशांचा अंधार”


(ब्रिटिश सर्व्हे वर आधारित कविता)




देशात गावोगावी होते
गुरुकुल सहा लाखांहून जास्त
शिकत होते तिथे सारे
ब्राम्हण, दलित, शूद्र, स्त्री–पुरुष.
 
जगात होते सर्वात जास्त
साक्षर जनतेचे प्रमाण
ज्ञानाचा दीप उजळत होता
भारत होता शिक्षणधाम.
 
शिक्षक असो वा विद्यार्थी,
शूद्रच होते जास्त तिथे,
वैद्यकीय शिक्षणातही,
वाजत होता त्यांचा दणका!
 
मनुस्मृतीच्या नावाने
खोटी आवई उठवली
ब्रिटीशांनी बंद केले
गुरुकुल सारेच्या सारे.
 
दलितांना केले वंचित
शिक्षणाच्या हक्कापासून
हेच आहे सत्य इतिहासाचे
डोळे उघडा, तपासा दस्तावेज  
असत्यात जगणाऱ्यांनो!
 

Saturday, May 30, 2026

दावणीची पत्रकारिता


   

प्रधानमंत्री कार्यालयातील मीडियाच्या एका अधिकार्‍याच्या घरी लग्न झाले होते. लग्नानंतर तीन-चार दिवसांनंतरची गोष्ट
, लंच करून मी सहज त्या अधिकार्‍याच्या पीए रूममध्ये गेलो. एका टेबलावर ५०–६० शगुनाचे लिफाफे ठेवलेले होते. पीए संगणकावर त्याची नोंद चढवत होता. मी सहज विचारले, “लिफाफ्यातील पैसे मोजणे हे तर घरच्यांचे काम असते ना?” तो म्हणाला, “हे फक्त मीडिया वाल्यांचे आहे. साहेबांसाठी मी लिस्ट तयार करतो आहे.” मी पुन्हा विचारले, “एवढ्या सार्‍यांना खरंच बोलावले होते का?” तो हसत म्हणाला, “यातल्या दहा टक्क्यांना तर निमंत्रणही नव्हते. तरीही सर्वांनी शगुन पाठविला. कदाचित साहेबांच्या लक्षात राहिले तर किमान बांग्लादेशचा दौरा मिळू शकतो.”
 
त्या काळी परदेश दौर्‍यावर प्रधानमंत्रींच्या ताफ्यात ३५–४० पत्रकारही असायचे. प्रधानमंत्री ७४७ विमानाच्या पहिल्या मजल्यावर, समोर मोठे अधिकारी, मधल्या भागात पत्रकार, आणि मागच्या भागात आमच्यासारखे कर्मचारी व एसपीजी असायचे. विमानातच पत्रकारांसाठी प्रेस कॉन्फरन्स होत असे.
 
पत्रकारांची जंगी खातीरदारी विमानातच व्हायची—अर्थात सोमरसाचीही व्यवस्था असायची. आमच्यातल्या पिणार्‍यांसाठी मात्र अंगूर खट्टे हैं! असो. बहुतेक पत्रकारांची राहण्याची व्यवस्था दुसर्‍या हॉटेलमध्ये केली जाई; किंवा हॉटेल मोठे असेल तर दूरच्या विंगमध्ये. ज्या विंगमध्ये प्रधानमंत्री आणि स्टाफ राहत असत, तिथे पत्रकारांना प्रवेश नव्हता. पत्रकारांना गिफ्टसुद्धा दिले जात असत. याशिवाय त्याकाळी पत्रकारांना सरकारी फ्लॅट, विविध सरकारी समित्या इत्यादींमध्ये प्रतिनिधित्व दिले जात होते. सोप्या शब्दांत, त्यांना दावणीला बांधून ठेवण्याचे प्रयत्न सुरू असत.
 
ज्या वेळी अण्णांचे आंदोलन दिल्लीत सुरू होते, तेव्हा माध्यमांमध्ये सरकारविरोधी वातावरण होते. मला आठवते, एक दिवस माझ्या साहेबांच्या खोलीत मीडिया पाहणार्‍या एका अधिकाऱ्याने डोकावले. साहेबांनी त्याला व्यंगात्मक भाषेत विचारले, "माध्यमांमध्ये आजकाल सरकारच्या विरुद्ध विष ओकले जात आहे, तुम्ही काय करत आहात?" तो म्हणाला, "बहुतेक कुणीतरी मोठे हाडूक त्यांच्यासमोर टाकले असावे." मला थोडे वाईट वाटले, पण सरकारी अधिकाऱ्यांच्या नजरेत मोठमोठ्या पत्रकारांची हैसियत दावणीला बांधलेल्या कुत्र्यांपेक्षा जास्त नव्हती.

बाकी या घडीला दावणीला बांधलेल्या पत्रकारांची परिस्थिती वाईटच आहे. सरकारी सुखसुविधांपासून ते वंचित झाले आहेत. मोदी सत्तेतून बाहेर कधी पडतील याचीच ते वाट पाहत आहेत. सद्यपरिस्थिती पाहता त्यांना २०३४ पर्यंत वाट पाहावी लागेल.

 

 

Monday, May 25, 2026

वेदांचे मोती: आत्म-पराजित राजाचे लक्षणे आणि परिणाम

 
अक्षद्रुग्धो राजन्यः पाप आत्मपराजितः।
स ब्राह्मणस्य गामद्यादद्य जीवानि मा श्वः ॥ (अथर्ववेद ५/१८/२)


आचार्य बालकृष्ण यांच्या मते, जो राजा इंद्रियांच्या अधीन होऊन आत्म्याने पराजित होतो आणि पापमार्गात प्रवृत्त होतो, तो विद्वान ब्राह्मणांच्या वाणीवर बंदी घालतो. असा राजा आज जिवंत असला तरी भविष्यकाळात टिकणार नाही. त्याचे राज्य नष्ट होईल.

आपल्या पाच ज्ञानेंद्रिया बाह्य जग आणि आपल्या मेंदू यांच्यामध्ये सेतूसारखे कार्य करतात. त्यांच्यामार्फत आपल्याला संसाराचे ज्ञान होते. सर्वप्रथम चक्षु (डोळा) येतो, ज्याचे मुख्य कार्य प्रकाश, रंग आणि आकार पाहून 'रूप' जाणवणे आहे. त्यानंतर श्रोत्र (कान) आहे, जे आकाशतत्त्वाद्वारे ध्वनी आणि शब्द ग्रहण करून आपल्याला ऐकण्याची शक्ती देते. घ्राणेंद्रिय (नाक) वायुत असलेल्या सुगंध-दुर्गंधांचा अनुभव देते. रसना (जिभ) अन्नातील रस आणि विविध स्वाद (गोड, कडू, आंबट) ओळखते. शेवटी स्पर्शेंद्रिय (त्वचा) आहे, जी संपूर्ण शरीरात पसरलेली असून स्पर्श, तापमान, दाब आणि वेदना जाणवते.

ही पाचही इंद्रिये मिळून मनुष्याला बाह्य वातावरणाबद्दल जागरूक आणि सक्रिय ठेवतात. इंद्रिये नैसर्गिकरित्या विषयांकडे (इच्छांकडे) धाव घेतात. जेव्हा सज्जन मनुष्यही बुद्धीऐवजी इंद्रियसुखाला प्राधान्य देतो, तेव्हा असुररूपी 'पाप' किंवा 'विकार' इंद्रियांमध्ये प्रवेश करतात. राजा तर सर्वशक्तिमान असतो. जो राजा 'अक्षद्रुग्ध' (इंद्रियांच्या मोहात अडकलेला) असतो, तो अनिवार्यपणे पापमार्गाकडे जातो.

जेव्हा शासक वासना, अहंकार आणि भोगविलासाचा गुलाम होतो, तेव्हा तो सर्वप्रथम 'विद्वान ब्राह्मणां'वर (सत्य बोलणारे बुद्धिजीवी आणि सल्लागार) बंदी घालतो. त्याला टीका सहन होत नाही आणि तो सत्याऐवजी चाटुकारितेला प्राधान्य देतो.

असा राजा 'आत्मपराजित' असतो. रणांगणात शत्रूंना जिंकला तरी तो स्वतःच्या आतल्या 'असुरां'कडून हरलेला असतो. जेव्हा राजाची बुद्धी भ्रष्ट होते, तेव्हा तो प्रजेवर अत्याचार करतो आणि हिंसेचा मार्ग निवडतो. वेद सांगतो की असा राजा आज जिवंत दिसत असला तरी त्याचे भविष्य अंधकारमय असते. तो 'आज' जगतो, पण 'उद्या' राहणार नाही, म्हणजेच त्याचा यश, पद आणि साम्राज्य काळाच्या गालात सामावून जाईल.

महाराज रावण याचे सर्वात मोठे उदाहरण आहेत. रावण महापंडित, वेदांचा ज्ञाता आणि अजेय योद्धा होता, पण तो इंद्रियांच्या (काम आणि अहंकार) अधीन झाला. सीता मातेसाठीची त्याची वासना आणि बलाचा मद यामुळे त्याची विवेकशक्ती नष्ट झाली. परिणामी, महान साम्राज्य आणि सोन्याची लंका पूर्णपणे नष्ट झाली. राजाच्या कुकर्मांचा परिणाम जनतेलाही भोगावा लागतो.

प्राचीन वैदिक ज्ञान आणि वर्तमान जागतिक परिस्थिती यांचा संगम आपल्याला शिकवतो की राष्ट्राचे भविष्य शासकाच्या आत्मनियंत्रणावर अवलंबून असते. आजच्या युगात खाडी युद्ध आणि मध्यपूर्वेतील संघर्ष हे जिवंत पुरावे आहेत की जेव्हा सत्तेवर असलेले व्यक्ती इंद्रियांचे गुलाम होतात, तेव्हा विनाश निश्चित असतो. तेल, संसाधनांचा लोभ आणि विस्तारवादाचा अहंकार त्यांना असुर बनवतो.

जेव्हा शासक वासना आणि मदमध्ये चूर होऊन स्वतःच्या प्रजेला युद्धाच्या आगीत ढकलतो, तेव्हा तो अथर्ववेदाच्या शब्दांत 'आत्मपराजित' होतो. असा राजा स्वतःच्या आत्म्यापाशी हरलेला असतो, म्हणून तो केवळ वर्तमानच उद्ध्वस्त करत नाही, तर राष्ट्राचे भविष्यही अंधकारात ढकलतो.

याउलट, भारतासारख्या राष्ट्रासाठी हे अत्यंत सौभाग्याचे आहे की त्याचे नेतृत्व इंद्रियदोषांपासून मुक्त आणि आत्मसंयमी आहे. जेव्हा शासक लोभ, मोह आणि स्वार्थापलीकडे जाऊन उपनिषदांमध्ये वर्णिलेल्या 'मुख्य प्राण' प्रमाणे निष्काम भावाने कार्य करतो, तेव्हा राष्ट्राची ऊर्जा विनाशकारी युद्धाऐवजी विकास, तंत्रज्ञान आणि जनकल्याणात खर्च होते.

इंद्रियजयी नेतृत्व केवळ कूटनीतिक स्तरावर देशाचा सन्मान वाढवत नाही, तर समाजाला स्थैर्यही देते. म्हणूनच आज देश आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सतत प्रगती करत आहे आणि प्रजाही शांती, सुख आणि गौरव अनुभवत आहे. सत्ता-रथ योग्य दिशेने तेव्हाच धावेल जेव्हा त्याच्या घोड्यांच्या (इंद्रियांच्या) लगाम 'आत्मविजयी' सारथ्याच्या हातात असेल.