Wednesday, June 4, 2025

तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार

आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्‍याने  ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर,  आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती. त्यांच्या उद्देश्य चीनचे केंद्रीय नेतृत्व कमकुवत करून जमले तर चीनचे तुकडे करण्याचा होता. पण चीनच्या कम्यूनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी स्वतचे निजी स्वार्थ विसरून देश हितासाठी कठोर कार्रवाई केली. किमान दहा हजार लोकांना यमसदनी पाठविले होते अशी वाच्यता आहे. पण या घटनेनंतर चीन मधले सर्व लोकतंत्र समर्थक आवाज नष्ट झाले किंवा कठोरतापूर्वक दाबून टाकले. आज चीनचे युवा आंदोलन इत्यादि सोडून विकासाच्या कार्यात व्यस्त आहे. आज चीन आर्थिक आणि सैनिक महाशक्ती बनला आहे. जर चीन ने 24 जूनला कठोर कार्रवाई केली नसती तर काय झाले असते. रशियाचे उदाहरण आपल्या समोर आहे. त्या पूर्वी ही अमेरिकाने सीआयए मार्फत इराणच्या नेत्यांना आणि मीडियाला विकत घेतले होते. पंतप्रधान मोहम्मद मोसद्देकच्या विरोधात मोठ्या प्रमाणात दुष्प्रचार केला होता. त्याला सत्ता सोडण्यास भाग पाडले होते. रशियात ही अमेरिकेने तेच सूत्र वापरले.  अमेरिकाने शेकडो रशियन नेत्यांना विकत घेतले. त्यांच्या व्यक्तिगत महत्वाकांशा वाढविल्या. मीडियाचा ही उपयोग केला. रशियाचे विभाजन झाले. शीत युद्धात अमेरिका विजयी झाला. फक्त काही लाख डॉलर खर्च करून. पुतीन सत्तेत आले, रशिया पुन्हा शक्तिशाली बनू लागला. आता सीआयए ने पुन्हा डॉलर, मीडिया आणि लालची नेत्यांचा वापर करून एका पाळीव कुत्र्याला यूक्रेनच्या सत्तेवर बसविले आणि त्याला रशियावर भुंकण्यासाठी सोडून दिले. यूक्रेन आणि रशिया युद्धाची किंमत मोजत आहे. दोन्ही देशांची कितीतरी ट्रीलियन डॉलरची संपत्ति नष्ट झाली असेल. दोन्ही कडचे हजारो सैनिक मरण पावले असतील. युक्रेन पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे आणि रशिया ही बर्‍यापैकी उध्वस्त झाला आहे. त्याच वेळी जर रशियाच्या शासकांनी कठोर निर्णय घेतला असता तर आज रशियाचे तुकडे दिसले नसते आणि संयुक्त रशिया अधिक उन्नत झालेला दिसला असता. जगात शांति ही असती. 

4 जून 1989च्या घटनेपासून भारताने काय शिकले पाहिजे. भारतात 1947 पासून लोकतंत्र आहे. भारताच्या राज्यांना भरपूर अधिकार आहे. मनात आले तर मुख्यमंत्री राज्यातले विकासाचे प्रोजेक्टस ही थांबवू शकतो. भारताच्या न्यायपालिकेचे बाबत तर काहीही बोलणे व्यर्थ आहे. न्यायाधीश तर स्वत:ला शासकच समजतात. लोकतंत्रच्या नावाने हे सर्व चालून जाते. भारतात ही अनेक नेत्यांच्या मनात स्वतंत्र देशाचे शासक होण्याची इच्छा आहे. त्यासाठी विदेशी मदत घेण्यात ही ते मागे पुढे राहणार नाही.  

गेल्या दहा वर्षांत भारताने अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांत भरपूर प्रगति केली आहे. भारताची प्रगति डीप स्टेटच्या डोळ्यांत खुपते. जॉर्ज सोरेस मार्फत डीप स्टेट ने  सत्तांतर करण्यासाठी किमान 7000 कोटी डॉलर भारतात खर्च केले, असे ऐकिवात आहे. डीप स्टेटने  मीडिया, एनजीओ इत्यादींच्या मदतीने किसान आंदोलनाच्या नावावर हजारों लोकांना  दिल्लीत घुसवून तियानानमेन सारखी परिस्थिति निर्माण करायची होती. पण भारताच्या शासकाने अत्यंत संयमी भूमिका घेऊन लाठीचा प्रयोग न करता आंदोलनकार्‍यांना दिल्ली बॉर्डर वर थोपवून ठेवले. हरियाणा निवडणूकीत जर भाजप पराजित झाली असती तर पुन्हा दिल्ली बॉर्डर वर ठाण मांडण्याचा आणि दिल्लीत घुसण्याचा हेतु तथाकथित आंदोलनकार्‍यांचा डाव होता. पण दिल्ली बॉर्डरला लागून असलेल्या हरियाणातील  मतदारांनी हे षड्यंत्र विफल केले. 

भविष्यात शासक कोणत्याही पक्षाचे का असेना, देशाला विभाजित करण्यासाठी सतांध नेत्यांचा, मीडिया, सोशल मीडिया इत्यादींचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होईल. भविष्यात जर  तियानानमेन सारखे  दिल्लीत हजारो उपद्रवी घुसले तर त्यावेळच्या शासकांना कठोर निर्णय घ्यावाच लागेल. जर नाही घेतला तर रशिया प्रमाणे देशाचे तुकडे होतील. 4 जून 1989 आपल्याला हाच संदेश देतो. 


Monday, June 2, 2025

समर्थ विचार: कीर्तनकार आणि कीर्तन



हा लेख लिहाण्यापूर्वी अनेक विठू माऊलीचे गुणगान करणार्‍या आणि संतांच्या गाथा सांगणार्‍या वारकरी संप्रदायांच्या आणि इतर कीर्तनकारांचे कीर्तन यूट्यूब वर बघितले. कीर्तन बघताना मला जाणवले अनेक कीर्तनकारांना कीर्तनाचा उद्देश्य ही माहीत नाही. ते श्रोत्यांना प्रसन्न करण्यासाठी पांचट आणि राजनीतिक विनोद करतात. बहुतेक जास्त प्रसिद्धी आणि बिदागी साठी श्रोत्यांच्या मनोरंजनावर भर दिला जातो. ते संतांच्या कधी न केलेल्या चमत्कारांच्या गाथा ऐकवितात. आज महाराष्ट्रात आणि देशात कीर्तनाच्या माध्यमाने सत्य आणि धर्म मार्गावर चालण्याची आणि स्वधर्म रक्षणाची प्रेरणा देणारे कीर्तनकार कमीच. समर्थांनी दासबोधात कीर्तन कसे करावे, हे सांगितले असले तरी वारकरी कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनात समर्थांचा उल्लेख केलेला मला तरी दिसला नाही. काही कीर्तनकार तर कीर्तनाची आड  घेऊन जातिगत द्वेष वाढविण्याचे कार्य ही परोक्ष रूपेण करतात. त्या बाबत जास्त बोलत नाही. त्यांच्या दृष्टीने टाळ मृदंग वाजवून भगवंताचे गुणगान करणे म्हणजे कीर्तन. आजच्या लेखात कीर्तनकार कसा असावा आणि कीर्तन करण्याचा उद्देश्य काय असावा यावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. 

समर्थ म्हणतात, कीर्तनकाराची वेशभूषा स्वच्छ असली पाहिजे. त्याची आवाज उत्तम असली पाहिजे. त्याला नृत्य आणि संगीताचे थोडे बहुत ज्ञान असायला पाहिजे. कीर्तन करणार्‍याला कीर्तन करण्याचा उद्देश्य ही माहीत असला पाहिजे. त्यासाठीच समर्थ म्हणतात, नाना वचनें प्रस्ताविक. शास्त्राधारें बोलावीं. भक्ति ज्ञान वैराग्यलक्षण. नीती न्याय स्वधर्मरक्षण.  कीर्तनकाराने धार्मिक ग्रंथांचा अभ्यास आणि पाठांतर केले पाहिजे. कीर्तनकाराने वेद, उपनिषद, श्रुति आणि स्मृतिंची थोडी माहीत घेतली पाहिजे. किमान भगवद्गीता तरी वाचली पाहिजे. दासबोध आणि सत्यार्थ प्रकाश सारखे ग्रंथ अवश्य वाचले पाहिजे. ग्रंथांचा अभ्यास केल्याने किंवा नुसत्याच वाचनाने सुद्धा सनातन धर्माविषयी कीर्तनकाराच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन ही होईल आणि त्याला कीर्तन करताना ग्रंथातले उदाहरण देऊन श्रोत्यांच्या मनातील शंका ही दूर करता येतील. 

फक्त भगवंताच्या लीलांचे गुणगान आणि चमत्कारांचे वर्णन म्हणजे कीर्तन नव्हे. आपल्या ऋषींनी मानवी आयुष्याला चार आश्रमात विभाजित आहे. ब्रम्हचारी आश्रमात शिक्षा ग्रहण करणे, ग्रहस्थ आश्रमात धर्म मार्गावर चालत प्रचंड पुरुषार्थ करून सांसारिक भोग भोगणे, वानप्रस्थ आश्रमात संसारीक भोगापासून विमुक्त होण्याचा प्रयत्न करणे आणि नंतर संन्यास आश्रमात मोक्षाची वाटचाल करणे.  

कीर्तनकाराने कीर्तन असे केले पाहिजे की  श्रोत्यांच्या मनात भगवंता प्रति प्रेम आणि श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. त्यांच्या  मनात सकारात्मक ऊर्जा निर्मित झाली पाहिजे, पुरुषार्थ करण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यांच्यात परस्पर प्रेम आणि सौहार्द उत्पन्न झाला पाहिजे. नीती आणि न्याय म्हणजे काय, हे श्रोत्यांना समजले पाहिजे. कीर्तनकाराने श्रोत्यांना स्पष्ट केले पाहिजे, भगवंत शरीर रूपी रथाला सत्य आणि धर्माचा मार्ग दाखवितो, त्याच मार्गावर चालत सांसारीक आणि आध्यात्मिक मार्गात चालण्यासाठी पुरुषार्थ करणे हे जीवाचे कार्य आहे. भगवंत चमत्कार करत नाही. आपण जर धर्माच्या मार्गावर चालू तर प्रत्यक्ष भगवंत आपल्या रथाचे सारथी बनतील. कर्म हे आपल्यालाच करायचे आहे. कीर्तनकाराने, श्रोत्यांना भगवंताचे नियमित नामस्मरण केल्याने सांसारीक कार्यांत नियमितता कशी येते,  गुरुचरणी बसून विद्या अध्ययन करून ज्ञान कसे प्राप्त करावे, इत्यादींचे उदाहरण देऊन श्रोत्यांना सांगितले पाहिजे.  कीर्तन ऐकून श्रोत्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांना मोक्षाच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा मिळाली तरच कीर्तन सार्थकी लागते. 

स्वधर्माच्या रक्षणाला समर्थ अधिक महत्व देतात. कारण धर्म जीवित राहील तरच धर्म तुमचे रक्षण करणार. त्यासाठीच समर्थांनी शोर्याचे प्रतिक मारुतीच्या मंदिरांची स्थापना आपल्या मठांत केली होती. आज ही अनेक आखड्यांत मारूतीचे मंदिर असते. असो. नुकतेच पहलगांव हल्यात एका ही व्यक्तीने आतंकींचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांचे मुख्य कारण कीर्तनकार मग ते भागवत कथा करणारे असो किंवा भगवती जागरण करणारे असो, श्रोत्यांना अधर्माविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणाच देत नाही. परिणाम, संत म्हणजे चमत्कार करणारे सिद्ध पुरुष अशीच श्रोत्यांची कल्पना झाली आहे. त्यांची पूजा अर्चना केल्याने सर्व संकटे दूर होतील अशीच आशा श्रोत्यांना असते.  अधर्माविरुद्ध संघर्ष न करण्याची प्रेरणा न मिळाल्याने  गत काळात आपली मंदिरे विध्वंस झाली. धर्माचा विध्वंस झाला. बहुधा देश आणि धर्माची अवस्था पाहूनच तुलसीदासांनी रामचरितमानसाची निर्मिती केली असावी. धर्माचा खरा अर्थ कळला पाहिजे याच साठी समर्थांनी दासबोधाची रचना केली. आजची परिस्थिति ही वेगळी नाही. आज कीर्तन करताना, कीर्तनकाराने स्वधर्म रक्षण करणारे छत्रपति, राणा प्रताप इत्यादींच्या शोर्याच्या एखाद्या गाथेचे अवश्य वर्णन केले पाहिजे. कीर्तन ऐकून श्रोत्यांना स्वधर्म रक्षणाची प्रेरणा मिळाली पाहिजे. मला एकाने विचारले तुमचा आवडता कीर्तनकार कोण? मी उत्तर दिले समर्थांनी कीर्तनकाराच्या जे गुण संगितले आहे ते ज्या माणसात आहे तो. ज्याला वेद, उपनिषद, स्मृति, श्रुति, षड दर्शन यांचे ज्ञान आहे. जो विरक्त सन्यासी आहे. ज्याला भगवद्गीता तोंडपाठ आहे. ज्याची आवाज आणि वाणी मधुर आहे. पंचवीस वर्षांपासून रोज सकाळी त्याचे कीर्तन अखंड सुरू आहे. जो श्रोत्यांना पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देतो, स्वस्थ आणि निरोग राहण्याचा मंत्र देतो. धर्म आणि सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो.  ज्याचा प्रेरणेने आज देशातील हजारो उद्यानात योग कक्षा चालतात.  ज्याचा रूपात मला नेहमीच  समर्थांचे दर्शन होते. असो. 

 


 






 

 
 

Monday, May 26, 2025

म्हशीची कथा

म्हैस निळसर काळ्या रंगाची असते. काळ्या रंगाची महिमाच न्यारी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सृष्टी निर्मात्याला निळाई म्हणून संबोधित केले आहे. सृष्टीचे पालनहार विष्णुही श्याम रंगाचे आहेत. सृष्टीचे विनाशकर्ता भगवान शिव ही काळ्या रंगाचे आहेत. अर्थात ईश्वर किंवा गॉड हा काळ्या रंगाचा आहे. दुष्टांचा विनाश करणारी काळी माता ही श्याम  रंगाची आहे. काळ्या गायीला पवित्र मानल्या जाते.  म्हैस तर काळीच आहे. मग म्हशीच्या शरीरात देवतांचे निवास का नाही, म्हशीला कामधेनु प्रमाणे महत्व का नाही,  असे अनेक प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतात. पण एक कथा धार्मिक ग्रंथात आहे, महादेवाने महिषाचे रूप धारण केले होते. आज केदारनाथ मध्ये महादेवाच्या महिष स्वरूपाची पूजा होते. यमराज ही महिषावर स्वार होऊन पृथ्वी लोकातील प्राण्याचे प्राण हरतात. अर्थात काही प्रमाणात म्हशीला ही देवत्व प्राप्त झाले, असे म्हणता येईल. पण गायीशी तिची तुलना होऊ शकत नाही. कामधेनु समुद्र मंथनातून प्रगट झाली होती म्हणून गायीला देवांपेक्षा श्रेष्ठ दैवीय स्वरूप प्राप्त झाले. म्हैस तर पृथ्वी लोकातील, त्यात ही भारतातील मूळ प्राणी. हिंदीत म्हण आहे, "घर की मुर्गी दाल बराबर" म्हणून कदाचित म्हशीला दैवीय स्वरूप प्राप्त झाले नाही.  आज ही म्हैस भारतात काजिरंगा आणि छत्तीसगढच्या जंगलात मूळ जंगली स्वरुपात आढळते. असो. 

जंगलात राहणार्‍या म्हशीला पाळीव कोणी आणि केंव्हा केले. याबाबत अनेक कथा आहेत. राजा सत्यव्रताला स्वर्गात प्रवेश मिळाला नाही. ऋषि विश्वामित्राने सत्यव्रतासाठी पृथ्वीवर प्रतिसृष्टी निर्मित केली. विश्वामित्राने जंगलात राहणार्‍या म्हशीला दुधासाठी पाळीव प्राणी बनविले. त्याचे मुख्य कारण म्हैस ही गायी पेक्षा जास्त दूध देते. म्हशीच्या दुधात स्निग्धता आणि प्रथिने जास्त असतात. म्हशीचे दूध प्राशन करून शरीर बलवान बनते. याशिवाय म्हैस शांत स्वभावाची असते. विश्वामित्राला हेच पाहिजे होते. चक्रवर्ती सम्राट नहुषपाशी म्हशीचे दूध प्राशन करून बलवान झालेले  सैन्य होते म्हणून त्याला स्वर्गाचे इंद्रपद मिळाले. सदेह स्वर्गात जाऊन इंद्रपदावर बसणारा एकमात्र मानव, हा सम्राट नहुष होता. म्हैस शक्तीची प्रतीक आहे. गाय मात्र दीन दुबळ्यांचे प्रतीक. राजाच्या प्रमुख राणीला राजमहिषी म्हणून संबोधित केले जाते. राजगौ म्हणून नाही. हीच आहे म्हशीची महत्ता. म्हशीचे दूध प्राशन करून पंजाब, हरियाणात पैलवान तैयार होतात. महाराष्ट्रात ही कोल्हापूर क्षेत्रे म्हशीचे दूध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तिथे ही पैलवान जास्त आहे. कोल्हापूर येथील म्हशीच्या दुधाची रबडी प्रसिद्ध आहे. तीन दिवस नृसिंहवाडी आणि कोल्हापुरात होतो. कोलेस्ट्रॉल वाढण्याची पर्वा न करता रोज म्हशीच्या दुधापासून बनलेल्या रबडी वर ताव मारला. सैन्यात जाण्याची इच्छा असणार्‍या, खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या  मराठी तरुणांनी म्हशीचे दूध अवश्य प्राशन केले पाहिजे. 

गाय म्हातारी झाली किंवा तिने दूध देणे बंद केले की तिला गोपालक गोशाळेत सोडतात. तिथे जागा नाही मिळाली की रस्त्यावर सोडतात. जिथे कचरा खात गाय शेवटची घटका मोजते. याशिवाय गो तस्कर आणि गो भक्त यांच्यात होणार्‍या हाणामारीत अनेकांचे प्राण ही जातात. 

म्हातार्‍या म्हशींची काळजी घेण्यासाठी गोशाळा प्रमाणे म्हैसशाळा नाही.  अधिकान्श म्हशी म्हातार्‍या होण्यापूर्वीच कसायांना विकल्या जातात.  आयुष्यभर दूध देणारी म्हैस ही, तिला कसायाला देणार्‍या कृतघ्न माणसाला,  मरण्यापूर्वी  काही हजार रुपये देऊन जाते. म्हशीला खरे गांधीवादी म्हणता येईल. म्हशीचे मांस आणि चर्म विकून भारताला भरपूर विदेशी मुद्रा मिळते. असो. 


Thursday, May 22, 2025

तोरई (दोडके) कोथिंबिर सूप




आज सकाळी सौ. मुगाची डाळ टाकून दोडक्याची भाजी बनवत होती. डाळ टाकण्यामुळे दोडके कमी लागले. तीन दोडके, जवळपास 300 ग्राम, उरले होते. अचानक अनेक महिन्यांपासून सुप्त असलेला माझ्यातला पाकशास्त्री जागृत झाला. दोन दिवस आधीच आठवडी बाजारातून सौ. ने भरपूर कोथिंबिर ही आणली होती. डोक्यात विचार आला. आज आपण दोडके आणि कोथिंबिर सूप बनवू. सौ. ने नाश्त्यासाठी पोहे बनविले होते. कोथिंबिर कापल्या नंतर काड्या उरलेल्या होत्या. त्या सोबत जवळपास 50 ग्राम कोथिंबिर ही घेतली. स्वाद वाढविण्यासाठी एक टमाटो ही घेतला.  एक आल्याचा तुकडा ही घेतला. सर्व साहित्य कापून कुकर मध्ये टाकले. (घरी काळी मिरी नसेल तर एक हिरवी मिरची ही कापून कुकर मध्ये घालू शकता). कुकर गॅस वर ठेऊन दोन शिट्या होऊ दिल्या. कुकर थंड झाल्यावर साहित्य मिक्सर मधून काढून भांड्यात टाकले. चार बाउल सूप झाले पाहिजे म्हणून अंदाजे पानी ही भांड्यात मिसळले. आता भांडे गॅस वर ठेऊन एक उकळी येऊ दिली. त्यात अर्धा चहाचा चमचा काळी मिरी, जिरा पाउडर आणि स्वादानुसार सेंधव मीठ टाकले. गरमागर्म सूप बाउल मध्ये टाकून त्यावर लोणी टाकले. नंतर एक फोटू काढला. पोहया सोबत हे सूप पिताना अत्यंत स्वादिष्ट लागले. लहान मुले ही हे सूप आनंदाने पिणार याची ग्यारंटी मी देऊ शकतो. 

टीप: घरात लोणी नसेल तर दुधावरची साय ही सुपात टाकली तरी स्वाद उत्तम लागेल. 









Tuesday, May 20, 2025

जागो ग्राहक: तुमच्या टमाटो केचप मध्ये टमाटो पेस्ट किती


आमच्या घरी पतंजलि टमाटो केचप येतो. महिन्यातून एकदा घरापासून 11 किमी दूर असलेल्या पतंजलि मेगास्टोर मधून महिन्याचा किराणा आणतो. टमाटो केचप ही तिथून विकत घेतो. पतंजलि टमाटो केचप मध्ये 28 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत फक्त 17 पैसे प्रति ग्राम. दुसरी कडे सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या किसान मध्ये 14.6 टक्के टमाटो  पेस्ट असते आणि किंमत 19 पैसे प्रति ग्राम. काही ब्रण्ड्स मध्ये तर आणखीन कमी टमाटो पेस्ट असते आणि किंमत जास्त असते. तुम्ही पण आपल्या घराचे टमाटो केचप तपासून बघा. 

काही दिवसांपूर्वी टमाटो केचप संपले. सोसायटीच्या बाहेर मार्केट आहे. तिथल्या दुकानदाराला विचारले. तो म्हणाला आम्ही पतंजलिचे समान ठेवत नाही. ते 15 टक्के पेक्षा जास्त मार्जिन देत नाही. इथले भाडे आणि रखरखवसाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो. दूध, दही, अन्न-धान्यात मार्जिन मिळत नाही. त्यामुळे इतर वस्तूंत किमान 25 टक्के मार्जिन मिळाले पाहिजे अशी अपेक्षा असते.  त्याचे म्हणणे खरे होते. नोएडात पतंजलि स्टोर गावांत आहेत. शहरी माल आणि मार्केट एखाद दुसरे असेल. दुकानदार फक्त जास्त विकणारी वस्तुसाठी कमी मार्जिन घेतील. उत्तम दर्जाचे उत्पाद विकण्यात त्यांचा किंचित ही उद्देश्य नसत. त्यांना ग्राहकांची काळजी मुळीच नसते. ग्राहक ही आळशी असतो तो कधीच पॅकेट वर लिहलेले वाचत नाही. तो फक्त ब्रॅंड पाहतो. पतंजलि आणि किसानच्या पॅकेटांचे चित्र खाली दिले आहे. तुम्हीच ठरवा कोणते केचप विकत घ्यायचे.