Saturday, April 30, 2022

वार्तालाप (२६) श्रीदासबोध: दशक ५ समास ५ - आधुनिक कृषी तंत्राची माहिती

 जय जय रघुवीर समर्थ 



श्रीदासबोध हा फक्त अध्यात्मिक ग्रंथ नाही. संसारात जगण्यासाठी आवश्यक सर्व ज्ञान यात आहे.  

आजचे कृषी शास्त्रज्ञ म्हणतात, शेती करण्यापूर्वी जमिनीची पोत, उत्तम बियाणे, नर्सरी, पाण्याची गुणवत्ता इत्यादी तपासल्यानंतर शेतात कोणते उत्पन्न घ्यावे हे शेतकऱ्याने ठरविले पाहिजे. तरच त्यांना शेतात जास्त उत्पन्न घेता येईल.  आश्चर्य म्हणजे  साडे तीनशे वर्षांपूर्वी या समासात समर्थांनी   हेच सांगितले आहे. समर्थ म्हणतात - "नाना भूमीची परीक्षा, नाना जळांची परीक्षा,नाना सरितांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा,नाना अंकुर परीक्षा,नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा" इत्यादी.  स्पष्ट आहे, त्या काळी गुरुकुलांत कृषी संबंधी शिक्षण ही दिले जात होते.  बाकी त्याकाळी गुरुकुलांत शिकविणाऱ्या समस्त विद्यांची माहिती या समासात आहे. 
 

Thursday, April 21, 2022

दुसऱ्या दशकातील मोती. तामसी भक्ती एक मूर्खपणा

 


मृत्यू लोक हा कर्म लोक आहे. कर्मा शिवाय इथे मुक्ती नाही. इथे गृहस्थ संसाराची गाडा चालविण्यासाठी कर्म करतो. सन्यासी जगाच्या उद्धारासाठी  कर्म करतो. काही लोक बिना कर्म करता भगवंत कृपेची किंवा मुक्तीची अपेक्षा करतात. त्यांना वाटते शरीराला कष्ट दिले की मुक्ती मिळेल. त्यासाठी ते तामसी उपाय करतात. श्री समर्थ  अश्या  तामसी अघोरी कृत्यांचे वर्णन करताना  म्हणतात:  कर्महीन  लोक नाना प्रकारे स्वतःच्या शरीराला कष्ट देतात. काही जिभेला टोचून घेतात. काही विविध प्रकारच्या शस्त्रांनी शरीरात छेद करतात. काही झाडाला उलटे लटकून तपस्या करतात, तर काही एक हात उंच करून तपस्या करतात. काही स्वतला जमिनीत पुरून घेतात. परिणामी मुक्ती तर मिळत नाही पण शरीराचे अनेक अंग लुळे- पांगळे अवश्य होतात.  काही मुक्तीसाठी देवाला शिर किंवा  शरीर अर्पण करतात अर्थात आत्महत्या करतात. इत्यादी.  निराहार राहून शरीराला कष्ट देऊन तपस्या केल्याने काहीच साध्य होत नाही, हे ज्ञान भगवान बुध्दाला ही झाले होते. त्यांनी सम्यक मार्ग निवडला. व्रत उपवास इत्यादि दिवसांसाठी केल्याने शारीरिक व्याधी दूर होते, हे ही सत्य आहे. पण फक्त उपवास केल्याने भगवंत प्रसन्न होत नाही.  तामसी अघोरी मार्गाने भगवंताला प्रसन्न करणाऱ्या  लोकांना जिवंतपणे नरक यातना सहन करण्या पलीकडे काहीच मिळत नाही. भगवंताला प्रसन्न करण्यासाठी तामसी मार्गांचा अवलंबन करणे म्हणजे मूर्खपणा.