Monday, March 30, 2020

राजा बळी आणि वामनाची नवीन कथा



त्रिलोक विजयी बळीराजाने नर्मदा तटावर स्थित महिष्मती नगरीत राजसूय यज्ञ करण्याचे ठरविले. महिष्मती नगरीला कुंभ मेळ्याचे स्वरूप आले होते. देवराज इंद्र सहित सर्व अधीनस्थ राजे-महाराजे यज्ञाला उपस्थित होते. हजारो व्यापारी, कलाकार, ब्राम्हण आणि हजारो प्रजाजन ही तिथे उपस्थित होते. लाखो लोकांसाठी नगरीत राहण्याची, खाण्या पिण्याची आणि मनोरंजनाची सोय करण्यासाठी मोठ्याप्रमाणात जंगल तोडले गेले. राजे- महाराजांसाठी आखेटची व्यवस्थाही केली होती. मनोरंजन आणि भोजनासाठी हजारो वन्य प्राण्यांची शिकार सुरू होती. यज्ञात ही मोठ्याप्रमाणात निरीह जनावरांची बळी दिली जात होती.

एक दिवस रात्री शयनकक्षात झोपण्याची तयारी करत असताना राजा बळीला एक आवाज ऐकू आला. महाराज, मला अभय द्या, माझी रक्षा करा. राजा बळीने इकडे-तिकडे बघितले कक्षात कुणीच दिसले नाही. राजा बळी म्हणाला हे अदृश्य आत्मा प्रगट हो, भिऊ नको, तुला अभय आहे. पुन्हा आवाज आला महाराज मी प्रगट आहे. मी वामन आहे. तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही एवढा सुष्म आहे. मी नर्मदेच्या वन्य प्रदेशात जनावरांच्या शरीरात राहणारा. पण तुमच्या सैनिकांनी आणि इथे जमलेल्या अतिथींनी हजारो जनावरांची शिकार केली. आता मला राहायला जागा उरली नाही. मानवी शरीरात मला जागा मिळाली तर मी सुरक्षित राहील. मानवी शरीरात हजारो जिवाणू राहतात. मीही त्यापैकी एक बनून राहील. बळीराजाने तथास्तु म्हटले. 

वामनाने महिष्मती नगरात त्यावेळी उपस्थित हजारो लोकांच्या शरीरात प्रवेश केला. काही दिवसांतच राजे- महाराजे सहित हजारो लोक ज्वरग्रस्त  झाले.  हजारो मृत्यूमुखी पडले. यज्ञ अर्धवट राहिला. लोक आपापल्या देशी परतले त्यांच्या सोबत वामन ही. महिष्मती नगरी ओसाड पडली त्रिलोक विजयी बळीराजाला एका सुष्म वामनाने पराजित केले होते. जीवाच्या भीतीने बळीराजा ही महिष्मती नगरी सोडून दूर दक्षिणेत पाताळात जाऊन लपला. 

Thursday, March 26, 2020

नूतन वर्ष: बटाट्याची भाजी ( नवी स्टाईल)


आज आज गुढीपाडवा नव्या वर्षाचा पहिला दिवस.  घरीच असल्यामुळे सौ. ला  मदत करण्याचा निश्‍चय केला. सौने बटाट्याची भाजी बनविण्याचे कार्य दिले. अर्धा किलो बटाटे आधी कुकर मध्ये उकडून घेतले. बटाटे सोलून बटाट्याचे चार ते सहा तुकडे केले. कढई गॅसवर ठेवली. दोन चमचे साजूक तूप त्यात घातले. तूप गरम झाल्यावर गॅस स्लो केला. नंतर अर्धा चमचा जिरे, एक चमचा तीळ,अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचे तिखट टाकले. नंतर त्यात बटाटे परतून घेतले. त्यानंतर स्वादानुसार मीठ आणि आमसूल टाकले व पुन्हा बटाटे परतले. नंतर झाकण ठेऊन दोन मिनिट वाफ काढून घेतली. स्वादिष्ट भाजी,श्रीखंड पुरी सोबत खाताना मजा आली.

Tuesday, March 24, 2020

केरम क्रिकेट

केरम क्रिकेट
ह्या खेळाचा आविष्कार मी आहे. खेळ सौपा आहे. 
 नियम:
केरम बोर्ड वर गोट्या केरम खेळ्या सारख्या लावाव्या.
ह्या खेळात प्रत्येक खेळाडू  ११ वेळा गोट्या घेण्याचा प्रयत्न करेल.  
पांढऱ्या गोट्या घ्यायच्या आहेत. 
साहजिकच काळया गोट्या क्षेत्र रक्षणाचे कार्य करतील. प्रत्येक पांढरी गोटी साठी ५० रन आणि लाल गोटी अर्थात राणी साठी शंभर रन. 
पण जर स्ट्रायकर पहिले काळया गोटीला लागला तर २० रन कमी होतील. 
जर काळी गोटी आत गेली तर ५० रन कमी होतील. 
११ प्रयत्नात जो जास्त रन बनवेल तो विजयी.

Tuesday, March 17, 2020

क्षणिका: कारोना आणि दारु


दारू लावली हाताला 
जिभेला लागली स्वादाला.
दारूने मारला कारोना 
नी स्वर्गात गेला  बेवडा.
 

Monday, March 16, 2020

अविद्या (भौतिक विद्या): मृत्युला दूर ठेवण्याची विद्या आणि कारोना


माझ्या एका मित्राने कर्मकांड आणि  जोतिष या विषयावर पीएचडी केली आहे अर्थात हा विद्वान ग्रहस्थ आहे. काल त्याने कारोनापासून बचाव करणारे  'कारोना कवच' एका व्हाट्सअप ग्रुप पाठविले.  या कवचाचा पाठ केल्याने कारोना होणार नाही असे त्याचे विचार. मी त्याला उत्तर दिले आपण पूजा-पाठ इत्यादी नैतिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी करतो. सांसारिक बंधनातून मुक्त होण्यासाठी करतो. पण रोगराई आपल्या भौतिक शरीराला हानी पोहचवितात. त्यांचा प्रतिकार भौतिक विद्येच्या सहाह्यानेच करता येईल. हेच शास्त्र प्रमाण आहे. ईशान उपनिषदात म्हंटले आहे.

विद्यां चाविद्यां यस्तद् वेदोभय्ँ सह 
अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्यामृतम्श्नुते.
[ईशोपनिषद (मंत्र ११) ]

*शाब्दिक अर्थ: विद्या (अध्यात्म ज्ञान) अर्थात परमेश्वराला जाणण्याचे ज्ञान. अविद्या (भौतिक विद्या) म्हणजे मृत्यु वर विजय प्राप्तीचे ज्ञान. जो व्यक्ती दोन्ही ज्ञान एकाच वेळी जाणतो. तो जीवनाचा पूर्ण आनंद ही उपभोगतो. तो जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण आनंद उपभोगू शकतो.

मानव सहित पृथ्वीवरील सर्व जीवांचे भौतिक शरीर अग्नि, वायु, जल आणि माती या चार पदार्थांपासून बनलेले आहे. हेच चार पदार्थ पृथ्वीवरील सर्व  जीवांचे अन्न आहे. अन्न शरीराला पोषण देते आणि जीवांना जिवंत ठेवते अर्थात मृत्युपासून दूर ठेवते. जगण्यासाठी आपण शाकाहारी आणि मासाहारी सर्व प्रकारच्या अन्नाचा उपभोग करतो. रोगराई पासून आपली रक्षा करणार्या औषधीहि अन्नापासून तैयार होतात. सारांश, भौतिक शरीरला मृत्युपासून वाचायचे असेल तर अन्नाचे सेवन आवश्यक आहे.

तैत्तरीय उपनिषदात आपल्या ऋषींनी हेच सांगितले आहे. माणसाचे भौतिक शरीर हे अन्न आहे, अन्नमय शरीर अन्नाचे भक्षण करते आणि शेवटी अन्नातच विलीन होते.

अन्नाद्वै प्रजाः प्रजायन्ते याः काश्च पृथिवीँ श्रिताः  
अथो अन्नेनैव जीवन्ति अथैनदपियन्त्यन्ततः  
(तैत्तरीय उपनिषद, ब्रह्मानंद वल्ली, प्रथम अनुवाक) 

 *शाब्दिक अर्थज्या पृथिवीच्या आश्रयाने रहाणाऱ्या प्रजा आहेत त्या सर्व अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नानेच त्या जिवंत रहातात. शेवटी यामध्येंच (अन्नामध्येच) लय पावतात.

आजकाल कारोना विषाणु देशात पसरला आहे आणि आपल्या भौतिक शरीरासाठी घातक आहे. दुसर्या शब्दांत हा विषाणु मृत्युचा दूतच आहे. आता प्रश्न उद्भवतो, कारोना पासून बचावसाठी आपण काय केले पाहिजे. शरीराला  स्वस्थ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग इत्यादी. शरीराला स्वस्थ्य ठेवण्यासाठी आवश्यक असे पोषणयुक्त अन्नाचे सेवन. भौतिक पदार्थांच्यापासून बनलेल्या औषधी (वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी) आपल्याला या रोगापासून दूर ठेऊ शकतात. तथाकथित मंत्र-तंत्र, गंडा-ताबीज किंवा कवच आपल्याला कारोना सहित अन्य रोगराईपासून वाचवू शकत नाही. असो.

*
सत्संगधारा या वेबसाईट वरून अर्थ घेतला आहे.