Monday, February 25, 2019

प्रजापति ने केला सम्मान विष पिणाऱ्या शंकराचा


रोज कचरा  उचलतो 
त्याची  विल्हेवाट करतो 
धरतीला वाचविण्यासाठी 
रोज हलाहल पितो
शंकर .

अमृत मंथानाच्या वेळी समुद्रातून हलाहल विष बाहेर आले. शंकराने विष प्राशन करून देव, दानव आणि मनुष्य तिन्हींचे रक्षण केले. मोबदल्यात शंकराला काय मिळाले. प्रजापति अर्थात प्रजेचे लालन-पालन करणारा  राजा. त्यावेळी दक्ष हा प्रजापति होता. दक्ष प्रजापतिने यज्ञात सर्वांना बोलविले. जावई असला तरी,  स्मशानभूमीत निवास करणाऱ्या समाजातील निम्न कोटीच्या व्यक्तीला बोलविणे दक्षाला उचित वाटले नाही. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने देहत्याग केला. हि झाली प्राचीन इतिहासातील कथा.

आज हि हजारो शंकर महानगरात, गावांत माणसांनी पसरविलेला  कचरा स्वच्छ करतात.  दिवस-रात्र  कचर्यात काम केल्याने त्यांना अनेक रोगराईला समोर जावे लागते. कधी-कधी रोगराई त्यांचा बळी पण घेते. दुसर्या शब्दांत आजचे सफाई कर्मचारी राष्ट्रातील प्रजेच्या  रक्षणासाठी रोज हलाहल विष पितात. पण हे सर्व करताना मोबदल्यात त्यांना काय मिळते. समाज त्यांना तुच्छ लेखतो. समाजात सर्वात खालचे त्यांचे स्थान. स्वतंत्रता प्राप्ती नंतर त्यांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्याचे अनेक प्रयत्न झाले. सरकारने शिक्षणाची व्यवस्था केली. नौकरीत आरक्षण दिले. अनेक कायदे बनवून त्यांच्यावर होणारे अत्याचार संपविण्याचे प्रयत्न केले. पण सामाजिक प्रतिष्ठा, ती तर फक्त समाजच  देऊ शकतो. 

स्वामी दयानंद यांनी समाजातील भेद मिटविण्यासाठी आर्यसमाजाची स्थापना केली. महात्मा फुले, शाहू महाराज यांनी दलित समाजाला शिक्षणाची प्रेरणा दिली. बाबासाहेबांनी संवैधानिक संरक्षण दलित समाजाला दिले. पण सामाजिक प्रतिष्ठा ती तर प्रजापतिच देऊ शकतो.  (राष्ट्राचा राजा किंवा आजच्या भाषेत प्रधानमंत्री). 

रामायण काळात अयोध्येचे राजकुमार श्रीराम वाळीत टाकलेल्या साध्वी अहल्येच्या आश्रमात गेले. तिथे ऋषी गौतमाचे व साध्वी अहल्येचे चरण स्पर्श करून, त्यांचे  आदर-आतिथ्य स्वीकार केले. त्यांच्या सोबत भोजन केले. श्रीरामाने अहल्येला समाजात पुन्हा स्थान मिळवून दिले. (वाल्मिकी रामायण, बालकांड सर्ग ४८-४९). श्रीरामाच्या कार्याची प्रशंसा स्वर्गीय देवतांनी पुष्पवृष्टी करून केली. 

पाय अर्थात चरणांचे स्थान शरीरात सर्वात खाली असते. आपले चरणच  आपल्या संपूर्ण शरीराचे ओझे उचलतात.  चरण नसतील तर माणूस काहीच करू शकत नाही किंवा अत्यंत कठीण आयुष्य त्याला जगावे लागते. चरणांचे महत्व ओळखूणच, ऋषी-मुनी, महापुरुष, विद्वान यांचा सम्मान करण्यासाठी  त्यांची पाद्यपूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा समाजात अस्तित्वात आली.  पण  स्वत: घाणीत राहून समाजाला स्वच्छ व आरोग्यदायी जीवन देणाऱ्या शंकरांचा सम्मान आपण कधी करण्याचा प्रयत्न केला आहे का?  कधीच नाही. पण काल दिनांक २४.२.२०१९ हा दिवस भारतीय इतिहासात निश्चित सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. या दिवशी प्रत्यक्ष देशाच्या राजप्रमुख अर्थात पंतप्रधानांनी सफाई कर्मचार्यांची पाद्यपूजा करून त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.  दुसर्या शब्दांत इतिहासात प्रथमच आजच्या प्रजापतिने शंकराचा सम्मान केला. असो.





Saturday, February 16, 2019

पद, पैसा आणि प्रतिष्ठेसोबत विकृती फ्री


१९९०चा काळ मी ग्राहक मंत्रालयात कार्यरत होतो. सहज जाणवलें, ग्राहक हिताच्या बाता करणारे अनेक एनजीओ प्रतिष्ठित व्यक्ती ग्राहक विरोधी कार्य करणारे आहेत. सहज एक अधिकार्याला या बाबत विचारले. तो म्हणाला पटाईत तू अजून बच्चा आहे. सरकारी कर्मचार्याने अनासक्त भावाने कर्म केले पाहिजे, जास्त विचार केला नाही पाहिजे. बाकी हें सर्व प्रतिष्ठित  एम एन सी औद्योगिक संगठनांचे हित पाहणारे आहेत, तिथून मिळणार्या पैश्यांवर यांची अय्याशी चालते. दुर्भाग्य, अश्या लोकांना दरबारी पुरस्कारहि मिळतात. पुढे वरिष्ठतम अधिकार्यांसोबत कार्य करत असताना, अनेक पांढर्या शुभ्र वेषधारी लोकांचा मग ते पत्रकार असो किंवा बुद्धिमंत, काळेकुट्ट स्वरूप समोर आले. असो. 

कुणीतरी म्हंटले आहे, राजनीती आणि वैश्या यांचा चोली दामनचा संबंध असतो. पूर्वी राजे महाराजे गणिकांचा उपयोग आपला स्वार्थ सिध्द करण्यासाठी करायचे. आज आपल्या देशात लोकतंत्र आहे. विभिन्न जातीचें गणित जुळविण्यासाठी, जातीजातीत भेद उत्पन्न करून सत्ता प्राप्त करणे हें राजनेत्यांचे उद्दिष्ट असते. काही तर सत्तेसाठी आतंकवादी, नक्षली आणि जेहादी समूहांचा वापर  वोट बँक तैयार करण्यासाठी करायला हि मागेपुढे पाहत नाही. देश गढ्यात गेला किंवा देशाचे तुकडे झाले आणि देशात अराजकता पसरली तरी चालेल, फक्त सत्ता मिळाली पाहिजें. असे सत्तालोलुप राजनेता आपला स्वार्थसिध्द करण्यासाठी कलाकार, पत्रकार आणि बुद्धीजीवी इत्यादी लोकांचा गणिका समान उपयोग करतात. पत्रकारांचे विदेशी दौरे, कलाकारांना व बुद्धिमंतांना लुटीयन दिल्लीत बंगले, सरकारी कमिटी, संस्थांमध्ये नियुक्ती, एनजीओंना, अनुदान इत्यादी कश्यासाठी असते, हे सांगण्याची गरज नाही.  


योग्यता नसतानाही पद मिळाले, पैसा मिळतो व देशी विदेशी पुरस्कार हि. मनात इच्छा नसतानाही फक्त स्वार्थासाठी, पद, पुरस्कार व प्रतिष्ठेसाठी इतिहासकार विकृत इतिहास सांगतातबुद्धीजीवी, प्रोफेसर, पत्रकार व राजनेता आतंकवादी आणि देशाचे तुकडे करणार्यांचे समर्थन करतात. असत्याचा व देशविरोधी तत्वांचा प्रचार करताना मनात द्वंद्व हे निर्माण होणारच. त्याचा परिणाम विकृतीत होतो. मग विकृती शब्दांद्वारा बाहेर पडते. असो. 

Wednesday, February 13, 2019

व्हेलेंटाईन डे स्पेशल


आज सकाळी राजीव चौक मेट्रो स्टेशन - काही तरुण पोट्टे आणि पोट्टी एक घोळका करून उभे होते आणि मी लक्ष देऊन त्यांचे बोलणे ऐकत होतो:

एका तरुण पोरीने आपल्या मोबाईल वर एक फोटो त्याला दाखवीत म्हंटले, हा फोटो कसा वाटतो? हा, हिचा होणारा नवरा आहे.

तो: (फोटोकडे पाहत)  हा तर चक्क बेवडा दिसतो, हिला कसे काय पटविले याने.

फोटो दाखविणारी मुलगी दुसर्या पोरीकडे पाहत म्हणाली, हा तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला बेवडा म्हणतो? ती त्याच्या कडे रागाने पाहते.

तो: (तो तिच्या कडे पाहत) मग मी काय करू, बेवड्याला लोक बेवडाच म्हणणार. 

ती:  माझा होणारा नवरा आहे तो. खबरदार त्याला कुणी बेवडा म्हंटले तर.  तू जरूर बेवडा होणार, देवदास सारखा. माझे लग्न झाल्यावर. १०० टक्के खात्री आहे मला.

तो: स्वत:ला ऐश्वर्य राय समजते का? तुझ्या सारख्या ५६ माझ्या मागे पुढे फिरतात. 

ती: तुझ्या मागे पुढे फिरणार्या एखाद्या 'ऐश्वर्य रायचे' नाव कळेल का मला?

तो:  तुला काय करायचे आहे त्याचे?

ती: आज व्हेलेंटाईन डे आहे. तुझ्या तर्फे  तिला गुलाबाचे फूल भेट देऊ, म्हणते मी?  

तो:  मी एक पीस इथे उभा आहे, हे हि तुला सहन होत नाह. तू माझी मित्र आहे कि शत्रू. 

ती: मी तर तुझी मित्रच आहे.... पण तू???

तो: हे बघ, खांद्यावर लटकवलेली बॅग हातात घेऊन तो उघडून त्यात व्यवस्थित पॅक करून ठेवलेले गुलाबाचे फुल बाहेर काढतो. तुझ्या साठी आणले आहे, दरवर्षी आणतो, पण हिम्मत होत नाही. म्हंटले आज तुला...... जाऊ दे.... एवढी वर्षे झाली, तुला माझे प्रेम कळले नाही. मूर्ख आहे मी, तुझ्यासारख्या  निष्ठुर पोरीवर जीव लावला.
 
ती: अरे माझ्या बेवड्या, गुलाबाचे फुल बॅगमध्ये सुकविण्यासाठी नसते. पोरीच्या हातात देऊन तिला आई लव यू म्हणायचे असते, एवढेही तुला कळत नाही का? 

तो: पण आता काय उपयोग.....

त्याला सोडून सर्व पोरे जोरात हसू लागतात. ती त्याला जाऊन बिलगते. तेवढ्यात मेट्रो आली त्यामुळे पुढे काय घडले कळणे शक्य नव्हते. पण शेवट गोड झाला असावा. 

सर्व तरुण तरुणींना व्हेलेंटाईन  डेच्या  शुभेच्छा. पांढरे केसावाल्यांना  "गेले ते दिन गेले... आता भजन करा"


Tuesday, February 12, 2019

१४ फेब्रुवारी



१४ फेब्रुवारीला 
भंवरा आला 
रस कळीचा 
शोषून गेला.

परिणाम

हृदयी वेदना 
उभार पोटाचा 
कचर्यात हॉस्पिटलच्या
अभ्रक अजन्मा.