Wednesday, July 22, 2020

आचार्य कुलं, हरिद्वार आणि दिल्लीतील वीआयपी भागांतील शाळा तुलनात्मक परीक्षा परिणाम



काही दिवसांपूर्वी इंडिया टीवी वर आचार्य कुलंच्या मुलांना योगाभ्यास करता पाहून माझा एक सहकारी म्हणाला. बाबांच्या शाळेत मुलांना टाकणे व्यर्थ. योगाभ्यास करण्याने कुणाचे भविष्य बनत नाही. त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या आंग्ल भाषी शाळेत टाकणे गरजेचे.  तो म्हणाला अनेक सरकारी कर्मचारी स्वत:चे घर असूनही क्वार्टर घेतात त्याचे कारण या भागातील चांगल्या शाळा अर्थात सेंट कोलंबस, डीपीएस इत्यादी. या शाळांत अधिकांश अधिकारी आणि बाबूंची मुले शिकतात. या शाळांत प्रवेश घेण्यासाठी अनेक पापड लाटावे लागतात. या शिवाय मुलाचे शैक्षिणिक प्रदर्शन चांगले नसेल तर शाळेतून हकालपट्टीहि होते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक  महागाच्या  कोचिंग क्लासवरहि  भरपूर पैसा खर्च करतात. दुसरीकडे आपल्या गौरवशालीपरंपरेवर विश्वास ठेवणारी मध्यमवर्गातील पालकांची मुले आचार्यकुलं मध्ये शिकायला येतात. माझा सहकारी म्हणाला आचार्यकुलंचा परीक्षा परिणाम या शाळांचा जवळपास हि नसणार.  मुले पैदा होताच त्यांच्याशी आंग्ल भाषेत "गुटर गू" करणाऱ्या मानसिक गुलाम फक्त भगव्या वस्त्रावरून शाळेच्या शिक्षणाची कल्पना करतात. अर्थातच १२वी परीक्षा परिणाम बघितल्या वर त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.  असे कसे होऊ शकते हीच त्याची प्रतिक्रिया. बाकी या सर्व शाळांचा परिणाम  नेहमी सारखा उत्तम होता तरीही आचार्य कुलं शाळेचा त्यांच्यापेक्षाहि जास्त उत्तम होता.  पतंजलि संचालित  आचार्यकुलं बहुतेक एकमात्र शाळा असावी जिथे शरीर आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम असलेले विद्यार्थी निर्माण होतात. याशिवाय तिथे शिक्षण हि अत्याधुनिक आहे, बहुधा अधिकांश मानसिक गुलामांना माहित हि नसेल.

प्रत्येक शाळेतील प्रथम आलेल्या  विद्यार्थ्याचे प्रतिशत

आचार्यकुलं, हरिद्वार  :                           ९९.४ %
सेंट कोलम्बस, गोल डाक खाना :            ९८.४ %
डीपीएस, मथुरा रोड :                            ९९.००%
डीपीएस, आर के पुरम :                         ९८.८%

आचार्य कुलं हरिद्वार

विद्यार्थी                      ७७
९०% पेक्षा जास्त         38       49.35%
75% पेक्षा जास्त         73       99.49%
60% पेक्षा जास्त         77       100%
सेंट कोलंबस गोल डाकखाना

विद्यार्थी                     २४२
९०% पेक्षा जास्त        ५२    २१.४८%
75% पेक्षा जास्त       १६७   ६८.१८%
60% पेक्षा जास्त       २३४    ९५.८६%
डी पी एस मथुरा रोड
कुल विद्यार्थी              ४११ 
९०% पेक्षा जास्त        १७५     ४२.५७%
75% पेक्षा जास्त        ३७६     ९१.४८%
60% पेक्षा जास्त        ४१०      ९९.७५%
डी पी एस  आर के पुरम
कुल विद्यार्थी            ८७८
९०% पेक्षा जास्त      ५५७     ६३.४३%
75% पेक्षा जास्त       ८४१     ९५.78.%
60% पेक्षा जास्त      ८७८      100%
  
https://www.dpsmathuraroad.org/cbse-result-xii-2019-20.php                         




Friday, July 17, 2020

प्रदूषण देत्य आणि सौर चक्र.


फार पूर्वी  ईक्ष्वाकु वंशाचा राजा भगीरथ पृथ्वीवर राज्य करत होता. एक दिवस पाताळातून हलाहल नावाचा दैत्य पृथ्वीवर आला. त्याने प्रजेला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे आमिष दाखविले. प्रजा त्याच्या विळख्यात न कळत सापडली. हलाहल दैत्य विषाक्त वायुने प्रजेचे प्राण घेऊन आपली भूक शमन करून लागला. भगीरथाने हलाहल दैत्य विरुद्ध युद्ध पुकारले.  पण भगीरथाचे अस्त्र-शस्त्र हलाहल दैत्य समोर निष्फळ ठरले.  

अखेर भगीरथाने जगाला  उर्जा प्रदान करणार्या सूर्यदेवाची आराधना सुरु केली. सूर्यदेव प्रसन्न झाले. सूर्यदेवाने भगीरथाला सौर चक्र प्रदान केले.  या सौर चक्राच्या मदतीने भगीरथाने हलाहल दैत्याला पराजित केले. हलाहल दैत्य पुन्हा पाताळात जाऊन दडून बसला.

Thursday, July 16, 2020

प्रदूषण : वेताळ आणि विक्रम


विक्रमा, पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या प्रदूषणासाठी उत्तरदायी कोण? तुला माहित असूनहि खरे उत्तर दिले  नाही तर तुझ्या डोक्याचे हजार तुकडे होतील. विक्रम म्हणाला, वेताळ, मानव निर्मित कचरा, प्लास्टिक, पेट्रोलचा धूर इत्यादीमुळे प्रदूषण पसरते. यांचा निर्माता मनुष्य प्राणी असल्यामुळे मानवच उत्तरदायी आहे. वेताळ खदाखदा हसला, विक्रम हा मी चाललो म्हणत वेताळ आकाशी उडाला, पण त्याला दूर-दूर कुठेही झाड दिसले नाही. शेवटी थकून-भागून वेताळ एका विजेच्या खांबावर लटकला.  ४४० वाॅटचा जोरदार करंट त्याला लागला. वेताळ धाडकन जमिनीवर आपटला. त्याला मुक्ती मिळाली आणि विक्रम प्रदूषणच्या नरकात तडफडत मरण्यासाठी जिवंत राहिला. 

(श्री सुभाष पी. नाईक यांच्या धरा धरोहर कविता संग्रहापासून पासून प्रेरणा  घेऊन)


Tuesday, July 14, 2020

करोना आणि मॅकालेचे मानसिक गुलाम


मॅकाले शिक्षणाचा एक  हेतू भारतीयांना मानसिक गुलाम बनविण्यासाठी त्यांच्यात हीन भावना भरणे होते.  एकदा माणूस आत्मग्लानी आणि हीन भावनेने ग्रस्त झाला कि त्याचे  विचार काहीशे असे होतोत "आपण अडाणी होतो, जे काही ज्ञान आहे ते ब्रिटीशांनी दिलेले आहे." आणि अश्या परिस्थितीत आपल्या परंपरागत ज्ञानाच्या आधारावर कुणी गौरवास्पद  कार्य केले तरी त्याला ते पचणार नाही.  या करोना काळात  पतंजलि निर्मित आयुर्वेदिक औषधी चाचणीत १०० टक्के  खरी उतरली आणि आंग्ल शिक्षित मानसिक गुलामांना हे पचणे कठीण झाले, याचे कारण काय. यावर विचार मांडण्या आधी पार्श्वभूमी समजणे हि आवश्यक. 

दहाव्या शताब्दी पर्यंत आयुर्वेद हे जगातील सर्वात उन्नत आरोग्य शास्त्र होते. शल्यक्रिया पासून ते शिक्षणासाठी शवांचे विच्छेदनचे कार्यहि देशातील मोठ्या गुरुकुलांमध्ये होत होते. विदेशी आक्रांतानी आपल्या ज्ञानाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यात ते सफलहि झाले. आपले दुर्भाग्य स्वतंत्रता प्राप्ती नंतरहि काळ्या मानसिक गुलामांचेच राज्य आले. आयुर्वेदाला दुर्लक्षित केल्या गेले. जिथे  एलोपथी  शिक्षणावर अब्जावधीचे अनुदान दिले जाते तिथे आयुर्वेद शिक्षणाच्या  फी वरहि निर्बंध घातले जाते. त्यामुळे कुठलेही नवीन अनुसंधान करणे आयुर्वेदीक शिक्षण संस्थांना  शक्य नाही. या मूर्खपणामुळे देशाचे अब्जावधी कोटींचे नुकसान होते, हेहि  त्यांना कळत नाही. आज जगात हर्बल मेडिसिन क्षेत्रात  चीनी औषधींना मान्यता प्राप्त आहे. लाखो कोटींचा त्यांचा व्यापार आहे. तिथल्या लाखो शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधरली आणि महागड्या औषधांचा खर्च हि वाचला. या शिवाय चीनला लाखो कोटींचे परकीय चलन हि मिळते. पण आयुर्वेदाला औषधी शास्त्र म्हणून जगात मान्यता  नाही कारण आयुर्वेदिक औषधीत प्रयुक्त होणार्या ११००च्या जवळपास वनस्पतींवर शोध कार्य अत्यंत कमी प्रमाणात  झाले आहे. सरकारने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असे म्हटले तरी गैर नाही. तसे झाले असते तर आज शेतकर्यांना काही लाख कोटी दरवर्षी भेटले असते. असो.

सन २०१६ मध्ये आयुर्वेदिक औषधींवर अनुसंधान करण्यासाठी पतंजलिने अब्जावधी खर्च करून देशातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक उन्नत यंत्रांनी सज्ज प्रयोगशाळा स्थापित केली. स्वयं प्रधानमंत्री नरेंद्र मोदिजीनी या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. आज इथे ३०० हून जास्त शास्त्राज्ञ कार्य करतात.  औषधींचे सुष्म स्तरापासून ते प्राणी आणि मानवावर प्रयोग करण्याची सुविधा इथे आहे. पतंजलि उद्योग समूहाच्या लाभांशचा अधिकांश हिस्सा या प्रयोगशाळेवर खर्च होतो. गेल्या तीन वर्षांत आयुर्वेदिक औषधींवर अनेक रिसर्च पेपर नेचर सहित अनेक मेडिकल जर्नल मध्ये प्रकशित झाले आहे. एवढेच नव्हे तर संस्कृत भाषेतहि एका रिसर्च पेपरचा सारांश प्रकाशित झाला आहे. अर्थात संस्कृत भाषेला अंतराष्ट्रीय स्तराच्या मेडिकल जर्नल मध्ये मान्यता मिळाली. हे वेगळे याबाबत मिडीयाने कधी चर्चा हि केली नाही. याचे उत्तर मिडीयाच देऊ शकते. (https://www.acharyabalkrishna.com/research/) पतंजलिचे अश्वगंधावर रिसर्च पेपर प्रकाशित होताच, अनेक आयुर्वेदिक कंपन्यांनी अश्वगंधाचे जोमाने  विज्ञापन सुरु केले. असो.

गिलोय, तुळशी, अश्वगंधा, अणु तेल आणि श्वासरी रस या औषधांचा प्रयोग पतंजलिने कोरोनाच्या रोगींवर केला. रोगी पूर्णपणे ठीक झाले. निम्स, जयपूरने या औषधींच्या आधुनिक पद्धतीने क्लिनिकल ट्रायल करण्यात रुचि दाखविली. सर्व सरकारी औपचारिकता पूर्ण करून नियमानुसार  'third party;  परीक्षण सुरु झाले. लक्षण नसलेले रोगी, कमी आणि मध्यम लक्षण असलेल्या रोगींवर हे परीक्षण झाले. इथे नमूद करणे गरजेचे उपचारासाठी येणार्या ९९ टक्के रोगींना हीच लक्षणे असतात. बाकी रोगीची प्रतिकार शक्ती कमी असेल किंवा आधुनिक औषधींचे दुष्परिणाम, रोगी दगावण्याची टक्केवारी जास्त आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या शब्दांत परीक्षणाचा प्रचार केला नाही कारण तसे केले असते तर बहुतेक ड्रग माफियाने या परीक्षणात अडथळे आणले असते.  या परीक्षणात सर्व रोगी बरे झाले. चुकीने एखादहि दगावला असता तर बहुतेक मानव वधाचा आरोप पतंजलिवर लावण्यात ड्रग माफिया आणि त्यांच्या गुलामांनी कसर सोडली नसती.  

साहजिकच मानसिक गुलामांना परीक्षणाचे निष्कर्ष पटले नाही. बहुधा त्यांना वाटत असेल आजहि आयुर्वेदिक औषधी खरल मध्ये खरडून बनतात.  अनेक अतिविद्वानाच्या मते आयुर्वेदिक औषधी म्हणजे 'आजीबाईच्या बटव्यातील औषधी', आयुर्वेदिक औषधींचा परिणाम अत्यंत हळू होतो. एवढे परिणाम कारक औषध आयुर्वेदात निर्मित होणे शक्यच नाही, इत्यादी. आमच्या औषधांच्या एक-एक गोळीची किमत हजारो रुपये आणि बाबा एवढ्या स्वस्तात औषध बाजारात आणतात आहे, काही तरी गोम आहे. आंग्लशिक्षित शहाणे बिना कुठले प्रमाण देता, बाबा फेक दावा करतात इत्यादी टंकून मोकळे झाले. हा त्यांच्या दोष नाही त्यांच्या मनात हीन भावना निर्माण करणाऱ्या  शिक्षणाचा दोष आहे. लोकांना लुटण्याच्या धंद्यावर गदा आल्यावर फेक आणि भ्रमित प्रचार पेड मिडिया करणारच. तसेही जेवढा मोठा मिडिया तेवढा जास्त खर्च आणि त्यासाठी विज्ञापनहि जास्त लागते. मध्यान्ही सूर्य दिसत असूनही त्याला रात्र म्हणणे त्यांचीहि विवशता. औषधींना बाजारात येऊ न देण्यासाठी राजकीय मदतहि घेण्यात आली. पण औषध बाजारात आलेच. या औषधी मुळे हजारो करोना रोगी रोगमुक्त होतील. अन्य औषधींच्या सेवनाने शरीरावर जे दुष्परिणाम  होतात तेहि होणार नाही.

आपण आपल्याच गौरवपूर्ण कार्याला स्वीकार करत नाही, हाच मॅकाले शिक्षणाचा परिणाम.आपल्या जवळहि ज्ञान-विज्ञान आहे, आधुनिक तंत्रांचा उपयोग करून आपणहि आपल्या  प्राचीन ज्ञानाला समृद्ध करून   जगात पुढे जाऊ शकतो ही भावना आज निर्मित करण्याची गरज आहे. बाकी सूर्याला उदित होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही.

Monday, July 6, 2020

स्वामी त्रिकालदर्शी: करोना वर चर्चा

आज  बर्याच  महिन्यांनी स्वामी त्रिकालदर्शी यांचे दर्शन घ्यायला त्यांच्या कुटीत गेलो. नेहमीप्रमाणे ते ध्यानमग्न अवस्थेत होते. कुटीत एका कोपर्यात जाऊन बसलो आणि त्यांच्या समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. एकदाचे त्यांनी डोळे उघडले आणि समाधीतून बाहेर आले. मी त्यांना साष्टांग प्रणाम केला. माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत स्वामीजी म्हणाले, बच्चा काय समस्या आहे. 

मी: स्वामीजी, सध्या करोनाची साथ जगात पसरलेली आहे. लाखो लोग मृत्यमुखी पडले आहे.  करोना मीटर पाहिल्यावर असे दिसते. जगात ज्या ठिकाणी स्वास्थ्य सुविधा कमी, तिथे मृत्यू दर कमी आणि जिथे जास्त तिथे मृत्यू दर जास्त. आपल्या देशातहि मुंबई, दिल्ली, अहमेदाबाद, चेन्नई सारख्या मोठ्या महानगरात मृत्यू दर जास्त आणि झारखंड, बिहार, ओडिशा, आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात कमी. काय कारण असावे?

स्वामीजी: बच्चा, करोनाच्या रोगींचा उपचार ज्या औषधींनी होतो आहे. त्या औषधींचा विपरीत परिणाम श्वसनतंत्र, हृदय, लिवर आणि किडनी वर होतो. पण बच्चा, एक लक्षात ठेव ९५ ते ९६  टक्के रोगी या औषधींमुळे बरे होतात. 

मी: स्वामीजी पण...

स्वामीजी: (पानदाणीतून विडा काढत), बच्चा पान खाणार का?

मी: स्वामीजी, मी पान खात नाही.

स्वामीजी: हा सोन्याचा वर्ख लागलेला विडा आहे, खाऊन बघ. डोक्यात फालतू विचार येणार नाही, डोक शांत होईल. म्हणतात न, "खाली दिमाग शैतान का घर".

मी: स्वामीजी, तुम्हाला माहित आहे, मी पान विडी तंबाकू काहीच घेत नाही. 

स्वामीजी: बच्चा, म्हणूनच तुझे चंचल मन एकाग्र होत नाही. ऐक, वेद भगवान म्हणतात, "एकत्र राहा, एकत्र खा, एकत्र प्या, एकत्र पुरुषार्थ करा". अशाने देशाची अर्थव्यवस्था सुधरते. बाकी जीवन-मरण भगवंताच्या हाती आहे. तू उगाच व्यर्थ काळजी करतो. मित्रांसोबत खा पी आणि मौज कर.

मी: स्वामीजी,  अखेरची शंका, चाचणीत यशस्वी झालेल्या औषधाचा विरोध का? त्या औषधाचे दुष्परीणाम हि नाही. 

स्वामीजी: वेद विरोधी कार्य करणार्याचा विरोध होतो. ज्या ग्राहकांकडून लाखो वसूल केल्या जाऊ शकतात. त्यांचे समाधान हजारहून कमी रुपयांत करून आपल्याच बंधूंच्या पोटावर लाथ मारणार्याचा विरोध हा होणारच. पोट आहे म्हणून हे मायावी जग आहे. जगण्यासाठी प्रथम स्वत:च्या पोटाचा विचार केला पाहिजे.  समाजाच्या विपरीत जाऊन कार्य करणे म्हणजेच अज्ञान. अज्ञान सोडून ज्ञानाचा मार्ग धर बच्चा तुझे कल्याण होईल म्हणत स्वामीजी पुन्हा ध्यानमग्न झाले.