Thursday, November 28, 2019

सूर्य आणि चंद्र


सूर्य स्वत:च्या प्रकाशात चमकतो. त्यामुळे  दिवस उजाडतो. सर्वत्र चैतन्य पसरते. सकारात्मक उर्जेचा प्रसार होतो. देवत्वच्या शक्त्या प्रबळ होतात. सर्व जन सुखी आणि समाधानी होतात.

चंद्रमा जवळ स्वत:चा प्रकाश नसतो. त्यामुळे रात्र होते.  नकारात्मक उर्जेचा संचार होतो. कट-कपट कारस्थान सुरु होतात. राक्षसी शक्त्या प्रबळ होतात. असंतोष आणि अराजकतेचे साम्राज्य सर्वत्र पसरते. लोक दुखी होतात. 

Tuesday, November 26, 2019

टॅामी ने घेतला बदला


बिन्दापुरच्या श्मशानात कुजबुज सुरु होती, "कुत्र्याने चावले हे त्याला कळलेच नाही. पण आता काय उपयोग. एकुलता एक होता तरणाताठा जास्तीसजास्त २० वर्षाचा असेल". हे ऐकून टॅामी कुत्रा आनंदाने उड्या मारत एका कोपर्यात पहुडलेल्या दादोजी  जवळ पोहचला. भू! भू! दादोजी, अखेर मेला तो. मेला तो. हां! हां! म्हणता हि बातमी दूर-दूरच्या कुत्र्यांपर्यंत पोहचली. याच तरुणाने जनकपुरीत टॅामीच्या आईला कारने उडविले होते. अनाथ टॅामीला दादोजी आपल्या सोबत बिन्दापुरच्या स्मशानात घेऊन आला. कुत्र्यांजवळ रेबीज नावाचे शस्त्र आहे त्याच्या उपयोग माणसांच्या विरुद्ध कसा कारायचा हे दादोजीने टॅामीला शिकविले.

जनकपुरीचा शनी बाजार. भयंकर भीड होती. टॅामीला चाटच्या ठेल्यावर तो दिसला. हातात प्लेट घेऊन तो चमच्याने चाट खात होता. हीच ती योग्यवेळ. टॅामीने हळूच त्याच्या पायाचा चावा घेतला आणि पटकन त्याच ठेल्याच्या खाली लपला. काहीतरी पायाला टोचले हे त्या तरुणाला जाणवले. त्यांनी मागे वळून पाहिले काहीच दिसले नाही.  फक्त पायातून थोडे रक्त निघत होते त्या तरुणाने ते रुमालाने पुसून टाकले. आपल्याला कुत्र्याने चावले आहे अशी पुसटची शंकाहि त्याला आली नाही.  रेबीज नावाच्या शस्त्राने त्या तरुणाला यमसदनी पाठविले.

रात्री धगधगणार्या चितेच्या उजेडात टॅामीचे विजेत्या सारखे स्वागत झाले. सर्व कुत्र्यांनी त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले. कुत्र्यांचा सरदार बॉबीने  मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मधून लंपास करून आणलेली अमेरिकन चिकनची तंगडी त्याला उपहार स्वरूप दिली. भू! भू! टॅामी जिंदाबाद एकच नारा आसमंतात घुमला.

हातवारे आणि मंदीचा तडका






नमस्कार, मी हातवारे, मंदीचा तडका या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्याला माहितच आहे. आज आपला देश मंदी नावाच्या रोगाने ग्रस्त आहे. मोठे-मोठे कारखाने बंद पडत आहे. हजारो कामगार बेरोजगार झाले आहे.  डॉक्टर अर्थशास्त्री बाई त्यावर उपाय शोधत आहे. पण म्हणतात ना "मर्ज बढता गया जूं जूं दवा की". आता तर छोटे-छोटे धन्धे ही बंद पडू लागले आहे. उदाहरण ब्युटी पार्लरचा धंधा. आपल्याला वाटत असेल मंदीचा ब्युटी पार्लरशी काय संबंध. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहे "शूर्पनखा  ब्युटी पार्लरची मालकीण मंदी ताई. 



हातवारे: ताई एक प्रश्न विचारावासा वाटतो. तुझ्या  पार्लरचे नाव 'शूर्पणखा ब्युटी पार्लर" का ठेवले?



मंदी ताई: सुंदर मुलींचे तोंड रंगवून त्याना अप्सरे समान सुंदर कुणीही बनवू शकतो. शूर्पनखेसारख्या मुलींना अप्सरा बनविण्याची कला फक्त या मंदी ताईच्या हातात आहे. 



हातवारे: वा! वा! शूर्पनखेलाहि अप्सरा बनविण्याची कला तुझ्या हातात आहे. तरीहि तुझा ब्युटी पार्लरचा धंधा मंद झाला? सरकारच्या कुठल्या जनविरोधी धोरणामुळे तुझ्यावर हि वेळ आली?



मंदी ताई: मल्या पळून गेला. 



हातवारे: यात मल्याचा काय संबंध?



मंदी ताई: मल्या जिथे जातो, तिथे त्याच्या सोबत अप्सरे सारख्या सुंदर कोवळ्या नाजूक पोरींचा घोळका असतो.  त्या पोरींना ब्युटी ट्रिटमेंट देऊन अप्सरा बनविण्याचे काम मीच करीत होते. एका सिटींगचे तब्बल दहा-दहा हजार मिळायचे. मल्या पळून गेला आणि पैशे हि उडून गेले...



हातवारे: (जोरात हात हलवत व ओरडत) प्रेक्षकानों, सरकारच्या जनविरोधी नीतीमुळे मल्या सारख्या उद्यमीनां देश सोडून पळून जावे लागले. मल्या सोबत फिरणार्या त्या कोवळ्या नाजूक पोरींचा कुणी विचार केला का? आभाळ कोसळले असेल त्यांच्यावर. पोरक्या झाल्या त्या. मल्या नाही तर मायाहि नाही. कसा गुजराण होत असेल त्यांचा. दोन वेळच्या जेवणाचे वांधे झाले असतील. पोट भरण्यासाठी काय-काय करावे लागत असेल त्या नाजूक पोरींना.  छे! छे!, त्या पोरींना भेटून  सत्य परिस्थिती जाणून घेण्याची गरज आहे. कदाचित बार बाला प्रमाणे त्यांच्यावर हि .....



मंदी ताई: मेल्या, हातवाऱ्या, तुझ्या जिभेला हाड आहे कि नाही. वाट्टेल ते बरळतो आहे. काहीही झाले नाही त्या पोरींना. पुढच्या फ्लाईटने त्याही लंडनला पोहचल्या. चैनीत आहेत त्या. पण धंधा माझा मंद झाला आहे. माझा विचार कर.



हातवारे: मंदच झाला आहे ना!, तुझा धंधा. तू काही उपाशी मर नाही. विचार कर जर त्या पोरींना मल्या  इथेच सोडून गेला असता तर. त्यांची मुलाकात घेतली असती. त्यांची व्यथा जगासमोर मांडली असती. चांगला मौका मिळाला असता कार्यक्रमाची टीआरपी वाढविण्याचा, तो हि हातून गेला. चॅनलच्या टीआरपी सोबत वाढला असता माझा पगारहि..... हे! हे! ठीक नाही केले मल्या तू.  .....आता माझे काय होणार, बहुतेक मंदीचा पुढचा बळी मीच......











Thursday, November 7, 2019

कृष्णाची बायको: राधा नव्हे रुक्मणीच



घनश्याम काही वर्ष विदर्भात राहिलेला वृंदावनवासी. तो  राधारानीचा भक्त होता. राधे-राधे म्हणून सर्वांना अभिवादन करायचा. 

एक दिवस तो म्हणाला साहेब, तुमच्या विदर्भात सर्वच काळे-सावळे असतात. रुक्मणीहि सावळीच. मी उतरलो, अरे स्पष्ट काळी म्हण न. विदर्भात सूर्य हा नेहमीच आग ओकतो, सर्व काळे- सावळेच राहणार. पण रुक्मिणी काळी असो वा सावळी त्याचे तुला काय करायचे आहे. तो म्हणाला साहेब "एक प्रश्न मला नेहमी सतावतो. आमची राधा एवढी सुंदर गोरीपान होती तरीहि कृष्णाने रुक्मणीत असे काय पहिले कि तो तिच्या जाळ्यात अटकला. तिला बायकू केली
 
मी म्हणालो घनश्याम त्याचे असे आहे, लग्न म्हणजे दोन जिवांचे एकरूप होणे. कृष्ण हा घननील म्हणजे अमावास्येच्या रात्री सारखा काळाकुट्ट. राधेसोबत लग्न केले असते तर त्याचाही शिवाप्रमाणे अर्धनारीश्वर झाला असता. राधेचा गोरा रंग कृष्णाच्या काळ्या रंगात मिसळणे शक्यच नव्हते. आजहि कृष्ण रास खेळायला रात्री वृन्दावनात जातो. आता तूच विचार कर पुनवेच्या रात्री  वृन्दावनातल्या सुंदर गोर्यापान गोपी अर्धनारीश्वर सोबत रास खेळायला कुंजवनात येतील का? त्याच्या अर्धनारीश्वर स्वरूपाला पाहून सर्व गोपी घाबरून पळून जातील. कृष्ण समझदार होता. रसियाहि होता. त्याने आमच्या विदर्भातल्या काळ्या रुक्मणीसोबत लग्न केले. रुक्मणीचा काळा रंग कृष्णाचा काळ्या रंगात सामावला अर्थात दोघेही एकाकार झाले. चतुर कृष्णहि गोपींसोबत रोज रात्री रास खेळायला मोकळा झाला. 

यावर घनश्याम काही वेळ काहीच बोलला नाही, मग म्हणाला साहेब, निवृत्त झाल्यावर तुम्ही वृंदावनात आश्रम उघडाच. तुमच्या दिव्य अध्यात्मिक ज्ञानाची जगाला आवश्यकता आहे


Wednesday, November 6, 2019

आजची क्षणिका ६.११.2019: सरडा


सरडा 

(१)

पक्ष बदलला तरी 
साथी तेच होते.
आंब्याच्या झाडावर 
सारेच सरडे होते. 

(२) 

शिकार पाहून 
रंग बदलतो 
खुर्ची पाहून 
पक्ष बदलतो. 





Tuesday, November 5, 2019

क्षणिका : नेता आणि सरडा


आजची ताजी चारोळी 

नेत्याला पाहून सरडा
काळा ठिक्कर झाला
रंग बदलण्याची कला
विसरून तो गेला.

Thursday, October 31, 2019

आठवणीतून: ए नौकर अनार उडाव


रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे  बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी. महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडट्टीत रहात होता. इतर लहान मुलांसारखे  त्यालाही दिवाळीत अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. त्याच्या बाबानी एक छोटे से पिस्तुल त्याला दिवाळीसाठी घेऊन दिले होते. दिवस भर टिकल्या उडवून  तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी फटाके आणू शकत नाही. आपण गरीब आहोत. ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला. 

चिन्या आत कशाला बसला आहे, बाहेर ये, समोरचा कोठीवाला मोठा अनार उडविणार आहे. बाबांचा आवाज ऐकून चिन्या बाहेर आला.  कोठी समोरच्या रस्त्यावर एका माणसाने अनार उडविला. एक उंच मोठा  रंग-बिरंगी कारंजा आकाशात चमकला. काय मजा आली ना! बाबांनी विचारले. चिन्या म्हणाला, कसली मजा, मी थोडी ना अनार उडविला आहे. चिन्या, बघ समोरच्या पोरांनी कश्या टाळ्या पिटल्या आणि उड्या मारल्या. त्यांनीही अनार उडविला नाही. बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले. त्यांनी नाही पण त्यांच्या नौकराने उडविला नं,  चिन्या उतरला.  "तसे असते तर फक्त नौकराला आनंद मिळाला असता, त्या मुलांना नाही."  चिन्या काहीच बोलला नाही. बाबा पुढे म्हणाले, हे बघ चिन्या, मोठे लोक, राजा-महाराजे, शेट स्वत: काहीच करत नाही. त्यांचे नौकर त्यांच्यासाठी काम करतात. समज हा नौकर आपल्यासाठी अनार उडवितो आहे, बघ काय मजा येईल. चिन्याला म्हणाला बाबा म्हणजे तो आपला नौकर आहे, असं समजायचे. तेव्हड्यात चिन्याचे लक्ष समोर गेले. बाबा, तो नौकर पुन्हा अनार उडविणार आहे. त्या नौकर कडे पाहत, चिन्या ओरडला "ए नौकर हमारे लिये अनार उडाव". लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांच्या छटा आकाशात पसरल्या. चिन्याने आनंदाने टाळ्या पिटत उड्या मारल्या.  चिन्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहून, त्याच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

Monday, October 21, 2019

नोटा जिंदाबाद


काय बाळ्या, तुझ्या जातीचे लोक आपल्या पक्षाला मत देत नाही त्यामुळे गेल्या निवडणुकीत मी चार हजार मतांनी पडलो. गेल्यावेळी बहिष्कार नावाच्या शस्त्राचा काहीच उपयोग झाला नाही. कुणीच बहिष्कार केला नाही. आता नोटा नावाचे ब्रह्मास्त्र बाहेर काढावे  लागेल. तुझ्या जातीच्या काही हजार लोकांनी नोटा दाबला तर मी निश्चित निवडून येईल. आता तू सोशल मीडियावर तुझ्या जातीच्या सर्व ग्रुपांवर प्रचार कर.   "आपल्या जातीच्या लोकांची  कुठल्याही पक्षाला  काळजी नाही. सर्वांनी आपला उपयोग केला व जिंकल्यावर ठेंगा दाखविला. आता वेळ आली आहे आपण आपली एकजुटता दाखविली पाहिजे. आपण मतदानावर नोटाचे  बटण दाबून सर्वांना अद्दल घडवू. आपली शक्ती सर्व राजनेत्यांना कळलीच पाहिजे." 

साहेब, लागतोच कामाला पण बदल्यात मला काय मिळेल.

"जिंकल्यावर तुला "पाण्याचा" मिळवून देतो. 

बाळ्या बेंबीच्या देठापासून घोषणा देतो "साहेबांचा विजय असो. नोटा महाराज जिंदाबाद."

Thursday, August 29, 2019

रामसेतु आणि अज्ञानी आयआयटीयन


भारतीय प्राद्योगिकी संस्थान (आईआईटी) खडगपूरच्या दीक्षांत समारोहात केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल "निशंक" यांनी म्हंटले रामसेतुचा निर्माण भारतीय अभियंतांनी  केला होता. मंत्र्याचे हे विधान अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांच्या बहुतेक पचनी पडले नाही. कारण स्पष्ट आहे आपल्या प्राचीन इतिहास आणि ज्ञाना बाबतीतील त्यांची अज्ञानता.

ब्रिटिशांनी शिक्षा नीति तैयार करताना, आपल्या पूर्वजांचा इतिहास व ज्ञानाचा पाठ्यक्रमात समावेशच केला नाही. भारतीय लोकांच्या मनात हीन भावना निर्मित करून त्यांना राज्य करायचे होते. स्वतंत्रता प्राप्तीनतर  आपल्या इतिहासाला व ज्ञानाला पाठ्यक्रमात स्थान मिळाले पाहिजे होते. पण आंग्ल शिक्षित व हीन भावनेने ग्रस्त भारतीय विद्वानांनी आपल्याच पूर्वजांच्या इतिहास व ज्ञानाकडे दुर्लक्ष केले. परिणाम शिक्षण घेणारे विद्यार्थी मग ते आईआईटीयन का असेना,  त्यांना भारतीय इतिहासाची व ज्ञानाची माहिती कुठून मिळणार. 

धनुषकोडीपासून ते तलाईमन्नार (श्रीलंका)- अंदाजे २६-२७ किमीचे अंतर आहे. समुद्रात पाण्याची पातळी अत्यंत कमी आहे. या उथळ समुद्री मार्गात अनेक छोटे-छोटे बेट आज हि विद्यमान आहेत. हा भूभाग म्हणजे प्राकृतिक निर्मित एक पुलच. अधिकांश पुरातत्ववेत्ता याच भागाला रामसेतु किंवा आदम ब्रिज म्हणतात. आज हि इथे नौकायन संभव नाही. रामायण काळात अर्थात ७५०० वर्षांपूर्वी तर समुद्र आजच्या तुलनेत जास्त उथळ होता. साहजिकच होते, समुद्रात नौकायन संभव नसल्याने श्रीरामाने या स्थानावर पूल बांधण्याचा निर्णय घेतला. श्रीरामाच्या सैन्यातील भारतीय अभियन्तानी समुद्रावर पूल बांधला. या पुलावरून श्रीरामाचे सैन्य श्रीलंकेत पोहचले. म्हणून या पुलाला रामसेतु हे नाव पडले. 

वाल्मिकी रामायणात युद्धकांडातील २२व्या सर्गात समुद्रावर सेतु बांधण्याचे वर्णन आहे. वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून काही हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. दगड व लाकडांचा उपयोग करून समुद्रावर बांधलेल्या पुलाचे अवशेष  आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतरसापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता.   


वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न  झाले याचे वर्णन करणारे, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:


ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।

बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥


ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।

कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥


बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।

चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥


हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।

पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥



संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या-मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले.  हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.


समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।

सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥


दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।

वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥


मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।

पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥


संक्षिप्त अर्थ: कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी निर्माण सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत, वेली आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते.



वाल्मिकी रामायणात एवढे स्पष्ट वर्णन आहे, तरी हि तथाकथित विद्वान शंका घेतात यावरच मला नेहमी आश्चर्य वाटते.  याचे एकच कारण आपल्याच ज्ञानावर व इतिहासावर विश्वास नसणे हे असावे.