Tuesday, March 28, 2023

वार्तालाप (8): "वर्णानां ब्राम्हणो गुरु:"

 
ब्रम्हज्ञानाचा विचारू. 
त्याचा ब्राम्हणासीच अधिकारू.
वर्णानां  ब्राम्हणो गुरु:(14/7/30)

समर्थ म्हणतात ज्या व्यक्तीने वेद, उपनिषद, दर्शन शास्त्र इत्यादीं वैदिक ज्ञानाचे अध्ययन केले आहे. ज्याला ब्रम्ह विद्येचे ज्ञान झाले आहे. तोच ब्राम्हण आहे आणि त्यालाच चारी वर्णाच्या लोकांनी त्याला गुरु मानले पाहिजे. दुसर्‍या शब्दांत ब्रम्हज्ञानी व्यक्तीलाच सांसारीक आणि आध्यात्मिक उपदेश देण्याचा अधिकार आहे. भग्वद्गीतेत योगेश्वर म्हणतात गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची मी निर्मिती केली आहे. मनुस्मृती अनुसार शिक्षणांतर अर्जित ज्ञानाच्या आधारावर जाती ठरते. 

महाभारतात युधिष्ठिर-सर्प संवाद आहे. नागाने युधिष्ठिराला विचारले, "ब्राह्मण कोण आहे?" युधिष्ठिर म्हणाले की ज्या व्यक्ति मध्ये सत्य, दान, क्षमा, अस्तेय,आणि दया इत्यादि सात्विक गुणांचा वास असतो. जो विद्वान तपस्वी असतो, तो ब्राम्हण". नाग म्हणाला की "शूद्रामध्येही हे गुण असू शकतात." युधिष्ठिर म्हणाले की “जर एखाद्या शूद्रा मध्ये वरील वैशिष्ट्ये असतील तो शूद्र, ब्राह्मण आणि ज्याच्यात हे गुण नाहीत तो ब्राम्हण ही शूद्र असतो.

आपल्या सनातन धर्मात अनेक मत आणि मतांतरे आहेत. अनेक देवी देवता आहेत. त्यांची पूजा उपासना आणि उत्सव करणारे सर्वच वर्णांचे पुजारी आहेत. अनेक मठ आणि महंत आहेत. भक्त त्यांना गुरु मानतात आणि ते भक्तांना उपदेश करतात. पण ते सर्वच ब्रम्हज्ञानी नसतात. अनेक फक्त महंत फक्त त्यांच्या गुरूंच्या चमत्कारांच्या गाथा सांगून भक्तांना भुलवितात. चमत्कारांच्या गाथा ऐकून भक्त ही सदा सर्वदा चिलमच्या नशेत राहणार्‍या ज्ञानहीन व्यक्तीला गुरुचा दर्जा देऊन त्यांच्या भक्तीत लीन होतात. अश्या चमत्कारी बाबांना गुरु मानणार्‍या भक्तांचा इहलोक आणि परलोक दोन्ही बिघडणारच. समर्थ म्हणतात "गुरुत्व नेले कुपात्री". गुरुच ब्रम्हज्ञानी  नसतील तर ते आपल्या भक्तांना सांसारिक आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा उपदेश करूच शकणार नाही. समर्थ म्हणतात अज्ञानी आणि नीच आचार-विचार असलेल्या महंतांची महंती वाढली की देश आणि धर्म दोघांचाही नाश होतो. देशात गरीबी अराजकता, हिंसेचे साम्राज्य पसरते. याचे प्रत्यक्ष उदाहरण पाकिस्तान इत्यादि देश आहेत. समर्थांच्या काळातही हीच परिस्थिति होती. असल्या मूर्ख गुरूंमुळे राज्यावर म्लेंछ आले, असे समर्थांचे मत होते.  

आपले सौभाग्य आज किमान आपला नेता तरी ब्रम्हज्ञानी आहे, त्यामुळे करोंना काळात ही आपल्या देशात कुणी उपाशी झोपले नाही किंवा ब्रिटेन अमेरिका सारख्या मोठ्या अर्थ व्यवस्थेला ही तडा गेला नाही. पण दुसरी कडे मेकाले शिक्षण पद्धतीत असलेल्या दोषांमुळे देशात ज्ञान, पुरुषार्थ आणि कर्तृत्व विहीन फक्त पुस्तकी ज्ञान असलेली एक मोठी युवा पिढी तैयार झाली आहे. शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी देशाला ब्रम्हज्ञानी गुरूंची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज आहे. 


 


Saturday, March 18, 2023

वार्तालाप (7) : मनातील मूषक वृतीला दूर करा.


अप त्यम्  परिपन्थिनम् मुषीवाणम् हुरःचितम् । 
दूरम् अधि  स्रुतेः अज॥
(ऋ.१/४२/३)

आपल्या मनातील मूषक प्रवृती म्हणजे दुर्विचार. बिना कष्ट करता दुसर्‍यांच्या वस्तु हडपण्याची इच्छा ठेवणे आणि त्यासाठी कपट कारस्थान रचणे, दुसर्‍यांना धोका देणे, चोरी,डाका, रिश्वत घेऊन कार्य करणे, इत्यादि-इत्यादि. या ऋचेत ऋषि आपल्या मनातील मूषक वृतीला दूर करण्याची प्रार्थना परमेश्वराला करत आहे. आपल्याला माहीत आहे उंदीर सदा कुरतडत राहतो. तो शेतातील, घरातील अन्न-धान्य कागद, कपडे इत्यादि काहीही सोडत नाही. सर्व काही तो त्याच्या बिळात सतत एकत्र करत राहतो. दुसर्‍यांची संपती हडपण्याची त्याची हाव कधीच संपत नाही. परिणाम उंदीराचा शेवट पिंजर्‍यात होतो किंवा विषाक्त पदार्थ खाऊन तो मरतो. समर्थ मनाच्या श्लोकात  म्हणतात: 

नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे 
अति स्वार्थ बुद्धीन रे पाप सांचे. 
घडे भोगणे पाप तें कर्म खोटे
न होतां मनासारिखें दु:ख मोठें. 

अति स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन सदा सर्वकाळ दुसर्‍यांच्या द्रव्याची अर्थात जे आपल्या कष्टाचे नाही, हाव धरण्याने पापांचा संचय होत राहतो. अखेर अश्या खोट्या कर्मांचे वाईट परिणाम भोगावे लागतात आणि मनाला त्याचे मोठे दु:ख होते. 


आजकाल संपूर्ण समाज या मूषक वृतीने ग्रसित आहे. काही काम न करता वीज, पाणी, जेवण सर्व फुकट पाहिजे ही मनोवृती समाजात बळावत आहे. व्होट बँक साठी अनेक राजनेता जनतेच्या मूषक प्रवृतीला खत-पाणी घालत आहे. देशातील अधिकान्श जनतेला फुकटाची सवय लागली तर कष्ट करून पोट भरण्याचा उद्यम कुणीच करणारा नाही. परिणाम स्वरूप या खोट्या कर्मांचे फळ समस्त समाजाला भोगावे लागेल. भूक, अराजकता आणि हिंसेने जनता त्रस्त होईल. अजूनही वेळ गेलेली नाही स्वत:ची आणि समाजाच्या मूषक  प्रवृतीला आळा घालण्याची गरज आहे. असो. 


   

Wednesday, March 15, 2023

मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप

एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले.  पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्‍याची फोडणी. स्वाद चांगला होता.  मुगाच्या डाळीत  उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर  लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो. मनात विचार आला उपमा प्रमाणे  भाजलेल्या मूगाच्या डाळीचे सूप ही पाच मिनिटांच्या आत निश्चित बनू शकते. मग काय. संध्याकाळी  तीन -चार चमचे मुगाची डाळ कढईत मंद गॅस वर रंग बदले पर्यन्त भाजली. बहुतेक पाच मिनिटे लागली असतील. थंड झाल्या वर मिक्सर मध्ये डाळीचे पावडर करून घेतले. गॅस वर एका भांड्यात चार कप पाणी ठेवले. पानी थोडे गरम होताच, भाजलेल्या डाळीचे तीन चमचे पावडर पाण्यात ढवळले.  गॅस वर  सूप  उकळू दिले. तो पर्यंत थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. दोन मिनिटांत पाण्याला उकळी येताच गॅस मंद केला, त्यात स्वादानुसार मीठ, काळी मिरी आणि जिरे पावडर टाकले. गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर टाकली. दोन चमचे सूप आमच्या चिरंजीवाला स्वाद तपासायला दिले. त्याने  आंगठा वर करून उत्तम स्वादाचे प्रमाणपत्र दिले. बाकी तो आठ-दहा वर्षांचा होता तेंव्हा पासून माझ्या पाकशास्त्राचे प्रयोग आधी त्याच्यावरच करतो. काही कमी जास्ती असेल तर तो सांगतो.

 सूप पिण्यासाठी तीन बाउल घेतले (एक माझ्यासाठी, एक सौ आणि एक चिरंजीव साठी). मला तूप आवडते म्हणून चहाच्या चमच्या एवढे तूप सूपात घातले. चित्रात तूप वर तरंगताना दिसत आहे. तूप घातल्याने चव वाढते असे माझे मत आहे. पण आमची सौ. त्यावर सहमत नाही. असो.  

बाकी इन्स्टेंट मुगाचे सूप बनविणारा मी पहिलाच असेल. या सूपाला तूप जिर्‍याची फोडणी ही देऊ शकतात. ज्यांना तिखट आवडते ते थोडे तिखट किंवा लाल मिरची घालू शकतात. याशिवाय चिंच गूळ टाकून  मूग/तुरीची डाळ भाजून पावडर करून इन्स्टेंट सार किंवा आमटी ही बनविता येऊ शकते. अजून प्रयोग करून बघितला नाही आहे.  बाकी आज दोन वाटी मूगची डाळ भाजून बरणीत भरून ठेवणार आहे. 



Friday, March 10, 2023

वार्तालाप: (6): सकारात्मक विचारांसाठी मनाचे श्लोक

मनात विचार उत्पन्न होतात, विचारांनी स्मृति तैयार होतात आणि स्मृतिच्या निर्देशानुसार आपण कृती करतो. मनात सकारात्मक विचार उत्पन्न होतील तर कृती ही सकारात्मक होणार. मनात नकारात्मक विचार उत्पन्न झाले की आपण नकारात्मक कृती उदा. तळीरामाणे दारू पिणे, शिव्या देणे किंवा हत्या इत्यादि घृणीत कृती ही आपण करू शकतो. मन तर अभौतिक आहे, त्यात विवेक पूर्ण सकारात्मक विचार कसे भरावे, हा मोठा प्रश्न आहे? 

 समर्थ रामदास स्वामी म्हणतात:  

मन दिसते मां धरावे. ज्याचे त्याने आवरावे.

आवरून विवेके भरावे.  अर्थांतरी (द. 18.10.17)

आपल्या मनाला भटकण्यापासून वाचविण्याचे कार्य आपल्यालाच करावे लागते. मनात विवेकपूर्ण विचार भरून मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करून आपण संसार आणि परमार्थात सफल होऊ शकतो. पण समर्थ फक्त उपदेश करणारे नव्हते. त्यासाठी समर्थांनी 205 श्लोकांत मनाला उद्देश्यून मनोबोधाची निर्मिती केली. मनाच्या श्लोकांच्या सुरवातीलाच समर्थ म्हणतात जनीं निंद्य ते सर्व सोडूनि द्यावें. जनीं वंद्य ते सर्व भावें करावें अर्थात काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादींचा वाईटांचा त्याग करणे. वंद्य धरण्यासाठी समर्थ म्हणतात, सज्जनांची संगती धरावी, पापबुद्धी नको रे, विषयांची कल्पना नको रे, मना वासना दुष्ट कामा नको रे, दुसर्‍यांचे द्रव्य नको रे, अति स्वार्थ बुद्धी सोडणे, अहंकार सोडणे, दुसर्‍यांचे नीच बोलणे ऐकून ही सर्वांशी नम्र बोलणे, शोक-चिंता न करणे, इत्यादि इत्यादि. मनाच्या श्लोकांचे नियमित वाचन/ पाठांतर केल्याने मनात विवेकपूर्ण उत्तम विचार सहज भरतील आणि उत्तम स्मृति निर्माण होतील. उत्तम स्मृति उत्तम कार्य करण्यास प्रेरणा देतील. संसारात आणि परमार्थात सफल होण्यास मदत  होईल.   


Tuesday, March 7, 2023

वार्तालाप: (5) मनातील विचार सकारात्मक आणि नकारात्मक

 

समुद्रात जेवढा लाटा उसळत नाही त्याच्यापेक्षा जास्त विचार तरंगा मानवाच्या  मनात सदैव उसळी भरत राहतात.  सृष्टी कर्त्याच्या मनात विचार आला आणि या ब्रह्मांडाची रचना झाली. आपले प्राचीन ऋषी म्हणतात 'जे काही ब्रम्हांडात आहे ते पिंडामध्येही' आहे. प्रत्येक सूष्म कोशाचे ही स्वतंत्र अस्तित्व आहे. एका कोशातील विचार ही ब्रम्हांडाची निर्मिती करण्यास समर्थ आहे. विचारांनी स्मृती निर्मित होते आणि कोशांच्या स्मृति ब्रम्हांडाच्या निर्मितीपासून सतत वृद्धिंगत होत राहतात आणि त्यानुसार जीवांची निर्मिती करतात. मानवाची निर्मितीही कोशांतील स्मृति अनुसारच झाली आहे. आपल्या शरीरातील कोश ही सतत निर्मितीत व्यस्त राहतात, शरीरात होणारी क्षती सतत दूर करत राहतात. मनुष्य आपल्या विचारांच्या स्मृती पुढच्या पिढीलाही प्रदान करतो. मानवाचे आचार व्यवहार - धर्म, अर्थ, काम जीवन सर्वच विचारानुसार ठरते आणि भविष्यासाठी स्मृतीत सुरक्षित होते. सकारात्मक विचार सकारात्मक स्मृति निर्माण करतात. मानवाला शारीरिक आणि मानसिक रूपेण निरोगी ठेवतात. नकारात्मक विचार नकारात्मक स्मृति निर्मित करतात. या नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरातील कोशिका भ्रमित होतात, निर्मितीच्या जागी शरीरलाच नष्ट करू लागतात. अधिकान्श आजारांचे हेच मुख्य कारण आहे. मानवाला होणारे आनुवंशिक आजारांचे मुख्य कारण ही नकारात्मक विचार आहे. आत्महत्येचे मुख्य कारण ही हेच आहे. 

मानव जातीचे अस्तित्व विचारांवर निर्भर आहे. सकारात्मक विचार ब्रम्हदेवाने निर्मित केलेल्या सृष्टीच्या समस्त जीवांचा जगण्याच्या अधिकाराचे सम्मान करतात. जियो और जीने दो या सिद्धांताचे पालन करतात. पण मानव जातीचे नकारात्मक विचार पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व ही संपवू शकतात.  तूर्त सकारात्मक विचार करा. आनंदी रहा. आनंदी आणि निर्मितीत व्यस्त राहणाऱ्या कोशिका जीवनाची रक्षा करण्यास समर्थ आहेत. करोना काळात हा अनुभव अनेकांनी घेतला आहे. 



 

Saturday, March 4, 2023

रतिपाल: एक आत्मघातकी प्रवृती

रणथम्बौरचे राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपाल होता. दिल्ली सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीने रणथम्बौर वर आक्रमण केले. अनेक महीने झाले तरी रणथम्बौर दुर्ग शरण आला नाही. अल्लाउद्दीनच्या सेनला रसदची टंचाई जाणवू लागली. त्याच्या मंत्र्यांनी सल्ला दिला. जर आपली अशी परिस्थिति आहे तर दुर्गात परिस्थिति यापेक्षा ही बिकट असेल. काफिर चंद चांदीच्या तुकड्यांसाठी देशाची गद्दारी करतात. हीच योग्य वेळ आहे, आपण दगाबाज काफिरांचा वापर करू शकतो. अल्लाउद्दीने राजा हम्मीरदेवला शांति प्रस्ताव पाठविला. मंत्री रतिपाल शांतिवार्तेसाठी अल्लाउद्दीनच्या छावणीत आला. अल्लाउद्दीन रतिपालचे जंगी स्वागत केले. अल्लाउद्दीन त्याला म्हणाला आमचे युद्ध फक्त हम्मीरदेवशी आहे. इतर राजपूतांशी नाही. या युद्धात नाहक तुमचा बळी जाईल. तसेही रणथम्बौरवर शासन फक्त चौहान वंशीय राजपूतच करणार. तू आणि इतर वंशीय राजपूत उपेक्षित  चाकरच राहणार.  तू आमची मदत कर आम्ही तुला बूंदीचे राज्य देऊ. तू सार्वभौम राजा होईल.  मंत्री रतिपालला अल्लाउद्दीनचे म्हणणे पटले. स्वार्थात आंधळा झाल्यामुळे तो हे ही विसरला अल्लाउद्दीन खिळजीचा उद्देश्य  हिंदूंचा विनाश करून देशात इस्लामी राज्य स्थापित करणे आहे. रतिपालने दुर्गाच्या एका भागाची रक्षा करणार्‍या सेनापति रणमलला (काहींच्या मते हाही मंत्री होता) आपल्या षडयंत्रात शामिल केले. एका दिवशी भल्या पहाटे त्यांनी दुर्गाचा दरवाजा उघडला. अल्लाउद्दीनचे सैन्य रणथम्बौर दुर्गात शिरले. महाराणी रंगादेवी, पौत्री देवल देवी सहित 12000 राजपूत स्त्रियांनी जौहर केले. पुरुषांनी केसरिया करून आपल्या प्राणांची आहुति दिलीअल्लाउद्दीनने बक्षीस म्हणून  मंत्री  रतिपाल आणि रणमलचे डोके हतीच्या पायाखाली चिरडन्याचा आदेश दिला. अल्लाउद्दीन त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या राजाचे आणि राज्याचे झाले नाही तर आमचे काय होणार.तुमच्यासारख्या फितुरांसाठी हेच इनाम उचित आहे. रणथम्बौर महास्मशानात बदलले. आज तिथे फक्त वन्य प्राणी विचरण करतात.  

आज ही आपण भारतीय याच आत्मघातकी प्रवृतीने ग्रस्त आहोत. आमच्या समाजाची उपेक्षा होते, आम्हाला वतन (आमदारकी खासदारकी) पाहिजे. नाही मिळाले तर आम्हाला नष्ट करण्याच्या मनसुबा रचणार्‍या शत्रूशी ही आम्ही हात मिळवू. मग आम्ही नष्ट झालो तरी चालेल. महाराष्ट्राचे म्हणाल तर फक्त वतन साठी स्वकीय नातेवाईकने छत्रपति संभाजी महाराजांना दगा दिला होता, हा इतिहास आहे. परिणाम, स्वराज्यासाठी लाखो मराठी वीरांना प्राणांची आहुति द्यावी लागली.