Monday, March 16, 2020

अविद्या (भौतिक विद्या): मृत्युला दूर ठेवण्याची विद्या आणि कारोना


माझ्या एका मित्राने कर्मकांड आणि  जोतिष या विषयावर पीएचडी केली आहे अर्थात हा विद्वान ग्रहस्थ आहे. काल त्याने कारोनापासून बचाव करणारे  'कारोना कवच' एका व्हाट्सअप ग्रुप पाठविले.  या कवचाचा पाठ केल्याने कारोना होणार नाही असे त्याचे विचार. मी त्याला उत्तर दिले आपण पूजा-पाठ इत्यादी नैतिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी करतो. सांसारिक बंधनातून मुक्त होण्यासाठी करतो. पण रोगराई आपल्या भौतिक शरीराला हानी पोहचवितात. त्यांचा प्रतिकार भौतिक विद्येच्या सहाह्यानेच करता येईल. हेच शास्त्र प्रमाण आहे. ईशान उपनिषदात म्हंटले आहे.

विद्यां चाविद्यां यस्तद् वेदोभय्ँ सह 
अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्यामृतम्श्नुते.
[ईशोपनिषद (मंत्र ११) ]

*शाब्दिक अर्थ: विद्या (अध्यात्म ज्ञान) अर्थात परमेश्वराला जाणण्याचे ज्ञान. अविद्या (भौतिक विद्या) म्हणजे मृत्यु वर विजय प्राप्तीचे ज्ञान. जो व्यक्ती दोन्ही ज्ञान एकाच वेळी जाणतो. तो जीवनाचा पूर्ण आनंद ही उपभोगतो. तो जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण आनंद उपभोगू शकतो.

मानव सहित पृथ्वीवरील सर्व जीवांचे भौतिक शरीर अग्नि, वायु, जल आणि माती या चार पदार्थांपासून बनलेले आहे. हेच चार पदार्थ पृथ्वीवरील सर्व  जीवांचे अन्न आहे. अन्न शरीराला पोषण देते आणि जीवांना जिवंत ठेवते अर्थात मृत्युपासून दूर ठेवते. जगण्यासाठी आपण शाकाहारी आणि मासाहारी सर्व प्रकारच्या अन्नाचा उपभोग करतो. रोगराई पासून आपली रक्षा करणार्या औषधीहि अन्नापासून तैयार होतात. सारांश, भौतिक शरीरला मृत्युपासून वाचायचे असेल तर अन्नाचे सेवन आवश्यक आहे.

तैत्तरीय उपनिषदात आपल्या ऋषींनी हेच सांगितले आहे. माणसाचे भौतिक शरीर हे अन्न आहे, अन्नमय शरीर अन्नाचे भक्षण करते आणि शेवटी अन्नातच विलीन होते.

अन्नाद्वै प्रजाः प्रजायन्ते याः काश्च पृथिवीँ श्रिताः  
अथो अन्नेनैव जीवन्ति अथैनदपियन्त्यन्ततः  
(तैत्तरीय उपनिषद, ब्रह्मानंद वल्ली, प्रथम अनुवाक) 

 *शाब्दिक अर्थज्या पृथिवीच्या आश्रयाने रहाणाऱ्या प्रजा आहेत त्या सर्व अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नानेच त्या जिवंत रहातात. शेवटी यामध्येंच (अन्नामध्येच) लय पावतात.

आजकाल कारोना विषाणु देशात पसरला आहे आणि आपल्या भौतिक शरीरासाठी घातक आहे. दुसर्या शब्दांत हा विषाणु मृत्युचा दूतच आहे. आता प्रश्न उद्भवतो, कारोना पासून बचावसाठी आपण काय केले पाहिजे. शरीराला  स्वस्थ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग इत्यादी. शरीराला स्वस्थ्य ठेवण्यासाठी आवश्यक असे पोषणयुक्त अन्नाचे सेवन. भौतिक पदार्थांच्यापासून बनलेल्या औषधी (वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी) आपल्याला या रोगापासून दूर ठेऊ शकतात. तथाकथित मंत्र-तंत्र, गंडा-ताबीज किंवा कवच आपल्याला कारोना सहित अन्य रोगराईपासून वाचवू शकत नाही. असो.

*
सत्संगधारा या वेबसाईट वरून अर्थ घेतला आहे.


1 comment: