Saturday, April 30, 2022

वार्तालाप (२६) श्रीदासबोध: दशक ५ समास ५ - आधुनिक कृषी तंत्राची माहिती

 जय जय रघुवीर समर्थ 



श्रीदासबोध हा फक्त अध्यात्मिक ग्रंथ नाही. संसारात जगण्यासाठी आवश्यक सर्व ज्ञान यात आहे.  

आजचे कृषी शास्त्रज्ञ म्हणतात, शेती करण्यापूर्वी जमिनीची पोत, उत्तम बियाणे, नर्सरी, पाण्याची गुणवत्ता इत्यादी तपासल्यानंतर शेतात कोणते उत्पन्न घ्यावे हे शेतकऱ्याने ठरविले पाहिजे. तरच त्यांना शेतात जास्त उत्पन्न घेता येईल.  आश्चर्य म्हणजे  साडे तीनशे वर्षांपूर्वी या समासात समर्थांनी   हेच सांगितले आहे. समर्थ म्हणतात - "नाना भूमीची परीक्षा, नाना जळांची परीक्षा,नाना सरितांची परीक्षा, नाना बीजांची परीक्षा,नाना अंकुर परीक्षा,नाना पुष्पांची परीक्षा, नाना फळांची परीक्षा, नाना वल्लींची परीक्षा" इत्यादी.  स्पष्ट आहे, त्या काळी गुरुकुलांत कृषी संबंधी शिक्षण ही दिले जात होते.  बाकी त्याकाळी गुरुकुलांत शिकविणाऱ्या समस्त विद्यांची माहिती या समासात आहे. 
 

No comments:

Post a Comment