Tuesday, March 20, 2018

ग्राहक हित : मधुवर चर्चा




गेल्या महिन्यात विदर्भात गेलो होतो. एका दुकानात  मधावर चर्चा होत होती.  दुकानदार म्हणाला, मी कुठल्याच ब्रांडेड कंपनीचे मध विकत नाही कारण त्यात साखर असते. मग ते डाबर असो किंवा पतंजलि.  मी विचारले, तुम्हाला कसे माहित. तो म्हणाला, शुद्ध शहद पाण्यात सहज विरघळते आणि साखर असेल तर सरळ खाली जाते, हळूहळू  विरघळते. मी विचारले, मग तुम्ही कुठून मध घेतात.  इथे जंगलातून मधाचे पोळे घेऊन गावकरी येतात, त्यांचाच कडून आपल्या डोळ्यांदेखत  ताजे काढलेले मध घेतो.  हे मध ६ वर्ष खराब होणार नाही किंवा साखरी सारखे जमणार नाही. 

दुकानासमोर उभे काही ग्राहक कि त्याच्याशी सहमत होते. दिल्लीत हि मधाचे पोळ, काही लोक दारोदारी जाऊन मध विकतात.  हा त्यांचा पुश्तैनी धंधा. हे लोक ९० टक्के नकली मध विकतात आणि ग्राहकांना मूर्ख बनवितात. अधिकांश ग्राहक हि नकली मधालाच  खरे समजतात.

खरे मध पाण्यात टाकले कि लगेच खाली जाते.  सामान्यत: ग्राहक २५० ग्रम किंवा ५०० ग्रम मध विकत घेतात. ते महिन्याभरात संपते हि. पण फ्रीज मध्ये जास्तीकाळ ठेवल्यास त्याचे क्रिस्टीलाईजेशन  होते अर्थात ते साखरी सारखे जमते.  थंडीत हि मध हे जमतेच. त्याच मुळे ग्राहकांचा गोंधळ होतो. नकली मध विकणारे ग्राहकाच्या याच गोंधळाचा फायदा घेतात आणि महागात नकली मध त्यांच्या डोक्स्यावर मारतात.  छोट्या शहरांत आणी गावांत  अधिकांश दुकानदार  भेसळयुक्त मधच विकत घेतात.  ब्रान्डेड मध १०० टक्के शुद्धच असते. वेल्यू एडिशन साठी इतर पदार्थ अदरक इत्यादी मिसळले असेल तर ते पॅकेट वर लिहलेले असते. 

शहरी दुकानदार हि ग्राहकांना दुसर्या प्रकारे लुटतात.  ज्या वस्तूवर जास्त कमिशन मिळेल तीच वस्तू ग्राहकाच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न करतात. चांगला 2० वर्षांपासूनचा ओळखीचा दुकानदार.  मी रोज सकाळी कोमट मध घेतो. (हृदयरोगाच्या  एलोपेथी औषधांमुळे पोटात गॅस होते. पेन्टासीड पेक्षा कोमट पाण्यात मध घेतलेले जास्त चांगले). एका संध्याकाळी घरी परत येताना  लक्ष्यात आले, मध संपलेले आहे.  दुकानदरला पतंजलिचे  २५० ग्रम मध मागितले.  सहज दुकानदार शेल्फकडे बघत म्हणाला शायद माल खतम हो गया. दुसर्या कंपनीचे घेऊन जा.  तुम्ही जुने ग्राहक आहात १२०च्या जागी १०० रुपये दिले तरी चालतील.  मी म्हंटले, जी वस्तू ७० रुपयांत मिळते त्यासाठी मी १०० रुपये का मोजू? नंतर येऊन घेऊन जाईन. तेवढ्यात दुकानात काम करणारा पोरगा म्हणाला, पतंजलि का शहद  उस ब्रांड के शहद के पीछे रखा है. दुकानदार त्याच्यावर डाफरला, तुझे कितनी बार कहा है, हर ब्रांड कि एक एक शिशी  शेल्फ में सामने रखा कर( तुला कितीदा सांगितले आहे, प्रत्येक ब्रांडच्या एक एक बाटली  समोर ठेवत जा).  मी त्याला म्हंटले, कशाला उगाच नौकरावर ओरडतो आहे, तू १५ वर्षांचा होता त्या वेळ पासून मी तुला ओळखतो. तो ओशाळला,  साहेब चूक झाली पुन्हा होणार नाही. बाकी  तुम्हाला माहितच आहे, जो जास्त कमिशन देतो त्याच्या माल विकण्याचा प्रयत्न दुकानदार करणारच.  आता काय बोलणार. बाकी शहरी ग्राहकांची हि एक विचारधारा असते, महाग आणि आकर्षित करणार्या पॅक  मिळणार्या  वस्तू  चांगल्या. 


शतशब्द कथा - मोबाईल वाली ती

https://vivekpatait.blogspot.in/2013/12/blog-post_29.html

No comments:

Post a Comment