आमच्या घरी पतंजलि टमाटो केचप येतो. महिन्यातून एकदा घरापासून 11 किमी दूर असलेल्या पतंजलि मेगास्टोर मधून महिन्याचा किराणा आणतो. टमाटो केचप ही तिथून विकत घेतो. पतंजलि टमाटो केचप मध्ये 28 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत फक्त 17 पैसे प्रति ग्राम. दुसरी कडे सर्वात जास्त विकल्या जाणार्या किसान मध्ये 14.6 टक्के टमाटो पेस्ट असते आणि किंमत 19 पैसे प्रति ग्राम. काही ब्रण्ड्स मध्ये तर आणखीन कमी टमाटो पेस्ट असते आणि किंमत जास्त असते. तुम्ही पण आपल्या घराचे टमाटो केचप तपासून बघा.
काही दिवसांपूर्वी टमाटो केचप संपले. सोसायटीच्या बाहेर मार्केट आहे. तिथल्या दुकानदाराला विचारले. तो म्हणाला आम्ही पतंजलिचे समान ठेवत नाही. ते 15 टक्के पेक्षा जास्त मार्जिन देत नाही. इथले भाडे आणि रखरखवसाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो. दूध, दही, अन्न-धान्यात मार्जिन मिळत नाही. त्यामुळे इतर वस्तूंत किमान 25 टक्के मार्जिन मिळाले पाहिजे अशी अपेक्षा असते. त्याचे म्हणणे खरे होते. नोएडात पतंजलि स्टोर गावांत आहेत. शहरी माल आणि मार्केट एखाद दुसरे असेल. दुकानदार फक्त जास्त विकणारी वस्तुसाठी कमी मार्जिन घेतील. उत्तम दर्जाचे उत्पाद विकण्यात त्यांचा किंचित ही उद्देश्य नसत. त्यांना ग्राहकांची काळजी मुळीच नसते. ग्राहक ही आळशी असतो तो कधीच पॅकेट वर लिहलेले वाचत नाही. तो फक्त ब्रॅंड पाहतो. पतंजलि आणि किसानच्या पॅकेटांचे चित्र खाली दिले आहे. तुम्हीच ठरवा कोणते केचप विकत घ्यायचे.
No comments:
Post a Comment