Monday, September 24, 2012
आपण गणपतीला दुर्वा का वाहतो?
Saturday, September 15, 2012
एफ डी आई सुंदरी
स्वर्गातली अप्सरा
एफ डी आई.
घेउनी कवेत त्याला
म्हणाली ती कशी.
अमृताहुनी गोड
आणिली मी तुझ्यासाठीच.
घालुनी परिधान वालमार्टी.
तुझे मेहनती हात-पाय
आपले हातपाय मेहनती.
स्वप्ने स्वर्ग सुखांची.
आसमंतात गुंजला
विळखा होता राक्षसी.
ओरडला, चीत्कारला,
पण उपयोग नव्हता.
शोधात नव्या सावजाच्या
एफ डी आई राक्षसी
एफ डी आई अप्सरा.
Sunday, September 9, 2012
आरोग्य दलिया
दलिया नाव घेतल्या बरोबर गव्हाचा दलिया आपल्या डोळ्यांसमोर येतो. सहा-सात महिन्यांपूर्वी सहज कतुहल म्हणून पतंजलीतून आरोग्य दलिया आणला होता. या दलिया मध्ये गहू, मुगाची डाळ (साली सकट), सम प्रमाणात बाजरी आणि तांदूळ.
साहित्यआरोग्य दलिया २ वाटी, जिरे १/२ चमचे, काळी मिरी १/२ चमचे किंवा १ हिरवी मिरची,तूप (शुद्ध) किंवा तेल १ किंवा २ चमचे, मीठ आवडीनुसार, टमाटर दोन (१०० ग्राम), पाणी ८ वाटी
वैकल्पित साहित्य: कोथिंबीर आणि *भाज्या
कृती : गॅस वर कुकर ठेवावे. १ चमचा तूप घालावे, तूप गरम झाल्यावर त्यात जिरे व काळी मिरी घालावी. नंतर दलिया घालून एक ते दोन मिनिटे तुपावर परतवावा. नंतर पाणी, टमाटर व आवडीनुसार मीठ त्यात घालावे. दोन सीट्या झाल्यावर गॅस बंद करावा. दलिया जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात पाणी घालून पुन्हा एक ते दोन मिनिटे उकळी द्यावी.
टीप: आवडत असेल तर दुधी भोपळा, लाल भोपळा, खीरा, गाजर , तोरी, शिमला मिरची, बंद गोबी, सर्व प्रकारच्या शेंगा यात घालता येतात (दलिया चमच्यांनी खातात म्हणून या भाज्या बारीक चिरून घातल्या पाहिजे). (अर्धा किलो दलियाची किमत ३० रू आहे अर्थात स्वस्त आणि पोष्टिक ही)हा दलिया सर्वाना निश्चितच आवडेल ही अपेक्षा.
Wednesday, August 22, 2012
ईशान्य उपनिषद – जगण्याचा मार्ग.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
(शांतीपाठ)
ईशा वास्यमिद्ँसर्व यत् किंच जागत्यां जगत.
तेन त्यक्तेन भुन्चीथा मा गृध: कस्य स्विद् धनम्.
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत्ँसमाः.
एवं त्वयि नान्यथेतोऽस्तिण कर्म लिप्यते नरे.
[ईशोपानिषद (मंत्र १ & २)]
उपनिषदकार ऋषींना “मंत्रदृष्टा” का म्हणतात हे ईशान उपनिषद वाचल्या वर कळते. भूत, वर्तमान आणि भविष्य पाहण्याची क्षमता त्यांचात होती. ब्रह्मा द्वारा निर्मित पृथ्वी समस्त जीव व जाती ही कधी तरी नष्ट होणारच हे सत्य असले, तरी भगवंताने मानवाला दिलेले आयुष्य त्याने जगले पाहिजे आणि त्या साठी मंत्रदृष्टा ऋषीने या मंत्रांद्वारे आपल्याला मार्ग दाखविला आहे.
पृथ्वीवरील आजचे वातावरण मानव आणि आज अस्तित्वात असेलेल्या समस्त प्राणीमात्रांसाठी अनुकूल असे आहे. अर्थात वातावरणातील हवा (गॅस),पाणी आणि माती यांचे संतुलन. जो पर्यंत हे वातावरण अनुकूल राहील मानवाचे अस्तित्व पृथ्वीवर टिकून राहील. पण माणूस बुद्धिमान आणि स्वत:ला भगवंताहून अधिक श्रेष्ठ समजतो. आपल्या स्वार्थासाठी वातावरणात बदल करण्याची क्षमता मानवाने आज मिळवली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या स्वार्थासाठी इतर प्राण्यांना नामशेष करण्याचा हट्टच जणू माणसाने धरला आहे. स्वर्थापायी आंधळ्या झालेल्या मानवाला हे कस समजत नाही पृथ्वीवरील इतर जीवन नष्ट झाले तर मानवजाती ही नष्ट होईल. आपल्याच कर्माचे परिणाम मानवाला भोगावे लागेल. मग या जगात माणसाने आपले आयुष्य कसे जगावे जेणे करून मानवजाती आपले अस्तित्व पृथ्वी वर टिकवू शकेल अर्थात आपली शंभर वर्ष जगण्याची इच्छा पूर्ण करू शकेल याचे मार्ग दर्शन ऋषीने केले आहे.
‘रोटी कपडा आणि मकान’ आपल्या तीन मूलभूत गरजा आहे. या साठी आपण काही वस्तूंची ‘निर्मिती’ करतो आणि काहींचा ‘उपभोग’ करतो.
ऋषी “उत्पादन” या शब्दाचा अर्थ सांगतात, “पृथ्वीवरील वातावरणातल्या संतुलनात कुठलाही बदल न करता जी निर्मिती होते तिलाच आपण “उत्पादन’ हे म्हणू शकतो”. याच उत्पादित पदार्थांचा आपण उपभोग करतो. पण इथे प्रश्न उठतो कुठलीही वस्तूची निर्मिती वातावरण संतुलनात बदल केल्या शिवाय कसे शक्य आहे. ऋषी याच प्रश्नाचे उत्तर देतात जे काही आपण उपभोग करतो “त्याचा त्याग करा”.
उदाहरणार्थ: झाड-झुडपी ही जमिनीतून भोज्य पदार्थ व पाणी इत्यादी घेतात बदल्यात पिकलेली पाने परत जमिनीला परत करतात. वातावरणात प्राणवायू निर्माण करतात. पाणी जमिनीत साठवण्यास मदत करतात. जनावरे चारा खातात आणि विष्टा परत करतात. अशारीतीने वातावरणातले संतुलन कायम राहते. पण माणसाच्या गरजा मोठ्या आहे. उदाहरणार्थ जाळण्यासाठी, फर्निचर व घरांसाठी आपण लाकूड वापरतो पण तेवढेच झाडे लावून त्यांची पूर्ती करतो का? पृथ्वीच्या गर्भातून कोळसा व पेट्रोलियम पदार्थ काढून ‘दूषित वायू’ वातावरणात उधळतो या मुळे हवेतील प्राणवायू कमी होत चालली आहे. या मुळे वातावरणातले संतुलन बिघडत चालले आहे. ही ‘दूषित वायू’ परत पृथ्वीच्या गर्भात टाकण्यासाठी आपण काय करीत आहोत. जर आपल्याला हे करणे शक्य नाही तर या पदार्थांचा वापर कशाला?
आपल्या स्वार्था साठी आपण दुसऱ्यांचा जगण्याचा हक्क आपण काढून घेत आहोत. कळत, असूनही पृथ्वीवरचे वातावरण दूषित करीत आहोत. अधिक काळ जर माणसाची अशीच प्रवृत्ती राहील तर मानवाला आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागतील व मानवजाती ही नष्ट होईल.
सारांश: जे काही आपण वातावरणातून घेतो ते आपल्याला परत करता आल पाहिजे. अन्यथा त्या पदार्थांचा उपभोग करण्याचा मोह टाळावा. ज्या पदार्थांना मानवाला परत करणे शक्य आहे त्यांचाच उपभोग घ्यावा अर्थात त्याग सहित भोग म्हणजे “सर्वोत्तम उपभोग”. अशा रीतीने जगल्यास आपण निश्चित शंभरी गाठू शकू.
Sunday, August 19, 2012
सूतजी म्हणाले, मुनिनों पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप या विषयावर एक कथा आज तुम्हाला सांगतो.
अवंती नगरीच्या राजकुमारी लक्ष्मीदेवीचे एका राक्षसाने अपहरण केले. राजाने जो कुणी राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून सोडवेल त्याला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याचा विवाह राजकुमारी लक्ष्मीदेवी बरोबर लावण्यात येईल.
विदिशाचा राजकुमार विष्णुवर्धन घोड्यावर स्वार होऊन राजकुमारीला शोधण्यास निघाला. पुष्कळ दिवस निघून गेले त्याला राजकुमारीचा पत्ता लागला नाही. निराशा त्याचा मनात घर करू लागली. परत आपल्या राज्यात परतावे कि आणखीन शोध घ्यावा, त्याला काही सुचेनासे झाले होते. अशा निराशेच्या क्षणी त्याला एक बुटका भेटला. राजकुमाराने त्याला राजकुमारी बद्धल विचारले. बुटका म्हणाला राक्षसाने राजकुमारीला एका किल्यात बंदिस्त करून ठेवले आहे. मला ती जागा माहित आहे. राजकुमार म्हणाला, बुटक्या मला ती जागा दाखव, आपण दोघ मिळून राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू.
राजकुमाराने बुटक्याला आपल्या सोबत घेतले. दोघांचे राक्षसा बरोबर युद्ध झाले. दोघांनी मिळून राक्षसास ठार मारले. राजकुमारी लक्ष्मीदेवी मुक्त झाली. राजकुमाराने तिला आपल्या सोबत घोड्यावर बसविले आणि तो अवंती नगरीच्या दिशेने निघाला. राजकुमारी घरी परतली. राजाला अत्यंत आनंद झाला. दिलेल्या वचनाचे पालन करीत, राजाने राजकुमार विष्णुवर्धन बरोबर राजकुमारीचे लगीन लावले व त्याला आपले अर्धे राज्य ही दिले. सर्वत्र आनंदी-आनंद पसरला.
तुमच्या मनात एक प्रश्न असेलच, त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला. कसा-बसा तो अवंती नगरीत येऊन पोहचला. त्याला कुणीही ओळखले नाही. बुटका तिथल्या चौरस्त्यावर भीक मागून कसाबसा आपल आयुष्य कंठू लागला. त्याला राजकुमारी तर मिळाली नाही पण राजा कडून काही बक्षीस ही मिळाले नाही. आपण मूर्ख बनलो, हा एकच विचार त्याचा मनात सदैव यायचा.
सूतजी म्हणाले, मुनिनों, कलयुगात जम्बूद्विपे ज्याला राजकुमार, बुटका, कोण हे कळेल पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल.
साठाउत्तराची कहाणी सकाळ संपूर्ण. इति.
आजचा कवी
Tuesday, August 14, 2012
ब्लू लाईन कथा – फिरुनी नवी जन्मेन मी
Friday, August 3, 2012
दिल्लीचा पावसाळा
Saturday, July 28, 2012
वाहतो रिश्वत जुडी
अखेर सदोबा चित्रगुप्ताच्या दरबारी पोहचले. चित्रगुप्ताने सदोबाला विचारले तुला कुठे पाठवू- स्वर्गात की नरकात? सदोबाने चित्रगुप्ताला साक्षात दंडवत केला व बरोबर आणलेल्या नोटांची एक जुडी चित्रगुप्ताच्या चरणी अर्पण केली व म्हणाला- आपण जे कराल ते योग्यच, फक्त एकच विनंती - पुन्हा भारतभूमीवर पाठवू नका, रिश्वत देवीची पूजा करत करत मी थकून गेलो आहे. चित्रगुप्त मिस्कीलपणे हसत म्हणाला- सदोबा तू पृथ्वीवर कधी ही कुणाला कष्ट दिले नाही, त्यामुळे मी तुला नरकात पाठवू शकत नाही. पण रिश्वत देऊन मला विकत घेऊ पाहत होता. तू विसरलाच ही भारतभूमी नाही, हे चित्रगुप्ताचे न्यायालय आहे. तुझ्या या अपराधामुळे तुला स्वर्गात ही पाठविता येत नाही. तुला फक्त एकच शिक्षा- सदोबांच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
Thursday, July 12, 2012
साठाउत्तराची कहाणी-पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्ट
Monday, July 9, 2012
परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? अमरतेचा आनंद कुणाला मिळतो?
परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? अमरतेचा आनंद कुणाला मिळतो?
ईशान्य उपनिषदच्या सातव्या मंत्रात ऋषी म्हणतात:
Thursday, July 5, 2012
वाटते भीती
Sunday, June 24, 2012
हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद
विश्वानि देव वयुयानि विद्वान्.
युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो
भूयिष्ठां तेनमउक्तिं विधेम.
[ईशोपानिषद (मंत्र १8) ]
शाब्दिक अर्थ: हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. ही विनंती. अग्निदेव सर्वज्ञ आहेत, ते सर्व काही जाणतात, त्यांच्या पासून काही ही लपलेले नाही. साधकच्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांमुळे मुक्तीचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. पापांच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी साधक अग्निदेवाची विनंती करीत आहे. अग्निदेव प्रसन्न होउन आपल्या भक्तांवर सदैव कृपा करतात.
आपल्या आयुष्यात अग्नीचे अत्यंत महत्व आहे. अग्नि विना आजच्या जगाची कल्पना आपण करू शकत नाही. आपल्या पोटात ही जठराग्नी जळत असते. ही अग्नी शरीलाला आवश्यक असे पोषक तत्व ग्रहण करते आणि व्यर्थ पदार्थ टाकून देते. काही भक्त व्रत-उपवासाद्वारे आपल्याच शरीराची (शरीरातल्या चरबीची) आहुती या अग्नीत देतात. अग्नीत तापल्या मुळे शरीर आणि मन शुद्ध होतात व परमेश्वरा पर्यंत पोहचण्याचा मार्ग प्रशस्त होतो. अशी अवधारणा.
समस्त भौतिक पदार्थांना शुद्ध करने हा अग्नीचा स्वभावाच आहे. अग्नीत तापल्या मुळे समस्त पदार्थांचे दोष नष्ट होतात. चिकित्सक ही धातूंना अग्नीत जाळून १००% शुद्ध भस्म प्राप्त करतात. या लौह, रौप्य ,सुवर्ण इत्यादी भस्माचा उपयोग व्याधीग्रस्थांची व्याधी दूर करण्यासाठी उपयोग करतात. अर्थात माणसांच्या भौतिक इच्छाही अग्निदेव पूर्ण करतात. फिगर सुंदर ठेवण्यासाठी कुणी तरुणी जठराग्नित आपल्या चरबीची आहुती देते. अग्निदेव तिच्यावर ही कृपा करतात. तिला ही स्लीम फिगर मिळते.
नेता आणि अधिकाऱ्यांच्या मनात सत्ता आणि भौतिक सुखांची आकांक्षा असते. त्यात काहीच गैर नाही. पण त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना गैर-मार्ग वापरावे लागतात. सरकार-दरबारात कागदी घोडे दौडत असल्यामुळे त्यांचे गैर कृत्य सरकारी कागदोपत्री दर्ज होतातच. पहिले या फाईली रिकॉर्ड रूम मध्ये दबलेल्या राहत असे. पण आपल्याला माहीतच आहे. माहितीचा अधिकारामुळे कित्येक दडलेले घोटाळे बाहेर निघाले. कित्येक नेत्यांना आणि अधिकाऱ्याने तिहाडची सुगंधित* हवा खावी लागली (तिहाड जेलच्या एका बाजूला जनकपुरीतली घाण वाहून नेणारा नाला वाहतो. त्याचा सुगंधी वास जेल मध्ये सतत दरवळत राहतो. गेल्याच वर्षांपासून या नाल्याला झाकण्याचे काम सुरु झाले आहे आतापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले असेल- या महान कैद्यांची कृपा दुसर काय) असो.
सूचनेच्या अधिकारानुसार माहिती ही द्यावीच लागते आणि परिणाम ही भोगावे लागतात. कागद गहाळ कारणे ही सौप नाही कारण त्याची ही चौकशी होणार. कदाचित गहाळ जालेली फाईल पुन्हा प्रगट होऊ शकते. सत्तेच्या खेळात कुणी ही केंव्हा दगा-फटकी करू शकतो. घोटाळे उघडकीस आले तर अश्या नेत्यांचा मार्ग अवरुद्ध होऊ शकतो. सत्ता त्यांच्यापासून दूर होईल. कदाचित तिहाडची हवा ही खावी लागेल.
आपल्याला माहित आहे, अग्निदेव अत्यंत कृपाळू आहेत, आपल्या भक्तांना निराश करीत नाही. अश्या घोटाळेबाज अधिकारी आणि नेत्यांनी अग्निदेवाची प्रार्थना केली आणि अग्नीने ही आपल्या भक्तांवर कृपा केली तर त्यात गैर काय. ‘आगीत फाईली जळाल्या, नेता-अधिकारी पापमुक्त जहाले’. अशारीतीने सर्वकाही जाणाऱ्या अग्निदेवाने आपल्या भक्तांच्या प्रगतीच्या प्रवासाच्या मार्गातले अडथळे दूर केले.
ज्या प्रमाणे अग्निदेवाने त्यांच्या मार्गातले अडथळे दूर केले त्याच प्रमाणे सर्वांच्या मार्गातले अडथळे अग्निदेवाने दूर करावे ही चरणी प्रार्थना.
Sunday, June 17, 2012
सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य
तत त्वं पुषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये l
[ईशोपानिषद (मंत्र १५) ]
शाब्दिक अर्थ: सोनेरी तेजाने (आवरणाने) सत्याचे मुख झाकलेले आहे. हे पूषण (पालनकर्ता) कृपया सोनेरी आवरण दूर करा सत्य रुपी धर्म पाहण्या करिता.
सूर्योदयाच्या वेळी सोनेरी रंगाचा सूर्य आपण नेहमीच पाहतो. आज सकाळी बागेत फिरायला गेलो होतो. सूर्योदयाची वेळ होती, बागेततल्या खुर्चीवर बसून पूर्व दिशेला सोनेरी रंगात रंगलेल्या सूर्य नारायणाला पहात होतो, दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचनात आलेला ईशोपनिषदातला हा मंत्र आठवला. मनात विचार आला, सूर्याला आपण क्षणभर ही पाहू शकत नाही. हा मंत्रदृष्टा ऋषी तर चक्क सोनेरी आवरण दूर करण्याची विनिती देवाला करीत आहे. सत्यरूपी तळपळणारा सूर्य पाहण्यासाठी. सत्यमार्गावर चालणारा हा मंत्रदृष्टा ऋषी सूर्याचे तेज सहन करू शकत होता.
सत्य हे नेहमीच सुवर्ण आवरणाखाली दडलेल असत. मोह, माया, ममता लालसा, स्वार्थ इत्यादी अनेक गोष्टी सत्याचा आड नेहमीच येतात. या सुवर्णाच्या लोभापायी लोक खऱ्याच खोट करतात किंवा सत्याचा पक्ष घ्यायला घाबरतात. राजा हरिश्चंद्राचे आपण गुण गातो पण हरिश्चंद्र बनण्याची कुणाचीही इच्छा नसते.
भर दरबारात द्रोपदीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न सुरु होता. द्रोपदी न्याय मागित होती. धर्माचे जाणकार भीष्म पितामह एवम् इतर मंत्री व दरबारी शांत बसून होते किंवा दुर्योधनाला रुचणारी धर्माची व्याख्या करण्यात मग्न होते. (मिळणारा पगार, दरबारातले स्थान, विरोध करण्याचा परिणाम व आपल्याला काय करायचे आहे, त्यांनी जुगार खेळला, भोगू द्या त्यांना त्यांच्या कर्मांची फळे). राजा ही आंधळा होता, गांधारीने चक्क डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती. (राजसुखाची लालसा आणि पुत्र मोहामुळे सत्य आणि न्याय मार्गापासून दूर अशा राजा साठीच ‘आंधळा’ हे बिरूद कदाचित व्यासांनी धृतराष्ट्रासाठी वापरले असेल आणि पत्नीतर पतीची अनुगामिनी असतेच) जिथे भर दरबारात कुलवधूचे वस्त्र हरण होत असेल त्या राज्यात सामान्य जनतेवर काय आत्याचार होत असतील त्याची कल्पना करणे शक्य नाही. त्या काळी स्त्रीयांच अपहरण आणि जबरन विवाह तर क्षत्रिय राजांसाठी सामान्य बाब होती. प्रजाही प्रारब्ध मानून असले अत्याचार निमुटपणे सहन करीत होती. परिणाम, महाभारताचे युद्ध झाले, कित्येक अक्षोहिणी सैन्य रणांगणात ठार झाले. हस्तिनापूरचे राज्य धुळीस मिळाले. प्रजाजानानाही त्याचे परिणाम भोगावे लागले. युद्धानंतरच्या भीषण वास्तव्याचे महाभारतात जे चित्रण आहे ते दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही. (ब्रह्मास्त्राच्या प्रभावामुळे दुष्काळ, अतिवृष्टी विकृत प्राणी आणि संततीचे जन्म इत्यादी). जर त्याच वेळी भीष्मपितामह आणि राजा धृतराष्ट्राने पुत्र मोह आवरून सत्य आणि धर्मानुसार निर्णय घेतला असता तर महाभारत घडले नसते. असो.
आज आपण काय पाहतो. जन्म प्रमाणपत्र, जातप्रमाण पत्र, शाळा, कॉलेज मध्ये अडमिशन, नौकरीसाठी लोकांना ‘सुवर्ण’ मोजावे लागतात. व्यापार धंद्या साठी ही नेता आणि दरबार्याना खुश करावे लागते. न्याय दरबारी तर परिस्थिती आणखीनच विचित्र. १० रुपये रिश्वत घेणाऱ्या चपरासी जेल मध्ये जातो आणि करोडों बुडविणार्याना जेल नव्हे तर सरकार दरबारात मान मिळतो. ही वस्तुस्थिती.
देशाला चालविणारे बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांना ही त्यांना मिळणारे प्रमोशन, सरकारी नौकरीतून निवृत्तीनंतर मिळणारे ‘बक्षिस’ यातच रस असतो. शिवाय वाहत्या गंगेत हात धुवण्याचा मौका ते का सोडणार. त्या मुळे सर्वकाही जाणूनही ते मूक राहतात, न्यायपूर्ण व जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला घाबरतात. आज देशाची परिस्थिती महाभारत काळासाराखीच आहे. परिणाम काय होणार हे जाणून ही सर्व चूप बसलेले आहे. कारण सत्य रूपी सूर्याचे तेज पाहण्याची हिम्मत कुणा मध्ये ही नाही.
मनात विचारांचे काहूर माजलेले होते. सूर्याचे उन आता बोचू लागले होते. वर आकाशाकडे लक्ष गेल सोनेरी आवरण दूर झालेले होते सूर्याला क्षणभर पाहणे ही आता शक्य नव्हते. मला माझेच हसू आले. सूर्य उजेडापासून दूर सुरक्षित व थंड अश्या सुरक्षित घराच्या दिशेने चालू लागलो.
Saturday, June 9, 2012
मृत्यु / एक विचार
मरणाची भीती सर्वांनाच वाटले. पण प्रत्येकाचा विचार वेगळा काहींचा मते, यात्रेतील एक पडाव, क्षणभराची विश्रांती घेण्याची जागा.