Thursday, August 30, 2018

शेवटची भेट - भारतीय युद्ध


(मध्यरात्रीची वेळ, शकुनि आपल्या शिविरात एका कोपऱ्यात मंचकावर ठेवेल्या चतुरंगच्या पटाकडे पाहत विचारात मग्न होता. शकुनि, या आवाजाने विचार शृंखला भग्न झाली).

शकुनि: ताई, अशी मध्यरात्री तू इथे कशी? तुझ्या डोळ्यांत अश्रू का? त्या आंधळ्याच्या पुत्रांसाठी तर नाही ना?

गांधारी: शकुनि, गांधार सोडताना आपण घेतलेला प्रण अजूनही माझ्या लक्षात आहे. कौरव जरी माझ्या गर्भातून जन्मले असले तरी, ती सर्पाची (शत्रूची) पिल्ले आहेत, हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यांच्यासाठी मी अश्रू नाही ढाळनार. आज रणांगणात शल्याचा वध झालेला आहे. युद्धाचा अंत जवळ आलेला आहे आता... (हुंदका देत) शेवटची भेटायला आली आहे रे तुला. उद्या रणभूमी वर कदाचित...

शकुनि: (तिचे वाक्य मध्ये तोडत म्हणाला), हा! हा! हा!, मी जिवंत राहणार नाही, एवढेच ना. युद्धाचा सुरुवातीपासूनच हे सत्य तुला आणि मला चांगलेच ठाऊक होते, त्यात रडण्या सारखे काय? भारतीय युद्धात अठरा अक्षोहणी सैन्य नष्ट झाले आहे. भारतीय सैनिकांच्या तीन पिढ्या नष्ट झाल्या आहेत. आपल्या गांधारचे काय नुकसान झाले, तुझ्या-माझ्या सहित केवळ बोटावर मोजण्या इतकेच सैनिक. पूर्वी इतिहासात कधी असे घडले होते का? आता कुणा भीष्माचे सैन्य गांधारात प्रवेश करणार नाही किंवा कुणा गांधारीला आपल्या आयुष्याचे बलिदान द्यावे लागणार नाही. गांधारला आता भारताची भीती नाही. मूर्ख भारतीय राजा सत्तेसाठी विदेशी तालावर सहज नाचतात, हे जगाला कळले आहे. हस्तिनापुरात मूर्ख बुद्धीजीवींचा भरणा होता म्हणून आपले कार्य सिद्ध झाले. गांधारी डोळ्यांतील अश्रू पुसुन टाक आणि बघ भविष्य, सप्तसिंधु प्रदेशातील मूर्ख हिंदू आणि बौद्ध राजे स्वार्थापोटी सिंधु नरेश दाहीरची मदत करणार नाही. बघ गांधारची अश्वसेना सप्तसिंधु प्रदेशाला उध्वस्त करण्यासााठी सज्ज झाली आहे..... 
दोघेही जोरात विजय गर्जना करतात, गांधारचा विजय असो.  


No comments:

Post a Comment