Thursday, July 5, 2018

वेद हे अपौरुषेय- कारण



वेदांना अपौरुषेय म्हंटले आहे. अपौरुषेय शब्दाचा अर्थ काय हा प्रश्न मनात येणारच. सामान्य अर्थ मनुष्य निर्मित नाही. मग त्या ऋचांची रचना कुणी केली.  देवांनी? पण ऋग्वेदातच म्हंटले आहे, देवांची निर्मिती हि सृष्टीच्या निर्मिती नंतर झाली आहे. निर्मित झालेली वस्तू जे निर्माण करेल ते अपौरुषेय निश्चितच नाही. त्यामुळे देवतांनी दिलेले ज्ञान हि अपौरुषेय नाही. 

वैदिक ऋषींनी वेदांच्या ऋचांची रचना केली नाही अपितु सनातन काळापासून विद्यमान सत्य जाणले, अनुभव केले आणि शब्दांत बांधले. हे शब्द म्हणजेच वैदिक ऋचा. ऋषींनी या वैदिक ऋचांचे ज्ञान समाज कल्याणासाठी आपल्या शिष्यांना दिले. या कारणामुळेच वैदिक ऋषींना मंत्रदृष्टा म्हंटले आहे. वेदांची भाषा संस्कृत असली तरी हि अगम्य आहे. एकाच शब्दाचे अनेक अर्थ तिथे सापडतात. त्यामुळे वैदिक ऋचांचा अर्थ विद्वान आपापल्या परीने वेग-वेगळे काढतात. बहुतेक जाणलेले ज्ञान चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून अशी भाषा ऋषींनी  वापरली असेल. 

अपौरुषेय म्हणजे सत्य आणि सनातन जे सृष्टीच्या प्रारंभापासून विद्यमान आहे. ऋषींनी ते सत्य जाणले आणि वेदांच्या माध्यमातून समोर आणले. आता सनातन सत्य म्हणजे काय? एक उदाहरण, झाडावरून फळ खाली पडते. सत्ययुगापासून ते आजगायत फळे झाडावरून खालीच पडतात. वर उडून जात नाही. पण फळे खालीच का पडतात, या मागचे कारण काय?  पृथ्वीच्या गृत्वशक्तीमुळे फळे खाली पडतात. गृत्वाकर्षण मानवाने निर्मित केलेले नाही. त्यामुळे गृत्वाकर्षण काय आहे हे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याची लांबी रुंदी हि मोजू शकत नाही. पण न्यूटनने पृथ्वीवर विद्यमान गृत्वाघर्षण  जाणले आणि गृत्वाघर्षणचा सिद्धांत समोर आला.  अशाच प्रकारे वेदांची निर्मिती झाली.

सारांश वैदिक ऋषींनी अनादीकाळापासून असलेले विद्यमान सत्य ओळखून, त्या सत्याला शब्दांत बांधले आणि वेदांची रचना केली म्हणून वेदांना अपौरुषेय म्हंटले आहे.
  

No comments:

Post a Comment