Monday, July 16, 2018

जन्मपत्रिका म्हणजें शोकपत्रिका


सौप्या शब्दांत सांगायचे जन्माची जागा आणि १२ राशी, सूर्य, चंद्रमा व  ग्रह इत्यादींची त्या जागेची संबंधित स्थिती. या स्थितीला कागदावर मांडणे म्हणजे जन्मकुंडली. त्या कुंडलीनुसार बालक/बालिकेचे भविष्य मांडणें म्हणजें जन्मपत्रिका.  काही ग्रह चांगले, काही दुष्ट.  शनीची साडेसाती तर मंगळी तर लग्न होणे दुष्कर.  या सर्व ठोकताळ्यांचा आधार काय, कुठलाच जोतिषी सांगू शकत नाही. मजेदार गोष्ट जगात अनेक प्रकारचे जोतिष सिद्धांत व अनेक प्रकारच्या जन्म कुंडल्या आणि त्यांचे वेगवेगळे ठोकटाळे. कुठल्या ठोकताळ्यांवर विश्वास ठेवायचा, हा हि एक प्रश्न आहे. 

माझ्या नाते संबंधातील गोष्ट. वडिलांना पत्रिकेचे भारी ज्ञान. पत्रिका पाहून मुलगी बघायचा कार्यक्रम ठरविला तिथे मुलगी नकार द्यायची किंवा मुलाला मुलगी पसंद नाही पडायची. बिना पत्रिका बघता आधी मुलगी बघितली तर पत्रिका आड यायची. वयाची ३५ची उलटली. मुली यायला बंद झाल्या. शेवटी त्यांच्या मुलाने एका सहकर्मी मुलीशी लग्न केले. पत्रिका, जात काही हि पहिली नाही. त्यांचा संसार सुखाचा आहे. पत्रिका पाहून लग्न झाल्यावर हि संसार सुखाचा होईल याची शाश्वती कुठला हि जोतिषी किंवा जन्मपत्रिका देत नाही.  कारण सुखी संसार आणि पत्रिका, यांचा संसाराशी काही हि घेणे देणे नाही. 

पत्रिकेत मंगळ असेल तर लग्न जमणे जवळपास अशक्य. शेवटी मंगळी मुलगा भेटला कि लग्न करून जवाबदारी झटकली जाते. मुलीचा संसार उध्वस्त झाला तरी चालते. शेवटी खापर पत्रिकेतल्या मंगळावर फोडल्या जाते. कधी-कधी लग्नच होत नाही. मुले/ मुली आयुष्भर अविवाहितच राहतात. दोषी कोण पत्रिकेतील मंगळ. या शिवाय पत्रिकेतील दुष्ट ग्रहांची शांती करण्यासाठी अवाढ्य खर्च केला जातो, चित्र-विचित्र रंगांचे दगड बोटांमध्ये घातले जातात. गंडा, ताबीज, दोरे बांधले जातात. आपल्या पत्रिकेत ग्रह चांगले नाही, याचा मनावर परिणाम झाला कि समजा आयुष्य उध्वस्त होणारच.  

एक प्रश्न कुणाच्या हि मनात येईल, खरंच पत्रिकेतल्या ग्रहांचा मानवीय जीवनावर परिणाम होतो का? हाच प्रश्न एका जोतिषीला विचारला. तो म्हणाला, पहा चन्द्रमाच्या प्रभावाने समुद्रात ज्वार-भाटा येतात. मग त्याचा परिणाम माणसावर का नाही होणार? प्रतिप्रश्न रास्त होता. मी म्हणालो तो प्रभाव प्रत्येक माणसावर एक सारखा पडतो. वेगवेगळा पडणार नाही. शारीरिक परिस्थितीनुसार कमी जास्त पडू शकतो, मान्य आहे. पण त्याच्या कुंडलीत कुठल्या स्थानावर चंद्रमा आहे याशी काही संबंध आहे का? जोतिषी चमकलाच असा प्रश्न आधी कुणीच विचारला नसेल. त्याच्या जवळ उत्तर नव्हते. सर्व ग्रह विधात्याने निश्चित केलेल्या मार्गानुसार सूर्याचे परिभ्रमण करीत आहे. त्यांना तुम्ही केंव्हा पैदा झाला, त्या वेळी ते ग्रह तुमच्या पत्रिकेत कुठल्या स्थानी होते, याच्याशी काही घेणे देणे नाही. त्यांच्या गृत्वाकर्षण, प्रकाश, इत्यादी प्रभाव जर पृथ्वीवरच्या लोकांवर पडत असेल तर सर्वांवर एक सारखाच पडणार. वेगळा नाही. शिवाय ब्रह्मांडात अब्जावधी खगोलीय पिंड आहेत त्यांच्या हि प्रभाव पृथ्वीलोकावर पडत असेल त्यांची हि जन्मकुंडलीत मांडणी का करत नाही. या प्रश्नावर जोतिषबुवा चूप राहिले. चिडून शेवटचा बाण त्यांनी मुखातून काढला, विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, पुढे काही बरे वाईट झाले तर बोंबलू नका. मी म्हणालो, पुढे काय होणार, हे विधात्याशिवाय कुणीच सांगू शकत नाही. जोतिषी तर निश्चित नाही. 

आमच्या वडिलांनी आमच्या लग्नाच्या वेळी जन्मकुंडली / पत्रिका बघितली नाही. घरात कुणाचेच काही वाईट झालेले नाही. पुढच्या पिढीने तर प्रेम विवाह केले जाती  बाहेर हि, सर्वांचे संसार सुखीचे आहे. महर्षी दयानंद तर जन्मपत्रिकेला, शोकपत्रिका म्हणायचे. ज्यांना आपला संसार उध्वस्त करायचा असेल किंवा पैसा उडवायचा असेल त्यांनी जन्मपत्रिकेवर विश्वास ठेवावा. मंगळ आणि शनीची शांती करावी.  ज्यांना आयुष्यात पुढे जायचे असेल  जन्मपत्रिका विसरून पुरुषार्थावर विश्वास ठेवावा. लग्न हि अनुरूप मुलगा / मुलगी पाहून करावे. पत्रिका पाहून तर कदापि नाही. 

No comments:

Post a Comment