Monday, April 16, 2018

प्रदूषण (२६) गोवर्धन गिरधारी



हिरव्यागार वस्त्रांनी नटलेली अरावलीची पर्वतराजी, आकाशात उंच मान डोकावून उभा गौवर्धन पर्वत. दूर यमुने पर्यंत पसरलेले हिरवेगार कुरण. पर्वतांच्या पायथ्याशी असलेली कमळदलांनी सजलेली सुंदर-सरोवरे. सारस, हंस सारखे सहित अनेक चित्र-विचित्र पक्षी, हत्ती, व्याघ्र,हरीणे इत्यादी जनावरे त्या रम्य परिसरात बागडत होती. कदंब, पिंपळ, कडूलिंब, वटवृक्ष, आंबा,पेरू नानाविध वनस्पती ने हा हिरवागार वन्य प्रदेश नटलेला होता.  हेच ते नयनाभिराम -गोकुळ-वृंदावन. 


एक दिवस माणसाची दृष्ट त्या रम्य परिसराला नजर लागली. दूर-दूर पसरलेली हिरवीगार कुरणे पाहून काही ग्वालपाल आपल्या  गुरांसहित इथे स्थिरावले. मथुरेच्या बाजारात दूध, दही, तूप विकून आपला उदर-निर्वाह करू लागले. जसे-जसे मथुरेचे वैभव वाढले, तसे-तसे वृंदावनात ही गवळ्यांची व गुरांचीही संख्या वाढली. कुरणांवरून त्यांचात आपसात भांडणे होऊ लागली. साहजिकच त्यांनी आपला राजा निवडला. कुरणे वाटण्यात आली. परिणाम वृन्दावानातले वन्य जीवन नष्ट झाले. नंतर मथुरेतल्या महाल व इमारतीत साठी, मोठ्याप्रमाणात झाडे तोडण्यात आले. अरावलीच्या टेकड्या ओसाड झाल्या. नग्न पर्वत पावसाळ्यात ढासळू लागले. पर्वत पायथ्याशी असलेली सरोवरे बुजुन गेली. व्हायचा तोच परिणाम झाला. पावसाचे पाणी आपल्यात सामावणारी सरोवरे आता नव्हती. एकदा श्रावणात अतिवृष्टी झाली. वृक्षविहीन पर्वतराजी पाण्यास थांबू शकली नाही. पर्वतावरून वाहत येणार्या पाण्यास कोणताच अडथळा नसल्यामुळे भयंकर पूर आला. शिवाय नदीच्या काठी वनराई नसल्याने  हजारोंच्या संख्येत गुर-ढोर व माणसे हि पाण्यात वाहून गेली. त्यानंतर पाऊस दगा देऊ लागला. त्या वर्षी एक थेंब ही पाऊस झाला नव्हता. हिरवीगार कुरणे सुकून गेली. आता यमुनेचा काठच ग्वालपाल आणि त्यांच्या हजारों गायींचे एकमात्र आश्रयस्थान उरले होते.  

प्रात:विधी पासून ते पिण्याचे पाणी- 'सर्वकाही यमुनेचा काठीच' आणि त्यात यमुनेचा कमी प्रवाह. माणसांच्या व गुरांच्या घाणी मुळे पाणी प्रदूषित झाले होते. पाण्याला घाण वास येऊ लागला होता. मग व्हायचा तोच परिणाम झाला. दूषित पाण्यामुळे माणसे व गुर-ढोर आजारी पडू लागले. काही दगावले सुद्धा. यमुनेच्या पाण्यात कालसर्प आहे अशी अफवा उडू लागली. मथुरेच्या शिपायांनी यमुनेच्याकाठी काही विषाक्त सर्प ही मारले.  पण काहीही फरक पडला नाही.  रोगराई काही कमी झाली नाही. 

ग्वालांचा राजा नंद चिंतित होता. दुष्काळामुळे गायींना खायला पर्याप्त चारा नव्हता. परिणामी गायी कमी दूध देत होत्या. पण मथुरेला दूध पाठवलं नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही हे ही नंदाला चांगले माहित होत. त्यामुळे ग्वाल-बाल दूध-दह्याला मुकले. दुष्काळ दूर करण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक होत. यादवांचे गुरु गर्ग ऋषींनी देवराज इंद्राला प्रसन्न करण्यासाठी इंद्रयज्ञ करण्याचा सल्ला दिला. वृंदावनात यज्ञाची तैयारी सुरु झाली. 

गोकुळापासून काही कोस दूर एका टेकडीच्या पायथ्याशी नंदाच्या मालकीचे कुरण होते. नंदाचा जारूक नावाचा एक वृद्ध सेवक आपल्या परिवारासहित या कुरणाची व्यवस्था पाह्यचा.  तिथे नंदाच्या शेकडो गाई होत्या. दहा-बारा वर्षाचा कृष्ण इथे पहिल्यांदाच आला होता. जिथे गोवर्धन समवेत समस्त पर्वतराजी व कुरणे वृक्षविहीन व वा सुकलेली दिसत  होती. पण इथे चहूकडे हिरवळ होती. कुरण विभिन्न फुल-फळांच्या झाडांनी नटलेल होत. पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सरोवरात भरपूर पाणी दिसत होत. त्याला अत्यंत आश्चर्य वाटले. कृष्णाने या बाबतीत सेवकास विचारले. तो म्हणाला: कृष्ण कधी पाऊस जास्ती पडतो कधी कमी. पर्वतावर व जंगलातली वृक्षे पावसाच्या पाण्यला जमिनीत मुरवितात, तेच पाणी हळू हळू पायथ्याशी असलेल्या तळ्यांत साचते.  पहिले इथे लहानसे तळे होते. दररोज काही वेळ देऊन या तळ्याला मोठ्या सरोवराचे स्वरूप दिले. गुरांची वाढती संख्या पाहून आणिक दोन तीन ठिकाणी या कुरणात स्व:परिश्रमाने सरोवरे बांधली. माझे सम्पूर्ण आयुष्य यात खर्ची गेले. दर श्रावणात समोरच्या टेकडी वर व आपल्या कुरणात ठीक-ठिकाणी  फळ-फुलांची झाडे नेमाने लावतो. कृष्ण जसे आपण सर्दी व गर्मी पासून वाचण्या साठी वस्त्र परिधान करतो व स्वत:ला सुरक्षित ठेवतो तसेच हिरवी वनस्पती पर्वतांचे व धरणीचे वस्त्र होय. या हिरव्या वस्त्रांशिवाय पर्वत व धरणी उध्वस्त होईल. त्याच बरोबर त्यांचा कुशीत वावरणारे आपल्या सारखे जीव ही. दूर असलेल्या गोवर्धन पर्वताकडे बोट दाखवीत तो म्हणाला हे पहा कृष्णा गौवर्धन वृन्दावानातला सर्वोच पर्वत पण काय त्याची दशा, वृक्षांविना कसा अनाथ दिसतो. गौवर्धन पर्वताच्या पायथ्याशी असलेली सरोवरे कधीच नष्ट झालेली आहे. वृंदावनात जिथे-पहा तिथे हीच परिस्थिती आहे. पाण्याच्या अभावी कुरणे सुकून  गेली आहे. गायी तहानलेल्या व उपाशी आहे. दुध-लोणी कुठून मिळणार. मथुरेला दूध, दही व लोणी पाठविणे सक्तीचे असल्याने ग्वालबालाचींं उपासमार होत आहे. आपल्याच कर्मांचीच फळे. देवराज इंद्राला दोष देण्यात अर्थ नाही. जारूक पुढे म्हणाला, कुठलाही व्यापार एक-पक्षीय नसतो. आपण दूध-दही मथुरेt विकतो त्या एवजी आपण अन्न-धान्य, वस्त्र इत्यादी घेतो. तसेच आपल्यालाही गोवर्धनाला त्याचे वैभव पुन्हा परत करावे लागेल. तरच इंद्राच्या क्रोधापासून तो आपली रक्षा करेल. अग्नीत तुपाची आहुती देऊन इंद्र प्रसन्न होणार नाही. गौवर्धन पर्वताचे जुने वैभव परत केल्यास, अकाल आणि अतिवृष्टी पासून गवळ्यांचे व गुरांचे रक्षण होईल. कृष्णाने विचारले, जारूक हे सर्व तुम्ही बाबांना का नाही सांगत? जारूक उतरला, मी एक सेवक आहे, माझे कोण ऐकणार. शिवाय लोक स्वार्थी असतात. स्वस्त:चाच विचार करता. मला काय फायदा हा त्यांचा पहिला प्रश्न असतो. सर्वांच्या उन्नतीत स्वत:ची उन्नती आहे, हे कुणालाच कळत नाही. तू ग्वालांचा राजकुमार आहे, तू मानत आणले तर सर्वांना एकत्र करून, उद्दिष्ट साध्य करू शकतो. 

कृष्ण गोकुळात परतला. नंदबाबा, यादवांचे कुलगुरूआचार्य गर्ग व काही प्रतिष्ठित गवळ्यांसोबत इंद्रयज्ञा बाबत चर्चा करीत होते. यज्ञासाठी लागणारी सामग्रीची बद्दल गर्ग ऋषी बोलत होते. किती पोती धान, किती हंडे दूध, दही, लोणी लागणार होते याचा हिशोब होत होता. कृष्ण -विचार करू लागला. इथे गवळ्यांच्या पोरांना दूध-लोणी मिळत नाही आहे. तिकडे अग्नीत अनेक हंडे दूध-लोणी व्यर्थ जाणारआणि देवराज इंद्र प्रसन्न ही होणार नाही. कृष्णाला राहवले नाही. तो म्हणाला आचार्य क्षमा असावी, लहान तोंडी मोठा घास घेतो आहे. देवराज इंद्र आपल्या वर कधीही रुष्ट नव्हते, आपण आपल्याच कर्मांची फळे भोगत आहोत. वरुणदेव आकाशातून अमृताचा वर्षाव करतो पण पाणी साठवणारी तळी आहेत कुठे? आपल्या स्वार्थापायी आपण पर्वतांना नग्न केले, झाडे तोडली. गौवर्धन पर्वत पावसाचे पाणी आपल्या कुशीत सामावून घेण्यास असमर्थ झाला आहे. परिणाम आपल्याला पाऊस आला कि काही वेळातच गोकुळात पाणी भरते. कृष्ण म्हणाला, बाबा आपले कुरण आज ही हिरवेगार आहे. कुरणात भरपूर झाडे आहेत. सरोवरांत पाणी आहे. जारूकने त्या साठी मेहनत घेतली आहे. धरणीचे वैभव अक्षत ठेवले आहे. आज इंद्र यज्ञाची नव्हे तर गौवर्धन पर्वताला प्रसन्न करणे गरजेचे आहे. गौवर्धन पर्वताची  पूजा करून,  हिरव्या वस्त्रांनी त्याचा श्रुंगार केला तर तो निश्चित  प्रसन्न  होईल. बुजलेली सरोवरे पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे. शिवाय अनेक नवीन सरोवरांच्या निर्मितीची. प्रसन्न झालेला गौवर्धन पर्वत अग्नी,वायु आणि वरुण या तिन्ही शक्तींचा नियंत्रक देवराज इंद्रच्या क्रोधापासून ग्वालपालांचे निश्चित रक्षण करेल. आज वृन्दावानाच्या धरतीला तिचे वैभव परत करण्याची गरज आहे. त्याकरता आपण सर्वाना  कठोर परिश्रम करावे लागेल. चमत्कार कधी होत नसतो. तो आपल्या पुरुषार्थाने घडवायचा असतो. 

तिथे असलेल्या अनेक ग्वालांनी कृष्णाचे समर्थन केले.  आचार्य गर्ग म्हणाले कृष्णा मला हि तुझे म्हणणे पटते. नंदबाबाला हि कृष्णाचे म्हणणे पटले. सभेत सर्वांनी ब्रज मंडळात सरोवरांचा निर्माण, नदी काठी व गोवर्धन सहित सर्व उजाड टेकड्यांवर वृक्ष  लावण्याचा संकल्प घेतला.  

दवंडी पिटली. सर्व गवळी एकत्र झाले. जुन्या सरोवरांचा पुन:उद्धार, नवीन  कुठे सरोवर बांधायचे, यावर चर्चा झाली व सर्वानुमतीने स्थळे निश्चित झाली.  जाणकार गवळ्यांनी कुठे कोणत्या वनस्पती आणि झाडे लावायची हे ठरविले. सर्व गवळी उत्साहाने कामाला लागले. पावसाळ्याच्या आधी काही सरोवरांना पुन:जीवित केले. पावसाळ्यात त्यांत पाणी साचले. गवळ्याचां उत्साह वाढला. 

अशीच १० दहा एक वर्षे निघून गेली.  हिरवे वस्त्रांनी नटलेला गौवर्धन पर्वत नववधू सारखा शोभून दिसत होता. कृष्णाने गौवर्धन पर्वताच्या शिखरावर उभे राहून  दूर यमुने पर्यंत पसरलेला ब्रजमंडळा कडे बघितले. एक, दोन, दहा-वीस नव्हे तर तब्बल ९९ सरोवरे ब्रजच्या गवळ्यानींं बांधून काढली होती. सर्वत्र हिरवळ दिसत होती. दूर यमुनेकाठी लावलेले कुंजवन हि दिसत होते. गायी भरपूर दूध देत होत्या. ग्वाल बाळांना भरपूर दूध व लोणी मिळत होते.  उपासमार संपली अणि समृद्धि आली.

या वर्षी अतिवृष्टी झाली, इद्राला क्रोध आला असे ब्रजच्या ग्वालांना वाटले. पण पावसाचे पाणी गौवर्धन पर्वताने आपल्या हिरव्या वस्त्रांत साठवले तर उरलेले सरोवरांनी आपल्या उदरात सामावून घेतले. नदी काठच्या कुंजवनांनी जनावरांना पुराच्या पाण्यात वाहून जाण्यापासून थांबविले.  इंद्राचा पराजय झाला व गौवर्धन पर्वताचा विजय.

यमुनेकाठचा कालसर्प वृंदावन सोडून केंव्हाच निघून गेला. आता पुनवेचा राती, यमुनेच्या काठावर, कुंज वनात कृष्णाच्या बंशीच्या तालावर गोप-गोपिकांच्या नृत्य आणि गाण्याचे बोल गुंजू लागले. 

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गावकरी मिळून अमृत तुल्य पावसाचे पाणी पुन्हा सरोवरांचा निर्माण करून साठविण्याचे कार्य करत आहे, हे पाहून आणि ऐकून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. 

टीप:

ब्रज : जिथे १० हजार गायी पाळल्या जातात. 

ब्रजमंडळात ९९ सरोवर बांधण्याची कथा, स्वर्गीय स्वामी हरीचैतन्य पुरी यांच्या मुखातून ऐकली होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य  पर्वतांना नष्ट करणाऱ्या दगड व रेत माफिया विरुद्ध लढ्यात घालविले. 

माझ्या मते ब्रजचा कृष्ण हा महाभारतातल्या कृष्णापेक्षा वेगळा होता. 

1 comment: