Saturday, September 7, 2024

आर्य म्हणजे कोण : भारतीय ग्रंथांचा संदर्भ

आर्य नावाची जाती होती आणि ते  बाहेरून भारतात आले असे इतिहासकार बिना कोणत्याही आधारावर म्हणतात. भारतीय ग्रंथांच्या अनुसार आर्य  जातीवाचक किंवा समुदायवाचक शब्द नव्हे तर मानवीय गुणांच्या आधारावर आहे. आचार विचाराने श्रेष्ठ व्यक्तीला आर्य म्हंटले आहे. आपल्यातील समस्त दुर्गुणांचा नाश करून सद् मार्गावर चालणे म्हणजे आर्य होणे. 

इन्द्रं॒ वर्ध॑न्तो अ॒प्तुर॑: कृ॒ण्वन्तो॒ विश्व॒मार्य॑म् । अ॒प॒घ्नन्तो॒ अरा॑व्णः ॥

इन्द्रं वर्धन्तो अप्तुर: कृण्वन्तो विश्वमार्यम् । अपघ्नन्तो अराव्णः ॥ (9/63/5)

या ऋचेचा सामान्य अर्थ इन्द्र अर्थात राजाने समाजात सद्गुणांचा आणि ज्ञानाचा प्रसार केला पाहिजे  आणि दुर्गुणांचा प्रसार करणार्‍यांचा नाश करून आर्य धर्माचा प्रसार केला पाहिजे.  

महाभारतात  व्यासजी म्हणतात: 

न वैर मुद्दीपयति प्रशान्त,न दर्पयासे हति नास्तिमेति।
न दुगेतोपीति करोव्य कार्य,तमार्य शीलं परमाहुरार्या।।
(उद्योग पर्व)

जे विनयशील पुरुष विनाकारण कोणाचाही हेवा करत नाहीत आणि गरीब 
असतानाही दुष्कर्म करत नाहीत त्यांना 'आर्य' म्हणतात.
 
वशिष्ठ स्मृति म्हणते 

कर्तव्यमाचरन कार्य कर्तव्यमनाचरन 
तिष्ठति प्रकृताचारे स वा आर्य इति स्मृत. 

जो सत्कर्म करतो तो करणे योग्य आहे आणि वाईट कृत्ये करत नाही जी करणे योग्य नाही आणि जो चांगल्या आचरणात स्थिर राहतो तो आर्य होय.

श्रीमद् भगवत गीतेत  स्वयं भगवान कृष्ण म्हणतात: 
अभ्यासाद धार्यते विद्या कुले शीलेन धार्यते ।
गुणेन जायते त्वार्य, कोपो नेत्रेण गम्यते ।।(अध्याय ५ श्लोक ८)

ज्ञान निरंतर अभ्यासाने प्राप्त होते, गुण, कृती, स्वभाव यांनी स्थिर होते, आर्य-श्रेष्ठ मानवी गुणांनी ओळखले जाते.


No comments:

Post a Comment