ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत
'पोरींच्या
आईच्या दरबारी किती आहे, हे
हि कळले. गुपचूप माँ
साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली.
चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा
आनंद काही औरच असतो. पंतप्रधान मोदी साहेबांनी तर चाय
पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी लोक चाय पे चर्चा करतात.
नुकताच अशोक नगर, मध्यप्रदेशला, एक नातलगाला भेटायला गेलो होतो. एक तरुण वयाचा ओळखीचा युवक सकाळी-सकाळी घरी आला. नमस्ते आणि हात मिळवणी झाली. आपको कोई एतराज ना हो तो "भाई साब सुबह का चाय व नाश्ता
हमारे घर हो जाय". त्याने आग्रहाचे निमंत्रण दिले. आमची स्वारी त्याच्या घरी जाऊन पोहचले.
दिवाणखाना मोठा व प्रशस्त होता. सोफ्यावर बसल्यावर समोर भिंती
वर लक्ष गेल. भारत
मातेचे मोठे चित्र आणि चित्राच्या चारी बाजूला, भगतसिंग, नेताजी, गुरुजी आणि डॉक्टर साहेबांचे चित्र होते. मनात विचार आला, आयला, देशभक्त, राष्ट्रवादी स्वदेशी परिवार दिसतो. माझे लक्ष्य चित्रांकडे
आहे, हे पाहून
तो म्हणाला, हमारे पिताजी संघ कि शाखा में जाते थे. मै भी बचपन में जाता था.
थोड्यावेळात बिन कांद्याचे पोहे समोर आले, (कांदे नसले तरी लाल सुर्ख अनारदाणे
पोह्यांवर पसरविले होते). सोबत
गायीच्या तुपात परतलेला, खोबर, बदाम घातलेला कणकीचा शिरा. घरगुती चर्चा सुरु झाली अर्थात मी कुठे आणि काय काम करतो. तो इंजिनिअर होता, इत्यादी. गप्पांसोबत पोहे आणि शिरा पोटात रिचविला, नंतर गरमागरम आले कडक चहा आला. आता खरी चाय पे चर्चेला सुरवात झाली.
अस्मादिकांचे डोक्याचे सर्व केसं पांढरे झालेले आहे.
(वय हि ५८ वर्षांचे आहें). आजकाल महिन्यातून एकदा नाव्हयाकडे जाऊन केसं बारीक कापून
घेतो. कधी सौ.ने टोका-टाकी
केली तरच डोक्याला तेल लावतो. त्या
तरुणाने डोक्यावरच्या हळू
हळू मैदान सोडणाऱ्या पांढर्याशुभ्र केसांकडे पाहत विचारले, भाई साब आप कौनसा तेल लगाते हो? आता काय उत्तर देणार. अश्यावेळी मेजबानला रुचेल असे उत्तर देणे योग्य. स्वदेशी आणि देशभक्त परिवार पाहता, उत्तर दिले आजकाल पतंजलीचे आवळ्याचे तेल डोक्स्यावर
लावतो. उत्तर ऐकताच त्याच्या अंगात काही तरी संचारले, आवाज चढवून म्हणाला, रामदेव! तो मर्कट उड्या मारून आणि विक्षिप्त
हावभाव करून कचरा लोकांना विकतो. माहित आहे त्याच्या विरुद्ध कित्येक मुकदमें सुरु
आहेत. शिकलेले
आहात ना तुम्ही, मग असले प्रोडक्ट का वापरतात? त्याचे बोलणे ऐकून मी अक्षरश: हादरलोच. पुन्हा समोर भिंती वर भारतमातेच्या फोटू कडे लक्ष गेले आणि या वेळी एका कोपर्यात टेबलावर
सजवून ठेवलेल्या एमवे प्रोडक्ट्स
कडे हि. मनात
म्हणालो आई माफ करा, पिढी बदलली आहे आणि स्वदेशीची परिभाषा
हि....
आता चहावर इतक्या
प्रेमाने का बोलविले आहे
हे कळले. त्याने एक एक करून एमवे प्रोडक्ट्सची
ओळख करून द्यायला सुरुवात
केली. एमवेचे
प्रोडक्ट्स उत्तम दर्जाचे, वनस्पती
आणि natural पदार्थांपासून
बनविलेले असतात. कंपनी सरळ ग्राहकांना वस्तू विकते. stockist, थोक
व्यापारी, दुकानदार
इत्यादि लोकांना दिले
जाणारे कमिशन टप्प्या टप्यावर एमवेच्या सदस्यांना दिले जाते.(त्यात किती तरी if आणि buts होते, हे वेगळे) एमवे विज्ञापन वर खर्च करीत नाही
(हे वेगळे,एमवे द्वारा विकल्या जाणार्या सर्व अमेरिकन
कंपन्याचे विज्ञापन टीवी
वर येतात). लाखो
कमविण्याचे स्वप्न हि रंगविले.
थोडक्यात त्याच्या म्हणण्याचा सारांश - पैसा कमविण्याचा विचार नसला तरी किमान उत्तम दर्ज्याचे एमवे प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. हे सर्व ऐकताना माझ्या मनात विचार
आला एक तर अमेरिकन कंपनी, ती
हि विभिन्न अमेरिकन प्रोडक्ट्सची मार्केटिंग करते. (त्या कंपन्याचा लाभांश, एमवेचा लाभांश, सदस्यांना कमिशन (३०-४० टक्के). १०
रुपयाची वस्तू १०० शंभर
रुपयांना निश्चित विकावी लागत असेल.
हा विचार मनात सुरुअसताना तो म्हणाला भाई साब, लगेच आपण सदस्य बना हे मी म्हणत नाही, किमान शेम्पू, शेविंग क्रीम, साबण इत्यादी आपण वापरू शकतात. आपल्याला रुचले तरच आपण
सदस्य बनू शकतात. एमवे
आंवला तेलाची बाटली हातात घेत म्हणाला, हे शुद्ध आवळ्याचे तेल वापरून बघा, केस गळणे बंद होईल. याची किंमत हि पतंजलीच्या तेला एवढीच
आहे अर्थात २००ml, ८० रुपये. मनात शंका आली एवढे कमिशन हे देतात, मग तेलात आवळा असेल का? मी विचारले तुमच्या या तेलात आहे तरी
काय? त्याने बाटलीवर
लिहिलेली बारीक अक्षरे वाचायला सुरुवात केली, वेजिटेबल ऑइल ( तीळ, खोबर्याचे, ओलिव ऑइल असते तर त्यांची नावे निश्चित दिली असती, बहुतेक सर्वात स्वस्त मिळणारे
.... तेल असावे), मिनिरल
तेल आणि आवळा बियांची सुगंध... तो वाचता- वाचता थबकला. त्याच्या चेहरा काळवंडला, बहुतेक त्याने पहिल्यांदाच प्रोडक्टची माहिती वाचली
असेल. माझ्या चेहऱ्यावर हळूच एक राक्षसी हास्य झळकले, मी म्हणालो, कोई बात नहीं, आखिर इतना कमीशन देने के बाद वो आंवला ऑइल के नाम पर कचरा हि परोस सकते हैं. घरी परत येताना, एक नुकत्याच उघडलेल्या पतंजलिच्या दुकानात तो मला घेऊन गेला. उद्देश्य पतंजली
प्रोडक्ट्सचा दर्जा तपासणे, ते
हि निकृष्ट निघाले असते
तर त्याचे मानसिक
समाधान झाले असते. दुकानात येऊन त्याने आंवला ऑइलच्या बाटली वर लिहिलेले वाचले. (त्यात ओलिव ऑइल, तिळाचे तेल आणि आवळ्याचे तेलाचे मिश्रण होते). निश्चितच पतंजलीच्या आवळ्याच्या
तेलाचा दर्जा कित्येक पट जास्त होता. मासा
गळाला लागण्या एवजी इथे नावच उलटली होती. त्याला चर्चेचा योग्य परिणाम साधता आला नाही. चहा आणि पोह्यांचे
'विज्ञापन' फुकट गेले.
मनात एकच विचार आला, आपल्या
देश्यात सुशिक्षित
उच्च वर्ग, बिना विचार
करता निकृष्ट दर्जाच्या विदेशी वस्तू विकत घेतो किंवा कितीतरी पट जास्त किंमत मोजतो. गाजराच्या अमिषाला बळी पडून साध प्रोडक्ट्स वर लिहिलेले
हि लोक वाचत नाही. आता तर अशोकनगर सारख्या मागासलेल्या भागातले लोक हि विदेशी वस्तू
वापरण्यात स्वत:ला धन्य मानू
लागले आहे. दीड
रुपयात मिळणाऱ्या रासायनिक द्रव्यांपासून बनलेल्या शेम्पू साठी
७ रुपये हि आनंदाने मोजतात. (हे वेगळे देशी
हर्बल शेम्पू २ रुपयातच मिळते, ज्याने
किमान नुकसान तरी होणार नाही).असो.