Monday, September 1, 2025

कालिदास आणि आजचा ययाती

 

निरीक्षर आणि मूर्ख कालिदास एका झाडाच्या फांदीवर बसून त्याच झाडाला आपल्या कुल्हाडीने तोडत होता. एका ऋषीने ते दृश्य पाहिले. तो कालिदासला म्हणाला, मूर्ख ज्या क्षणी झाड तुटेल त्याच क्षणी तू ही खाली पडेल. कदाचित, झाडासोबत तू ही मरणार. कालिदासला ऋषींचे म्हणणे पटले, तो झाडावरून खाली उतरला. कालिदास पुढे मोठा विद्वान लेखक झाला. कालिदासने त्याच्या साहित्यात मानवाचे पशू पक्षी, प्राणी आणि  झाडे फुले यांच्या प्रेमाचे वर्णन केले आहे. प्रकृतीच्या सुंदरतेचे वर्णन केले आहे. 

आजच्या ययातिला पृथ्वीवरच स्वर्ग सुख भोगायचे आहे. त्याने राहण्यासाठी सीमेंट कांक्रीटचे घर बांधले. घरातील सर्व फर्निचर, कपाटे, इत्यादींसाठी लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले. त्याच्या घरातील एसी, मायक्रोवेव, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, कंप्यूटर इत्यादि सर्व विजेवर चालणारे होते. पेट्रोल वर चालणारी कार ही घरात होती. ययाति स्वतला सर्व शक्तिमान समजतो. फक्त शिकारीसाठी त्यांनी जंगलातील प्राण्यांचा शिकार केला. पृथ्वीवरून पशू-पक्षी आणि इतर प्राणी नाहीसे होऊ लागले.   

त्याने स्वतचे लाड पुरविण्यासाठी जंगल स्वच्छ करून, धरतीला खोदून, तिला जखमी करून मोठ्या प्रमाणात खनिजे बाहेर काढली. वीज निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणावर कोळसा काढला, कार चालविण्यासाठी  पेट्रोल ही पृथ्वीच्या रक्तातून काढले. त्यामुळे पृथ्वीवरील वायु प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झाले. प्रदूषणामुळे सर्वत्र रोगराई पसरली. आज ययातिला स्वर्ग सुखाएवजी नरक यातना भोगाव्या लागत आहे. ययाति ऋषींना शरण गेला. ऋषि म्हणाले, ययाति, तुला नरक यातनेतून मुक्ति पाहिजे असेल तर, पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचा, पशू पक्षी, वनस्पति, झाडे सर्वांच्या जगण्याचा अधिकार स्वीकार कर. धरतीचे रक्त पिणे आणि तिला जखमी करणे बंद कर. त्याशिवाय तुला नरक यातनेतून मुक्ति मिळणार नाही. 

प्रश्न एकच. ययाति ऋषींचे ऐकणार का? स्वर्गसुखाच्या लालसेने नरक यातना भोगत राहणार. 


* ययाति प्राचीन महाकाव्य महाभारतातील एक राजा ज्याला जिवंतपणे स्वर्ग सुख भोगायचे होते. त्याच्या इच्छा कधी न संपणार्‍या होत्या. अखेर त्याला सत्याचा साक्षात्कार झाला. त्याने सर्व संसारीक भोगांच्या त्याग करून संन्यास घेतला.