Saturday, July 24, 2021

यजुर्वेद : राष्ट्र उन्नतीचा मार्ग

 

आ ब्रह्यन्‌ ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्‌ आ राष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति व्याधी महारथो जायताम्‌ दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः परंध्रिर्योषा जिष्णू रथेष्ठाः सभेयो युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्‌ योगक्षेमो नः कल्पताम्. (युजुर्वेद २२/२२) (ऋषी: प्रजापति: देवता - लिंगोक्ता)


राष्ट्राच्या उन्नतीसाठी काय आवश्यक आहे, हे या मंत्रात सांगितले आहे. 


१. उत्तम  शिक्षण व्यवस्था 


आ ब्रह्यन्‌ ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्‌ : ऋषी प्रार्थना करतो राष्ट्राच्या उन्नती साठी ब्र्म्हतेज युक्त ब्राम्हण अर्थात उत्तम कोटीचे शिक्षित  विद्वान  देशात उत्पन्न झाले पाहिजे.   

 

पूर्वी देशात शेकडो मोठे गुरुकुल होते आणि प्रत्येक गावातहि प्राथमिक शिक्षण देणारे लाखो गुरुकुल होते. चार-पाच वर्ष स्थानीय भाषा आणि गणित इत्यादीचे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या १३व्या वर्षापासून अधिकांश विद्यार्थी कौशल्य आधारित शिक्षण घ्यायचे. बाकी काहीच हुशार विद्यार्थी व्याकरण, दर्शन, वैद्यकीय शिक्षण इत्यादी. यावेळी देशातील सर्वच प्रजा शिक्षित होती, सुखी आणि समृद्ध होती. विदेशी आक्रांतानी देशातील मोठे गुरुकुल नष्ट केले तरीही १८५० सालीहि देशात ६ लाख गुरुकुल होते. मोठ्या प्रमाणात मुले आणि मुली तिथे शिक्षण घ्यायच्या. जगात सर्वात जास्त साक्षरता  त्यावेळी आपल्या देशात होती. ब्रिटीशांनी गुरुकुलांना नष्ट केले त्यांची आर्थिक नाळ तोडली. गुरुकुल बंद केली पण तसेच शिक्षण देणाऱ्या ६ लाख शाळा काही उघडल्या नाही. कारण त्यांना फक्त चाकर हवे होते, कुशल आणि आत्मनिर्भर प्रजा  नाही. भारत त्यांच्या साठी बाजार होता. देशाला स्वतंत्रता मिळाली पण मानसिक रूपेण गुलाम काळ्या अन्ग्रेजांचे राज्य आले. फक्त साक्षरता वाढविणे आणि कागदी शिक्षित तैयार करणारी शिक्षण व्यवस्था देशात आली. व्होट बँकमुळे आजहि परिस्थिती आहे कि पहिलीत प्रवेश घ्या, वाचता नाही आले तरी वयाच्या १८व्या वर्षी १२वी पासची डिग्री मिळेल. लिहिता नाही आले तरी तुम्ही स्नातक व्हाल. आजच्या शिक्षण व्यवस्थेने  तैयार केलेले कोट्यावधी अकुशल तरुण राष्ट्रावर भार समानच आहे असे म्हणता येईल. हे तरुण राष्ट्राच्या उन्नतीसाठी हातभार लाऊ शकत नाही. यांच्या उपयोग समाज विरोधी कार्यांसाठी शत्रू राष्ट्र करतात, हे आपण पाहतोच आहोत.  


नुकतीच घोषित केलेल्या नवीन शिक्षानीतीत ८वी नंतर विद्यार्थांना विषय घेण्याची स्वतंत्रता देण्यात आली आहे. पण एवढ्याने कार्य भागणार नाही. ८वी पास झाल्यानंतर किमान ८० टक्के विद्यार्थी कौशल्य शिक्षण घेणारे असले पाहिजे. आज भारतीय शिक्षा बोर्डालाहि  सरकारने मान्यता दिली आहे जिथे वैदिक आणि आधुनिक दोन्ही शिक्षण दिले जातील. काही वर्षातच आपल्याला चांगला परिणाम मिळेल आणि देशात पूर्वी सारखेच शिक्षित आणि विद्वान नागरिक मिळतील हि आशा. 


२. उत्तम सुरक्षा व्यवस्था: 


आराष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति व्याधी महारथो जायताम्‌: राष्ट्राच्या सुरक्षेसाठी नेमबाजीत प्रवीण धनुर्धर आणि सर्व प्रकारच्या अस्त्र-शस्त्र निपुण शूरवीर आवश्यक आहे. आजच्या संदर्भात आपले सैन्य अत्याधुनिक अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित असेल तरच ते राष्ट्राची सुरक्षा करू शकेल. राष्ट्र सुरक्षित हातात असेल तर प्रजा सुखी आणि संपन्न राहील. भारतीय राजांनी राष्ट्राच्या सुरक्षेवर लक्ष दिले नाही त्यामुळे ते पराजित झाले, हे ऐतिहासिक सत्य आहे. 


भारताला स्वतंत्रता मिळाली. द्वितीय जागतिक युद्धात भाग घेणारे कुशल सैन्य भारताला मिळाले. पण त्यावेळच्या स्वप्नील राजनेत्याला शक्तिशाली सैन्याची गरज वाटत नव्हती. देशात शस्त्र उद्योग उभा करणे, सैन्याला नवीन आधुनिक अस्त्र-शस्त्र  पुरविण्याचे कार्य केले नाही.  परिणाम अर्धा काश्मीर हातातून गेला, तिबेट वर चीन ने अधिकार केला. १९६२च्या युद्धात दारूण पराजय पत्करावा लागला. त्यानंतर परदेशातून अस्त्र-शस्त्र विकत घेऊन पाकिस्तान आधारित सुरक्षानीती तैयार झाली. पण चीन कडे दुर्लक्ष केले. हातातून गेलेला भाग परत मिळविण्याचा प्रयत्न केला नाही.


आज सुरक्षे संबंधी धोरण बदलले आहे. आधुनिक अस्त्र- शस्त्रांच्या बाबतीत देशाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न होत आहे. शस्त्रूच्या मनात भीती निर्माण होईल, असे सैन्य अजून तैयार झालेले नाही. काही वर्षांत चित्र बदलेल हि अपेक्षा. 


३.  गाय  आणि वाहतुकीच्या  साधनाचे महत्व: 


दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः गाय, बैल, घोडा गाडी इत्यादिंची कमतरता नसावी. आपला देश गावांत राहतो. आजहि गाय ग्रामीण अर्थव्यवस्थेची धुरी आहे. दूध, दही, ताक, लोणी गायींपासून मिळते. या शिवाय कृषी साठी, खत, जाळण्यासाठी गोवर्या किंवा गोबर गॅस मिळते. गोमूत्रापासून कीट नाशक, गोनायाल, साबण  आणि अनेक औषधीहि बनतात. बैलांचा उपयोग शेतीत होतो. आपल्या देशात शेतकर्यांजवळ शेत जमीन कमी असल्याने शेतीसाठी गाय-बैलांचे महत्व जास्त. 


पूर्वी देश/ विदेशांत आपल्या देशातील शेतमाल आणि इतर सामग्री विकण्यासाठी बैलगाडी, घोडा-गाडी, नौका  इत्यादी वाहतुकीसाठी वापरले जात होते. उत्तम आणि सुरक्षित रस्त्यांमुळे आपला व्यापार युरोप, आफ्रिका  ते दक्षिण पूर्वी एशिया पर्यंत होता.  


आज  बसेस, मेट्रो, ट्रक आणि आगगाडी, विमान, मोठे मोठे समुद्री जहाज  इत्यादींचा वापर वाहतुकीसाठी होतो. स्वतन्त्रता प्राप्ती नंतर सर्वात जास्त दुर्लक्ष वाहतुकीच्या साधनांकडे केल्या गेले. द्वितीय विश्वयुद्ध संपल्यावर अधिकांश देशांनी मग ते जापान, दक्षिण कोरिया असो, किंवा अमेरिका युरोप, मोठे महामार्ग बांधण्यावर, विमान उद्योग आणि जहाज उद्योगावर  सर्वांत जास्त जोर दिला. पण आपण दुर्लक्ष केले म्हणा किंवा फार थोडे बजेट यासाठी दिले. असो. 


आज देशात मोठ्या प्रमाणांवर महामार्गांची निर्मिती होत आहे, मोठे-मोठे विमानतळहि बांधले जात आहे. रेल्वेचा पूर्णपणे कायाकल्प होत आहे. नवीन नदी आणि समुद्री मार्ग निर्मितीचा प्रयत्न हि होत आहे. वाहतुकीच्या ह्या साधनांमुळे आज देश-विदेशातून आलेले उद्योजक आपल्ल्या देशात वस्तू निर्माण करण्याचे उद्योग लाऊ लागले आहे. भविष्यात देशाचा व्यापार वाढेल आणि शेतकरी सहित देशाचे नागरिक समृद्ध होतील हि आशा. 


४. शिक्षित स्वावलंबी स्त्री 


परंध्रिर्योषा: दुर्ग, नगर आणि घर संचालन करण्यात सक्षम स्त्री: राष्ट्राच्या उन्नतीसाठी स्त्री शिक्षित, बुद्धिमान, सुचरित आणि वेळ पडल्यास नगर आणि दुर्गच्या रक्षणास समर्थ असावी. वैदिक काळात सूर्या, घोषा, शची, अथर्वा, इत्यादी बुद्धिमान स्त्रिया होत्या. तर मुद्गलांनी सारख्या इंद्र सेनेच्या सेनापतीहि होत्या. मध्य युगातहि अहिल्या, चेन्नमा, दुर्गावती, राणी लक्ष्मीबाई इत्यादी महान योद्धा स्त्रिया होत्या. 


मध्य काळात समाज स्त्रीला सुरक्षा देण्यास असमर्थ ठरला. स्त्रीचे घराबाहेर निघणे देशातील अधिकांश भागात बंद झाले. साहजिक याचा परिणाम स्त्री शिक्षणावर झाला. पुरुषांच्या तुलनेत कमी स्त्रिया शिक्षण घेत होत्या त्याही अधिकांश दक्षिण भारतात किंवा उत्तरेत  संपन्न घराण्यातील स्त्रिया. स्वतंत्रता प्राप्ती नंतर सरकारने स्त्री शिक्षणावर जोर दिला. पण मुळातच शिक्षण फक्त चाकर निर्मितीसाठी असल्याने कुणालाही त्याचा जास्त फायदा झाला नाही. सुशिक्षित आणि स्वावलंबी स्त्रीच्या निर्मितीत आजहि देश काही प्रमाणातच सफल झाला आहे. आज देशात अधिकांश भागात शांती आणि सुरक्षा आहे. शिक्षण व्यवस्थेतहि बदल होत आहे, त्यामुळे भविष्यात स्त्री अधिक शिक्षित आणि स्वावलंबी होईल हि आशा ठेऊ शकतो. आज सैन्यात स्त्रीला दरवाजे खुले झाले आहे. भविष्यात स्त्रियाहि रणांगणावर पराक्रम गाजवतील हि आशा. तेंव्हा खर्या अर्थाने स्त्रिया पुरंधि: घोषा ठरतील.   


५.  अनकूल वर्षा


निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्‌ योगक्षेमो नः कल्पताम्.राष्ट्रात अतिवृष्टी आणि अनावृष्टी झाली नाही पाहिजे. वर्षां शेतकर्याला अनकूल पाहिजे, ज्यामुळे शेतात धान्य, भाजी-पाला फळे आणि औषधी प्रचुर मात्रात उत्पन्न होतील. जेणे करून राष्ट्राची प्रजा  सुखी आणि संपन्न होईल.


वैदिक काळात पर्यावरणाला अनन्य महत्व होते. अरण्य  आणि वृक्षांच्या सुरक्षेसाठी  अरण्य, वृक्ष  इत्यादींना देवत्व प्रदान केले. त्यांची सुरक्षा केली. मोठ्या प्रमाणावर तलाव निर्मिती आणि त्यांची सुरक्षा यावर जोर दिला गेला. तलाव, सरोवर इत्यादिंना तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. त्यामुळे वर्षा शेतकर्यांसाठी अनकूल राहत होती.  


आज आपण अधिकांश जंगलांचा विनाश केला. चुकीच्या सरकारी नियमांमुळे अधिकांश प्रजेने घरात आणि शेतात झाले लावणे सोडून दिले. उपभोगासाठी जमिनीतून काढलेले हलाहल आणि खनिज इत्यादी आपण जास्त प्रमाणात वापरू लागलो, ते परत जमिनीला परत करणे आपल्याला शक्य नाही. परिणाम पृथ्वीचे तापमान वाढू लागले. माझ्या दिल्लीचे म्हणाल तर गेल्या २०-२५ वर्षांपासून पावसाळ्यातहि दहा-दहा दिवस पाऊस पडत नाही. पण ज्या दिवशी पडतो भयंकर पडतो. हेच बहुतेक देशात सर्वत्र घडत आहे. अतिवृष्टी आणि अनावृष्टीच्या दुष: चक्रात आज देश सापडलेला आहे. सध्या तरी देशात अन्न-धान्याची कमतरता नाही पण असेच चालत राहिले तर भविष्यात अन्न-धान्याची कमतरता देशात नव्हे पूर्ण जगात होईल. ज्या राष्ट्रात अन्न-धान्याची कमतरता असते त्या राष्ट्रात अराजकता पसरायला वेळ लागत नाही. पर्यावरण सुरक्षेसाठी सरकार कठोर पावले उचलली पाहिजे. प्रजेला सुखी आणि समृद्ध जीवन जगायची इच्छा असेल तर प्रजेने हि या कार्यात हातभार लावला पाहिजे. 


६. राष्ट्राचे अभीष्टचिंतन हेच युवांचे (नागरिक)  कर्तव्य


जिष्णू रथेष्ठाः सभेयो युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां : राष्ट्र निर्माण हि एक यज्ञ आहे. राष्ट्रातील  यज्ञकर्तांचे (नागरिकांचे) पुत्र विजयी, रथारोही, सभ्य अर्थात सभेत बसण्याची योग्यता असणारे पाहिजे. 


देशाच्या विकासात युवा पिढीचे महत्व अनन्य असते. भारत एक युवा  देश आहे. आपली  युवा पिढी शिक्षित, वीर, सभ्य असेल तर सहजच सुखी समृद्ध राष्ट्राची निर्मिती आपण करू शकू. तरुणांना आत्मनिर्भर करणारी शिक्षा प्रणाली, चांगले संस्कार देणारी स्त्री, अन्न-धान्यात आत्मनिर्भरता आणि सुरक्षा व्यवस्था सदृढ असेल तर  भविष्याची युवा पिढी सभ्य, शिक्षित आणि आत्मनिर्भर होईल. राष्ट्र सुखी आणि समृद्ध होईल. 


आर्य समाज फेसबुक वरून या मंत्राचा हिंदी अनुवाद.  अर्थात राष्ट्र गान:  


ब्रह्मन् ! स्वराष्ट्र में हों, द्विज ब्रह्म तेजधारी |
क्षत्रिय महारथी हों, अरिदल विनाशकारी ||
होवें दुधारू गौएँ, पशु अश्व आशुवाही |
आधार राष्ट्र की हों, नारी सुभग सदा ही ||
बलवान सभ्य योद्धा, यजमान पुत्र होवें |
इच्छानुसार वर्षें, पर्जन्य ताप धोवें ||
फल-फूल से लदी हों, औषध अमोघ सारी |
हों योग-क्षेमकारी, स्वाधीनता हमारी ll

 

No comments:

Post a Comment