ऋग्वेदाला आपण चिकित्साशास्त्रचा पहिला ग्रंथ म्हणू शकतो. यात प्राण चिकित्सा आहे. आजारी व्यक्ती प्राणांशी सख्य करून रोगमुक्त होऊ शकतो याचे वर्णन ऋचांमध्ये आहे. माणूस आजारी का पडतो याचे मुख्य कारण खालील ऋचेत दिले आहे.
वृत्रस्य त्वा श्वसथादीषमाणा विश्वे देवा अजहुर्ये सखायः ।
मरुद्भिरिन्द्र सख्यं ते अस्त्वथेमा विश्वाः पृतना जयासि ॥
(ऋग्वेद ८.९६.७)
विश्वे देवा अर्थात दिव्य गुण - दया, क्षमा, दम, शौच, इंद्रिय संयम, अहिंसा, विद्या, धैर्य इत्यादी जे आधी मित्र होते ते वृत्राच्या पापाने अर्थात पापाच्या श्वासाने माणसाला सोडून जातात. प्राणहि पापांनी आच्छादित शरीराला सोडून जातो. हे इंद्र अर्थात इंद्रियांचा स्वामी मनुष्य प्राणांशी मैत्री जोड, वृत्राला पराजित करण्यासाठी.
अधिकांश लोक निरोगी शरीर धारण करून जन्माला येतात. आपले शरीर हे आत्म्याचे निवासस्थान आहे. जो पर्यंत हे शरीर निरोगी आहे, आत्मा शरीरात निवास करते. रोगग्रस्त शरीराला आत्मा सोडून जातो. यालाच आपण मृत्यू म्हणतो.
जो माणूस मोह, माया, मद, मत्सर आणि अहंकार इत्यादीने ग्रसित आहे. ज्याचे इंद्रियांवर नियंत्रण नाही, आळशी, निद्रेच्या स्वाधीन, शरीरासाठी नव्हे तर इंद्रिय तृप्तीसाठी आहार घेणारा, क्रोध करणारा, असंयमी, दिवसा झोपणारा, रात्री जागणारा, इत्यादी दुर्गुणांचा अधीन व्यक्ती आजारी पडतो. या ऋचेत ऋषी प्रार्थना करतो, हे, इंद्र प्राणांशी सख्य केले तरच, चारी बाजूंनी शरीराला आच्छादित केलेले पापांचे आवरण नष्ट करता येईल, अर्थात वृत्राला नष्ट करता येईल.
आता प्राणांशी मैत्री कशी करायची हा प्रश्न मनात येणारच. खलील ऋचेत ऋषी म्हणतात:
द्वाविमौ वातौ वात आ सिन्धोरा परावत: l
वक्षं ते अन्य आवातु पराऽन्यो वातु यद्र्प ll
(ऋ. १०.१३७.२)
आ वात वाहि भेषजं वि वात वाहि यद्रप l
त्वं हि विश्व भेषजो देवानां दूत ईयसे ll
(ऋ. १०.१३७.३)
माणसाच्या शरीरात अब्जावधी कोशिका आहेत. प्रत्येक कोशिकेला जगण्यासाठी प्राणवायू पाहिजे. जर ती योग्य मात्रेत मिळाली नाही तर कोशिका नष्ट होतात. असेच चालत राहिले तर माणूस रोगग्रस्त होतो. ऋषी म्हणतो, आपल्या शरीरात श्वास आणि निश्वास रुपी दोन वायू आहेत. एक वायू वातावरणात आहे जी श्वासांद्वारे आपण आत घेतो. ती आपल्या शरीरात प्रत्येक कोशिका पर्यंत पोहचते या वायुला प्राणवायूहि म्हणतात. प्राणवायू आरोग्य, जीवनशक्ती, बल आणि उत्साह प्रदान करते. दुसरी वायू आपल्या शरीरातून समस्त दोष बाहेर काढून आपल्याला रोगमुक्त करते.
ऋषी पुढे म्हणतो, प्राणवायू औषधी आहे. प्राणवायू वायू आपल्या संपूर्ण शरीरात प्रवाहमान राहते. प्राणवायूहि संपूर्ण चिकित्सा पद्धती आहे जी भौतिक शरीराला तर निरोगी करते याशिवाय भावनात्मक रूपेण शरीरालाहि सदृढ करते. प्राणवायू देवतांची दूत आहे.
विभिन्न प्रकारचे प्राणायाम उदा. अनुलोम-विलोम, भस्रिका, कपालभाती इत्यादी करून आपण प्राणांशी सख्य स्थापित करू शकतो.
करोना विषाणू फुफ्फुसांना संक्रमित करतो. रुग्णांना श्वास घेणे शक्य होत नाही. त्यांच्या शरीरात प्राणवायूचे स्तर कमी होऊ लागते. अनेकदा कृत्रिमरित्या प्राणवायू देण्याचे प्रयत्न सफल होत नाही. परिणाम लाखोंच्या संख्येने रुग्ण दगावले. जर या रुग्णांनी प्राणाशी सख्य केले असते तर ते सर्व आज जिवंत असते.
हे सर्व सिद्धांतिक झाले. प्रत्यक्ष पुरावा आहे का? हा प्रश्न येणारच. करोना पसरण्यात सुरवात झाली होती तेंव्हाच स्वामी रामदेव यांनी देशातील जनतेला प्राणांशी सख्य करायची प्रेरणा दिली. इंडिया टीव्ही वर रोज सकाळी आठ वाजता प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्याची सुरवातहि केली. देशातील कोट्यावधी लोकांनी त्यांचे अनुसरण केले. प्राणांशी सख्य करण्यासाठी प्राणायाम करणे सुरु केले. ते सर्व लोक करोना काळात जिवंत राहिले. प्रत्यक्ष प्रमाण- पतंजलि योगपीठ येथील पतंजलि गुरुकुलमहि शाळा एक हि दिवस बंद झाली नाही. आचार्यकुलंहि शाळा फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बंद झाली. पाच हजार लोक तिथे नेहमी असतात. तिथे एकालाही करोना झाला नाही. त्यांचे हरिद्वार येथील योगग्राम जिथे १००० रुग्ण एक आठवडा ते पंधरा दिवस उपचार घेतात. तिथे एकालाही करोना झाला नाही. तेही गेल्या ऑक्टोबर पासून सुरु आहे. कारण एकच प्राणाशी सख्य.
गेल्या एप्रिल महिन्यात करोना आजार भयंकर रीतीने देशात सर्वत्र पसरला. देशात प्राणवायूचा तुटवडा पडला. दिल्ली भारताची राजधानी पण इथेही सर्व हॉस्पिटल भरलेले होते. ८० टक्के रुग्णांना घरात राहून उपचार घ्यावा लागला. अश्या वेळी लाखो रुग्णांनी प्राणायामची मदत घेतली आणि करोना पासून स्वत:चे रक्षण केले. त्यात एक मीही आहे.
बाकी आपल्या देशाचे दुर्भाग्य ज्या व्यक्तीचा गौरव व्हायला पाहिजे त्याच्या विरुद्ध कोर्ट केसेस दर्ज होतात. प्राणांशी सख्य करण्याचा सल्ला देणार्या स्वामी रामदेव विरुद्ध देशात प्रबळ झालेले दस्यू अर्थात मेडिकल माफिया(आयएमए) स्वामी रामदेव विरुद्ध शेकडो केसेस टाकतात. बहुतेक त्यांच्या एकच उदेष्य आहे, रुग्णांचा खिसा रिकामा करणें मग त्यात रुग्ण दगावले तरी चालेल. अश्या वेळी फ्रीची प्राणवायू रुग्णांचा प्राण वाचवेल तर त्यांचा धंधा बुडणार. बाकी केसेस टाकण्यासाठी लागणारा कोट्यावधी रुपय्या मेडिकल माफियाला कोण पुरवितो, हा हि एक मोठा प्रश्न आहे.
करोनाची तिसरी लहर येणार असे सर्व मेडिकल विशारद म्हणत आहे. अश्या वेळी प्राण वाचविण्यासाठी. प्राणांशी सख्य करणें गरजेचे आहे. असो.
(वैदिक ऋचांचा अर्थ: आचार्य बालकृष्ण यांच्या " वेदों की शिक्षाएँ)
No comments:
Post a Comment