Monday, July 19, 2021

उपभोग आणि पर्यावरण


पर्यावरण म्हणजे आपल्या चारी बाजूला असेलेले "जल, थल, नभ यांचे आच्छादन". जल थल नभच्या एका विशिष्ट आच्छादन मुळे मानव सहित आजच्या जीव जंतूंची निर्मिती झाली आहे. जो पर्यंत हे पर्यावरण (विशिष्ट आच्छादन) अक्षुण राहील, मनुष्य या पृथ्वीवर वास्तव्य करू शकेल. काळाच्या नियमानुसार पृथ्वीवरील पर्यावरण सतत बदलत राहते. पण हा बदल हळू- हळू होतो. काळाच्या घडीनुसार आपल्याला १०० वर्षांचे आयुष्य दिले आहे, हे जरी गृहीत धरले तरी मानव १०० वर्ष पृथ्वीवर वास्तव्य करू शकेल का? हा प्रश्न आपल्याला  सदैव सतावत राहतो.  

आपण या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी आहोत. इथल्या संसाधनांचा वापर आपण आपल्या स्वार्थासाठी करतो. त्यासाठी जीव जंतू वनस्पती सर्वांचा नाश करतो आहे. आज  अधिकांश नद्यांचे पाणी पिण्या लायक राहिले नाही, जंगल मोठ्या वेगाने नष्ट होत आहे. पृथ्वीच्या  गर्भातून काढलेल्या खनिज, खनिज तेल इत्यादी मुळे संपूर्ण अच्छादनच विषाक्त होत आहे. असेच सुरु राहिले  हे आच्छादन आपले रक्षण करू शकणार नाही. पुढे प्रश्न येतोच पृथ्वीवरील संसाधनांचा उपभोग करताना, आपण काय करावे जेणेकरून पर्यावरण अक्षुण राहील आणि आपण काळाने दिलेले पूर्ण आयुष्य जगू शकू. 

ईशान्य उपनिषद मध्ये माणसाने पृथ्वीवरील संसाधनांचा उपयोग कसा करावा  यासाठी दोन  सूत्र दिले आहे. 

१.  ज्या वस्तूचा उपभोग केला आहे, त्यात न्यूनता आली नाही पाहिजे.  

हे कसे शक्य होणार. 

२.  ज्या वस्तूचा उपभोग केला आहे, तिचा त्याग करणे, अर्थात पुन्हा परत करणे.  

पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेल्या वनस्पती, झाडे आपण पुन्हा सहज परत करू शकतो. उदा. एक झाड कापल्या वर पुन्हा दुसरे झाड लाऊन फक्त २० वर्षांत आपण तुटीची भरपाई करू शकतो. पृथ्वीच्या गर्भातून काढलेल्या वस्तू पुन्हा परत करू शकत नाही. उदा. खनिज, तेल आपण पेट्रोल डीझेलच्या स्वरूपात वापरतो. ते आपण परत करू शकत नाही.   

अनेक खनिज पदार्थ आपण पर्वतांना नष्ट करून प्राप्त करतो. त्यामुळेहि पृथ्वीची भौगोलिक संरचना बदलते. उदा. घर बांधण्यासाठी लागणारे सिमेंट आणि दगडांसाठीहि आपण मोठ्या प्रमाणात पर्वतांना नष्ट करतो. दिल्लीच्या रस्त्यांसाठी आणि घरांसाठी, १०० वर्षांपूर्वी  जी अरावली पर्वतमाला दक्षिण दिल्ली वसंतकुंज ते बदरपूर पर्यंत स्पष्ट दिसायची, आज ती पूर्णपणे नष्ट झाली आहे. यावरून एकच निष्कर्ष निघते: 

आपल्या उपभोगाच्या ज्यावस्तू आपण पुन्हा परत करू शकत नाही त्यांच्या वापर कमीत कमी केला पाहिजे.

घर बांधायचे आहे, तर सिमेंट कॉंक्रीटच्या जागी शक्यतो लाकूड, बांबू आणि मातीचा उपयोग करणे उचित. 

जेवणासाठी स्टील, पितळ, चांदीच्या भांडयाएवजी झाडांच्या पानांपासून तैयार पत्रावळींचा उपयोग करणे योग्य. 

अन्न शिजविण्यासाठी गॅस, कोळसा इत्यादी जागी सौर कुकर, गोबर गॅस, लाकूड, शेणाच्या गोवर्या इत्यादींचा वापर. (लाकूड इत्यादीची तूट आपण भरून काढू शकतो).

अंतिम संस्कारसाठी आज तरी लाकूड सर्वात योग्य. काही विद्वान लोक म्हणतात जमिनीत गाडले तर लाकडाची गरज नाही. पण कौफिन हे लाकडाचे असते. याशिवाय एकदा कब्र/ समाधी बनली कि हजार वर्ष तरी ती जागा निरपयोगी होते. त्या कालावधीत झाडांच्या १५ ते २०पिढ्या जगतील. मोठ्या प्रमाणावर वायू शुद्ध करतील. 

बाकी आपण एक तर निश्चित करू शकतो. साबण, शेम्पू, भांड्यांसाठी डीश बार, फरशी साफ करणारे फिनायाल इत्यादी ग्रीन टॅग वाले वापरू शकतो. तेवढाच आपला हातभार. 

No comments:

Post a Comment