Tuesday, July 14, 2020

करोना आणि मॅकालेचे मानसिक गुलाम


मॅकाले शिक्षणाचा एक  हेतू भारतीयांना मानसिक गुलाम बनविण्यासाठी त्यांच्यात हीन भावना भरणे होते.  एकदा माणूस आत्मग्लानी आणि हीन भावनेने ग्रस्त झाला कि त्याचे  विचार काहीशे असे होतोत "आपण अडाणी होतो, जे काही ज्ञान आहे ते ब्रिटीशांनी दिलेले आहे." आणि अश्या परिस्थितीत आपल्या परंपरागत ज्ञानाच्या आधारावर कुणी गौरवास्पद  कार्य केले तरी त्याला ते पचणार नाही.  या करोना काळात  पतंजलि निर्मित आयुर्वेदिक औषधी चाचणीत १०० टक्के  खरी उतरली आणि आंग्ल शिक्षित मानसिक गुलामांना हे पचणे कठीण झाले, याचे कारण काय. यावर विचार मांडण्या आधी पार्श्वभूमी समजणे हि आवश्यक. 

दहाव्या शताब्दी पर्यंत आयुर्वेद हे जगातील सर्वात उन्नत आरोग्य शास्त्र होते. शल्यक्रिया पासून ते शिक्षणासाठी शवांचे विच्छेदनचे कार्यहि देशातील मोठ्या गुरुकुलांमध्ये होत होते. विदेशी आक्रांतानी आपल्या ज्ञानाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यात ते सफलहि झाले. आपले दुर्भाग्य स्वतंत्रता प्राप्ती नंतरहि काळ्या मानसिक गुलामांचेच राज्य आले. आयुर्वेदाला दुर्लक्षित केल्या गेले. जिथे  एलोपथी  शिक्षणावर अब्जावधीचे अनुदान दिले जाते तिथे आयुर्वेद शिक्षणाच्या  फी वरहि निर्बंध घातले जाते. त्यामुळे कुठलेही नवीन अनुसंधान करणे आयुर्वेदीक शिक्षण संस्थांना  शक्य नाही. या मूर्खपणामुळे देशाचे अब्जावधी कोटींचे नुकसान होते, हेहि  त्यांना कळत नाही. आज जगात हर्बल मेडिसिन क्षेत्रात  चीनी औषधींना मान्यता प्राप्त आहे. लाखो कोटींचा त्यांचा व्यापार आहे. तिथल्या लाखो शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधरली आणि महागड्या औषधांचा खर्च हि वाचला. या शिवाय चीनला लाखो कोटींचे परकीय चलन हि मिळते. पण आयुर्वेदाला औषधी शास्त्र म्हणून जगात मान्यता  नाही कारण आयुर्वेदिक औषधीत प्रयुक्त होणार्या ११००च्या जवळपास वनस्पतींवर शोध कार्य अत्यंत कमी प्रमाणात  झाले आहे. सरकारने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असे म्हटले तरी गैर नाही. तसे झाले असते तर आज शेतकर्यांना काही लाख कोटी दरवर्षी भेटले असते. असो.

सन २०१६ मध्ये आयुर्वेदिक औषधींवर अनुसंधान करण्यासाठी पतंजलिने अब्जावधी खर्च करून देशातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक उन्नत यंत्रांनी सज्ज प्रयोगशाळा स्थापित केली. स्वयं प्रधानमंत्री नरेंद्र मोदिजीनी या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. आज इथे ३०० हून जास्त शास्त्राज्ञ कार्य करतात.  औषधींचे सुष्म स्तरापासून ते प्राणी आणि मानवावर प्रयोग करण्याची सुविधा इथे आहे. पतंजलि उद्योग समूहाच्या लाभांशचा अधिकांश हिस्सा या प्रयोगशाळेवर खर्च होतो. गेल्या तीन वर्षांत आयुर्वेदिक औषधींवर अनेक रिसर्च पेपर नेचर सहित अनेक मेडिकल जर्नल मध्ये प्रकशित झाले आहे. एवढेच नव्हे तर संस्कृत भाषेतहि एका रिसर्च पेपरचा सारांश प्रकाशित झाला आहे. अर्थात संस्कृत भाषेला अंतराष्ट्रीय स्तराच्या मेडिकल जर्नल मध्ये मान्यता मिळाली. हे वेगळे याबाबत मिडीयाने कधी चर्चा हि केली नाही. याचे उत्तर मिडीयाच देऊ शकते. (https://www.acharyabalkrishna.com/research/) पतंजलिचे अश्वगंधावर रिसर्च पेपर प्रकाशित होताच, अनेक आयुर्वेदिक कंपन्यांनी अश्वगंधाचे जोमाने  विज्ञापन सुरु केले. असो.

गिलोय, तुळशी, अश्वगंधा, अणु तेल आणि श्वासरी रस या औषधांचा प्रयोग पतंजलिने कोरोनाच्या रोगींवर केला. रोगी पूर्णपणे ठीक झाले. निम्स, जयपूरने या औषधींच्या आधुनिक पद्धतीने क्लिनिकल ट्रायल करण्यात रुचि दाखविली. सर्व सरकारी औपचारिकता पूर्ण करून नियमानुसार  'third party;  परीक्षण सुरु झाले. लक्षण नसलेले रोगी, कमी आणि मध्यम लक्षण असलेल्या रोगींवर हे परीक्षण झाले. इथे नमूद करणे गरजेचे उपचारासाठी येणार्या ९९ टक्के रोगींना हीच लक्षणे असतात. बाकी रोगीची प्रतिकार शक्ती कमी असेल किंवा आधुनिक औषधींचे दुष्परिणाम, रोगी दगावण्याची टक्केवारी जास्त आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या शब्दांत परीक्षणाचा प्रचार केला नाही कारण तसे केले असते तर बहुतेक ड्रग माफियाने या परीक्षणात अडथळे आणले असते.  या परीक्षणात सर्व रोगी बरे झाले. चुकीने एखादहि दगावला असता तर बहुतेक मानव वधाचा आरोप पतंजलिवर लावण्यात ड्रग माफिया आणि त्यांच्या गुलामांनी कसर सोडली नसती.  

साहजिकच मानसिक गुलामांना परीक्षणाचे निष्कर्ष पटले नाही. बहुधा त्यांना वाटत असेल आजहि आयुर्वेदिक औषधी खरल मध्ये खरडून बनतात.  अनेक अतिविद्वानाच्या मते आयुर्वेदिक औषधी म्हणजे 'आजीबाईच्या बटव्यातील औषधी', आयुर्वेदिक औषधींचा परिणाम अत्यंत हळू होतो. एवढे परिणाम कारक औषध आयुर्वेदात निर्मित होणे शक्यच नाही, इत्यादी. आमच्या औषधांच्या एक-एक गोळीची किमत हजारो रुपये आणि बाबा एवढ्या स्वस्तात औषध बाजारात आणतात आहे, काही तरी गोम आहे. आंग्लशिक्षित शहाणे बिना कुठले प्रमाण देता, बाबा फेक दावा करतात इत्यादी टंकून मोकळे झाले. हा त्यांच्या दोष नाही त्यांच्या मनात हीन भावना निर्माण करणाऱ्या  शिक्षणाचा दोष आहे. लोकांना लुटण्याच्या धंद्यावर गदा आल्यावर फेक आणि भ्रमित प्रचार पेड मिडिया करणारच. तसेही जेवढा मोठा मिडिया तेवढा जास्त खर्च आणि त्यासाठी विज्ञापनहि जास्त लागते. मध्यान्ही सूर्य दिसत असूनही त्याला रात्र म्हणणे त्यांचीहि विवशता. औषधींना बाजारात येऊ न देण्यासाठी राजकीय मदतहि घेण्यात आली. पण औषध बाजारात आलेच. या औषधी मुळे हजारो करोना रोगी रोगमुक्त होतील. अन्य औषधींच्या सेवनाने शरीरावर जे दुष्परिणाम  होतात तेहि होणार नाही.

आपण आपल्याच गौरवपूर्ण कार्याला स्वीकार करत नाही, हाच मॅकाले शिक्षणाचा परिणाम.आपल्या जवळहि ज्ञान-विज्ञान आहे, आधुनिक तंत्रांचा उपयोग करून आपणहि आपल्या  प्राचीन ज्ञानाला समृद्ध करून   जगात पुढे जाऊ शकतो ही भावना आज निर्मित करण्याची गरज आहे. बाकी सूर्याला उदित होण्यापासून कुणीच थांबवू शकत नाही.

No comments:

Post a Comment