Monday, July 6, 2020

स्वामी त्रिकालदर्शी: करोना वर चर्चा

आज  बर्याच  महिन्यांनी स्वामी त्रिकालदर्शी यांचे दर्शन घ्यायला त्यांच्या कुटीत गेलो. नेहमीप्रमाणे ते ध्यानमग्न अवस्थेत होते. कुटीत एका कोपर्यात जाऊन बसलो आणि त्यांच्या समाधीतून बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. एकदाचे त्यांनी डोळे उघडले आणि समाधीतून बाहेर आले. मी त्यांना साष्टांग प्रणाम केला. माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत स्वामीजी म्हणाले, बच्चा काय समस्या आहे. 

मी: स्वामीजी, सध्या करोनाची साथ जगात पसरलेली आहे. लाखो लोग मृत्यमुखी पडले आहे.  करोना मीटर पाहिल्यावर असे दिसते. जगात ज्या ठिकाणी स्वास्थ्य सुविधा कमी, तिथे मृत्यू दर कमी आणि जिथे जास्त तिथे मृत्यू दर जास्त. आपल्या देशातहि मुंबई, दिल्ली, अहमेदाबाद, चेन्नई सारख्या मोठ्या महानगरात मृत्यू दर जास्त आणि झारखंड, बिहार, ओडिशा, आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात कमी. काय कारण असावे?

स्वामीजी: बच्चा, करोनाच्या रोगींचा उपचार ज्या औषधींनी होतो आहे. त्या औषधींचा विपरीत परिणाम श्वसनतंत्र, हृदय, लिवर आणि किडनी वर होतो. पण बच्चा, एक लक्षात ठेव ९५ ते ९६  टक्के रोगी या औषधींमुळे बरे होतात. 

मी: स्वामीजी पण...

स्वामीजी: (पानदाणीतून विडा काढत), बच्चा पान खाणार का?

मी: स्वामीजी, मी पान खात नाही.

स्वामीजी: हा सोन्याचा वर्ख लागलेला विडा आहे, खाऊन बघ. डोक्यात फालतू विचार येणार नाही, डोक शांत होईल. म्हणतात न, "खाली दिमाग शैतान का घर".

मी: स्वामीजी, तुम्हाला माहित आहे, मी पान विडी तंबाकू काहीच घेत नाही. 

स्वामीजी: बच्चा, म्हणूनच तुझे चंचल मन एकाग्र होत नाही. ऐक, वेद भगवान म्हणतात, "एकत्र राहा, एकत्र खा, एकत्र प्या, एकत्र पुरुषार्थ करा". अशाने देशाची अर्थव्यवस्था सुधरते. बाकी जीवन-मरण भगवंताच्या हाती आहे. तू उगाच व्यर्थ काळजी करतो. मित्रांसोबत खा पी आणि मौज कर.

मी: स्वामीजी,  अखेरची शंका, चाचणीत यशस्वी झालेल्या औषधाचा विरोध का? त्या औषधाचे दुष्परीणाम हि नाही. 

स्वामीजी: वेद विरोधी कार्य करणार्याचा विरोध होतो. ज्या ग्राहकांकडून लाखो वसूल केल्या जाऊ शकतात. त्यांचे समाधान हजारहून कमी रुपयांत करून आपल्याच बंधूंच्या पोटावर लाथ मारणार्याचा विरोध हा होणारच. पोट आहे म्हणून हे मायावी जग आहे. जगण्यासाठी प्रथम स्वत:च्या पोटाचा विचार केला पाहिजे.  समाजाच्या विपरीत जाऊन कार्य करणे म्हणजेच अज्ञान. अज्ञान सोडून ज्ञानाचा मार्ग धर बच्चा तुझे कल्याण होईल म्हणत स्वामीजी पुन्हा ध्यानमग्न झाले.  





No comments:

Post a Comment