Friday, May 4, 2018

गर्भ संस्कार म्हणजे काय रे भाऊ


गर्भ संस्कार म्हणजे काय? हा प्रश्न माझ्या एका सहकर्मीने विचारला. गर्भ संस्कार म्हणजे पूजा-पाठ, उपवास इत्यादी तर निश्चित नाही. स्त्री-पुरुष लग्न करतात किंवा आजच्या भाषेत एकत्र येतात.  एकत्र येण्याचा उद्देश्य फक्त वासना पूर्ती नव्हे तर आपला वंश वाढविण्याचा  उद्देश्य हि असतो.  यासाठी आपल्या पुत्राचे लालन पोषण करण्याची त्यांची मानसिक तैयारी हि असतेच. आपली संतान  शारीरिक व मानसिक दृष्टीने स्वस्थ्य असावी हि प्रत्येक पालकांची  इच्छा हि असते. गर्भ संस्काराचा उद्देश्य पालकांची हि इच्छा पूर्ण करणे. 

आता प्रश्न येतोच गर्भ धारण करण्यासाठी काय पूर्व तैयारी आवश्यक आहे. आपण सर्व मातीचेच पुतळे असल्यामुळे आधी शेतीचा विचार आला. पेरणी आधी शेताला तैयार केले जाते. त्यात माती परीक्षण ते नागरणी, शेतात खत इत्यादी सर्व आले. पेरणी साठी उत्तम दर्जाचे बियाणे वापरल्या जातात. बियांना पेराण्याआधी  जीवाणु, विषाणु, बुरशी इत्यादी पासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपचारित केले जाते.    

तसेच गर्भ धारण करण्याची इच्छा ठेवणारी स्त्री  आणि पुरुष शारीरिक व मानसिक रूपेण स्वस्थ असायला पाहिजे. ते  निर्बल असेल किंवा  रोगराई इत्यादीने ग्रसित असेल आधी योग्य उपचार व  पोषणाहारची व्यवस्था करने गरजेचे. 

शेतात बी पेरल्या नंतर ही नियमित नियमित अंतरावर खत-पाणी द्यावे लागते. जीवाणू आणि विषाणूंंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी फवारणी इत्यादी करावी लागते. 

गर्भात स्वस्थ संतानाची वाढ होण्यासाठी गर्भवती स्त्री काय करावे हा प्रश्न आलाच. इथे रामायणातील एक किस्सा आठवला.  दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला. अग्निदेवाने प्रसन्न होऊन पायसदान दिले. पायस अर्थ खीर हा होतो.  खीर हि सात्विक जेवणाचे प्रतीक. अग्नी आपल्या जठरात असते. आपण जे खातो ते पचविण्याचे कार्य करते.  जेवणाच्या माध्यमातून आईला पोषण मिळते तेच पोषण गर्भस्थ शिशुला हि मिळते 

सात्विक जेवणात गाईचे दूध, तूप, ताज्या भाज्या, फळे, अंकुरित अन्न, दुधी भोपळा, तोरई, कारल, हिरव्या भाज्या इत्यादी.  शिवाय फोडणी साठी कमी मसाल्यांचा उपयोग इत्यादी.  सात्विक भोजन सहज पचते. त्यामुळे पोटांचे विकार इत्यादी होत नाही व शरीराला पूर्ण पोषण हि मिळते.  स्वस्थ्य शरीर असेल तर मनात सात्विक विचार हि सहज उत्पन्न होतात. दुसर्यांच्याप्रती प्रेम आणि दयेची भावना उत्पन्न होते. मन शांत आणी प्रसन्न राहते. हेच विचार आई सोबत गर्भातल्या बाळाला हि मिळतात. 

राजसिक जेवणात ताजे पण अंकुरित न केलेले अन्न व डाळी, सर्वच मांसाहारी पदार्थ मांस, मासोळी, अंडे इत्यादी येतात. फोडणीत स्वाद वाढविण्यासाठी भरपूर मसाले हि टाकले जातात. इथे जिभेचा स्वाद महत्वपूर्ण असतो.राजसिक आहार वासना, लालच, कपट, क्रोध व अहंकार  इत्यादी वाढवणारा असतो. हे भोजन पचायला जड असल्यामुळे, अपचन इत्यादी त्रास होतात,  त्या मुळे एकाग्रता कमी होते, मन स्थिर राहत नाही. वासना बळावते. आई स्वत:च्या इच्छा गर्भस्थ बाळाच्या नावाने खपविते. हे आपण अनेकदा अनुभवले आहे. गर्भस्थ शिशुवर याचा परिणाम हा होतोच. वासना, अहंकार, जिद्दीपणा. हृदयरोग इत्यादी होण्याच्या संभावना त्याला गर्भातच मिळतात. 

तामसिक जेवण म्हणजे सर्व प्रकारचे शिळे अन्न भाज्या. फ्रीज मध्ये जास्त दिवस ठेवलेले अन्न, प्रकारचे प्रसंस्कृत व प्रोसेस्ड पदार्थ, पूर्वी पासून अर्धवट तैयार केलेले पदार्थ पित्जा, बर्गर इत्यादी. तळलेल्या पदार्थाने जास्त सेवन. या शिवाय मांस मदिरा, बिडी, तंबाकू, ड्रग इत्यादीचे सेवन. या जेवणाचा परिणाम, भोग व वासने वर नियंत्रण रहात नाही. जेवण पचत नाही, पोषक तत्व आईला व बाळाला मिळत नाही. मनात काही कार्य न करत पडून राहण्याची इच्छा होते, आळस वाढतो. स्वास्थ्य ठीक नसल्यामुळे मूड सतत बदलत राहतो. आई सोबत  गर्भस्थ शिशुहि  विभिन्न रोगराईने ग्रस्त होता.  

महाभारतात तामसिक भोजनाचा एक परिणाम पाहायला मिळतो. अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहात कसे शिरायचे व त्यातून कसे बाहेर पडायचे हे सांगत असतो. अभिमन्यू गर्भात हे ऐकत असतो. चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगत असताना अर्जुन पाहतो सुभद्रा झोपून गेलेली आहे. अभिमन्यूला गर्भात चक्रव्यूहात कसे शिरायचे याचे ज्ञान होते. जन्मल्यानंतर आळसामुळे त्याला कधीच आपल्या वडिलांकडून चक्रव्यूहातून बाहेर कसे पडावे हे शिकायची इच्छा झाली नाही. परिणाम महाभारत युद्धात चक्रव्यूहातच त्याचा अंत होतो. 

सारांश स्त्री-पुरुष संतान उत्पन्न करण्यासाठी शारीरिक व मानसिक रूपेण स्वस्थ असायला पाहिजे. नसेल तर त्यांनी स्वस्थ्य होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गर्भावस्थेत स्त्रीला प्रसन्न व शांत ठेवण्याचा प्रयत्न घरतील पुरुष व इतर मंडळीनी केला पाहिजे. गर्भस्थ शिशूच्या विकासासाठी सकस आणि सात्विक आहार दिला पाहिजे. टीवी वर सास बहु व आपल्या विरोधकांना संपवणारे षड्यंत्र रचणार्या मालिका सोडून. सकारात्मक विचार मनात येतील अशी पुस्तके वाचली पाहिजे. टीवी मालिका बघायचीच असेल तर ती सकारात्मक व प्रेरणादायक संदेश देणारी असायला पाहिजे.  शेवटी शरीर स्वस्थ्य ठेवण्यासाठी गर्भस्थ स्त्री साठी असणारे व्यायाम इत्यादी व प्राणायाम तिने केले पाहिजेत. 

माझ्या दृष्टीने वरील उल्लेखित सर्व गोष्टी गर्भ संसारातच येतात.

No comments:

Post a Comment