Wednesday, July 30, 2025

ऑपरेशन सिंदूर: अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला


अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध शेरखान आणि तवाकी सारखेच आहे. अमेरिकेच्या षड्यंत्रात पाकिस्तान नेहमीच अमेरिकेची मदत करत आला आहे. अफगाणिस्तान वर आक्रमण करण्यासाठी पाकिस्तान ने विमानळे अमेरिकेला उधार दिले होते. सर्वप्रकारची सैन्य मदत ही केली होती. वैश्विक राजनीति मध्ये एक म्हण आहे, अमेरिकेपासून अमेरिकेच्या शत्रूला जेवढा धोका नाही त्यापेक्षा जास्त धोका मित्राला असतो. ऑपरेशन सिंदूर मध्ये ही हे दिसून आले. 

9 मेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जे डी वेंस ने भारताच्या पंतप्रधान मोदीजींना सूचना दिली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करणार आहे. याबाबत एआई वरून मिळालेली माहिती 

"अमेरिकेला त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत माहिती मिळाली की पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर JD Vance यांनी 9 मेच्या रात्री पंतप्रधान मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांना फोनवरून कळवले की हा हल्ला लवकरच होऊ शकतो. भारताने ही चेतावणी अत्यंत गांभीर्याने घेतली आणि 10 मेच्या सकाळी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवर जोरदार हल्ला केला. या घटनाक्रमात JD Vance यांनी भारताला संभाव्य धोक्याची आधीच कल्पना दिली असेल. Vance यांनी अमेरिकेची भूमिका सहकार्यशील आणि सतर्क ठेवली. पाकिस्तानला रणनीतीक लाभ होऊ दिला नाही." 

पाकिस्तानचे  प्रधानमंत्री शहबाज शरीफ म्हणाले होते, आम्ही दहा तारखेला सकाळी साडे चार वाजता भारतावर मोठा हल्ला करणार होतो. पण रात्री  अडीच वाजता आमच्या विमानतळांवर ब्रह्मोस येऊन आपटले. आम्हाला वेळच मिळाला नाही. नुकसान टाळण्यासाठी विमाने सुरक्षित करणे आम्हाला गरजेचे वाटले. त्यामुळे भारताशी बदला घेणे शक्य झाले नाही. याशिवाय जगाचे सोडा मुस्लिम देशांचाही पाकिस्तानला पाठिंबा नाही, हे ही शरीफ यांना कळून चुकले होते. त्यांचा  मिसाईल आणि द्रोण हल्ला ही नाकाम झाला होता. त्यामुळे युद्धविरामाची मागणी करण्या व्यतिरिक्त कोणताही मार्ग त्यांच्या समोर नव्हता . 

भारताच्या सैन्याने निश्चित केलेली आतंकी आश्रय स्थळे आधीच उध्वस्त केली होती. पाकिस्तानला जर बदला घेण्याची दुर्बुद्धी झाली नसती, द्रोण आणि मिसाईल हल्ले केले नसते तर  7 मे ला सकाळीच ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले असते. भारताला ही युद्ध सुरू ठेवण्याचे कोणतेही कारण नव्हते. भारताने पाकिस्तानची युद्ध थांबविण्याची मागणी मान्य केली.  

भारताने 11/12 विमानतळांवर हल्ला केला. काही सुरक्षा विशेषज्ञांच्या मते यातल्या काही बेस वर अमेरिकी अस्त्र-शस्त्र ठेवलेले होते. हल्ल्यात ते नष्ट झाले. बहुतेक त्याचा राग तात्यांना आला असेल. तात्यांनी युद्धविरामाचे श्रेय घेऊन भारतात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भरपूर प्रयत्न केला. बाकी भारताला पूर्व माहिती देऊन अमेरिकेने पाकिस्तानला दगा दिला, हे नाकारणे शक्य नाही. 



Wednesday, July 23, 2025

मतदानाचा हक्क आमचा

बिहार मध्ये मतदाता सूची तपासल्या गेली. आतापर्यंत यादीत 22 लाख मृतातम्यांचे नावे, 7 लाख डुप्लीकेट मतदाता सापडले.  35 लाख मतदाता दिलेल्या पत्त्यावर सापडलेच नाही. 1 लाख मतदाता कोणत्याही पत्त्यावर नव्हते.  ही संख्या एवढी मोठी आहे, की संपूर्ण राज्याची निवडणूक प्रभावित करू शकते. यावरून सुचलेल्या काही ओळी: 

मृतांच्या आत्मा 
भटकतात जिथे. 
मतदानाचा हक्क
त्यांना आहे तिथे.  

घुसखोरांचे घाम 
गळतात जिथे.  
मतदानाचा हक्क 
आहे त्यांना तिथे.  

डुप्लीकेट मतदार  
वाढवी मतदान जिथे.  
मतदानाचा हक्क  
त्यांनाही आहे तिथे. 

संविधांनाचा रक्षणे साठी
लोकतंत्र वाचविण्यासाठी
मतदान यादी बदलू नका
सरकारी तालावर नाचू नका. 

बाकी प्रत्येक निवडणूक पूर्वी मतदाता यादी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नकली मतदान निवडणूक जिंकण्याचे एक अस्त्र आहे. विशिष्ट मतदाता याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. 







Monday, July 21, 2025

आपरेशन सिंदूर : ट्रंप तात्या कोमात

आपरेशन सिंदूर नंतर ट्रंप तात्या कोमात गेले असे वाटू लागले आहे. तात्या एखाद्या मतिभ्रष्ट माणसासारखे बरगळू लागले आहे. नुकतेच ते म्हणाले भारत-पाक युद्धात अनेक जेट पडले. पण कोणाचे ते मात्र  सांगू शकले नाही. अमेरिकेचे शेकडो आकाशात गमन करत हेरगिरी करणारे उपग्रह आणि  सीआयए त्यांना खरी माहिती देऊ शकले नाही. बहुतेक खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांना कळून चुकले असेल की भविष्यात भारताला ब्लॅक मेल करणे संभव नाही याचा मानसिक धक्का बसला आहे, हे मात्र निश्चित. 

माझा एक मित्र कट्टर मोदी विरोधी आहे, काल त्याने मला फोन करून म्हंटले, पटाईत, ट्रंप तात्या पुन्हा म्हणाले आहे, भारताचे जेट पडले. असे म्हंटताना त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मी उत्तर दिले, भारताचे युद्धक विमाने पडली आणि तुला आनंद होत आहे. बाकी तात्या खरे बोलले, पाकिस्तान ने आपल्या आक्रमण करणार्‍या युद्धक विमानांना पाडले. वैमानिकांनी पेराशूट उघडले. ते पाकिस्तानच्या जमिनीवर उतरले. तिथून त्यांनी ओला-उबेर पकडली आणि ते भारतात परतले. तो म्हणाला, पटाईत काहीतरी बरगळू नको. मी म्हणालो, गाढवा मग काय म्हणू. विमान पडले असते तर त्यांनी अभिनंदन सारखे भारतीय वैमानिक ही पकडले असते किंवा त्यांचे प्रेत तरी मीडिया वर दाखविले असते. किमान एवढी तरी अक्कल तुला असायला पाहिजे. तू काही राजनेता नाही ज्याला असत्य प्रचार करून लोकांची मते घ्यायची आहे. काहींची इच्छा तर भारत पराजित झाला पाहिजे अशी होती. बाकी भारतीय युद्धक विमान भारतात पडले असते, तरीही इथला मीडिया त्या जागी पोहचला असत. स्थानीय लोक आणि मीडियाने  विडियो टाकले असते.  या शिवाय भारतात शहीद होणार्‍या प्रत्येक सैनिकाला मानाची वंदना दिली जाते, एवढे माहीत आहे ना, तुला. आता त्याचे सूर बदलले. तो म्हणाला, मग तात्या खोटे का बोल्ले. मी उत्तर दिले, तात्या कोमात गेले आहे. किराणा हिल्स वर बहुतेक तात्यांचे आण्विक अस्त्रांचा साठा असू शकतो. भारताने किराणा हिल्स वर मिसाईल हल्ला केला नाही, असेच विधान केले असले तरी तिथल्या स्फोटांचे उपग्रह फोटो मीडियावर आहे. नंतर त्याच भागात जमिनीच्या आत अनेक भूकंप ही आले. नूरखान बेस वर ही जमिनी खाली असलेले शस्त्र भंडार ही नष्ट झाले. बहुतेक भारताने दाखविले पाकिस्तानचे अस्त्र भंडार सुरक्षित नाही. पण इथे ठेवलेले अस्त्र- शस्त्र भंडार तात्यांचे असेल तर तात्या कोमात जाणारच.  

पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ एका प्रेस कोन्फ्रेंस मध्ये म्हणाले होते, ते भल्या पहाटे भारतावर हवाई हल्ला करणार होते, त्या आधीच अडीच वाजता भारताने ब्रम्होस मिसाईलने आमच्या विमानतळांवर हल्ले केले. आम्हाला प्रतिकार करण्यासाठी 30 सेकंड ही नव्हते. भारताच्या हल्ल्यात तिथल्या हवाई पट्ट्या आणि तिथे उभी असलेली अनेक विमाने नष्ट झाली. त्यांची विमाने आक्रमण करण्यासाठी तैयारी करत असल्याने त्यांची विमाने असुरक्षित होती. किमान 30-40 विमानांना निश्चित नुकसान झाले असेल, खरी संख्या काही वर्षांनी पाकिस्तान उघडी करेलच. भारता जवळ शत्रूवर पिन पॉइंट आक्रमण करण्याची क्षमता पाहून तात्यांना धक्का बसणे स्वाभाविक होते. 

नुकतेच झालेल्या इजराईल आणि इराण युद्धात हजारून जास्त किमी दूरून येणार्‍या मिसाईल आणि द्रोण अमेरिकेचे आधुनिक डिफेंस सिस्टम थांबवू शकले नाही. दुसरी कडे 25-50 किमी दुरून येणारे द्रोण आणि मिसाईल भारताने रोखले.  ह्याचा आघात ही त्यांना जबरदस्त बसला असेल. 

बाकी तात्यांप्रमाणे भारतात ही अनेकांना दारुण धक्का बसला आणि त्यांचे ही मानसिक संतुलन बिघडले. भारताने 9 आतंकी तळ उध्वस्त केले. तिथे इतके आतंकी मेले की एक आतंकी म्होरक्या म्हणाला, "आम्ही प्रेत मोजता मोजता थकून गेलो. आमचे दुख कुणाला ही कळू शकत नाही". 11 विमान तळे उध्वस्त झाल्याने पुढील वर्षभर तरी पाकिस्तान पुन्हा गडबड करू शकत नाही. एवढे नुकसान झाल्यावर पाकिस्तान ने बदला न घेता युद्धविराम स्वीकार केला अर्थात सरेंडर केले/ तरीही आपले काही नेता "भारताने सरेंडर असा शब्द प्रयोग करतात". बहुतेक पाकिस्तानच्या दारुण पराजयाचे पाकिस्तानपेक्षा त्यांनाच जास्त दु:ख झाले असावे आणि ते ही तात्या प्रमाणे बरगळू लागले.   

बाकी आता भारतासोबत सर्व व्यापारीक सौदे बरोबरीच्या नात्याने करण्याची मानसिक तैयारी ही तात्यांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी तात्यांना कोमातून लवकर बाहेर यावे लागेल. पंतप्रधान मोदींच्या भारताला आता कुणीही हलके घेऊ शकत नाही. 



Thursday, July 17, 2025

काँवड़ यात्रेचे आर्थिक महत्व.

 

आपल्या प्राचीन ऋषींना माहीत होते, लक्ष्मी चंचल असते. जेवढ्या लवकर ती एका हातातून दुसर्‍या हातात जाईल, तेवढ्या जास्त लोकांना लक्ष्मीचा लाभ होतो. एक छोटेसे उदाहरण, एका किराणाच्या दुकानदाराला भूक लागली, त्याने 20 रु देऊन समोसा विकत घेतला. समोसा विकणार्‍याने तेच 20 रु देऊन पाव-भाव भाजी खाल्ली. पाव भाजीवाल्याने तेच 20 रु देऊन किराणाच्या दुकानदारा कडून पाव विकत घेतले. 20 रुच्या एकाच नोट ने 60 रूपयांचा धंधा केला. यालाच आर्थिक चक्र म्हणतात. हे आर्थिक चक्र जेवढ्या वेगाने फिरेल तेवढ्या जास्त लोकांना लक्ष्मीचा लाभ होतो. लोकांच्या घरात धन पडून राहिले तर आर्थिक चक्र ही फिरणार नाही. आपल्या सनातन धर्माच्या सर्व सणांचा आणि यात्रांचा उद्देश्य तिजोरीत साठलेले धनाचे वितरण समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचवून आर्थिक चक्र फिरण्याची गति वाढविणे आहे. आपले प्राचीन ऋषि मुनि हे उत्तम अर्थशास्त्री होते, असे ही म्हणता येईल.  

या वर्षी हरिद्वार मध्ये कांवड घेण्यासाठी किमान सहा ते सात कोटी लोक येणार असा अंदाज आहे. कांवड बांबूची असते आणि गंगेच्या पाण्यासाठी  प्लॅस्टिक, स्टील, पितळ इत्यादीं पासून बनलेल्या बाटल्या, घाघर इत्यादि ही कांवड मध्ये असतात. एक कांवड 500 ते 5000 रु पर्यन्तची असू शकते. एवढे लोक दोन आढवडयात हरिद्वारला येणार. ते पायी, बस, रेल्वे, कार, ट्रक, टेम्पो इत्यादि वाहनांचा वापर करून येणार. अधिकान्श 50 ते 250  किमी दूरून येतात.  काही 500 किमी दूर पर्यन्त  दुरून ही येतात. यातले अधिकान्श एक रात्र तरी हरिद्वार येथे थांबतात. इथल्या ढाबे, हॉटेल, धर्मशाळा इत्यादींना आर्थिक लाभ होतो. यानंतर कांवड घेऊन सर्व पायी त्यांच्या शहरांत/ गावी जाणार. अंदाजे एक यात्री चार दिवस पायी चालणार (हरिद्वारहून  50 ते 75 किमी चालत चार दिवसांत कांवड घेऊन यात्री दिल्ली पोहचतात) या सर्वांची राहण्याची सोय, चहा-पाणी आणि जेवणाची सोय जागो-जागी उभारलेल्या शिविरांत केली जाते. अंदाजे दरवर्षी लाखांच्या वर शिविर उभारले जातात. प्रत्येक ठिकाणी स्थानीय श्रीमंत लोक या शिविरांची व्यवस्था करतात. या शिविरांत किमान 20 ते 25 कोटी चहाचे कप, तेवढेच जेवणासाठी पानांच्या प्लेट्स, वाट्या इत्यादि लागणार. काही हजार हलवाई लागणार, जोडे चपलांच्या दुरूस्तीसाठी चांभार, डॉक्टर, मालीशवाले इत्यादि. या शिवाय शिविरात, देवांचे फोटो असतात. त्यांची पूजा होते. पूजेचे साहित्य हार, फुले धूप, दीप नैवेद्य इत्यादि ही लागतात. अधिकान्श शिविरांत भागवत कथा, जागरण होतात. त्यासाठी कथावाचक, भक्ति गीत गाणारे गायक, देवांचे सोंग घेणारे, डिजे, जनरेटर, विजेचे काम करणारे इत्यादि लोकांची गरज असते. रस्त्यात पडणारे ढाबे, चहाच्या दुकानदारांची ही कमाई होते. दूध, दही, भाजी-पाला, फळे इत्यादींची विक्रीही कांवड मार्गावर होते. स्थानीय शेतकर्‍यांना ही त्याचा लाभ होतो. 

कांवड नेणार्‍यांना ही तैयारी करावी लागते. दोन कपडे, उपरण, टॉवेल, इत्यादि ठेवण्यासाठी एक बॅग ही लागते.  सीमेंट आणि डाबर रास्ते आल्याने अधिकान्श कांवड यात्री कापडाचे जोडे किंवा चप्पल घालतात. त्या ही विकत घ्याव्या लागतात. शिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करूनच ते घरी परततात. ज्या-ज्या स्थानीय मंदिरात जलाभिषेक होतो त्या दिवशी भंडारा ही राहतो. अंदाजे एक कांवड यात्री कमीत-कमी 1000 रु यात्रेत खर्च करतो. या सर्वांचा विचार केला तर 20 ते 30 हजार कोटींचा आर्थिक व्यवहार या 15 दिवसांत निश्चित होत असेल. काही लाख लोकांना रोजगार ही या काळात मिळतो. त्यांच्या जवळ पैसा येणार आणि मग ते ही तो खर्च करणार. दुसर्‍या शब्दांत आर्थिक चक्र फिरण्याची गति वाढते आणि समाजाच्या सर्व स्तरांना त्याच्या लाभ मिळतो.

काही महाविद्वान म्हणतात, कांवड यात्रा करण्यात लोक एक आठवडा व्यर्थ करतात.  या महाविद्वान लोकांना कळत नाही  चार- पाच दिवस रस्त्यावर 50 ते 60 किमी रोज चालण्याने शारीरिक आणि मानसिक दृढता त्यांच्यात येते. परिस्थितीला न घाबरता सामोरे जाण्याची हिम्मत येते. रस्त्यात चालताना विभिन्न जाति पंथांच्या आणि वेगवेगळ्या प्रांतांच्या लोकांची भेटी गाठी होतात. शिविरांत श्रीमंत आणि गरीब एकत्र जेवतात. जमिनीवर खाली झोपतात.  यात्रेकरूंमध्ये मैत्री संबंध स्थापित होतात.  या सर्वांचा लाभ रोजगार, व्यापार आणि उद्योगात ही होतो. या शिवाय सामाजिक भेदभाव दूर करण्यात आणि आर्थिक समरसता निर्माण करण्यात अश्या यात्रांचे अनन्य महत्व  आहे. 

    

Monday, July 14, 2025

वार्तालाप: संपन्न बनण्याचा मार्ग

जाणपण निरूपण समासात समर्थांनी आध्यात्मिक प्रगती सोबत संसारात संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग ही सांगितलेला आहे. समर्थ म्हणतात, समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता नेहमीच असते. अजाणते पणे लोक राजकीय व्यवस्थेला दोष देतात, काही प्रारब्धला दोष देतात. भारतात अनेक राजनेता सामाजिक विषमतेचा उपयोग जातीय, भाषिक आणि प्रांतीय आधारवर प्रजेत भेद टाकून निवडणूक जिंकण्यासाठी करतात. समर्थांच्या शब्दांत नेणता अर्थात अज्ञानी माणूस यातच गुरूफटून जातो. जसे आजकाल महाराष्ट्रात भाषा विवादात प्रजा गुंतली आहे. अज्ञानी माणूस आपली दरिद्रता दूर करण्याचा प्रयत्न सोडून दुसर्‍यांना दोष देत चुकीच्या मार्गावर चालू लागतो आणि दारिद्रयात जगत जीवन व्यर्थ घालवतो. समर्थ म्हणतात, 
 
विद्या नाही बुद्धि नाही. 
विवेक नाही साक्षेप नाही.
कुशळता नाही व्याप नाही. 
म्हणोन प्राणी करंटा.

समर्थ म्हणतात, ज्या व्यक्ति पाशी विद्या, बुद्धि, उद्योग, कुशलता, व्याप आणि विवेक नाही तो प्राणी करंटा होतो अर्थात आयुष्यभर दरिद्री राहतो. दुसर्‍या शब्दांत या ओवीत समर्थांनी आपल्याला संपन्न आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग दाखविला आहे.  

समर्थ म्हणतात विद्या अध्ययन हा संपन्न बनण्याच्या मार्गातील पहिला टप्पा आहे. ज्या माणसाजवळ कोणतीही विद्या नाही तो करंटा राहणारच. वेदपाठी ब्राह्मणाला मोठ्या-मोठ्या यज्ञ कार्यांत बोलविले जाते. मोठी दक्षिणा मिळते. ज्या ब्राह्मणाला सत्यनारायणाची पोथी वाचून ही पूजा सांगता येणार नाही तो दरिद्री राहणारच. हाच संसाराचा नियम आहे. दुसरी पायरी उद्योग अर्थात कष्ट करण्याची तैयारी. विद्या अर्जित करण्यासाठी संबंधित विषयांच्या पोथ्या वाचाव्या लागतात. योग्य गुरु कडून समजून घ्याव्या लागतात. प्रश्नांची उत्तरे पाठ करावी लागतात. दहा-बारा तास रोज अभ्यास करावा लागतो. तेंव्हा काही डॉक्टर बनतात, काही आयएएस बनतात. काही सीए बनतात काही एमबीए करून मोठ्या- मोठ्या उद्योगांचे प्रशासनिक प्रमुख बनतात. कोट्यवधी पगार घेतात. समृद्ध बनतात. काही कारकून बनून मध्यम वर्गीय जीवन जगतात. बाकी ज्यांच्यात मेहनत करून ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता नाही, ते बेरोजगार आणि दरिद्री राहतात. चुकीच्या मार्गावर चालू लागतात.  काही चोरी-चकारी आणि गैरमार्गांचा अवलंबन करून जगण्याचा प्रयत्न करतात. काही सत्ता लोलुप नेत्यांच्या तालावर नाचतात. आंदोलनात भाग घेऊन तोडफोड ही करतात. अश्या तरुणांना कधी-कधी जेल मध्ये ही जावे लागते. त्यांचे आयुष्य उध्वस्त होतात. दु:ख आणि गरीबी त्यांच्या भाग्यात येते.  काही नैराश्याने ग्रस्त होऊन आत्महत्या ही करतात. असो. 

समर्थ म्हणतात उत्तम गुरु कडून ज्ञान प्राप्त करून काम भागत नाही. त्या ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी कुशलता ही लागते. उदाहरण, शिलाई केंद्रात जाऊन कपडे शिवण्याचे ज्ञान प्राप्त केल्या नंतर त्यात कुशलता ही प्राप्त करावी लागते. शिंपीला कुशलता प्राप्त करण्यासाठी एखाद्या उस्तादाच्या दुकानात काम करावे लागते. सरळ रेषेत शिलाई करण्यासाठी ही अनेक महीने अभ्यास करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगळी असल्याने त्यानुसार माप घेणे आणि शिलाई करण्यासाठी कुशलता ही लागणारच. त्यासाठी उस्तादच्या मार्गदर्शनात निरंतर अभ्यास करावा लागतो. कपडे शिवण्यात कुशलता प्राप्त झाल्यानंतर वेगळी दुकान थाटता येते. बिना कुशलता प्राप्त केल्या, थेट दुकान उघडली तर ती काही महिन्यातच बंद होण्याची शक्यता जास्त.

समर्थ सारासार विचार करण्यासाठी विवेक बुद्धि वर ही जोर देतात. आता शिंप्याला दुकान उघडायची आहे. त्याला दुकानासाठी त्याच्यापाशी असलेल्या बजेट अनुसार मौक्याची जागा शोधावी लागणार. ज्या भागात दुकान उघडायची आहे, त्या भागातील दुकानाचे भाडे, सरकारी कर, बँकेचे व्याज, उत्तम शिलाई सामग्री वापरण्याचा खर्च उदा. दोरे, सुई, जीप बटन, लेस, इत्यादि, त्या भागातल्या लोकांची खर्च करण्याची क्षमता, किमान नफा किती ठेवला पाहिजे जेणे करून नुकसान होणार नाही इत्यादि. शिंप्याने या सर्वांचा विचार करूनच शिलाईचे रेट ठरविले पाहिजे. रेट कमी ठरविले तर नुकसान होईल. रेट जास्त ठेवले तर ग्राहक कमी येतील. रेट कमी ठेवण्यासाठी शिलाईचे सामान निम्न दर्जाचे वापरले तर ग्राहक तुटतील. विवेक आणि बुद्धीचा वापर करून  शिंप्याने योग्य जागी दुकान उघडली पाहिजे आणि गुणवत्तेशी प्रामाणिक राहिले पाहिजे. ग्राहकांशी गोड बोलले पाहिजे. शेवटी,  शिंप्याला ऊन असो की पाऊस, दररोज नियमित वेळेवर दुकान उघडावी लागेल आणि 12-12 तास उघडी ठेवावी लागेल. किमान एवढे केले तरी, थोड्या काळातच त्याला निश्चित प्रसिद्धी मिळेल. तो संपन्न आणि वैभवशाली होईल. थोडक्यात, संसारात संपन्न आणि वैभवशाली बनायचे असेल तर ज्ञान, कुशलता, सारासार विचार करण्याची विवेक बुद्धि ही पाहिजे. असो. 





Wednesday, July 9, 2025

विद्यार्थी: निराशा आणि आत्महत्या इत्यादि दोष कुणाचा

 

आज एक बातमी फेसबूक वर वाचली. दहावीच्या मुलाने आत्महत्या केली. त्याने आत्महत्येचे कारण एका कागदावर लिहले. मी "पासी" घेत आहे, कारण मास्तर माझ्यावर रागावले. मास्तर रागावले.  कारण काय असावे. या विषयावर ओळखीच्या  शिक्षिकांसोबत काही महीने आधी चर्चा केली होती.  

मी जेंव्हा शाळेत शिकत होतो. 11वी बोर्ड होता. नववी, दहावी आणि अकरावी तिन्ही वर्षांचा अभ्यासक्रम बोर्डाचा परीक्षेत येत होता.  एक-एक प्रश्न 15- 20 मार्कांचा राहायचा. मोठी उत्तरे लिहावी लागायची. छोटे प्रश्न फक्त 20 टक्के मार्क असलेले.अभ्यासाच्या तणावामुळे डिप्रेशन, हृदयाघात, आत्महत्या इत्यादि ऐकायला मिळत नव्हते. वर्ग शिक्षक ही मुलांना बदडत होते. आमच्या गणिताच्या शिक्षकाची छडी तर रोजच तुटायची. पण मास्तराने मारले म्हणून विद्यार्थी आत्महत्या करत नव्हते. 

पहिले कारण आजची दोषपूर्ण शिक्षण व्यवस्था.  पूर्वी 8वी बोर्ड असायचा. त्याच्या परीक्षा परिणाम ही 60 ते 70 टक्के असायचा. आठवीत नापास झालेले किंवा कमी मार्क असणारे पुढे शालेय शिक्षण घेत नसे. 60 टक्के विद्यार्थी जे नववीत प्रवेश घेत से त्यातले अधिकान्श विद्यार्थी विज्ञान, गणित आणि अंगरेजी सारखे विषय 9वीत घेत नसे. विद्यार्थ्यांवर असणारा अभ्यासाचा मानसिक तनाव बर्‍यापैकी कमी होत असे. मानसिक तणाव कमी असल्याने हृदयाघात किंवा मानसिक आजार होण्याची संभावना ही कमी होती. फक्त हुशार विद्यार्थी विज्ञान हा विषय नववीत घ्यायचे. मात्र आज देशांत 10+2 शिक्षण पद्धती आहे. दहावी पर्यन्त सर्वच विद्यार्थ्यांना बोर्डाने निर्धारित केलेले सर्व विषय घ्यावे लागतात. ज्या विद्यार्थाची गणित, इंग्लिश  आणि विज्ञानात गति नाही त्याला ही या विषयांचा अभ्यास करावा लागतो. या शिवाय  विद्यार्थ्यांना काही येत असो की नसो  पहिलीपासून पुढे ढकलण्याची सरकारी नीती. मला आठवते आमच्या गल्लीत माझ्या सोबतचा एक मुलगा दुसरीची वार्षिक परीक्षा अत्यंत काठावर पास झाला होता. त्याच्या आईने पुन्हा त्याला पुन्हा दुसरीत बसविले. त्याचा पाया मजबूत झाला.  पुढे वर्गात त्याचा पहिला नंबर येऊ लागला आणि तो डॉक्टर झाला.  प्राथमिक शाळेत असताना विद्यार्थ्यांना एखाद्या वर्गात पुन्हा बसविले तर वय लहान असल्याने विद्यार्थ्यांना वाईट वाटत नाही आणि त्यांची शैक्षणिक नीव ही मजबूत होते. पालक ही मुलाच्या शिक्षणाकडे  लक्ष देऊ लागतात.  पण आज दहावी पर्यन्त कुणालाही नापास केले जात नाही. दहावी आणि 12वीचा परीक्षा परिणाम  ही 90 टक्क्यांचा वर असतो. अर्थात पहिलीत प्रवेश घेणार्‍या 100 पैकी 90 विद्यार्थी परीक्षा आणि पूरक परीक्षा देऊन 12वी पास होणार. (11 वी बोर्ड वेळी ही संख्या 50 पेक्षा जास्त राहायची नाही). हे असेच आहे जसे "इधर से आलू डालो उधर से सोना निकालो"। पहिलीत अडमिशन घ्या आणि 12वीचे प्रमाणपत्र ही घ्या. पण गाडी इथेच थांबत नाही. काही येत नसेल तरी आज स्नातक होणे ही कठीण नाही. मग ज्या तरूणांकडे डिग्री आहे पण ज्ञान नाही. असे तरुण बेरोजगार राहणार, तणावग्रस्त राहणार. त्यांना डिप्रेशन होणार. ते आत्महत्या करणार किंवा रस्त्यावर उतारणार. कीड लागलेल्या निरपयोगी प्रजेचे निर्माण आजच्या शिक्षण व्यवस्थेत आहे. वेगळा विषय आहे तरी तो आजच्या शिक्षण प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. देशातील एक प्रसिद्ध आयटी कंपनी आधी दोन महीने निवडलेल्या डिग्रीधारी तरुणांना पुन्हा प्रशिक्षण देते आणि नंतर परीक्षा घेते. त्यात उतीर्ण झालेल्या उमेदवारांना  नियुक्ती पत्र देते.

डिझाईनर चाइल्ड सिंड्रोम: मध्यम वर्गाला लागलेला हा गंभीर आजार आहे. या आजारचे कारणे, आम्ही गरीब होतो. उत्तम शिक्षण मिळाले असते तर कदाचित आयएएस, डॉक्टर, इंजीनियर इत्यादि झालो असतो. विदेशांत गेलो असतो.  सरकारी बाबू  असो,  आयटी वाले असो किंवा डॉक्टर, इंजीनियर ते प्राइवेट नौकरी करणारे, सर्वांना वाटते त्यांच्या न पूर्ण झालेल्या  इच्छा त्यांच्या एकुलता एक लेक पूर्ण करेल. ते परिवार नियोजन करतात एकच्या मूल जन्माला घालत नाही. त्याला प्रतिष्ठित आंग्ल शाळेत घालतात. महिना दहा ते वीस हजार फी भारतात. पहिली पासून ट्यूशन ही लावतात. नववी पासून  कोचिंग क्लासेस ज्यांची फी दोन ते पाच लाख पर्यन्त असते लावतात. त्यासाठी कर्ज ही घेतात. दिल्लीचे म्हणाल तर इथे सकाळी सातला निघलेला मुलगा शाळेतून दुपारी अडीच तीन पर्यन्त घरी येतो. जेवून तो पुन्हा क्लासला जातो. घरी येता-येता संध्याकाळचे सात  वाजतात. मग घरी  येऊन तो शाळेचा अभ्यास, क्लासचा अभ्यास, रीविजन इत्यादि करतो. प्रत्येक शाळेत साप्ताहिक मासिक परीक्षा होतात. मुलांवर नेहमीच अभ्यासाचा ताण असतो. रात्री एक-दोन वाजेपर्यंत ते अभ्यास करतात. रात्री कॉफी इत्यादि घेतात. झोप पूर्ण होत नाही. शारीरिक व्यायाम इत्यादि नसण्याने वजन वाढण्यासहीत अनेक आजार मुलांना लागतात. बाकी कितीही अभ्यास केला तरी ज्या  विषयाच्या 100 जागा असेल तर 100 मुलांनाच प्रवेश मिळेल. मुलालाही माहीत असते पालक त्यांच्यावर भरपूर खर्च करत आहे. पालकांना इच्छित परिणाम देण्यास असमर्थ ठरल्याने विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जातात. माझ्या ओळखीच्या एका मराठी दांपत्याचा एकुलत्या एक मुलाने दहावीत पहिल्या परीक्षेत चांगले मार्क्स आले नाही म्हणून गळ्यात फास लाऊन आत्महत्या केली. तर महाराष्ट्रात कमी मार्क्स आले म्हणून बापाने मुलीला रागाने मारले. मुलीचे प्राण गेले. आता बापाला कितीही दुख झाले असेल तरीही त्यांची मुलगी त्यांना परत मिळणार नाही. या आजाराने ग्रस्त पालक मुलांना आर्थिक गुंतवणूक समजतात. ते उत्तम नागरिक तैयार करण्याएवजी पैसा कमविणारी मशीन समजून गुंतवणूक करतात. जी मशीन खराब निघते ती कचरा पेटीत फेकली जाणारच. असे पालक मुलांचे आयुष्य उध्वस्त करतात. त्यांना आत्महत्या करण्यास विवश करतात. मुले ही स्वतला अभ्यास करण्याची मशीन समजतात आणि परिणाम पाहिजे तसा आला नाही तर ते आत्महत्या करतात किंवा डिप्रेशन मध्ये जातात. 

यावर उपाय अत्यंत सौपा आहे. पहिली पासून फक्त जे विद्यार्थी पुढच्या वर्षाचे शिक्षण घेण्याच्या लायकीचे आहे त्यांनाच पुढे जाऊ द्या. 60 किलो वजनी पैलवान 48 किलो वजनी पैलवान सोबत कुस्ती खेळत  नाही. तसेच ज्ञानाच्या बाबतीत आहे. 8वी बोर्ड पुन्हा सुरू केला पाहिजे. ग्रेस मार्क इत्यादि देणे बंद केले पाहिजे. 8वी बोर्डात पास होण्यासाठी किमान तीन विषयांत  50 टक्के मार्क असणे अनिवार्य केले पाहिजे. 10वी बोर्ड बंद केला पाहिजे. 9वीत विषय निवडण्याची स्वतंत्रता विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. 9वी पासून  गणित, विज्ञान आणि आंग्ल भाषेचे बंधन नसावे. पहिले दोन वर्ष  विषय बदलण्याची स्वतंत्रता ही दिली पाहिजे. पाच विषयांजागी आवडीच्या तीन विषयांत ही तो 12वी बोर्डची परीक्षा देऊ शकेल असा बदल शिक्षण पद्धतीत झाला पाहिजे. उदा. मला जर मराठी, हिन्दी आणि संस्कृत या तीन भाषा घेऊन 12वीची परीक्षा द्यायची असेल तर ती स्वतंत्रता मला मिळाली पाहिजे. 12वीत उतीर्ण होण्यासाठी 50 टक्के मार्कांची अट असायला पाहिजे. तीन विषय घेणार्‍यांना कौशल युक्त शिक्षण घेणे अनिवार्य असले पाहिजे. "इधर से आलू डालो उधर से डिग्री लो" हा प्रकार बंद झाला पाहिजे.  अनुपयोगी वस्तु काही कामाची नसते, हे कटू सत्य आहे. स्नातक झालेला तरुण स्वतच्या पायावर उभ्या राहण्याचा लायकीचा असला पाहिजे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या आत्महत्या  थांबणार नाही.