Monday, August 22, 2022

समर्थ रामदास: सुखी संवाद

 
जनी वाद-वेवाद सोडूनि द्यावाl
जनी सुख-संवाद सुखें करावाll
 जगी तोचि तो शोक संतापहारीl
तुटे वाद संवाद तो हीतकारी ll
(मनाचे श्लोक 109)

समर्थ म्हणतात हे मना, लोकांशी सुख संवाद आनंदाने करावा. वाद विवाद  कदापि करू नये. जो संवाद, वाद दूर करतो, सुखी आणि समाधानी करतो. जो आपले दुख हरतो. तोच संवाद करणे योग्य.

घर असो, कार्यालय असो किंवा सामाजिक आणि राजनीतिक संस्था असो. प्रत्येक ठिकाणी काही समस्या असतात किंवा कार्यक्रम असतात. कार्यक्रम  ठरविण्यासाठी आणि समस्येंवर तोडगा काढण्यासाठी संवाद हा करावाच लागतो. साहजिकच आहे जिथे दहा लोक असतील, तिथे प्रत्येकाचे विचार आणि कार्य करण्याची पद्धत ही वेगळी असणारच. सर्वांची मते ऐकून सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी संवाद हा करावाच लागतो. पण संवादाचे रूपांतरण वादात झाले तर कार्याचा नाश हा होतोच. लोकही तुटून दूर होतात. संवादातून समाधान शोधाचे असेल तर आपल्याला निम्न बाबी लक्षात ठेवल्या पाहिजे. 

1. आपला अहंकार हा बाजूला ठेवणे.
2. मी म्हणेल ती पूर्व दिशा हा हेका सोडणे.  
3. कुणालाही हीन लेखू नये.
4. अडाणी व्यक्तीच्या मतांचा ही सम्मान करणे.  
5. कुणी काहीही बोलले तरी क्रोध न करणे. 
6. बोलताना सदैव वाणी वर संयम ठेवणे. 
7. व्यर्थचे प्रश्न न विचारणे. 
8. दुसर्‍यांचे दोष न दाखविणे.
9. फक्त विषयवस्तु वरच चर्चा करणे. 

संवाद करताना वरील बाबी लक्षात ठेवल्या तर, समस्यांचे समाधान शोधता येतात. अश्या प्रकारचा संवाद सर्वांना संवाद सुखदायी आणि समाधानी करतो. शेवटी जे काही आपण सुचवितो त्याचे पालन आपल्यालाही करता आले पाहिजे. अन्यथा आपल्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. 


No comments:

Post a Comment