Friday, August 19, 2022

समर्थ रामदास: पाण्याचे नियोजन आणि शेती



नदीचे उदक वहात गेले. तो ते निरर्थक चालले.
जरी बोंधोनी काढले. नाना तीरी कालवे.
उदक निगेने वर्तविले. 
नाना जीनसी पीक काढले.
पुढे उदकाचे झाले. पीक सुवर्ण. 
नाना उंच आम्र फळे. अंजीर,ऊस, द्राक्ष, केले; 
नाना पिके यत्नजळे. निर्माण झाली.  

एका टीव्ही वाहिनीवर एक छोट्या शेतकर्‍याची गोष्ट दाखविली होती. त्याच्या छोट्या शेतात नाना पिके, भाज्या, फळे घेऊन तो चांगली कमाई करत होता. तो कार्यक्र्म बघताना मला समर्थांच्या वरील ओळी आठवल्या. पुराणात म्हण आहे, जे कृषि करतात ते ऋषि. आपले सर्व ऋषि मुनि हे शेती ही करायचे. वैदिक काळात त्यांच्या आश्रमात शेतीवर अनुसंधान ही होत होते. बहुतेक त्यामुळेच आपल्या देशात शेतीत विविधता आली असेल. समर्थ ही एक ऋषि होत. समर्थांनी 12 वर्ष देशाचे भ्रमण केले होते. समर्थांनी भ्रमण करताना देशातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणल्या. पाणी आणि पिकांचे नियोजन केल्या शिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. हे त्यांनी जाणले. समर्थांनी शेतकर्‍यांच्या समस्यांवर उपायही सुचविले. समर्थ म्हणतात, व्यर्थ वाहणारे नदीचे पाणी अडवून बंधारे बांधले पाहिजे. कालवे बांधून पाणी शेतात पोहचविले पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पाण्याची जेवढी उपलब्धता आहे त्यानुसार पिके घेतली पाहिजे. पिकाला जेवढे पाहिजे, तेवढेच पाणी दिले पाहिजे. एकाच वेळी शेतात नाना प्रकारची पिके घेतली पाहिजे. अनेकदा शेतकरी लोभाला बळी पडून संपूर्ण शेतात एकच पीक घेतात. वादळ, वारे, कमी-जास्त पाऊस, पिकाला लागणारी कीड इत्यादि कारणांमुळे पीक हातात येत नाही. शेतकर्‍याचे नुकसान होते.  कधी कधी नगदीच्या लालची ने एखाद्या भागात अनेक शेतकरी एकच पीक घेतात. मग बाजारात भाव मिळत नाही. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होते. बाजारात टमाटो, कांदे इत्यादींचे भाव अचानक गडगडण्याचे हेच मुख्य कारण.  नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. अधिकान्श आत्महत्या करणारे शेतकरी एकच पीक घेणारे असतात. शेतात एकापेक्षा जास्त पीक घेतले असेल तर, शेतकर्‍यावर अशी विपरीत परिस्थिति येणार नाही. समर्थ म्हणतात, शेतात  निश्चित जागी विविध प्रकारची फळ देणारी झाडे ही लावली पाहिजे. झाडे वार्‍यापासून पिकांची सुरक्षा तर करतातच पण फळे देऊन शेतकर्‍याची आर्थिक मदत ही करतात. समर्थांनी सुचविलेल्या वरील उपायानुसार जर शेतकर्‍यांनी शेती केली तर आज ही ते सुवर्ण पीक घेऊ शकतात. 

No comments:

Post a Comment