Wednesday, August 17, 2022

भारतीय शिक्षा बोर्ड

 

1835 पूर्वी देशात 6 लाख गुरुकुल होते. विद्यार्थी गुरुकुलांत सुरवातीच्या पाच-सहा वर्ष स्थानिक भाषा, गणित इत्यादीचे जीवनावश्यक ज्ञान अर्जित करायचे। सामान्य शिक्षण पूर्ण झाल्यावर अधिकान्श विद्यार्थी गुरूंकडून पारंपरिक पेशेवर ज्ञान प्राप्तकरून आत्मनिर्भर होत असे.  उरलेले हुशार विद्यार्थी गणित, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र, तलाव निर्मितीचे शास्त्र, वैद्यक शास्त्र, विज्ञान, संस्कृत भाषा, व्याकरण, दर्शन, वेद उपनिषद  इत्यादि विषय शिकायचे. परिणामी शिक्षित बेरोजगारी हा शब्द अस्तित्वात नव्हता. या शिवाय 1850च्या पूर्वी जगात सर्वात जास्त साक्षर लोक आपल्या देशात होते.  

ब्रिटीशांनी गुरुकुलांना नष्ट करून मैकाले शिक्षण भारतात आणले. शिक्षणाचे मुख्य उद्देश्य होता, भारतीयांना त्यांच्या मुळांपासून तोडणे, त्यांच्यात हीन भावना भरणे आणि ब्रिटीशांसाठी चाकर निर्मिती करणे. या व्यवस्थेत 11/12 वर्ष शालेय शिक्षण घेऊन ही, पारंपरिक ज्ञानापासूनही वंचित झालेले, अधिकान्श विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नव्हते. भारत स्वतंत्र झाला. पण शालेय शिक्षणात बदल झाला नाही. आपल्या इतिहास, परंपरा आणि मुळांशी विद्यार्थ्यांची नाळ जोडण्याकडे दुर्लक्ष केल्या गेले. आजची भारतीय शिक्षा म्हणजे 'बिना नींव की  इमारत'. आज देशातील सीबीएससी समेत अधिकान्श शैक्षणिक बोर्डांचा  उद्देश्य,  '"इधर से आलू डालो, उधर से सोना निकलो"  अर्थात सर्वांना पास करून 12वी पास प्रमाणपत्र देण्या इतका राहिला आहे.  12 वर्ष शिकूनही अर्जित ज्ञांनाच्या मदतीने  विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकत नाही, हे कटू सत्य आहे. आपल्याच मुळांशी नाते तुटल्यामुळे तो आत्म सम्मानरहित हीनभावनेने ग्रस्त ही असतो. परिणाम आज देशात डिग्रीधारिच सर्वात जास्त बेरोजगार आहेत. कारण त्यांच्यापाशी अर्थार्जन करण्याचे ज्ञान नाही आणि सर्वांना सरकारी नौकरी मिळणे शक्य नाही. 

देशात अनेक सरकारी बोर्ड आहेत. मग भारतीय शिक्षा बोर्डाची आवश्यकता कशाला. देशाच्या लोकांशी  नाळ मुळांशी जोडून त्यांच्यात आत्मसम्मांनाची भावना भरण्याचे शिक्षण आजच्या व्यवस्थेत दिले जात नाही. सरकारी नौकरशाही आणि राजनीति मुळे शिक्षणात बदल काळानुसार होणे शक्य नाही. त्यासाठी गैर सरकारी बोर्डाची आवश्यकता आहे. या शिवाय सरकारचा शिक्षणावर होणारा खर्च ही कमी होईल. 

भारतीय शिक्षा बोर्डाचे गठन झाले आहेत. भारत सरकारने ही या बोर्डाला मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांची नाळ आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाशी जोडण्यासाठी संस्कृत भाषा अनिवार्य राहणार. प्रत्येक भाषा शिकताना त्या भाषिक साहित्याकारांसोबत अनुवादित दुसर्‍या भारतीय भाषांचे साहित्य ही राहील. आंग्ल भाषेत शेक्सपियर सोबत वैदिक साहित्य ही असू शकते. विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबत दुसरी भारतीय भाषा ही शिकावी लागेल. इतिहासाच्या पाठ्यक्रमात उपेक्षित दक्षिण भारत आणि पूर्वोत्तर भारताला ही उचित स्थान दिले जाईल. गणित, विज्ञान ,इत्यादि विषयांत उपेक्षित प्राचीन भारतीय विद्वानांना ही स्थान दिले जाईल. ज्ञान विज्ञानात होणारे बदल वेळोवेळी समाविष्ट केले जातील. सर्व धर्मांच्या सकारात्मक मूल्यांना ही स्थान दिले जाईल. रोजगार उन्मुख कौशल विकासावर पाठ्यक्रमात अधिक भर दिला जाईल. 300 हून जास्त प्राध्यापक आणि 2000 हून अधिक शिक्षाविदांनी पाठ्यक्रम निर्मितीचे कार्य जवळपास पूर्ण केले आहे. बहुधा पुढच्यावर्षी पासून शिक्षण कार्य सुरू होईल. आशा आहे, हा बोर्ड शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांति घडवून आणेल. 

No comments:

Post a Comment