Tuesday, June 14, 2022

वार्तालाप (२२)श्रीदासबोध : दशक 12: आचार विचार आणि प्रयत्न

श्रीदासबोधात समर्थांनी पूर्वापार पासून निर्मित वेद उपनिषद आणि समस्त शास्त्रांचे ज्ञान सामान्य जनांना कळेल अश्या सौप्या भाषेत सांगितले आहे. या दशकात इच्छित उद्देश्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्ननांची पराकाष्ठा केली पाहिजे, हे संगितले आहे. श्रीदासबोधात समर्थांनी फक्त उपदेश दिलेला नाही. प्रयत्न कश्यारीतीने केले पाहिजे हे ही सांगतात. आपल्या आचरण आणि व्यवहाराचा प्रभाव दुसर्‍यांवर पडतो. त्यासाठी समर्थांनी माणसाचे आचार, विचार आणि व्यवहार कसे असावे, हे सांगितले  आहे. 

समर्थ म्हणतात माणसाने सकाळी लवकर उठले पाहिजे. स्नान इत्यादि करून व्यवसायासाठी घरातून बाहेर निघण्यापूर्वी स्वच्छ वस्त्र परिधान केले पाहिजे. मलिन वस्त्र घातलेल्या, केश आणि दाढी व्यवस्थित केली नसलेल्या  व्यक्तीचा समोरच्यावर सकारात्म्क प्रभाव पडत नाही. अक्षर सुंदर आणि स्पष्ट असले पाहिजे. तुमचे लिखाण वाचणार्‍याला त्रास झाला नाही पाहिजे. फक्त अनुमानाच्या आधारावर कुठलीही चर्चा केली नाही पाहिजे. प्रत्यक्ष आणि तर्क आधारित प्रमाणाच्या मदतीने नेमकी, मुद्देसूद आणि मृदु भाषेत आपली बाजू सदैव मांडली पाहिजे. फक्त अनुमानाच्या आधारावर कार्य केल्याने गोत्यात येण्याची शक्यता जास्त आणि दुसर्‍यांचा विश्वास गमाविण्याची शक्यताही जास्त. भूतकाळात झालेले अन्याय विसरून दुसर्‍यांना क्षमा करता आली पाहिजे. दंभ दर्प आणि अभिमान यांच्या त्याग करता आला पाहिजे.  सत्याची कास कधीही सोडली नाही पाहिजे. इत्यादि. 

पुढे समर्थ म्हणतात पवित्र आचार आणि विचार इच्छित साध्य करण्यास बहुमोल मदत करतात पण इच्छित साध्य करण्यासाठी प्रयत्नांची ही पराकाष्ठा करावी लागते. आजचे उदाहरण, स्वामी रामदेव ही म्हणतात 'अखंड, प्रचंड, पुरुषार्थ' केल्या शिवाय इच्छित उद्देश्य पूर्ण होत नाही. ते स्वत: सकाळी साडे तीन वाजता उठतात. दीड तास प्रात:विधी आणि व्यायाम, त्यात 5 किमी धावणे ही आले. त्यांची योग कक्षा सकाळी 5 वाजता  प्रारंभ होते. त्या विभिन्न वाहिनींवर साडे नऊ वाजे पर्यन्त चालतात. गेल्या वीस वर्षांपासून एक ही दिवस त्यात खंड पडलेला नाही. त्यानंतर विभिन्न संस्थांचे कार्यक्र्म, शेकडो रुग्णांना प्रत्यक्ष भेटणे, देशातील विभिन्न प्रदेशांना भेट देऊन रात्री तीन वाजता परतल्यावर ही सकाळी साडे तीन वाजता पुन्हा नवीन सुरुवात होतेच. समर्थांनी म्हंटलेच आहे 'बोलण्यासारिखें चालणे, स्वयें करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे'. जगातील सर्वच प्रसिध्द व्यक्ति मग त्या वैज्ञानिक असो, राजनेता असो की व्यवसायिक सर्वच 18-18 तास कार्य करतात. बोलतात तसेच वागतात. आपले पंतप्रधान ही रोज 18 तास काम करतात.  सारांश उत्तम मार्गांचा अवलंबन करून आणि सतत निरंतर प्रयत्न केल्याशिवाय आयुष्यात इच्छित उद्देश्य पूर्ण होत नाही. 

No comments:

Post a Comment