Saturday, May 23, 2020

पंतप्रधानांच्या विजयाची मुख्य कारणे


गेल्यावर्षी आजच्या दिवशी अर्थात 23 मई २०19 ला लोकसभा निवडणुकीचे परिणाम आले. अनेक मराठी आणि भारतीय प्रसार माध्यमातील दिग्गजांनी त्यांच्या विजयाचे विश्लेषण केले. गेली काही दिवस त्यांचे अध्ययन केले. अधिकांश दिग्गजांच्यामते गेल्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था बुडाली, शेतकरी त्रस्त होते, तरीही फक्त बालाकोट आणि आणि मतांच्या ध्रुवीकरणमुळे पंतप्रधान पुन्हा निवडून आले. असे विश्लेषण ऐकून/ वाचून हसावे की रडावे काहीच कळत नव्हते. बहुतेक दावणीला बांधले असल्यामुळे विचारशक्ती हरवलेल्या दिग्गजांना लोकांनी जातीपातीचे बंधन झुगारून  पंतप्रधान मोदींना पुन्हा निवडून दिले हे समजले नसावे. 

जनतेने पंतप्रधानांना पुन्हा निवडून दिले त्याचे खरी कारणे:
१. जनधन खाते आणि नोट बंदी: देशात बॅंकांचे सरकारी करण १९६९ झाले असले तरी देशातील बहुसंख्य गरीब आणि निम्न वर्गीय जनते जवळ बँक खाते नव्हते. बहुतेक बँकेत पाय ठेवणे ही त्यांना जमत नव्हते. घरात पैसा साठवणे कधीच कुणाला जमत नाही. त्यामुळे अडचणीच्या वेळी सावकारांकडून शंभर रुपयांवर पाच रुपये महिना व्याजाने कर्ज घ्यावे लागायचे. दिल्लीत हाच रेट होता. अश्या पस्तीस कोटीहून जास्त गरिबांना बँक खाते मिळाले. त्यांनाही बचतीची सवय लागली. त्यानंतर नोट बंदी आली. गरिबांच्या दृष्टीने नोट बंदी म्हणजे बिना मेहनतीची कमाई. दुसऱ्यांचे नोट बदलून, खात्यात ४९००० ते २.५० लाख दुसऱ्यांचे ठेऊन कोट्यावधी गरिबांनी  लाख  कोटींची कमाई  कमीतकमी केली असावी. त्यांच्या मनात आपले पंतप्रधान इमानदार आहेत आणि चोरांवर कडक कारवाई करीत आहे ही धारणा पक्की झाली आणि एक मोठा व्होट बँक ही पक्का झाला.

२. मोठे होणारे रस्ते आणि रेल्वे स्टेशन: आपल्या देशात कोट्यवधी लोक रोज प्रवास करतात. वेगात होणारे रस्त्यांचे रुंदीकरण डोळ्यांनी जनतेला स्पष्ट दिसले. आधुनिक झालेले रेल्वे स्टेशन, स्वचलीत पायऱ्या, नवीन डब्बे, हे सर्व लोकांच्या नजरेत भरणारच आणि व्होट बँक वर ही परिणाम होणारच.

३. घरोघरी संडास:. ही मोहीम जोरदार रीतीने राबवून संडास बांधल्या गेले. याचा परिणाम ग्रामीण जनतेवर विशेषकरून महिलांवर झालाच.

४. उज्ज्वला योजनेमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात घरोघरी वीज पोहचली. विजेच्या उत्पादनात अभूतपूर्व वृध्दी झाल्याने खेड्यापाड्यात ही दिवसभर वीस दिसू लागली. २०14 च्या पूर्वी मेरठ जवळच्या गावात एका मित्राकडे गेलो होतो. गावात प्रत्येकाच्या घरी डिझेल जनरेटर होते. कारण दिवसातून चार तास ही वीज रहायची नाही. पण पाच वर्षांत परिस्थिती बदलली. त्याचाही मोठा परिणाम व्होट बँक वर झाला.

५.  या शिवाय गरिबांसाठी घरे, मुद्रा योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान, आयुष्मान योजना, स्वस्त औषधांची दुकाने, इत्यादी योजनांचा परिणाम ही व्होट बँक वर बऱ्यापैकी परिणाम झालाच.

स्वतंत्रता प्राप्तीनंतर प्रथमच सामान्य गरीब जनतेला त्यांच्या गरजेनुसार सरकारी योजनांचा लाभ मिळाला. हेच पंतप्रधान मोदींच्या विजयाचे खरी कारण होते.

No comments:

Post a Comment