Wednesday, October 15, 2025

मनाचे श्लोक आणि विवाद

हिंदीत एक म्हण आहे—"बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो होगा!"

नाव + कुप्रसिद्धी = पैसा या गणितीय समीकरणाचा लाभ अनेकांना झालेला आहे. मराठी सिनेमांचे बजेट तसेच कमी असते. त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी डोके वापरावे लागते. या निर्मात्यानेही डोक्याचा वापर केला आणि सिनेमाला प्रसिद्धी मिळवून दिली.

ज्या सिनेमाचा समर्थ रामदास रचित मनाचे श्लोकशी काहीही संबंध नाही, त्या सिनेमाला मनाचे श्लोक हे नाव दिल्यावर जनता भडकली पाहिजे, विरोधात उतरली पाहिजे—अशी निर्मात्याची अपेक्षा होती आणि तसेच घडले. एक पैसा खर्च न करता सिनेमाला प्रसिद्धी मिळाली. आता जेंव्हा तो सिनेमा नवीन नावाने पुन्हा रिलीज होईल, तेंव्हा तो चालण्याची शक्यता अधिक आहे.

मला एकाने विचारले, "पटाईत साहेब, सेन्सॉर बोर्डने या नावाला अनुमती का दिली असेल?"

मी उत्तर दिले, मला असे वाटते सेन्सॉर बोर्ड फक्त दोन बाबींवर लक्ष देतो:

  1. अल्पसंख्यकांच्या भावना दुखावल्या तर गेल्या नाही?
    कारण तसे झाले तर 'सर तन से जुदा' फतवा निघू शकतो. त्याचा त्रास कलाकारांना आणि निर्मात्याला होऊ शकतो. 
  2. सिनेमात अश्लीलता आणि हिंसा कितपत आहे?
    बहुतेक निर्मात्याच्या वजनाच्या आधारावर किती कात्री लावायची, हे ठरवले जात असेल.  

मनाचे श्लोक या सिनेमात वरील दोन्ही बाबी नसल्यामुळे तो सेन्सॉरने सहज पास केला.

मराठी कलाकारांची प्रतिक्रिया फेसबुकवर वाचली. अधिकांश मराठी कलाकार शिक्षित आहेत. मनात अनेक प्रश्न आले,चित्रपटाचे समर्थन करताना त्यांनी कोट्यवधी समर्थ भक्तांच्या भावनांचा विचार का केला नाही? मनाचे श्लोक बाबत दुष्प्रचार होतो आहे, असे त्यांना का वाटले नाही. फक्त सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाचा दुरुपयोग करणाऱ्या निर्मात्याची निंदा त्यांनी का केली नाही. 

जर मराठी सिनेसृष्टी आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न करणार नसेल,आपल्या चुका सुधारण्या एवजी त्या चुकांचे समर्थन करीत राहील तर "मराठी सिनेमे मराठी दर्शकांनी पहावेत" ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ ठरेल.


Saturday, October 11, 2025

विरहातून जन्मलेली सृष्टी

सृष्टीच्या प्रारंभात, सृष्टीकर्त्याने सर्वप्रथम पृथ्वीची निर्मिती केली. त्याने पृथ्वीवर समुद्र आणि धरतीची रचना केली. या नवसर्जित जगात चैतन्य निर्माण व्हावे, जीवन फुलावे, यासाठी सृष्टीकर्त्याने त्यांच्या मनात प्रेम आणि कामभावना उत्पन्न केल्या.

पण एक समस्या होती-  जर समुद्र आणि धरती कामातुर होऊन एकमेकांच्या सान्निध्यात आले, तर त्यांचे मिलन प्रलय घडवेल. धरती समुद्राशी एकरूप होईल आणि साऱ्या सृष्टीचा अंत होईल. म्हणूनच सृष्टीकर्त्याने समुद्राकडून एक वचन घेतले: "युगाच्या अंतापर्यंत तुला धरतीपासून दूर राहावे लागेल."

प्रेम आणि कामभावने शिवाय पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती अशक्य होती. पण जिथे प्रेम असते, तिथे मार्ग सापडतो.

सूर्याच्या प्रखर उन्हात धरती विरहाग्नीत जळू लागली. तिच्या अंतःकरणात समुद्राची ओढ पेटू लागली. समुद्राचीही तीच अवस्था झाली—तो घामाने बेजार झाला. त्याचे पाणी वाष्परूप घेऊन नभात जाऊ लागले. त्या वाफेने वादळाचे स्वरूप घेतले. ते वादळ प्रेमाने ओथंबलेले होते.

समुद्राच्या प्रेमाने भरलेले ते वादळ आकाशात उंच गेले. काळ्याकुट्ट मेघांच्या रूपात ते धरतीच्या दिशेने आले. धरतीने त्या वादळाकडे पाहिले आणि त्यात तिला समुद्राची आत्मा दिसली. तिने दोन्ही बाहू उंच करून त्या वादळाचे स्वागत केले.

प्रेमाच्या वर्षावात धरती चिंब भिजली. तिच्या गर्भात जीवन अंकुरले. ती प्रसूत झाली. आणि अखेर, पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती झाली.

वादळ पुन्हा-पुन्हा येतं आणि जातं. प्रत्येक वेळी, पृथ्वी आणि समुद्र क्षणभर एकमेकांना स्पर्श करतात. नवजीवन जन्म घेतं. सृष्टीकर्त्याचे  वचन नियम न राहता, एक अखंड परंपरा बनते. निर्मितीचा जणू एक यज्ञच. 


Tuesday, October 7, 2025

जिन्नने प्रदूषण दूर केले

अलादीन सकाळी-सकाळी लोधी गार्डनमध्ये फेरफटका मारत होता. अचानक एक झणझणीत वाऱ्याचा झोत आला आणि पेट्रोलच्या तीव्र वासाने त्याचे नाक जळजळले. नाक मुरडत तो पुटपुटला, “निसर्गाच्या कुशीतसुद्धा शुद्ध हवा नाही! या प्रदूषणावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा.”

तेवढ्यात त्याचा पाय एका कठीण वस्तूला लागला. तो थोडा डगमगला, पण पडला नाही. खाली पाहिलं तर एक जुना, मळलेला दिवा पडलेला होता. उत्सुकतेने त्याने तो उचलला. “खूप जुना दिसतोय… कदाचित चांगला भाव मिळेल,” असं म्हणत त्याने रुमालाने दिवा  पुसायला सुरुवात केली.

अचानक दिव्यातून धूर निघाला—आणि एक जिन्न प्रकट झाला.

“काय आज्ञा आहे, मालिक?” जिन्नने विचारलं.

अलादीन दचकला. गोंधळून म्हणाला, “काही आज्ञा नाही. दिव्यात परत जा.”

जिन्नने  मान झुकवली आणि म्हणाला, “मालिक, मी तुमची एखादी आज्ञा पूर्ण केल्याशिवाय परत जाऊ शकत नाही. तुम्हाला काहीतरी आज्ञा द्यावीच लागेल.”

अलादीनने स्वतःला सावरलं. “ठीक आहे. सांग—तू काय करू शकतोस?”

“माझ्यासाठी काहीही अशक्य नाही,” जिन्न म्हणाला. “जे मनुष्य करू शकत नाही, ते काम पण मी करू शकतो.”

अलादीन हसला. त्याने जिन्नची फिरकी घ्यायचे ठरविले. त्याने जिन्नला आदेश दिला,  "पृथ्वीवरील सगळं प्रदूषण तात्काळ आणि पूर्णपणे नष्ट करून टाक.”

जिन्न हात जोडून शांत उभा राहिला.

अलादीनने जिन्नला टोमणा मारला, “काय झालं? प्रदूषणाने तुलाही हरवलं का? मला माहीत होतं—हे काम तुझ्या आवाक्याबाहेरचं आहे. तो दिव्यात  परत जा आणि झोप घे. जेव्हा तुझ्या लायकीचं काही काम असेल, तेव्हा मी तुला बोलावीन.”

जिन्नच्या आवाजात एक कंप होता— खोल दुःखाचा. तो म्हणाला “मालिक, मी प्रदूषण मूळासकट नष्ट करू शकतो… पण—”

“पण, किंतु, परंतु!” अलादीन चिडून म्हणाला. “तू तर माणसांसारखी बहाणेबाजी शिकलीस वाटतं. आपल्या मालकाची आज्ञा पाळ—किंवा मान्य कर की तू असमर्थ आहेस.”

जिन्नने मान झुकवली, जणू तो अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करत होता. “जशी आज्ञा, मालिक.” त्याने डोळे मिटले, एक मंत्र उच्चारला आणि आकाशात एक विचित्र शांतता पसरली.

क्षणभरात मानवजातीचा श्वास थांबला. अलादीनसह सर्व मानव—आपापल्या पापांच्या ओझ्याने—नरकाच्या ज्वाळांमध्ये विलीन झाले. पृथ्वीने सुटकेचा श्वास घेतला… आणि पुन्हा एकदा हिरवीगार झाली.

 

Thursday, October 2, 2025

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

 
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही, तरीही देशातील सर्वात मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनेबाबत अंतरजालावर उपलब्ध माहिती या लेखात सादर करत आहे.
 
आज RSS च्या लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.
 
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ,६०० वनवासी गावांपैकी सुमारे ,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात.
 
१९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.
 
महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार हरिजनसाप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना केसरीदैनिकात जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.

देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च  लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला.

२००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस  आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले.
 
कोरोना महामारीच्या काळात, RSS चे लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.
 
२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.

शहरातील निवासी असो की वनवासीसर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस मुख्य ध्येय आहे.