Friday, May 2, 2025

समर्थ विचार: पाद सेवन भक्तिचे सांसारिक महत्व


पाद सेवन तेंचि जाणवें.
काया वाचा मनोभावें. 
सद्गुरूचे पाय सेवावे. 
सद्गतीकारणे.  
(दासबोध ४/२)

पाद सेवन भक्ति म्हणजे गुरूचे पाय चेपणे नव्हे. समर्थ म्हणतात सद्गुरूने दिलेल्या मंत्राचा अर्थात ज्ञानाचा, काया वाचा मनोभावे जप करणे अर्थात त्यावर मनन चिंतन करणे. प्राप्त ज्ञानाचा उपयोग कसा  करवा हे जाणून घेणे. सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाचा संसारीक जीवनात आणि अध्यात्माच्या प्रवासात उत्तम रीतीने वापर केल्यानेच आध्यात्मिक आणि संसारीक मार्ग सुकर होतो. समर्थ पुढे म्हणतात,  
 
जें अभ्यासें अभ्यासितां नये.
जें साधनें असाध्य होये. 
तें हें सद्गुरूविण काये. 
उमजों जाणे. 
(दासबोध ४/२०)

अभ्यास करून, पुस्तके वाचून, यूट्यूब, एआईची मदत घेऊन ज्ञान प्राप्ती होऊ शकते. पण ज्ञानाचा वापर कसा करावा हे कळू शकत नाही. त्यासाठी त्या क्षेत्रातील सद्गुरू शोधावा लागतो आणि त्याच्या कडून ज्ञानाचा सांसारिक पक्ष  शिकवा लागतो. त्यासाठी  भगवद्गीतेत, भगवंत म्हणतात: 

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: || 34 ||

आयटीआय मधून एकाने ऑटोमोबाइल मध्ये डिप्लोमा घेतला. लगेच गराज उघडून तो गाड्या ठीक करू शकणार का? उत्तर नाही. त्याला त्या क्षेत्रातील उत्तम उस्तादाकडे जावे लागेल. श्रद्धापूर्वक त्याची सेवा करावे लागेल. विनम्रतेने प्रश्न विचारून मनातील शंका दूर करून घ्यावा लागतील.  या साठी त्याला सतत उस्तादच्या सांधित्यात राहावे लागेल. त्याला रोज 18 तास काम करावे लागले तरी त्याने ते पूर्ण श्रद्धेने केले पाहिजे. तेंव्हाच त्याला उस्ताद कडून कामाचे बारकावे शिकायला मिळेल. त्यानंतरच तो स्वत:चे गराज उघडून गाड्या दुरुस्तीचे काम उत्तम रीतीने करू शकेल. 

डॉक्टर असो, वकील असो किंवा किराण्याची दुकान उघड्याची असेल,  सर्वांना सद्गुरूची (त्या क्षेत्रातील जाणकार) सेवा करून प्राप्त विद्येचा उपयोग कसा करवा हे शिकावे लागते. सद्गुरूच्या चरणी बसूनच  सांसारिक उन्नतीचा मार्ग आपल्याला सापडतो. हेच पाद सेवन भक्तीचे सांसारिक महत्व आहे.   




Monday, April 28, 2025

कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. लक्ष्मी रूपाने त्याच्या घरी सदैव निवास करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी  तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गो आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गो दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गाय प्रदान केली. मुख्य उद्देश्य देशात गायीच्या दूधाचे उत्पादन वाढविणे आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविणे होता. आज ही अनेक राज्यांत गाय पाळण्यासाठी सरकार अनुदान देते. गो सेवा केल्याने शेतकर्‍यांचे जीवनमान सुधरले. दूध आयात कमी झाले. आज आपण दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात ही करतो. देशात १९ कोटी गायी आहेत त्यात 5 कोटी विदेशी आणि संकर गायी आहेत. त्यात 13 कोटी गायी दूध देणार्‍या आहेत. दुधाचे उत्पादन 2014-15 मध्ये 146.3 एमटी होते जे वाढून 23-24 मध्ये 239.2 एमटी झाले. दुग्ध जन्य पदार्थांचा निर्यात 2014 मध्ये 141.39 मिलियन युएस डॉलर होता तो 23-24 मध्ये वाढून 272.64 मिलियन डॉलर झाला. देशात अमूल, मदर डेअरी, नंदिनी सारखे मोठे ब्रॅंड तैयार झाले. कोट्यवधी शेतकर्‍यांना त्याच्या लाभ झाला. असो 

आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे. आज ही आपण  यज्ञ हवन आणि धार्मिक समारंभात आपण गायीच्या गोवार्‍यांच्या उपयोग करतो. गायीच्या शेणापासून, उदबत्ती, धूप, संभ्राणी कप, हवन कप, दिवे इत्यादि पूजा सामग्री बनतात.  

शंभर वर्षांपूर्वी आणि आज ही भारतात ग्रामीण भागात आणि जगात अनेक भागांत घरांच्या निर्मिती साठी माती आणि शेणाचा वापर होतो. काही वर्षांपूर्वी अशोक नगर जवळ एका मराठी जमींदाराच्या शेताला भेट दिली होती. बाहेर भयंकर गरमी होती पण शेतात असलेल्या मातीच्या (माती आणि बांबू वापरुन पूर्वी घरे बनत होती) आणि वरती मातीची  कौलारू छत)  घरात वातावरण थंड होते. मातीच्या घरांच्या निर्मिती आणि रखरखावचा खर्च अत्यंत कमी असतो. या शिवाय भूकंप इत्यादि आल्या तरी तुमचे प्राण वाचण्याची शाश्वती. आज गायीच्या शेणापासून वीट,टाईल्स बनतात. शेणापासून बनलेल्या वैदिक प्लास्टरचा आणि पेंटचा उपयोग केला तर घराचे तापमान बाहेरपेक्षा आठ ते दहा डिग्री कमी राहते.  घर निर्मितीचा खर्च ही कमी येतो. याशिवाय ज्याच्या कडे गाय आहे. तो गोबर गॅसचा वापर करू शकतो आणि खत तर बाई प्रॉडक्ट म्हणून तैयार होणारच. घरासाठी शेणाचा वापर पर्यावरणाला पोशाक ही आहे आणि खर्च वाचविणारा ही आहे.  

आज अधिकान्श शेतकरी जास्त उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा जास्त वापर करतात. सरकारी ही रासायनिक खतांवर भारी भरकम अनुदान देते.  पण जेवढा शेतकर्‍यांचा खर्च वाढत जातो तेवढे उत्पादन मिळत नाही. या शिवाय कितीही रासायनिक शेती केली तरी दर दोन किंवा तीन वर्षानी प्रति हेक्टर 12 ते 15 टन शेण  खत विकत घेऊन  शेतात टाकावे लागते. किमान तीस ते 50 हजार खर्च करावा लागतो. 

देसी गायीच्या गो मूत्रात असंख्य सक्रिय संयुगे असतात. मुख्यत: नाइट्रोजन, युरिया आणि खनिज इत्यादि ज्यांचा वापर खत आणि कीटनाशक बनविण्यात वापर होतो. गो मूत्रात तांबे, लोह आणि जास्त सारखी खनिजे सापडतात जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. गायीच्या शेणात ही असंख्य संयुगे असतात. नायट्रोजन, फास्फोरस, पोटाशीयम असतात. असंख्य सूक्ष्मजीव असतात जे मातीच्या आरोग्यासाठी आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात. शेतीत गो मूत्र आणि शेणाच्या वापराने शेत जमीन सुपीक आणि समृद्ध होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते. एखाद वर्षी पाऊस कमी झाला तरी शेती होऊ शकते. पण यांच्या जास्त वापराने जमिनीचा पोत बिघडतो. कालांतरात जमीन नापीक होते. जमिनीतील पानी ही प्रदूषित होते. कृषि वैज्ञानिकांच्या मते विशेषकरून रासायनिक खतांचा वापर कमी झाला नाही तर भविष्यात जमिनीतील पानी पिण्याचे सोडा ओंघोळीच्या लायकीचे राहणार नाही. आज रासायनिक खतांचा आणि किट नाशकांचा परिणाम शेतकर्‍यांना भोगावा लागतो आहे. एक तर  शेतीचा खर्च वाढला दूसरा लाखो शेतकरी कॅन्सर ग्रस्त  होतात.  पंजाबातून बिकानेरला जाणार्‍या गाडीचे नावच कॅन्सर ट्रेन पडले आहे. रासायनिक खत आणि किटनाशक वापरुन पिकावलेले अन्न ही विषाक्त असते. अश्या अन्नाचे सेवन करून कोट्यवधी लोक दरवर्षी रोगग्रस्त होतात. हजारो कोटी उपचारावर खर्च होतात. आज हजारो शेतकरी पुन्हा गोमय आधारित शेतीकडे वळत आहे किंवा स्वत:च्या वापरासाठी उपयोग करत आहे. 

आयुर्वेदात रूग्णांच्या उपचारासाठी पंचगव्याचा वापर होतो. गोमूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो. आज मोठ्या प्रमाणात गो मूत्रावर संशोधन सुरू आहे. फिनायाल एवजी घरात  गोनायलने  (डिस्टील गो मूत्र आणि पाणी,  कडू लिंब, निलगिरी, वज आणि पाईन तेल पासून) फरशी पुसली तर किटाणू आणि जिवाणू पासून सुरक्षा ही मिळते आणि अपायकरक ही नसते. आज हजारो गोशाला गोनायल, आंघोळीचे साबण आणि गो अर्क बनवितात.  एका स्वदेशी कंपनी ने 100 कोटीहून जास्त रुपयांचे गो अर्क आणि गोनायल गेल्या वर्षी विकले. शेतकर्यांना ही गोमूत्र विकून एका लीटरचे पाच ते दहा रुपये  सहज मिळतात. गेल्यावर्षी   गोमय  निर्मित वस्तूंचा 400 कोटींचा निर्यात आपण केला. 

जर गोपालक आणि शेतकर्‍याने गोमयचा आर्थिक दृष्टीकोणातून उपयोग केला तर गोमूत्र आणि शेण यातून विभिन्न जीवनावश्यक उपयोगी पदार्थांची निर्मिती करून  गायीच्या दुधापेक्षा जास्त कमाई करू शकतो.  शेतकर्‍याने एक गाय पाळून किमान एक हेक्टर शेतीत गोमूत्र आधारित किटनाशकांचा  आणि शेणाचा उपयोग करून खर्च वाचवू शकतो. जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जमिनीची सुपीकता आणि पाणी धरण करण्याची क्षमता वाढवू शकतो.  जास्त नफा मिळवू शकतो. 

गायीच्या गोमूत्र आणि शेणाचे आर्थिक महत्व आपल्या ऋषींना माहीत होते म्हणून ते म्हणाले   "गोमय वसते लक्ष्मी


Monday, April 21, 2025

समर्थ विचार: ग्रंथ वाचल्या शिवाय नाव ठेवणारा मूर्ख असतो

समूळ ग्रंथ पाहिल्याविण. 
उगाच ठेवी जो दूषण. 
गुण सांगतां पाहे अवगुण. 
तो एक पढत मूर्ख. 
(दासबोध: 2.10.26)

समर्थ म्हणतात कोणत्याही ग्रंथाची समीक्षा करण्यापूर्वी तो ग्रंथ वाचला पाहिजे. उत्तम गुरूंकडून त्या ग्रंथातील शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतर त्या ग्रंथाची समीक्षा केली पाहिजे. ग्रंथातील गुण आणि दोष इत्यादीचे चिंतन आणि मनन करून, त्या ग्रंथाचा सार ग्रहण केला पाहिजे. त्या ग्रंथातील गुण आपल्याला घ्यायचे आहे आणि दोष टाकून द्यायचे आहे. 

कबीर दास ही म्हणतात:  

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय.
सार -सार को गहि थोथा देई उड़ाय.

ज्या प्रमाणे धान्यातील भूसा, कचरा, खड़े इत्यादि धान्यातून वेगळे करण्यासाठी सूपाला हाताने जोरात फटकारावे लागते. हाताने सूप फटकारताना  डोक्याचा आणि डोळ्यांचा वापर ही करावा लागतो. तसे नाही केले तर कचर्‍या सोबत धान्य सूप फटकारताना उडून जाईल.  

आपले अधिकान्श ग्रंथ अत्यंत प्राचीन असल्याने आणि त्या वेळी प्रिंटिंग प्रेसचे अस्तित्व नसल्याने, अनेक सुलेखकांनी त्यात भेसळ केली आहे. ती चांगली आणि वाईट दोन्ही आहे. त्यामुळे प्राचीन ग्रंथ वाचताना, कबीरदासचा हा दोहा नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे. माझा एक दलित कबीरपंथी सहकारी होता. मनुस्मृती बहुतेक ब्राह्मणांनी दलितांना गुलाम बनविण्यासाठी लिहली असावी असे त्याचे मत होते. पण त्याला वाचण्याची आवड होती. एक दिवस लाईब्रेरीतून मनुस्मृती आणून त्याला वाचायला दिली आणि म्हंटले,  कबीरदासच्या नजरेतून या पुस्तकातील गुण दोष वेगळे करून तुझे मत मला सांग.  काही दिवसांनी त्याने पुस्तक परत केले आणि म्हणाला बहुतेक धर्म आणि दलित विरोधी नेताच मनुस्मृतीचा विरोध करतात. त्याच्या विचारात झालेल्या बदलाने मी ही आश्चर्यचकीत झालो.

आपल्या देशात बिना वाचता ज्या ग्रंथला जाळल्या जाते तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती, स्त्री, पुरुष, ब्राह्मण, शूद्र सर्वांना शिक्षणाचा अधिकार देते. गुरुकुलांत शिक्षण प्रारंभ करताना ब्रम्हचारी आणि ब्रम्हचारिणी सर्वांचा यज्ञोपवीत होत असे. सर्वांना स्नान संध्याचा अधिकार होता.  आज ही माझ्या माहीत प्रमाणे आर्यसमाज गुरुकुलांत आणि बाबा रामदेवच्या शाळांत सर्वांचा यज्ञोपवीत होतो. यू ट्यूब वर व्हिडिओ दिसतील. शिक्षणानंतर योग्यते अनुसार वर्ण ठरत असे. त्याकाळी ब्राम्हण कुळात जन्मलेला विद्यार्थी ही शूद्र होत असे आणि शूद्र ही ब्राम्हण होत होता. उदा. रत्नाकर ते वाल्मिकी, वैश्या पुत्र सत्यकाम जाबाली आणि महामुनी व्यास तर धीवर कन्येपासून विवाह बाहय संबंधातून उत्पन्न झाले होते. आपल्या संविधानात जाती जन्मानुसार आहे. आज शूद्र  ब्राम्हण बनू शकत नाही. मनुस्मृती शिक्षणात भेदभाव करत नाही. वयाच्या आठ वर्षांनंतर सर्व मुलांनी गुरुकुलात राहावे असा निर्देश मनुस्मृतीत आहे. बाल विवाहाचा ही निषेध मनुस्मृतीत आहे. रजस्वला झाल्यानंतर 36 महिन्यांनंतर अर्थात वयाच्या 16 वर्षांनंतरच  स्त्रीचा  विवाह झाला पाहिजे अशी व्यवस्था मनुने दिली आहे. विवाह पूर्वी स्त्रीचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे होते. मनुने विधवेला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार दिला आहे. पुत्र प्राप्त करण्याचा अधिकार ही दिला आहे. महाभारतात तो कुंतीने वापरला ही आहे. मनुस्मृती तर एकाच अपराधासाठी शुद्राला सर्वात कमी दंड  (कारण तो बुद्धीने न्यून आहे), त्याच्या आठ पट जास्त वैश्याला, 32 पट जास्त क्षत्रियाला आणि 64 पट ब्राह्मणाला. राजाला तर सहस्त्र पट जास्त. इत्यादि इत्यादि. तो जिज्ञासु असल्याने मनुस्मृती वाचून त्याचा दृष्टीकोण बदलला. त्याचे विचार बदलले. 

बाकी मूर्ख माणसांना धान्यात असलेले तांदूळ, गहू दिसणार नाही. त्यांना फक्त कचरा, खडे, दगड इत्यादि दिसतात आणि ते सर्व धान्य उडवून लावतात. तसेच ग्रंथांना नावे ठेवणारे आणि ग्रंथांना जाळणारे असतात. बाकी दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी म्हंटले आहे, ज्याचा मनात जैसा भाव,  तसेच फळ ग्रंथ वाचून मिळते.


Saturday, April 19, 2025

समर्थ विचार: तमोगुणी भक्ति म्हणजे जिवंतपणे नरक यातना भोगणे

मानवीय जीवनाचे उद्दीष्ट धर्म मार्गावर चालत अर्थार्जन करणे, त्या धनाचा उपयोग स्वतच्या परिवारसाठी आणि समाज कल्याणसाठी करणे, हळू-हळू भौतिक सुखांचा त्याग करत अध्यात्माची वाटचाल करून मोक्षाची प्राप्ती करणे. धर्म मार्गावर चालण्यासाठी स्वस्थ शरीर आणि मन पाहिजे. पुरुषार्थ करण्याची क्षमता पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगति करण्यासाठी नानाविध धार्मिक ग्रंथांचे श्रवण आणि मनन करावे लागते, उत्तम गुरूंकडून समजून घ्यावे लागते आणि आचरणात उतरवावे लागते. या साठी पुरुषार्थ हा करावाच लागतो.तेंव्हाच आध्यात्मिक क्षेत्रात साधकाची प्रगति होते. आध्यात्मिक मार्गावर चालण्यार्‍या साधकाला आत्मसंतोष रूपी स्वर्ग सुखाची प्राप्ती तर याच जीवनात  होते

पण माणूस स्वभावाने आळशी असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात पुरुषार्थ करू शकत नाही. मग तो भौतिक आणि आध्यात्मिक जगात  प्रसिद्धीसाठी  सौपा आणि तामसिक मार्ग निवडतो. त्याला वाटते शरीराला कष्ट देणार्‍या तामसिक मार्गाचा अवलंबन करून या लोकात सहज स्वर्ग सुख भोगता येते आणि मोक्षाची प्राप्ती ही होते. 

समर्थांनी दासबोधातील दुसर्‍या दशकातील सहाव्या समासात भगवंताला प्रसन्न करण्यासाठी किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी  शरीराला त्रास देण्याच्या प्रकारांचे वर्णन केले आहे. उदा. गळ टोचून घेणे, निखर्‍यावरून चालणे, जिभेला टोचून घेणे, देवतेले जीभ अर्पित करणे, डोक्यावर पेटलेल्या सरक्या ठेऊन चालणे, एक हात सदैव उंच ठेऊन वाळवून घेणे, स्वत:ला गळ्या पर्यन्त जमिनीत पुरून घेणे इत्यादि इत्यादि. काही तामसिक भक्त आपले शिर देवतेला अर्पित करून देतात तर काही देवाच्या दारी निराहार राहून प्राण त्याग करतात. अश्या तामसिक भक्तांना आत्महत्येचे पाप भोगावे लागते. नुकताच कुंभ मेला पूर्ण झाला. समर्थांनी वर्णन केलेले सर्व तामसिक प्रकार या मेळाव्यात  दिसले.   

अनेक महीने एक हात सतत उंच ठेवला तो वाळून जाईल. शरीराला कष्ट होईल. ईश्वराची प्राप्ती होणार नाही. देवतेला जीभ कापून अर्पित केल्याने साधक आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. याच प्रमाणे नाना प्रकारे शरीराला कष्ट दिल्याने साधकाला शारीरिक कष्ट होईल. जीवंतपणी नरक यातना सोसाव्या लागतील. ईश्वर प्राप्ती निश्चित होणार नाही. मोक्ष प्राप्तीचा प्रश्नच येत नाही. त्याला उदर निर्वाहासाठी काही काळ दान-दक्षिणा अवश्य मिळेल. अश्या अनेक तामसिक मार्गावर चालणार्‍या साधकांना काही काळानंतर पश्चाताप होतो. पण अधिकान्शांच्या बाबतीत वेळ निघून गेलेली असते. जीर्ण शरीर आणि मनाने पुरुषार्थ करणे ही शक्य होत नाही. उरलेल्या आयुष्यात फक्त नरक यातना त्यांच्या नशिबी येतात. 




 

Monday, April 14, 2025

स्वप्नाची टीम: दोन लघु कथा

 

फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्‍या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला. पण त्याच्या काही फायदा होणार नव्हता. त्याचा त्रिफळा उडालेला होता. राजेश आऊट झालेला होता. तो पेवेलियन मध्ये परतला. त्याच्या फ्रेंचाईसच्या मालकिणीने त्याच्या कडे पाहून थंब्स अप केले. राजेशने ही तिच्या कडे पाहत एक स्माईल दिले. 

रात्री बेडरूम मध्ये राजेश आपल्या बायकोला म्हणाला, राणी तुझ्या स्वप्नाचे फार्म हाऊस घेण्याची इच्छा आज मी पूर्ण केली. 

(2)

राजेशचा त्रिफळा उडाला आणि राजूने डोक्यावर हात मारला. राजू स्वत:ला बुद्धिमान समजत होता. लीग खेळणार्‍या सर्व खेळाडुंचे आंकडे त्याला माहीत होते. कोणता खेळाडू, कोणत्या गोलंदाजाविरुद्ध चांगला खेळतो, कोणत्या मैदानात चेंडू कसा येतो इत्यादींचे त्याने उत्तम रीतीने अध्ययन केले होते. त्याच आधारावर तो  दररोज स्वप्नील टीम बनवायचा. प्रत्येक मॅच संपल्यावर आपल्या चुका  शोधायचा. त्याने आकड्यांच्या आधारावर आजच्या फायनल मॅचसाठी स्वप्नील टीम निवडली होती. आज एक कोटी जिंकण्याची त्याला शंभर टक्के खात्री होती. मॅच संपला. निवडणूकीच्या सर्व्हे प्रमाणे त्याचे अंदाज या वेळी ही चुकले होते. या सीझन मध्ये कर्ज घेऊन त्याने लाखो रुपये स्वप्नील टीम वर खर्च केले होते. लोकांचे कर्ज कसे चुकविणार, बायको मुलांचे पोट कसे भरणार... या यक्ष प्रश्नांचे उत्तर त्याच्यापाशी नव्हते. न कळत त्याची पाऊले रेल्वे लाइनच्या दिशेने चालू लागली.....