Wednesday, September 22, 2021

भगवद्गीता : मध्यस्थ लक्षण


उद्योग, व्यापार, नौकरी, परिवार जिथेहि द्विपक्षीय व्यवहार आहे, तिथे विवाद होण्याची संभावना सदैव असतेच.  परस्पर  विवाद जर न्यायालयात गेले तर दोन्ही पक्षांत कटुता येते. पुन्हा व्यवहार करणे कठीण जाते. याशिवाय वेळहि भरपूर लागतो. अश्यावेळी मध्यस्थाच्या मदतीने विवादाचे दोन्ही पक्षांना मान्य असे समाधान काढले जाते.  दोन्ही पक्षांचा ज्या व्यक्ती/ संस्थेवर विश्वास असतो तो मध्यस्थाचे कार्य करतो. जुन्या दिल्लीत अनेक व्यक्ती पिढीजात मध्यस्थाचे कार्य करणारे आहेत. त्यांनी दिलेला निर्णय सर्वांना मान्य असतो.  

भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाच्या ९व्या श्लोकात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीचे लक्षण दिलेले आहे.   

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।
साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥

मध्यस्थ हा सहृदय अर्थात कोमल मनाचा, दुसर्यांचे सुख-दुख ज्याला कळते असा असतो. मध्यस्थ  नेहमी उदासीन अर्थात तटस्थ राहतो. बंधू-बांधव, मित्र-शत्रू, धर्मात्मा आणि दुराचारी इत्यादी प्रति मध्यस्थाची बुद्धी सम असते. अर्थात तो कुणाचाही पक्ष घेत नाही निष्पक्ष राहून निर्णय देतो. मध्यस्थ कुठल्याही उपकारची इच्छा न ठेवता दोन्ही पक्षांचे भले चिंतणारा असतो.  
 
  


No comments:

Post a Comment