Friday, June 12, 2020

साने गुरुजी आणि मी

आज साने गुरुजींची पुण्यतिथि. आजच्या दिवशी अर्थात 11 जून 1950 रोजी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती. बहुतेक गणपती उत्सवात श्यामची आई हा सिनेमा पाहिला होता आणि सिनेमा पाहताना ढसाढसा रडलोही होतो. साने गुरुजी कोण त्याबाबत प्रथम माहिती आईकडून मिळाली. पण एक प्रश्न मनात सतत घोंगावत होता एवढ्या मोठ्या माणसाने आत्महत्या का केली? त्याचे कारण काय असावे? दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही  नागपूरला जायचो. काका एका वृत्तपत्रात संपादक होते. नागपूर आणि विदर्भात प्रकाशित होणाऱ्या अधिकांश हिंदी पुस्तकांचे संपादनही ते करायचे. त्यासाठी राष्ट्रपती कलामच्या हातून राष्ट्रपती भवनात त्यांचा गौरवही झाला होता. नागपूरला काकांच्या घरी एक मोठी लायब्ररी होती. किमान दोन-तीन हजार पुस्तके तरी होती. बहुतेक त्यावेळी मी तेरा-चौदा वर्षांचा होतो. वाचण्याची आवडही होती. साने गुरुजींचे जीवन चरित्र वाचले. लहानपणीच वडिल गेले नंतर आई. अनेक कष्ट सहत सानेे गुरुजींनी शिक्षण पूर्ण केले. ते एमए झाले. शाळेत शिक्षकाची नोकरी केली. १९३० मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले. त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता विरोधात लढा दिला. राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली. साधना साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. खडतर मार्गाने आयुष्याचा प्रवास करणारा व्यक्ती आत्महत्या करतो हे कधीच मनाला पटले नव्हते. एक दिवस काकांना हाच प्रश्न विचारला. ते म्हणाले साने गुरुजी कवी होते. भावनाप्रधान होते. देशाला स्वात्यंत्र मिळतात देश बदलेल असे त्यांना वाटत असावे. माणसाचे आयुष्य १०० वर्ष असेल तर राष्ट्राचे हजारो वर्ष असते. जे बदल माणसाच्या आयुष्यात एका वर्षात होतात त्या बदलांसाठी राष्ट्राला १०० वर्ष ही अपुरे पडतील. एकच उद्दीष्ट मनात ठेऊन अनेक पिढ्यांना खपावे लागते. देश स्वतंत्र झाला. भारतीय नेते सत्ताधीश झाले. सत्ता टिकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्वांचा उपयोग करावा लागतो. या सदा  चालत आलेल्या मार्गावर आजचे सत्ताधीश ही चालणारच. स्वतंत्रता मिळाली. देशात लाखो लोक दंगलीत मारल्या गेले.  महात्मा गांधींची हत्या झाली,. महाराष्ट्रात जतिगत घृणेचे राजकारण फोफावले. बहुतेक कवी हृदयाने पाहिलेले स्वप्न धुळीत मिळाले.  सत्याचा मार्ग काटेरी असतो त्यावर विपरीत परिस्थितीतही सतत चालणे प्रत्येकाला जमत नाही. काही सत्य मार्गाचा त्याग करतात. काही परिस्थितीशी समाझौता करत नाही अर्ध्यावरच प्राण सोडतात. काही विरलेच संघर्षाची ज्योत सतत तेवित ठेवतात.  निराश होऊन साने गुरुजींनी अर्ध्या रस्त्यावरच प्राण ठेवलेेेे. शेवटी काका म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत निराश व्हायचं नाही हे त्यांचे चरित्र वाचून शिकले पाहिजे.

No comments:

Post a Comment