Saturday, June 20, 2020

सूर्यग्रहण: सावल्या - सावल्यातील अंतर


हिमाचलच्या लोकांशी घरोबा झाल्यामुळे हिमाचलच्या वारी होतच राहतात. असेच एका लग्नाला गेलो होतो.  मंडी जिल्ह्यात लोकांची घरे मोठी अर्थात १० ते २० खोल्यांची असतातच. लग्नकार्य घरातच होतात. लग्नकार्याच्या विधी दिवसभर चालणारे असल्यामुळे गप्पांच्या मैफिलसाठी भरपूर वेळ मिळतो. सहज सूर्यग्रहण हा विषय निघाला. एका सज्जन धार्मिक इंजिनिअर महोदयांनी सूर्यग्रहणाचा एक किस्सा सांगितला. हिवाळ्याचे दिवस होते. त्यांचे एक मराठी मित्र घरी आले होते.  शिक्षित आणि विज्ञानवादी विचारधारेचे मराठी सज्जन अंधश्रद्धा मूर्खमिलन समितीचे चाहतेही होते. बाहेर भयंकर थंडी असल्यामुळे बैठीकीच्या खोलीत फायर बॉक्समध्ये लाकडे जळत होती समोर १२ फूट दूर सोफ्यावर बसून  गप्पा मारताना सूर्यग्रहण हा विषय निघाला. विज्ञानवादी मित्र म्हणाले चंद्राची सावली आणि वादळाची सावली काहीच फरक नसतो. चंद्राच्या सावलीचा काहीही दुष्प्रभाव पडत नाही. इंजिनिअर सज्जन म्हणाले फरक असतो आत्ताच सिद्धकरून दाखवतो. त्यांनीं  एक ताट आणि एक छोटी वाटी मागवली. ताट फायरबॉक्सच्या समोर अश्यारितीने धरले की ताटाची सावली मित्राच्या अंगावर पडली. मित्राला विचारले काही फरक पडला का? मित्र म्हणाला हो, ताटाने उष्मा रोखल्यामुळे थोडी थंडी जाणवते आहे.  इंजिनीयर महोदयाने  छोटी वाटी मित्राला देत म्हंटले वादळाची पण सावली असते. वादळ जास्तीतजास्त पृथ्वीपासून दहा-बारा किलोमीटर उंचीवर असते. चंद्राच्या मानेने फारच जवळ. ही वाटी म्हणजे वादळ. आता वाटीला पोटाशी धरून ठेव आणि सांग काय फरक पडतो. मित्र म्हणाला काहीही फरक पडणार नाही.  इंजिनीयर महोदय विजयी मुद्रेने म्हणाले हा फरक सूर्यग्रहण आणि वादळाच्या सावलीतला आहे. एका मराठी माणसाची कशी जिरवली हा भाव ही त्यांच्या मुद्रेत दिसत होता. 

दोन वर्षांपूर्वी मला पँक्रियाचा टीबी  झाला. गंगाराम हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आशिष  कडून ट्रीटमेंट घेत होतो. एक दिवस त्यांना विचारले माझ्या घरी आणि कार्यालयातील ही स्वच्छता आहे. मी बाहेरचेही जास्त खात नाही तरीही मला टीबी का झाली? ते म्हणाले वातावरणात लाखो वायरस नेहमीच असतात. भारतासारख्या देशात तर टीबीसहित अनेक रोगांचे जीवाणू ही वातावरणमध्ये असतात. शरीराची प्रतिकारशक्ती त्यांच्याशी सदैव युद्ध करत राहते. काही क्षणांसाठी ही एखाद्या रोगणुप्रति ती कमी झाली की लगेच तो रोगाणु शरीरात वाढू लागतो. हे असेच आहे, जसे क्षणभराच्या नजरचुकीने एखादा आतंकवादी देशात घुसतो. सर्च ऑपरेशन करून त्याचा नायनाट करावा लागतो.  तसे न केल्यास देशात बॉम्बस्फोट इत्यादी होतात आणि लोकांचा जीव जातो.  तुम्हाला ही दहा बारा दिवस आणखीन उशीर झाला असता तर...असो.

वादळ वातावरणात आपल्या जवळ असतात. सूर्याच्या जीवनदायी किरणांना रोखण्याची क्षमता त्यात नसते. पण अंतरीक्षात विचरण करणाऱ्या पृथ्वीपासून लाखो किमी दूर असलेल्या चंद्रमामध्ये निश्चित असते त्यामुळे वादळांच्या आणि चंद्रमाच्या सावली फरक असतो. ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनी सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर न जाणे योग्य. हे असेच आहे, जसे कारोनाच्या बचावासाठी गर्भवती स्त्री, वृद्ध आणि रोगी माणसांना घरात बसण्याचा सल्ला दिला गेला आहे. बाकी अंधश्रद्धा मूर्खमिलन बाबत काही न बोलणे योग्य.




No comments:

Post a Comment