आपण ढाब्यात जेवतो.आपल्याला वाटते सर्व नफा हा ढाब्यावाल्याचा. पण त्या नफ्यात ही ही अनेक वाटेकरू असतात. ढाबेवाला खाण्या - पिण्याची सामग्री ज्या कंपन्यांकडून घेतो, त्यांच्या वाटा ही असतो. त्याच अनुषंगाने देशातील एका महान नेत्याने, एका भाषणात म्हटले, जेव्हा लोक ढाब्यात शंभर रुपये खर्च करतात तेव्हा दहा ते पंधरा रुपये देशातील एका उद्योगपतीच्या खिश्यात जातात. त्या महान नेत्याच्या वक्तव्यात कितपत सत्य आहे. हे पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला.
आधी पिण्याचे पदार्थ. चहाचे दोन मोठे ब्रँड brook bond आणि लिफ्टन हे विदेशी कंपनी युनिलिव्हर पेप्सिकोचे आहेत. देशात कॉफी नेस्लेची विकल्या जाते. सद्याची लोकप्रिय स्टारबॅग ही पण विदेशी आहे. कोल्ड ड्रिंक म्हणाल तर इथे कोक आणि पेप्सीचे राज्य आहे. अर्थात नफा विदेशात जातो त्या उद्योगपतीच्या खिश्यात नाही.
जेवणाचे म्हणाल तर महामार्गांवर पित्झा, सँडविच बर्गर विकणारे डोमिनो, केएफसी, पित्झाहट मेक., बर्गर किंग इत्यादी जागोजागी दिसतात. रस्त्यावर मिळणारी मेग्गी, केचप इत्यादी विदेशी आहेत. यांच्या ही नफा विदेशातच जाणार.
तुम्ही म्हणाल आम्ही तर ढाब्यात दाल रोटी सब्जी खातो. ढाब्यात वापरणारे खाण्याचे ७० टक्के तेल विदेशातून येते. अधिकांश खाद्य तेल विकणाऱ्या कंपन्यांचे स्वामित्व कारगिल, बंजे ऑईल, युनिलिव्हर इत्यादींचे आहे उदा.- डालडा, रथ, गिन्नी, सनफ्लावर, फारच्यून, Gemini, स्वीकार इत्यादी इत्यादी. किराण्याच्या धंद्यात ही आटा इत्यादी विकणाऱ्या विदेशी कंपन्या आहेतच.
थोडक्यात आपण खाण्या-पिण्यावर, घरात किंवा रस्त्यांवर असलेल्या ढाब्यांत जर १०० रू खर्च करतो तर अंदाजे दोन ते तीन रुपये नफा निश्चितच विदेशी कंपन्याच्या खिशात जातो. अर्थातच त्या नेत्याच्या विधानात सत्यता कमी, राजनीती जास्त होती.
देशातील पैसा देशात रहावा असे वाटत असेल तर, तर स्वदेशी किराणा विकत घ्या. स्वदेशी कंपन्यांचा पित्झा, बर्गर आणि नुडल्स खा. असो.
No comments:
Post a Comment