Wednesday, December 15, 2021

कुसंगतीत नासला बटाटा

बटाटा हा सर्वांनाच आवडतो. सर्व भाज्यांमधे हा सहज मिसळतो. सकाळच्या नाश्ता ते रात्रीच्या जेवणात बटाटा हा असतोच. छोट्या बच्यांची प्रिय भाजी बटाटाच असते. बटाटा हा तसा गुणांची खाण आहे. कार्ब., प्रोटीन, विटामिन अबस ते एंटीओक्सीडेंट, लौह समेत अनेक खनिज आणि पोषक तत्व यात आहे. बटाटा हे पूर्ण भोजन आहे हे म्हंटले तरी वागवे नाही. बटाटा खाल्याने पचन विकार दूर होतात, हृदय विकारात ही लाभ होतो, बटाटा रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत करतो इत्यादि इत्यादि. ह्याशिवाय सुंदरींचे सौंदर्य वाढविण्याचे कार्य ही बटाटा करतो.  बटाट्याचा लेप तोंडावर तोंडावर फासल्याने त्वचेचा रंग उजळतो. चेहर्‍यावरचे डाग पिंपल्स, पुरळ इत्यादि नाहीसे होतात. दाद, दाग खुलजी का शर्तिया इलाज हा बटाटाच. एवढे गुण असूनही डॉक्टर- वैद्य रुग्णांना बटाट्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. कारण काय असेल. 

बटाट्याला मित्र जोडण्याची भारी हौस आहे. आता पहा कडू कारले कुणालाही आवडत नाही. पण कडू पाणी आवडते. पण ते किती मात्रेत घ्यायचे हे अनेकांना कळत नाही. मग त्यांचा तळीराम होतो. आयुष्य वाया जाते. बटाट्याचे ही तसेच झाले. तेलासोबत बटाट्याची मैत्री म्हणजे कुसंगत. ह्या तेलाने बटाट्याला स्वाद दिला पण त्याला नासवले, बदनाम केले. आज सर्वत्र तेलात तळलेले अंकल चिप्स छोटे बच्चे खाताना दिसतात. स्वादिष्ट भरपूर तेलात तळलेली आलू की टिक्की ही मलाही प्रिय आहे. तळलेल्या बटाट्याची चाट तर स्त्री-पुरुष सर्वांनाच आवडते.  दिल्लीत  लग्नात ह्या दोन्ही असतातच. याशिवाय अधिकान्श हॉटेलात बटाटे फ्राय करूनच भाजी केली जाते. मध्यम आणि श्रीमंतांचे बर्गर, फ्रेंच फ्राईस असो की गरिबांचा वडा पाव, तळीव बटाटा हा असतोच.  बिहार मध्ये एक म्हण होती जब तक रहेगा समोसे मे आलू .... ही म्हण पूर्णपणे सत्यात उतरली नाही, तरीही समोस्यांची महिमा सांगतेच. मंत्रालयांच्या केंटीन मध्ये उकळलेले बटाटे नेहमीच असतात. समोसा, कटलेट, ब्रेड पकोडा सर्वांचा एकच बटाटा मसाला असतो. तळीव बटाटे जिभेचा स्वाद वाढवितात पण शरीरसाठी हानिकारक ठरतात. त्यामुळे डॉक्टर-वैद्य बटाट्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. 

बटाट्या वरून आठवले, दिल्लीच्या पराठा वाली गल्लीत पराठा चक्क तेलात तळतात. देशाच्या काण्या कोपर्‍यातून तिथे पराठा खायला लोक येतात. जुन्या दिल्लीत राहत होतो, तेंव्हा दरवर्षी किमान एकदा तरी पराठा खायला तिथे जात असू. त्यावेळी वीस-पंचविस दुकाने पराठ्याची होती. आज फक्त पाच-सहा उरली आहे. गेल्या वर्षी उत्तराखंड फिरतीवर असताना. एका छोट्या हॉटेल मध्ये सकाळचा नाश्ता केला. पराठ्याची कृती तिथे प्रत्यक्ष बघितली. शेफने (दुकानाचा मालक), बटाटे कुसकरताना, त्यात मसाल्या सोबत कसूरी मेथी, कोथिंबीर, ओवा इत्यादि ही घातले. तव्यावर पराठा शेकताना तेलाचा वापर केला नाही. नंतर वाढताना सोबत  वाटीत  लोणी आणि दही. हा पराठा ही तेवढाच स्वादिष्ट होता आणि पोष्टिक ही.

उपवासाच्या दिवशी सौ. घोटलेल्या दहयात उकडलेला बटाटा कापून टाकून रायता नेहमीच बनविते. चाट बनविताना तळीव बटाट्यांच्या जागी उकडलेले किंवा जमल्यास भाजलेले बटाटे ही वापरले जाऊ शकतात. एकदा राखेत भाजलेल्या बटाट्याची चाट खाल्ली होती. तीही स्वादिष्ट होती. उकडलेला बटाटा, कांदे, टमाटो आणि पनीर टाकून कमी तेलाचा वापलर करून बनविलेले सँडविच ही स्वादिष्ट लागते. सारांश बटाट्याने तेलाचा नाद सोडला तर हा आरोग्यासाठी उत्तम आहे. 

बाकी माझी आवडती बटाटे भजी.😀😀😀


No comments:

Post a Comment