Tuesday, February 12, 2019

१४ फेब्रुवारी



१४ फेब्रुवारीला 
भंवरा आला 
रस कळीचा 
शोषून गेला.

परिणाम

हृदयी वेदना 
उभार पोटाचा 
कचर्यात हॉस्पिटलच्या
अभ्रक अजन्मा.

Thursday, January 24, 2019

क्षणिका : अभयारण्य


कार्बेट मध्ये फिरून आल्यानंतर मला जे जाणवले 

  मोठ्या पिंजर्यात
 बंदी जनावरे
साधन मनोरंजनाचे.

Friday, January 18, 2019

हिंदी कविता: द्रोपदी का वस्त्र हरण


डर मत, घबरा मत 
कर विवस्त्र द्रोपदी को 
नचा उसको छमाछम 
भरे दरबार में आज . 

नाचेगी राजपथ पर 
कुलवधू आज 
वासनामयी नजरे 
बरसाएंगी सुवर्ण, 
द्रोपदी के नग्न तनु पर.

अनायस ही भर जायेगा
राजकोष भी आज.

डर मत, घबरा मत .......धृ.
जम गया है खून 
भीम  का आज
बाण अर्जुन के भी 
कुंद हो गए हैं आज
जुए को ही धर्म
मानता धर्मराज है आज.

डर मत, घबरा मत .......धृ

नहीं है आज कोई 
कृष्ण सुदर्शनधारी
डाल-डाल पर है बसेरा 
मांस नोचते गिद्धोंका
 धर्म न्याय के ज्ञाता 
भीष्म भी है सहमत
नाचेगी कुलवधू 
भरे दरबार में आज.

डर मत, घबरा मत .......धृ


चारण भाट गायेंगे 
नग्न तनु के गीत आज 
देह की गंध में डूबेगा 
अंधा धृतराष्ट्र आज.

डर मत, घबरा मत .......धृ










Wednesday, January 16, 2019

कहाणी: कारे बामना पादलास तू.



महाराष्ट्र देशात कुडंनपुर नावाचे राज्य होते. दरबार सजलेला होता. अचानक भयंकर वास दरबारात पसरला. कुणीतरी महाभयंकर असा ठुसकी पाद मारला होता. महाराजांनी नजर चौफेर फिरवली. सर्व दरबारी नाक दाबून बसले होते. ते पाहून महाराजांना राग आला. ते प्रधानजीवर डाफरले, प्रधानजी कोण पादले इथे, शोधून काढा. प्रधानजी हुशार होते, प्रधानजींना वास महाराजांच्या दिशेने येताना वाटत असला तरीही महाराजांच्या आदेशानुसार, बळीचा बकरा शोधणे क्रमप्राप्त होते. प्रधानाने सर्वप्रथम महाराजांच्या शेजारी बसलेल्या महाराणीसाहेबांवर वर नजर टाकली. मनात विचार केला, महाराणी पादल्या असतील का? छे! छे! महाराणीसाहेबा  खरोखर पाद्ल्या असतील तरी  त्यांच्यावर आळ घेणे योग्य नाही. घेतला तर उद्या आपली गच्छन्ति निश्चित. मग प्रधानाने सेनापतीकडे बघितले. सेनापती महोदयांचा उजवा हात तलवारीच्या मूठवर होता. प्रधानाने विचार केला, सेनापतीवर आळ घेणे म्हणजे जीवाची जोखीम, विषाची परीक्षा पाहण्यात अर्थ नाही.  प्रधानाने आता आपली नजर राजवैद्याच्या दिशेने नजर वळवली. वैद्य म्हणजे "यमराजाचा सहोदर", त्याच्यावर आरोप घेतला तर उद्या रोगराई झाल्यावर हा आपल्यास जालीम औषध देण्यास कमी करणार नाही. शेवटी उरला राजपुरोहित, प्रधानाने विचार केला, हा म्हातारा आपले कुठलेच नुकसान करु शकत नाही. त्याचेकडे पहात प्रधानजी म्हणाले, ठाम ठुस्स ठैन्या ठुस्स कारे बामना पादला तूच. बेचारे ब्राह्मण देवता, थक्क होऊन प्रधानजीकडे पाहतच राहिले. ते पादले नव्हते तरी प्रधानजीने त्यांच्यावर का बरे आळ घेतला, यावर काय बोलावे राजपुरोहिताला सुचेनासे झाले. राजपुरोहिताची गोंधळलेली अवस्था पाहत, मौक्याचा फायदा घेत राजवैद्य म्हणाले, "हे यजमानांच्या घरी मेजवान्या झाडतात. यांना कित्येकदा म्हंटले आहे, थोड खाणे कमी करा, पण ऐकतच नाही. आता यांनी काही दिवस लंघन करावे, पोट ठीक होईल. असे भर दरबारात पादणार नाही".   महाराणीसाहिबांना काही आठवले, त्या म्हणाल्या, माझ्या मनात अनेक दिवसांपासून विचार येत आहे, महाराजांनी  युद्धात विजय प्रदान करणार्या रणचंडीचे व्रत करावे.  या व्रतात २१ दिवस उपवास करावा लागतो. महाराजांना उपवास करणे जमत नाही. त्यांच्यावतीने राजपुरोहिताने हे व्रत करावे. सेनापतीहि लगेच म्हणाले, उत्तम विचार आहे, महाराणीसाहेब. खरे तर हा सर्व प्रकार पाहून महाराजांना हसू येत होते. पण आपले हसू दाबत, महाराज  म्हणाले, सर्वांची इच्छा आहे मी रणचंडीचे व्रत करावे. राजपुरोहित माझ्यावतीने २१ दिवस उपवास करतील. प्रधानजी आता तुम्ही या व्रताची तैयारी करा. व्रत संपन्न झाल्यावर राजपुरोहिताला यथायोग्य दक्षिणा द्या. बेचारे राजपुरोहित, त्यांच्या नशिबी  खोटा आळ आणि २१ दिवस उपाशी राहण्याची पाळी आली. 

त्या दिवसापासून महाराष्ट्रात काहीही घडले तरी त्याचा आळ ब्राह्मणांवर घेण्याची पद्धत रूढ झाली आणि हि म्हण: ठाम ठुस्स ठैन्या ठुस्स कारे बामना पादला तूच.

Friday, January 4, 2019

पूर्वी आणि आता


फाटके कपडे 
दारिद्र्य  लक्षणे.
फाटके कपडे 
डिजाइनर कपडे. 


दोनवेळच्या भुकेसाठी
वणवण भिकारणीची 
तरही राहायची नेहमी
पोटाची खळकी उपाशी. 

सल्ला दिक्षितांचा  
जेवण दोन वेळचे 
पोटाचा खळकी साठी 
पैका मोजते रमणी.




 






Wednesday, January 2, 2019

ईशाचे लग्न


आजच्या ब्राह्मण मुली इतर जातीत लग्न का करतात, आपल्या जातीत का योग्य मुले नाहीत का? हा प्रश्न फेसबुक वर एका ब्राह्मण ग्रुपमध्ये वारंवार वाचायला मिळाला.  काही घडलेल्या घटनांवर आधारित.

ईशा कुलकर्णी मूळ विदर्भातली. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. शाकाहारी व निर्व्यसनी. बीबीए केल्यावर पुण्यात तिला नौकरी मिळाली. नौकरी लागल्यावर लग्नाची इच्छा होणारच. साहजिक होते, पुण्यातच काम करणारा नवरा मिळावा अशी ईशाची इच्छा होती. नौकरी लागल्यानंतर काही महिन्यातच मिलिंद नावाचा मुलाशी तिचा परिचय झाला. तो हि नागपूरचा होता व ब्राह्मण हि होता. वर्षाचे ५ लाख वर्षाचे पकेज. त्याच्या वडिलांना पेन्शन होती. स्वत:चे घर हि नागपुरात होते. तिच्यासाठी नवरा म्हणून मिलिंद सामाजिक व आर्थिक दृष्ट्या परफेक्ट होता. दोघांच्या नौकरी शिवाय पुण्यासारख्या महानगरात गुजराण होणे शक्य नाही, हे हि सत्य दोघांना कळून चुकले  होते. ईशाने मिलिंदची माहिती आपल्या आई वडिलांना दिली. पण वडिलांनी मुलाची जन्म तारीख आणि वेळ विचारली. मुलाची जन्म कुंडली बनवून मिळवून बघितली. जन्म कुंडली जुळली नाही. अर्थातच लग्नाची बोलणी पुढे होऊ शकली नाही. वर्ष दोन वर्ष असेच निघून गेले. पुण्यात काम करणाऱ्या ३-४ मुलांचे फोटो ईशाला रुचले,  पण कुठेही पत्रिका जुळली नाही. आता ईशा पंचविसीची झाली.

सृष्टीच्या नियमांना बांधले ग्रह नक्षत्र अवकाशात विचरण करतात. त्यांना पृथ्वीवरील माणसांशी काही घेणे-देणे नाही. त्यांचा काही प्रभाव मानवावर पडत असेल तर सर्वांवर एकसारखा. जेंव्हा पासून टीवी मालिकांचे प्रस्थ वाढले आहे, स्वत:ची बुद्धी गहाण ठेऊन पत्रिका इत्यादी पाहण्याचे प्रमाण हि वाढले आहे. पत्रिकेतल्या १२ खाण्याचे लग्न एका-दुसर्याशी होत नाही. जीवित स्त्री-पुरुषांचे होतात, हे साधे सत्यहि शिकलेल्या ब्राम्हण समाजाच्या लोकांना कळत नाही याचेच दु:ख होते.  

एका मुलाची पत्रिका जुळली. ईशाच्या आईने आनंदाने हि बातमी ईशाला सांगितली. आता तुम्ही दोघांनी एका दुसर्याला पसंत केले कि झाले.  ईशा त्या मुलाला भेटायला गेली. थोड्या वेळ एका-दुसर्याशी जुजबी बोलणे झाल्यावर तो मुलगा म्हणाला.  मी एकुलता एक मुलगा आहे. आईची इच्छा आहे. मुलीकडच्यांनी दोन्हीकडचा खर्च केला पाहिजे, हुंडा आणि इतके तोळे सोने हि दिले पाहिजे.  ईशाला राग आला, तिने त्याला सरळ विचारले, तुम्ही लोक भिकारी आहात का? किस्सा तिथेच समाप्त झाला. ईशाच्या आईने  ईशालाच रागावले, तुला चिडायला काय झाले होते. हुंड्याच्या गोष्टी आम्ही केल्या असत्या. अशाने तुझे लग्न कसे जमणार?

एक मुलगा तर चक्क तोंडात पान-तंबाकू तोंडात कोंबून तिला भेटला. त्याने तिला विचारले तू घेते का? लग्न झाल्यावर तिला सामिष भोजन बनवावे लागेल. तिने त्याला तिथेच नकार दिला. आता तिची आई तिच्यावर डाफरली. आजकाल सर्वच तरुण दारू पितात, सामिष भोजन करतात. लग्न करायचे असेल तर तुला बदलावे लागेल. असेच दोन-तीन वर्ष निघून गेले. ईशाने लग्नाचा विचारच सोडून दिला. 

मनोज ईशाच्या ऑफिस मध्येच काम करत होता. त्याच्या वडिलांनी राधास्वामी पंथाची दीक्षा घेतली होती. मद्य मांस मदिरा इत्यादी व्यसनांचा त्याच्या  वडिलांनी त्याग केला.  साहजिक होते, मनोजला कुठलेही व्यसन नव्हते आणि तो पूर्ण शाकाहारी होता. पुण्यात नौकरी लागल्यावर त्यालाहि कळून गेले होते महानगरात एका नौकरीत गुजराण होणे शक्य नाही. भाड्यातच अर्धा पगार निघून जात होता आणि  एका पगारात स्वत:चा फ्लॅट घेणे आयुष्यात शक्य होणार नाही. त्याच्या बिरादरीत शिकलेल्या मुली नाहीत आणि एखाद दुसरी असेली, तरी पुण्यात नौकरी करणारी नाही. तो हि तीसीचा होत आला होता. पण लग्न झाले नव्हते. त्यालाहि पुण्यात काम करणारी शिकलेली बायको पाहिजे होती. पण त्याची जात पाहून उच्चवर्णीय शिक्षित मुली लग्नासाठी होकार देतील का? हा प्रश्न नेहमीच त्याच्या डोळ्यांसमोर यायचा. ईशाचे लग्न या न त्या कारणाने जमत नाही याची कुणकुण त्यालाही लागली होती. त्याने विचार केला, ईशासारख्या  नौकरी करणार्या मुली म्हणजे सतत दूध देणार्या गायी. लोक दूध देणाऱ्या गायीला पैका मोजून विकत घेतात. मूर्ख लोक हुंडा मागतात. हिश्याची लग्न झाले तर आयुष्याचा सर्व समस्या सुटतील. दोघांच्या पगारात पुण्यात फ्लॅट हि विकत घेता येईल. आई-वडिलांना हि गावातून पुण्यात बोलविता येईल आणि होणार्या मुलांना चांगले शिक्षण हि देता येईल.  शिकलेली आई मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देईलच. 

एक दिवस हिम्मत करून त्याने ईशासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. तो म्हणाला माझी जाती सोडली तर माझ्यात तुला अपेक्षित सर्व गुण आहेत. आम्हाला दहेज नको, एका साडीत तू घरात आली तरी सर्व तुझा स्वीकार करतील. आमच्या घरी तुला मान आणि प्रतिष्ठा मिळेल.  ईशानेहि विचार केला हुंडा न मागणारा निर्व्यसनी आणि तिच्याच जेव्हढा पगार असलेल्या मुलाशी लग्न करण्यात काय गैर. शेवटी जाती माणसाने निर्मित केल्या आहेत, देवाने नव्हे. असा चांगला मुलगा मिळणे आता शक्य नाही. आता ईशाच्या आई वडिलांनी विचार केला आपली मुलगी आता ३०ची होत  आली आहे, तिला एक मुलगा आवडला आहे. एक जाती सोडली, तर सर्व चांगले गुण मनोज मध्ये आहेत. त्यांनी पत्रिका इत्यादीचा विचार त्यागून, सर्वांचा विरोध झुगारून आपल्या ऐपतीप्रमाणे ईशाचे मनोज सोबत लग्न लाऊन दिले. लग्नानंतर पहिले काम मनोजने फ्लॅट बुक करण्याचे केले. त्याचे पुण्यातले स्वप्न पूर्ण झाले होते.

मनोजच्या एका मित्राने त्याला विचारले, ब्राह्मण पोरीला तू कसे काय पटविले. तो म्हणाला, जो पर्यंत व्यसनाधीन ब्राह्मण मुले, अतिशहाणे पत्रिका पाहणारे आणि हुंडा मागणारे ब्राह्मण मायबाप आहेत, शिक्षित, संस्कारी आणि चांगल्या पगार असलेल्या ब्राह्मण मुलींना पटविणे सहज शक्य आहेत.   


Tuesday, January 1, 2019

क्षणिका: स्वागत केले नववर्षाचे



डोकावला धुक्यातून 
सूर्य नारायण आज 
सोनेरी किरणांनी केले
स्वागत  नववर्षाचे 

Saturday, December 29, 2018

क्षणिका: हिवाळा : सूर्य आणि धरती


अनेक वर्षांनंतर दिल्लीत डिसेंबर महिन्यात भयंकर थंडी पडली आहे. धुक्यामुळे सूर्य दिसत नाही आणि  धरतीने हि हिरवेगार वस्त्रांच्या त्याग केला आणि दवांत न्हात आहे,  येणार्या वसंतात नटण्यासाठी. 

कुडकुडत्या थंडीत 
सूर्याला भरलं कापरंं.
दुलई ओढून धुक्याची 
दडला तो आकाशी. 

धरतीने त्यागली 
हिरवीगार चोळी. 
दवांत ती न्हाली 
अंग-अंग चोळूनी. 




Friday, December 21, 2018

ब्राह्मण, आरक्षण आणि सरकारी नौकरीची तैयारी

(हा लेख ब्राह्मण समाजाला केंद्रित करून लिहिला असेल तरी सर्व मराठी माणसांवर लागू होतो). 

बलीराम तुला कितीदा एकच गोष्ट परत-परत सांगावी लागले. एसएससीचा पेपर पास तरी कसा झाला.  तो शांतपणे म्हणाला साब, १००० घंटे पढने के बाद गधा भी एसएससी का पेपर पास कर लेगा. मै तो फिर भी इन्सान हूँँ. कहो तो ४३ का पहाडा सुना दूँँ. बलीरामने चक्क ५० पर्यंतचे पहाडे पाठ केले होते. गणिताचे शेकडो फार्मुले हि.  बलीरामाला १२वीत ५० टक्के मार्क मिळाले. याला अभ्यासात गति नाही हे ओळखून मुलाने सरकारी नौकरीची तैयारी केलेली बरी, हा विचार त्याच्या वडिलांनी केला. (११वी बोर्डात आंग्ल भाषेत काठावर व द्वितीय श्रेणीत पास झाल्यावर मी हाच विचार केला होता, आपल्याला सरकारी नौकरी शिवाय अन्यत्र कुठली  चांगली नौकरी मिळणे शक्य नाही). बिहारमधून बलीराम थेट दिल्लीत आपल्या चुलत्याकडे पोहचला. दिल्लीत आल्यावर बीए (corrs) अडमिशन घेतली व एसएसचीच्या तैयारी साठी क्लास सुरु केली. रोज एसएससीची क्लास व त्या शिवाय दोन ते तीन तास घरी अभ्यास. शनिवारी रविवारी व सुट्टीत कालेजची क्लास. या शिवाय रोज  घरच्या कामात मदत करणे आलेच. वर्षभरानंतर त्याने सरकारी पेपर हि देणे सुरु केले. अनेक सरकारी पेपर दिले. अखेर यश मिळाले बळीरामने एसएससीचा पेपर पास केला  आणि २२ व्या वर्षी सरकारी नौकरीत रुजू झाला. हजारो बिहारी आज केंद्र सरकारच्या नौकरीत आहे. सामान्य बुद्धी असली तरी नियमित मेहनत करून, आज सुरवातीचा पगारच ३५००० हजारहून अधिक घेत आहेत. पण मराठी माणूस कुठे. माझ्या csss केडर मध्ये स्टेनो ते पीएसओ ६००० पोस्ट आहेत. त्यात मराठी माणूस बोटांवर मोजण्या एवढे. ब्राह्मण तर ४ ते ५, ते हि दिल्लीकर. बहुधा ते हि पुढील काही वर्षांत निवृत्त होतील. दिल्लीकरांची पुढची पिढी सरकारी नौकरीत नाही. मराठी लोकांची जनसंख्या पाहता किमान या केडरमध्ये ५०० तरी मराठी माणूस असायला पाहिजे. हीच परिस्थिती केंद्र सरकारच्या सर्व केडर मध्ये आहे. कारण काय. 

मराठी माणूस त्यात हि ब्राह्मण, ६० टक्केवाल्या मुलाला हि जबरदस्ती बीटेकला टाकतो. भरपूर पैसा खर्च करतो. नंतर त्याला १५ ते २० हजाराची नौकरी हि बमुश्कील लागते. शिकलेला असल्यामुळे क्लार्कचा पेपर द्यायला त्याला लाज वाटते. या सरकारी पेपर पास करण्यासाठी जी मेहनत व अभ्यास लागतो ती करण्याची तैयारी मराठी विशेषकरून ब्राह्मण मुलांची नसते. ग्रेजुएट होत पर्यंत पालक हि लक्ष देत नाही. मग नौकरीसाठी मुलांवर दबाव आणतात. मग मुले हि हि वेकेंसी निघाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात. दोन-चार महिन्याचा अभ्यास, अर्धवट तैयारी करून क्लार्कचा पेपर पास करणे शक्य नाही. मग म्हणतात, मुलाने पेपर दिला पास झाला नाही. आरक्षणावर खापर फोडतात. एकदा तर एका नातलगाने महाराष्ट्रातून फोन केला. माझ्या मुलाने स्टेनोचा लिखित पेपर पास केला आहे. दिल्लीला पाठवितो २ महिन्यात त्याला स्टेनोची तैयारी करून देईल का? मी म्हणालो स्टेनो शिकायला किमान २ वर्ष लागतात. तेही नियमित न चुकता ३६५ दिवस अभ्यास केला तर. त्या नंतर हि जो पर्यंत पेपर पास होत नाही रोज एक तास अभ्यास करावाच लागेल. अधिकांश मराठी मुले,  लिखित परीक्षा पास केल्यावर टाइपिंग शिकण्याचा विचार करतात. टाइपिंगचा हि रोज अभ्यास करावा लागतो.  दोन ते तीन महिन्यात टाइपिंग शिकणे शक्य नाही. अर्धवट तैयारी करून दिलेला पेपर कितीही सौपा असला तरी तो पास करणे कदापि शक्य नाही.  

सुरवातीला ३५००० हजाराहून जास्त पगार असलेल्या क्लार्क, डाटा एन्ट्री ओपरेटर, इत्यादीचा  पेपर पास करणे अत्यंत सौपे आहे. सामान्य  ज्ञान, गणित (१० स्तर),आंग्ल भाषा आणि तर्क शक्ती, हे विषय असतात. तुमच्या मुलाला १२वीत कमी मार्क्स आले. तर कालेज सोबत सरकारी पेपर तैयारी करण्यासाठी क्लास लावा. क्लास नसेल लावली तरी प्रतियोगिता दर्पण या मासिकाचे नियमित वाचन व त्यातले पेपर सोडविणे. नेटवर असलेले एसएससी, रेल्वे इत्यादींचे पेपर पैकी रोज एक सोडविणे. अभ्यासासाठी विकास पीडिया (http://mr.vikaspedia. in/ InDG)  हि सरकारी वेबसाईट सर्व भाषेंत उपलब्ध आहे. या साईटवर सर्व सरकारी योजना, इतिहास ते अर्थशास्त्र संपूर्ण ज्ञान उपलब्ध आहे. भारतकोश या वेबसाईटवर   (http://bharatdiscovery.org)  सामान्य ज्ञानच्या अर्थशास्त्र पासून ते नागरिक शास्त्र पर्यंत हजारो प्रश्नोत्तरी आहेत. दुसर्या शब्दांत सरकारी पेपरची तैयारी करण्यासाठी नेटवर सर्व साहित्य उपलब्ध आहे. इंटरनेट वर आज बँक, रेल्वे, कोर्ट, सरकारी कंपन्या, केंद्र सरकारचे एसएससीचे पेपर उपलब्ध आहेत. रोज एक पेपर सोडविला तरी तीन वर्षांत भरपूर तैयारी होते. एवढी तैयारी केल्यावर विश्वास वाढतो.  बीए, बीकॉमचे पेपर हि मुले चांगल्या मार्काने पास होतात. वयाच्या २५शी पर्यंत बँक रेल्वे सरकारी पदांसाठी अनेक पेपर दिल्यामुळे ज्ञान हि वाढते व सरकारी नौकरी सहज मिळते. आंग्लभाषा सहित अनेक विषयांचे ज्ञान वाढल्याने निजी क्षेत्रात हि चांगली नौकरी मिळते.  पण आपली मुलें काय करतात. फेसबुक, whatsup, रस्त्यावर पान तंबाकू खात टवाळक्या करणे, यातच वेळ घालवितात. काही टाईमपास म्हणून एमए, एमकॉम मध्ये अडमिशन घेतात. वेळ वाया घालवितात. स्वत:ला आणि घरच्यांना मूर्ख बनवितात. 

तात्पर्य एवढेच केंद्र सरकार, रेल्वे, बँक व राज्य सरकारच्या खुल्या प्रवर्गात हजारो पदे दरवर्षी निघतात. पण त्या नौकरींसाठी किती ब्राह्मण तरुण तैयारी करतात. नुकतेच या वर्षी रेल्वेत लाखाच्या वर पदांसाठी परीक्षा झाली. अर्धी पदे खुल्या प्रवर्गासाठी होती. किती ब्राह्मण तरुणांनी पेपर दिले. एका ब्राह्मण फेसबुक ग्रुप वर हे विचारले. कुणीही सार्थक उत्तर दिले नाही. बहुतेक कुणाचाही मुलगा सरकारी नौकरीच्या प्रयत्नात नाही. फक्त आरक्षण-आरक्षण हि ओरड करण्यात वेळ व्यर्थ घालवीत आहेत. समजा ब्राह्मणांना महाराष्ट्रात ३ टक्के आरक्षण मिळाले तरी उत्तर  प्रदेश आणि बिहारी मुले मराठी भाषा शिकून त्या जागांवर आपले नाव लिहतील. मग त्यांच्या नावाने बोंब ठोका.  

सरकारी नौकरीच्या माहिती साठी. 
 http://www.sarkarinaukridaily.in/employment-news-paper/



Tuesday, December 11, 2018

काही क्षणिका: हिवाळा



सावरुनी पदर धुक्याचा 
लाजली सोनेरी उषा.

सूर्य मध्यानींचा
आज थंड झाला 
अंत एका पर्वाचा.

गोठलेल्या राती 
कुंद झाले मन 
विरहणीचे. 





Friday, December 7, 2018

मोगऱ्या फुलांची वेणी

( हि कथा मैफिल दिवाळी अंकासाठी लिहली होती, तिथे प्रसिद्ध झाल्यानंतर आता ब्लॉग वर)

तब्बल ३५ वर्षांनी दोघ भेटले. केस पांढरे झाले असले तरीही दोघांनी एका दुसर्‍याला ओळखले. त्याला तिच्या सोबतची शेवटची भेट आठवली. हो, नेहरू पार्कच. केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळलेली ती, त्याला खेटून बसलेली होती. मोगऱ्याच्या वेणीला हुंगण्याचे नाटक करत त्याने पटकन तिच्या गालाचे चुंबन घेतले.

“दूर हो, मला काय समजले आहे, तुझी हक्काची बायको? अजून लग्न नाही झाले आपले”.

‘मग केंव्हा विचारणार तुझ्या वडीलांना, आता तर  वर्ष झाले मला नोकरी लागून’.

“अरे, माझे बाबा एका भाड्यावर राहणार्‍या बाबूशी आपल्या लेकीचे लग्न करायला तैयार होणार नाही”. 

‘मग काय आपण असेच राहायचे’?

“माझा एसएससीचा पेपर क्लिअर झाला आहे ना. महिन्याच्या आत अॅपाइंटमेंट लेटर येईलच. मग विचारेल बाबांना, एका स्मार्ट पण अक्कल नसलेला, निर्व्यसनी, कंजूष मुलाशी लग्न करायचे आहे. दोघांच्या पगारात आमचे व्यवस्थित भागेल. माझे बाबा नाही म्हणणार नाही, खात्री आहे मला”.
‘मी कंजूष?
“मग काय, आपल्या प्रेयसीला चाणक्य सिनेमा हाल मध्ये ६५ पैश्याचे पहिल्या रोचे  तिकीट घेऊन सिनेमा दाखवणार्‍याला काय म्हणायचे? एका रुप्पलीचे पॅापकॅार्न आणि एक कप कॉफी दोघांसाठी. काय मजनू आहे माझा. बाय द वे तुझ्या आई-वडीलांना विचारले का?” 
‘दूध देणार्‍या गायीला, कोण नकार देणार’.

तिने त्याच्या पाठीवर जोरात गुद्दा मारला.

‘आई! ग! किती जोरात मारते’.

“आई! ग, नाही म्हणायचे, बायको ग, म्हणायचे”.

‘म्हणजे लग्न झाल्यावरही तू मारणार’

“हो, पण लाटण्यानी”  ....
पुढे ती भेटलीच नाही. नंतर कळले मुंबईत एका सरकारी कार्यालयात तिने नौकरी जॉईन केली होती. तिचे लग्नही झाले. तो देवदास तर नक्कीच नव्हता. आईने पसंत केलेल्या मुलीशी त्याने लग्न केले.
---
‘कशी आहे’ 
“राग तर नाही ना माझ्यावर! माझ्या वडीलांना आपले प्रकरण माहित झाले होते. मला तुझ्या पासून दूर नेण्यासाठी बाबांनी खेळी केली. आईने शपथ घातली. तूही तिथे नव्हता. नाइलाजाने वडीलांची इच्छा पूर्ण केली”.

‘काय करतात तुझे मिष्टर’.

“ते हयात नाही. एका प्राईवेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. चांगला पगार होता पण त्याच सोबत दारू व जुगाराचे व्यसनही होते. नशेत सैतान संचारायचा त्यांच्या अंगात. सर्व राग माझ्यावर काढायचे. व्यसनांमुळे लग्नाच्या काही वर्षांतच ते वर गेले. मा‍झ्याच पगारावर कसेबसे घर चालविले. मुलगा इन्जीनियर झाला. तोही बापाच्या वळणावर गेला. त्यालाही दारूचे व्यसन आहे. त्याने प्रेम विवाह केला, सूनही पिणारी. वेगळे राहतात दोघ. व्यवस्थित चाललेय आहे, त्यांचे....  बहुतेक निवृत्तिनंतर मला वृद्धाश्रम शोधावे लागणार. नशीब एकेकाचे. तुझे काय”.

तुझे लग्न झाले हे कळल्यावर खरं तर मला राग आला होता. पण आईने समजावले, आयुष्य हे असेच असते. आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. अचानक त्याला काही आठवले, हं, लग्ना आधी एकदा भेटलो होतो आम्ही, सीपी मध्ये. ओडीयन मध्ये  बाल्कनीचे तिकीट घेऊन सिनेमा पाहिला ,मैने प्यार किया” तो उगाच हसला. 

“अरे वा! भाग्यशाली आहे ती, प्रेयसीसाठी ६५ पैशांचे तिकीट आणि बायकोसाठी बाल्कनी” बोलताना तिने जीभ चावली”.

‘हो! पण त्या नंतर गेल्या ३५ वर्षांत आम्ही सिनेमा पाहिला नाही कि कधी हॉटेलिंग केल नाही’. एकाच्या पगारात दिल्ली सारख्या शहरात गुजराण करणे मुश्कीलच. शिवाय पोरांचा शिक्षणाचा खर्चही भरपूर. आता सर्व ठीक आहे. घरही आहे स्वत:चे. लेकीचे, लग्न झाले आहे, जावयाला कसलंही व्यसन नाही. आजच्या काळात हीच जमेची बाजू म्हणावी लागेल. मुलाचे शिक्षणही पूर्ण झाले आहे. त्यालाही नौकरी लागली आहे. अजून तरी कुठल्याही पोरीने त्याला घास टाकलेली नाही. बघू काही काळ. मग आई आहेच सून शोधण्यासाठी.....काही क्षण शांतता. ‘तुझा मोबाईल नंबर देते का?

“नको रे, उगाच त्रास होईल, तुला”.

तो काही बोलला नाही, त्याचे लक्ष रस्त्यावर मोगऱ्या फुलांच्या वेण्या विकणार्‍या दुकानदाराकडे गेले, मनात विचार आला. तिच्या पांढर्‍या केसांवरही मोगऱ्याची वेणी शोभून दिसेल. तो थांबला, त्याने तिला विचारले 
 ‘वेणी घ्यायची का’? 

“हो, घे ना! तुझ्या बायकोसाठी. मलाही आवडते, मोगऱ्याची वेणी....

त्याने दोन वेण्या घेतल्या. एक तिच्या हातात देत विचारले, ‘एकदा बघायचे आहे, वेणी केसांत माळलेली तू, कशी दिसते’.
वेणी हातात घेत, ती म्हणाली “तुला विसरण्याचा प्रयत्न केला पण विसरू शकली नाही. हे गेल्यावर तर सारखी तुझीच आठवण यायची. कधी-कधी वाटायचे, कदाचित अजूनही तू माझी वाट पहात असेल तर कधी वाटायचे तुझाही संसार असेल. तुला विसरलेच पाहिजे. मनाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. तुझी आठवण अनावर झाली कि बाजारात जाऊन मोगऱ्या फुलांची वेणी विकत घेते, खोलीचे दार बंद करून वेणी केसांत माळून आरश्या समोर उभी राहून रडते... आजही रडणारच”. काही क्षण दोघ काहीच बोलले नाही. थोड्या वेळाने ती म्हणाली, “प्लीज, मला भेटण्याचा पुन्हा प्रयत्न करू नको, वादळ उठेल, भावनांचा बंध फुटेल... तुझा संसार उध्वस्त होईल”. बोलता-बोलता ती विरुद्ध दिशेला वळली आणि झप-झप पाउले टाकत चालू लागली. एका क्षणासाठीही तिने मागे वळून पाहिले नाही. काही क्षण तो स्तब्ध.. जडवत तिथेच उभा राहला. तिला हाक मारायची तीव्र इच्छा झाली पण...

काही वेळाने त्याचे लक्ष हातातल्या मोगऱ्याच्या वेणी कडे गेले. त्याने उभ्या आयुष्यात बायकोसाठी मोगऱ्या फुलांची वेणी घेतलीच नव्हती आणि आज...  त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. लग्ना पूर्वी त्याच्या बायकोनेही राजा-राणीच्या सप्त रंगी संसाराचे चित्र पाहिले असेल. पण प्रत्यक्षात दिसली, नवर्‍याच्या अपुर्या पगारात घर चालवण्याची तिची धडपड. संसार फुलण्यासाठी तिने स्वत:च्या सर्व इच्छा मारून टाकल्या. कधी काहीही मागीतले नाही किंवा हट्ट केला नाही. त्याला आठवले, कित्येकदा त्याचा आणि पोरांचा डब्बा भरल्यावर भाजी शिल्लक राहायची नाही. कधी विचारले ‘अग! तुझ्यासाठी भाजी उरली नाही’. ‘मी माझे बघून घेईल’, हेच नेहमीचे उत्तर. बहुतेक लोणच्या सोबत किंवा पोळीला तेल तिखट मीठ लाउन भूक भागवायची. तिनेही त्याच्यावर शरीर व मनानी प्रेम केले आहे, बदल्यात त्याने काय दिले??? कधी मनाने प्रेम केलं का तिच्या वर?  त्याने निश्चय केला, आता सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायला हवी. घरी गेल्यावर त्याने आपल्या हाताने बायकोच्या पांढर्‍या शुभ्र केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळली.... 

Thursday, December 6, 2018

काही क्षणिका : सत्य



सत्य मध्यानी सूर्यासारखे प्रखर असते, एखादा हरिश्चंद्र सत्य नग्न डोळ्यांनी पाहू शकतो. बाकी सत्य न पाहण्याचे अनेक कारणे: 

शोधले सत्य 
अवसेच्या राती 
सापडले नाही. 

उषा सोनेरी
भावली मनी 
मोह सुखाचा.


काळ्या चष्म्यानी
सत्य मध्यांनी 
धूसर दिसले. 





 


Wednesday, November 28, 2018

क्षणिका : प्रवास



भिजलेल्या शब्दांचा 
संवाद दोन तटांचा
प्रवास समुद्र पर्यंतचा
वेगळा वेगळा.


  




Tuesday, November 27, 2018

क्षणिका: देहाचा सुगंध


देहाच्या सुगंधात
प्रेमाला शोधले
हृदयात फ़क्त
काटेच रुतले।

Monday, November 26, 2018

लघु कथा: उंदीरांच्या राज्यात


उंदीरांच्या देशात, मांजर होती महाराणी. तिच्या जवळ होता परवाना. उंदीरांना मारण्याचा. उंदीरांना खाण्याचा. रोज एखाद-दुसरा उंदीर मांजरीचा पोटात जायचा. रोज होणारा उंदीरांचा संहार बघून सर्व उंदीर वैतागले. एक दिवस मांजर झोपली असताना सर्व उंदीरांनी मिळून मांजरीच्या गळ्यात घंटी बांधली. घंटीचा आवाज ऐकून उंदीर पसार व्हायचे. शेवटी उपासमार होऊन मांजर मरण पावली. उंदीरांनी जल्लोष केला. 
 
आता उंदीरांचे राज्य आले. तरीही परिस्थिती बदलली नाही. रोज एखाद-दुसऱ्या उंदीराचा जीव जायचा. कारण आता उंदीरांच्या राज्यात उंदीरच उंदीरांना मारू लागले होते. 


Sunday, November 25, 2018

क्षणिका: सुगंध मातीचा


सुगंध पान गळतीचा
रोमरोमात भिनला।
पाश मायेचा 
सहज तुटला।

Saturday, November 24, 2018

वात्रटिका: तालिबानी राज्य आले

आज सकाळी
सोनेरी उषा
आंगणात प्रगटली
काळा बुरखा घालुनी
मला वाटले देशात
तालिबानी राज्य आले।

Tuesday, November 20, 2018

ग्राहक संगठन/कार्यकर्त्यांचा एक चेहरा असा हि


सिविल सप्लाय मंत्रालयात कार्यरत होतो. सन १९८५ एक अवर सचिव, त्यांचा स्टेनो अर्थात मी, एक उपनिदेशक त्यांचे नाव आणि एक लिपिक. मंत्रालयात ग्राहक सुरक्षा एककची स्थापना झाली. उपभोक्ता संरक्षण कायद्याची निर्मिती सुरु झाली. उपभोक्ता संगठन, सरकारी विभाग, व्यवसायिक संगठन व सामान्य जनतेची मते हि विचारार्थ घेतली. शेवटी एक राष्ट्रीयस्तरावर संमेलन घेतले. संमेलनात मसौद्यावर  चर्चा झाली. अनेक उपभोक्ता प्रतिनिधींनी आपले मत मांडले. अखेर २४ डिसेंबर १९८६ मध्य  उपभोक्ता कायदा झाला. 

उपभोक्ता कायद्याचा लाभ जनतेला मिळू लागला. साहजिकच आहे, लोक फोनवर धन्यवाद हि देणारच. एकदा असाच फोन आला, समोर पांढर्या केस वाले  हि बसले होते. प्रशंसा करणारे फोन ऐकल्यावर छाती ५६ इंचाची होणारच. मी ला म्हणालो हा कायदा होण्यास सरकार सोबत उपभोक्ता संगठनांचे हि महत्वपूर्ण योगदान आहे. काहींचे नाव हि घेतले. म्हणाले, तू बच्चा आहे. सरकारला कायदा करायचा होता म्हणून झाला. बाकी हे आंग्लभाषेत गिटीरपिटीर करणारे उपभोक्ता कार्यकर्ता त्या भागातल्या दल्ल्यापेक्षाही गेलेगुजरे आहेत. मला थोडा रागच आला, मी म्हणालो सर हे जरा जास्ती होत आहे. आता काळ बदलला आहे, विचार हि बदलले आहेत. माझ्या डोक्यावर हात फिरवीत म्हणाले, नादान बच्चा चिंता करू नको, लवकरच यांचे खरे स्वरूप तुला कळेल.

उपभोक्ता कायद्याच्या अंतर्गत उपभोक्ता संरक्षणासाठी एक केंद्रीय समितीचे गठन हि झाले. सरकारी अधिकारी, उपभोक्ता कार्यकर्ते, व्यवसायिक संठनांचे प्रतिनिधी इत्यादी. उपभोक्ता कायद्यात काही न्यूनता आहे, त्या दूर केल्या पाहिजे असे समितीचे मत झाले. कायद्याच्या दुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय उपभोक्ता समितीची एक बैठक झाली. 

त्या बैठकीत राष्ट्रीयस्तर प्रसिद्ध एका उपभोक्ता कार्यकर्ताने बोलणे सुरु केले. त्यांनी एक गोष्ट सांगितली मला जेवढे आठवते त्यानुसार "एका विधवा बाईने सिलाई मशीन (शिवणयंत्र) विकत घेतली. त्यावर कपडे शिवून ती गुजाराण करीत होती. ती सिलाई मशीन खराब झाली. तिने ग्राहक आयोगात तक्रार केली. कंपनीने उत्तर दिले,  हि बाई  सिलाई मशीनचा व्यवसायिक उपयोग करत आहे. अत: हिची केस उपभोक्ता कायद्या अंतर्गत येत नाही. न्यायालयाला हि कंपनीची बाजू पटली. त्या बाईला उपभोक्ता कायद्या अंतर्गत न्याय मिळाला नाही." त्यांनी पुढे म्हंटले कायद्यात सुधार करून स्व:रोजगारासाठी घेतलेली "पूंजीगत वस्तू" कायद्या अंतर्गत आणिली पाहिजे. अधिकांश उपभोक्ता कार्यकर्त्यांनी तोच कित्ता गिरविला. दीड वाजता जेवणाची वेळ झाली. जेवताना माझ्याजवळ आले आणि विचारले काय पटाईत काही कळले का? मी उतरलो, हो तूर्त तरी मला जबरदस्त धक्का बसला आहे. उपभोक्ता कायद्यात हि दुरुस्ती झाली तर खर्या ग्राहकांना न्याय मिळायला उशीर होईल. 

उपभोक्ता कायद्याची दुरुस्ती करण्यासाठी प. बंगालच्या मंत्र्याच्या अध्यक्षाखाली एक समिती बनली. त्यात नामी उपभोक्ता कार्यकर्ता, व्यवसायिक संगठनांचे प्रतिनिधी इत्यादी होते. तरीही स्वरोजगारासाठी घेतलेली पूंजीगत वस्तू ग्राहक कायद्या अंतर्गत आली. आता उपभोक्ता आयोगाचे स्वरूप बदलले. ग्राहकांसोबत, उद्योगपती हि न्यायासाठी या कायद्याचा वापर करू लागले. वकिलांची फौज आता जिला फोरमच्या समोर दिसू लागली. स्वभाविकच  होते सामान्य ग्राहकांना न्याय मिळायला उशीर होऊ लागला. व्यवसायिक संगठनांचा उद्देश्य सफल झाला. 

त्यानंतर बहुतेक वर्षभरा नंतरची गोष्ट, एक फोन आला. तो व्यक्ती ऑफसेट प्रिटींग मशिन बनविणारा होता. एका ग्राहकाला त्याने तीन महिन्यात मशीन डिलिवरीचे वचन दिले होते. पण उन्हाळ्यातील वीज कपात, काही औद्योगिक क्षेत्रात हडताल इत्यादी. मशीनींचे काही पुर्जे मिळायला उशीर झाला. तो म्हणाला आम्ही मशीन सोबत ऑपरेटरला हि ट्रेनिंग देतो. ग्राहकाला वेळोवेळी कल्पना हि दिली. त्यानी कुणालाही ट्रेनिंग साठी पाठविले नाही किंवा ऑर्डर हि रद्द केला नाही. ग्राहकाला उशिराने डिलिवरी दिली. ग्राहकाने डिलिवरी घेतली नाही व उपभोक्ता आयोगात केस टाकली. त्याने विचारले ऑफसेट प्रिंटींग मशीन केंव्हा पासून उपभोक्ता कायद्यात येते. मी उत्तर दिले, स्वरोजगारसाठी घेतलेली प्रत्येक वस्तू या कायद्या अंतर्गत येते. तो रागाने म्हणाला, मी हि स्वरोजगारसाठीच मशीन बनवितो. मशीनचे स्पेअरपार्टस अनेक उत्पादकांकडून येतात. मी पण उपभोक्ता आयोगात जाऊ शकतो का? मी उत्तर दिले सर, हा तुमचा प्रश्न आहेत. तो शिव्या देत रागाने बडबडू लागला. अश्या वेळी मी फोन कधीच कापत नाही. कापला तर बहुतेक असे लोक पुन्हा फोन करतात. त्यापेक्षा एकदा शांतीने त्यांचे गरळ एकून घेणे जास्त रास्त. त्याच्या म्हणण्याचा तात्पर्य एवढाच होता. दिल्लीत सर्व मूर्ख आणि गाढव बसलेले आहेत, जे असे कायदे बनवितात. बाकी सर्व कायदे रद्द करून हा एकच कायदा वस्तू-खरीदी विक्रीसाठी ठेवा. अखेर त्याने फोन ठेवला. शेजारीच सिपाही उभा होता, तो म्हणाला साब वो आदमी गुस्से में गालीयाँ दे रहा था क्या? मुझे भी सुनाई दे रही थी. मी उतरलो हा फक्त शिव्या देत होता, मला तर त्या दल्ल्याला चाबकाने फोडायची इच्छा होत आहे. सिपाही म्हणाला, साब, बायको मुलांचा विचार करा.  मी एक कप काॅफी आणतो, डोक थंड होईल.

सारांश, उपभोक्ता कायदा हा एक संकुचित कायदा होता, ज्याचा मुख्य उद्देश्य सामान्य ग्राहकांना न्याय देणे हा होता. पण कायद्याचे क्षेत्र वाढल्यामुळे ग्राहकांना न्याय मिळायला उशीर होऊ लागला. हा आहे अधिकांश उपभोक्ता संगठन व कार्यकर्त्यांचा खरा चेहरा.


Monday, November 19, 2018

वात्रटिका: बर्याच वर्षांनी मीटू भेटली.


बर्याच वर्षांनी 
मीटू भेटली
नोटीस कोर्टाची
हाती लागली.

बायको मुलांनी 
वाळीत टाकले 
वकिलाच्या द्वारी 
फिरतो एकाकी.

सौद्यात तुझाही 
झाला होता फायदा 
मग का माझ्या 
जीवावर उठली?

बर्याच वर्षांनी 
मीटू भेटली
माझ्या आयुष्याची
राखरांगोळी केली.







Friday, November 16, 2018

खरा इतिहास : वाल्मिकी/महार समुदाय हा पूर्वीचा क्षत्रिय



(भारतीय समाजात जातीभेदाचे विष पसरविण्यासाठी  मूळ निवासी युरेशिअन इत्यादी थोतांड इतिहासाच्या नावावर पसरविले जातात. हे पसरविणारे स्वत:ला इतिहासकार इत्यादी म्हणवितात. खर म्हणाल तर आजच्या लोकांचे अध्ययन केले तरी खरा इतिहास कळू शकतो).

हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात लेकीच्या सासरी एक लग्नाला गेलो होतो. त्यावेळी राज्यात निवडणुकीचे दिवस होते. साहजिकच होते गप्पा मारताना राजनीती जातीपातीचा विषय निघणारच. हिमाचल प्रदेशात २७ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे, पण वाल्मिकी समुदाय २०११ जनसंख्यानुसार अर्ध्या टक्क्याहून कमी याचे कारण काय, हा प्रश्न आला. तिथे एक शाळेचे शिक्षक बसले होते, ते म्हणाले हिमाचल मध्ये मुगल आले नाही. म्हणून वाल्मिकी समुदाय हि नाही.  हिमाचल येथे वाल्मिकी समुदाय गेल्या २०० वर्षांत बहुतेक ब्रिटीश लोकांकडे शौचालाय स्वच्छ करण्यासाठी आला आणि इथलाच बनला. मुगल येण्याआधी 'शौचालय साफ करण्याचे कार्य' करणारी कुठलीही जाती भारतात अस्तित्वात नव्हती. 

मुगल येण्याच्या पूर्वी आपल्या देशात सकाळी शौचेसाठी लोक जंगलात अथवा दिशा मैदानात जात होते. घरात शौचालय बांधण्याची पद्धत नव्हती. वेद, रामायण, महाभारत किंवा संकृत भाषेतील नाटक, कादंबरी इतकेच नव्हे मनुस्मृतीत 'साफ सफाई' करणाऱ्या कुठल्याही जातीचा उल्लेख नाही. घरची साफसफाई गृहणी करायची आणि राजमहाल इत्यादी ठिकाणी सेवेसाठी सूतपुत्र (राजाची इतर स्त्रियांपासून झालेल्या संतान) होतेच. सैनिक पासून ते मंत्री, रथचालका पासून ते कथा वाचणारे, राज वंशाचे चरित्र सांगणारे सूतच होते. त्यांना अस्पृश्य वागणूक मिळत हि नव्हती.  मग प्रश्न येतो वाल्मिकी  समुदाय आला कुठून. 

मी दिल्लीत बिंदापूर एक्स. येथे राहतो. पूर्वी गावाच्या बाहेर (अर्थात आज एक कोलोनी आहे). हरिजन बस्ती होती. ३० वर्षांपूर्वी बिंदापूर एक्स. कॉलोनी बनल्यावर, कोलोनीच्या सफाईची ठेका सोनू नावाच्या तरुणाने आपल्या नावावर करून घेतला अर्थात स्थानीय नेत्याला पटवून. सध्या सोनुच्या खाली काही कर्मचारी हि कार्य करतात. हरिजन कोलोनीत पंवार, चौहान, वर्मा, सोलंकी, पाल इत्यादी आडनावांच्या पाट्या दिसतात. हि सर्व नावे राजपूत अर्थात क्षत्रियांत आहे. महिना-दोन महिन्यातून घराच्या मागच्या नालीतून गाळ, कचरा इत्यादी काढावा लागतो. माझ्या घरी हातपाय धुवायला पाणी आणि  चहा हि त्याला मिळतो. एकदा बोलताना तो सहज म्हणाला, इतर जातीतले लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाही. चहा हि वेगळ्या कपात देतात. साहेब तुम्ही या भागातले नाही, म्हणून चांगली वागणूक देतात. पण आमचे पूर्वज हि राजपूत होते. त्या काळात युद्धात पराजित राजपूतान्जवळ तीनच पर्याय रहात होते, एक मृत्यूला स्वीकार करणे, धर्म बदलणे किंवा मुगलांची शौच साफ करणे. आमच्या पूर्वजांनी हा तिसरा मार्ग स्वीकारला, पण धर्म बदलला नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत.

पश्चिम दिशेतून येणारे लोक वाळवंटात राहणारे. तिथे दिशा मैदान, तलाव इत्यादी नव्हते. शौच घरातच करायचे. गुलाम लोक ती साफ करायचे. भारतात जाती व्यवस्था होती. प्रत्येक जाती स्वत:चे पारंपारिक कार्य करणारी. इस्लाम कबूल केले तरी ते त्यांचे पारंपारिक कार्यच करणार. मग पराजित क्षत्रियांना या कामावर जुंपले. पुढे मुगलांची घरात शौचालय बांधण्याची पद्धत संपूर्ण भारतात पसरली. राजा महाराजा, जमीनदार, समाजातील प्रतिष्ठीत लोक घरात शौचालय बांधू लागले आणि वाल्मिकी समुदाय विभिन्न नावांनी देशभर पसरला. 

महाराष्ट्रात हि पाहाल तर इतर समुदायांची आडनावे महारांत आहेत. ज्या भागांत मुगलांचे जास्त वर्चस्व होते, त्या भागात वाल्मिकी समुदाय हि मोठ्या प्रमाणात आढळेल. देशातील दुर्गम भागात जिथे मुगल पोहचले नाही तिथे वाल्मिकी समुदाय आढळणार नाही. 

उत्तर भारतीय ते दक्षिण भारतीय सर्वांचे डीएनए एक असले तरी हि स्वत:ची राजनीतिक पोळी शेकण्यासाठी इतिहासाच्या नावावर थोतांड पसरविण्याचे गेल्या काहीं वर्षांत जोमात सुरु आहे. ते थांबविण्यासाठी वाल्मिकी समाजाला पुन्हा भारतीय समाजात मानाचे स्थान देणे काळाची गरज आहे.

Thursday, November 15, 2018

दोन क्षणिका : कवी -मैफिल आणि पाहुणे



कवीला मिळाली 
कावळ्यांची साथ 
वडाच्या पारावर 
मैफिल छान.


आले पाहुणे घरी
 हुरूप आला कवीला.
पाहुनी चौपडी हाती कवीच्या
पळाले पाहुणे उलट्या पायी.

Wednesday, November 14, 2018

वात्रटिका : कवीचे नशीब




 (दिल्लीतल्या  एका कवीची व्यथा)

कवीची कांव कांव
नेत्याची खांव खांव 
एका म्यानीत 
दोन तलवार  
कवी झाला 
बेदरबार.

कवीच्या नशिबी वनवासच असतो
 
चारणाला मिळतो 
दरबारात मान 
कवीच्या नशिबी 
येतो वनवास.



Tuesday, November 13, 2018

हायकू: दिल्लीतील वारा आणि यमाचा चेहरा



दिल्लीतील वारा
विषाहून विखार  
जणू यमाचा पाश.

काळ्या-कुट्ट स्मागात 
दिसला यमाचा चेहरा 
कंठाशी आला प्राण.

Sunday, November 11, 2018

वात्रटिका: काळ कोठडीत पाठवा


बॉम्ब स्फोट करतात
जनतेला मारतात।
वसुली करतात
जनतेला मारतात।
 शिकार करतात
 जनतेला खातात।

आतंकवादी असो नक्सली
आणिक वाघीण नरभक्षी
यांना मारणार्याना
काळ कोठडीत पाठवा।







Thursday, November 8, 2018

वात्रटिका: कोल्होबाची ढुंगोली जळाली


नोट बंदीचा दिवस आठवला 

काळ्या रातीत 
काळी जळाली
कोल्होबाची 
ढुंगोली जळाली.

Wednesday, November 7, 2018

वात्रटिका: लक्ष्मी गेली चीनला

चाईनीज दिव्यांनी 
घर रोशन  केले.

लक्ष्मी गेली चीनला 
पूजन आम्ही केले.