Monday, August 20, 2018

शतशब्द कथा: जगण्याचे उद्दिष्ट

तहान, भूक, निद्रा विसरून आपल्याच तंद्रीत तो चालत होता.  त्याला रस्त्यात  अनेक यात्री भेटले. पण त्याने कुणाला ही आपल्या सोबत घेतले नाही. त्याने क्षणभराची विश्रांती ही घेतली नाही. एकटाच तो जिद्दीने चालत राहिला, अंतहीन रस्त्यावर.

अखेर सूर्यास्त हा झालाच. त्याचे गात्र झाले शिथिल झाले, डोळे जड झाले. त्याला आता चालणे  शक्य होत नव्हते. त्याने स्वत:लाच विचारले, सकाळ पासून आपण चालतो आहे, तरीही  आपल्याला लक्ष्य का भेटले नाही? काही चूक तर झाली नाही ना.  क्षणभरासाठी त्याने डोळे उघडले, संपूर्ण सृष्टी सोनेरी रंगात न्हात होती. अनादी काळापासून चालत आलेला  सुर्यास्ताचा उत्सव. अखेरचा श्वास घेताना त्याला उमगले, आनंदाचे सोनेरी रंग उधळत अंतहीन रस्त्यावर चालणे म्हणजेच जगण्याचे उद्दिष्ट. 

Friday, August 17, 2018

सबका साथ सबका विकासाचे आद्य पुरुष - स्वर्गीय अटलजी



मी भाग्यशाली होतो, १९९७ मध्ये प्रधानमंत्री कार्यालयात पोस्टिंग झाली. अटलजी प्रधानमंत्री झाले आणि कार्यालयात एक वेगळीच चेतना आली. कामाचा बोझा एकदम वाढलला. सरकारी दफ्तरात नूतन कल्पना साकारताना, भरपूर कागदी कार्य करावे लागतेच. सकाळी ९ ते रात्री ९ वाजायचे  कधी  कळायचे नाही. पण देशासाठी आपण काही ठोस कार्य करत आहोत या जाणीवेने त्या कामातहि आनंदच मिळत होता. 

सबका साथ, सबका विकास याचा अर्थ काय. स्व. अटलजींनी अनेक राजनीतिक दलांना आपल्या सोबत घेऊन सरकार चालवली म्हणजे विकास होतो. नाही. देशात विभिन्न राजनीतिक आणि धार्मिक समूहांना आरक्षण दिल्याने सर्वांचा विकास होतो. नाही. सरकारी नौकर्या फक्त ५ टक्के आणि भविष्यात कमी होणार. अर्थात आरक्षण देऊन विकास होणार नाही. स्वस्तात राशन दिल्याने विकास होणार, हे हि संभव नाही. मग सर्वांचा विकास कसा होणार? हा प्रश्न आहेच. 

मी १९९६ ला सेप्टेंबर अशोकनगर मध्यप्रदेशात फिरायला, सौ. आणि छोट्या मुलांसोबत, गेलो होतो. हा भाग शिंदे परिवारची पुश्तैनी जागीर. तरीही इथल्या रस्त्यांची अवस्था फार भयंकर होती. चंदेरी, थुबोन्जी (जैन मंदिर), विन्ध्यवासिनी देवी (एका गावात) व अनेक जुने मंदिर बघितले.  बाईक, जीप, ट्रक आणि ट्रैैक्टर शिवाय दुसरे वाहन रस्त्यावर चालणे अशक्यच होते. जीप मध्ये हि पोरांना धरून ठेवावे लागले होते.  बाजारात कांदे इत्यादी बाहेरून येणाऱ्या भाज्या नव्हत्या. फळे हि केळ, पेरू आणि पपीता ते हि एखाद्या दुकानात व महाग.  पुन्हा २०१७ मध्ये लेक-जावयासोबत हा भाग फिरलो. या वेळी रस्ते हिरोईनच्या गालासारखे होते. दिल्लीपेक्षा हि चांगले. रस्त्यांवर कार, स्कूटी सर्वच दिसत होते. अशोकनगरच्या भाजी बाजारात सेप्टेंबरच्या सुरवातीला हि भरपूर भाज्या दिसत होत्या. दिल्लीत दिसणारी फळे हि दिसत होती. काय बदलले. 

अटलजींनी जवळ दूरदृष्टी होती. जो पर्यंत ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पोहचणार नाही. तो पर्यंत तिथे उद्योग-धंधा तर सोडाच, कृषी आधारित उद्योग हि लागू शकत नाही. एखाद्या भागात जास्त शेतमालाचे उत्पादन झाले तर माल रस्त्यावर फेकल्या जाणार, कारण  जिथे रस्तेच नाही किंवा अत्यंत खराब आहे, तिथे टेम्पो घेऊन कुणी  येणार नाही. २०-२५ किमी दूर हि भाजीपाला पाठविणे आर्थिक दृष्टीने संभव नव्हते. अन्न-धान्य हि शेतातच कमी दरात विकावे लागायचे.  राज्य सरकारांना ग्रामीण भागात रस्ते बनविणात रस हि नव्हता. ज्या देशात जाती आणि धार्मिक आधारावर जनतेला वोट मिळत असेल तर आधारभूत सुविधांचा विकास करायची गरज काय.  परिणाम ग्रामीण भागातून मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांत पलायन. कारण तिथेच वीज हि आहे आणि रस्ते हि.  दिल्ली NCR मध्ये  ८० टक्के लोक नरक सदृश्य जीवन जगतात मग ते कुठल्याही जाती, संप्रदाय आणि धर्माचे का असेना. गावांचा विकास अर्थात सर्वांचा विकास, हे अटलजींनी ओळखले होते आणि त्या साठी सर्वात आधी आधारभूत सुविधा ग्रामस्थांनी पोहचविण्याचे कार्य करणे गरजेचे . 

अटलजींनी संपूर्ण देश आपल्या पायाखाली तुटवला असल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव होती. आपल्या देशात अधिकांश जनता ग्रामीण भागात राहते. ती मेहनती आहे. ग्रामीण भागात रस्ते, रेल्वे, वीज इत्यादी पोहचली तर गावांचा आपसूक विकास होईल. ग्रामीण भागातून पलायन कमी होईल.  ग्रामीण भागातील जनतेला देशांच्या इतर भागांपासून जोडण्यासाठी सन २००१ मध्ये प्रधानमंत्री  ग्राम सडक योजनेचे कार्यान्वन सुरु झाले. सुरवातीला १०००.पेक्षा जास्त आणि ५०० जास्त वनवासी बंधू राहत असलेल्या गावांना या योजनेंतर्गत जोडण्याचा निर्णय घेतला. आज देशात साडेपाच लक्ष किमी रस्ते या योजने अंतर्गत बनले आहे.  

राष्ट्रीय राजमार्ग देशातील सर्व मोठ्या शहरांना जोडतात. या महामार्गांवर जर माल घेऊन जाणारे ट्रक मुंगीच्या गतीने धावत असेल तर, ग्रामीण भागातून उत्पाद मोठ्या शहरांत वेळेवर पोचविणे अशक्यच. अश्या परिस्थितीत शहर सोडून ग्रामीण भागात उद्योग कोण लावणार. हि बाब लक्षात घेऊन स्वर्णिम चतुर्भुज योजनेचा शुभारंभ केला. यात ५८४६ राष्ट्रीय महामार्ग २ लेन जागी ४ आणि ६ लेन करण्याचा निर्णय घेतला होता.  योजना २००६ पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती. पण २०१२ पूर्ण झाली.  या रस्त्यांमुळे गाव आणि शहरांची दुरी कमी झाली. ग्रामीण भागात विकासाला प्रारंभ झाला. 

अटलजींनी २००३ मध्ये सागरमाला प्रकल्पाचा विचार सादर केला होता. पण   प्रत्यक्षात २०१५ मध्ये या योजनेवर कार्य सुरु झाले. २१ बंदरांना रेल्वेशी जोडणे. ७५०० किमी सागरमार्ग विकसित करणे, १४००० किमी नदीमार्ग विकसित करणे. या योजनेवर ४ लाख कोटी खर्च होणार. पण वेळ आणि वाहतूक खर्च वाचण्याने लाखो कोटींचा फायदा होणार. 

ग्रामीण भागात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढावी म्हणून १९९९ मध्ये  नदी जोड प्रकल्प साकारण्यासाठी प्रयत्नसुरु झाले पण  दुर्भाग्यवश नवी सरकार येताच तो थंड्या बस्त्यात गेला. या घटकेला काही प्रकल्पांवर पुन्हा कार्य सुरु झाले आहे. असो. 

अटलजींनची प्रेरणा घेऊनच, विद्यमान प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी अटलजींचे स्वप्न पुढे नेले. भारतमाला प्रकल्पात ८६०००  किमी रस्ते ४ पदरी आणि ६ पदरी होणार आहेत. त्यातले ३४००० किमी २०२२ पर्यंत पूर्ण होतील.  रखडलेल्या डीएफसी हि वर वेगाने कार्य सुरु आहे. रेल्वेच्या पुनर्विकासासाठी ३ लाखाहून जास्त वित्तीय मदत दिल्या गेली. अनेक नवीन रेल्वे मार्ग बांधणे सुरु झाले.  गेल्या ४ वर्षांत वीज उत्पादन वाढवून खेड्या-पाड्यात वीज पोहचवून  ग्रामीण विकासाला चालना दिली.  ग्रामस्थांना बँक खाते मिळाले, स्वस्तात सुरक्षा विमा मिळाला. आता स्वास्थ्य विमा हि मिळणार. हे सर्व  खर्या अर्थाने सबका साथ सबका विकास आहे. 

ग्रामीण भागातील रस्ते, रुंद महामार्ग, जलमार्ग आणि विकसित बंदरे, देशातील सदूर भागातील ग्रामीण हि जगाशी जोडले जातील.  ग्रामीण भागात शेतमालावर आधारित उद्योग मोठ्या-प्रमाणात स्थापित होतील. तेथून पलायन थांबेल. महानगरांवरचा भार कमी होणार. काही वर्षांतच शेतातच तोडून स्वच्छ केली भाजी सरळ स्वैपाकघरात पोहचेल तेंव्हा या युगदृष्ट्या महापुरुषाचे स्मरण करायला विसरू नका. असो. 

Thursday, August 16, 2018

क्षणिका : घर



मातीच्या भिंतीत 
जन्माची शिक्षा
घर नावाच्या 
बंदीशाळेत.

 







Tuesday, August 14, 2018

एमएनसीच्या विळख्यात स्वदेशी


युएस मध्ये एक कहावत आहे,  तुम्ही पेप्सी पीतात कि  कोकाकोला पीतात या वरून तुमची पार्टी सांगता येते. एका युएस राष्ट्राध्यक्षाने एका कर्मचार्याला व्हाईट हॅाऊसमध्ये वेगळा कोक पीताना पाहिले, त्याला बाहेरचा दरवाजा दाखविला गेला. अमेरिकेत हि परिस्थिती तर भारतात या एमएनसी काय कहर माजवीत असतील याची कल्पना करणे कठीण. जेवढे ईस्ट इंडिया कंपनीने देशाला लूटले नसेल, त्या पेक्षा कितीतरी पट या एमएनसी देशाला लुटत आहे. त्यासाठी त्यांना भारताच्या भूक्षेत्रावर अधिकार करण्याची हि गरज नाही. 

एमएनसी कंपनीचे मुख्य धोरण नफा. त्या साठी साम दाम दंड आणि भेद ह्या सर्वांचा उपयोग करतात. नैतिकता नावाची वस्तू धंद्यात नसते  हे त्यांचे धोरण. प्रशासन आणि कार्यपालिकाला अनुकूल करा. स्वत:च्या फायद्यासाठी नियम कायदे बदलवून घ्या. मिडीयाला विकत घ्या. तिच्या मदतीने स्वदेशी कंपन्यांच्या विरुद्ध अफवा: पसरवा. आपले हेर तिथे प्लांट करून गडबड करा. शेवटी स्वदेशी कंपन्यांना शरणागती पत्करायला मजबूर करा.  

आपल्याला आठवत असेल थम्प्स अप, गोल्डस्पॉट, माजा, रिमझिम आणि केम्पाकोला  मोठे ब्रांड होतेच, त्या शिवाय अनेक स्थानीय ब्रांड बाजारात होते. सुरवातीला प्राईस वार. जास्ती फरक पडला नाही. दुकानातून काचेच्या बाटल्या उचलून मोठ्याप्रमाणावर फोडल्या गेल्या. बाटल्या बनविणाऱ्या कंपन्यांना जास्त पैसा देऊन अनुकूल केले. हे सर्व होत असताना, प्रशासन मूक दर्शक राहिला. छोट्या मोठ्या कंपन्या धुळीत गेल्या. मोठ्यांनीही परिस्थिती ओळखून शरणागती पत्करली. आज मोठ्या प्रमाणात जीवाणू नाशक आणि विषाणू नाशक असलेले टोईलेट कोला भरपूर पैसे देऊन अशिक्षितापासून ते उच्च शिक्षित मोठ्या आनंदाने पितात.  

युनीलिवर कंपनीने हि अनेक साबण कंपन्या याच मार्गाने संपविल्या. अंकल चिप्स आणि इदुलेखा हे ताजे उदाहरण आहेत. सर्वांना खिश्यात घालण्याची आमची कुवत आहे. यांच्या निर्मित शीतल पेयांत उंदीर सापडले तरी चर्चा होत नाही. दंड हि जास्त होत नाही. यांचे उत्पाद परीक्षणात फेल झाले आणि बाजारातून परत मागविले तरी मीडियात चर्चा होत नाही. जास्तीसजास्त एखाद्या तेही हिंदी अथवा स्थानिक वर्तमान पत्रात कुठेतरी कोपर्यात बातमी दडलेली दिसेल. एमएनसी  स्वदेशी कंपन्यांना संपविण्यासाठी सर्व माध्यमांचा भरपूर प्रयोग करतात. त्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशात तर जयचंदांची कमी नाहीच. 

विदेशी कंपनींचे षडयंत्राविरुद्ध सर्वोच्च न्यायालया पर्यंत  लढा देण्यासाठी  विकोवज्रदंतीला कोट्यावधी खर्च करावा लागला. त्यांची प्रगती रोखण्यात एमएनसींना बर्यापैकी यश आले. या घटकेला एलोपेथी औषधांवर ४% टक्के (कारण अधिकांश विदेशी कंपन्या आहेत) व आयुर्वेदिक वर १२%. आयुर्वेदिक औषधी बनविणाऱ्या अधिकांश स्वदेशी कंपन्या आहेत, हे विशेष. 

नागाने फणावर काढण्या आधीच त्याला नष्ट केले पाहिजे. एमएनसींनी पतंजलि आयुर्वेदची स्थापने पासूनच तिला नष्ट करण्याच्या प्रयत्न सुरु केला. कामगारांना भडकविण्यापासून ते अनेक अफवाः पसरविण्याचे कार्य सुरु झाले. पतंजलि विरुद्ध शेकडो कसेस दर्ज केल्या गेले. कंपनीचे खाते हि अनेकदा सील झाले. ट्रक चालकांना भडकवून फूडपार्क वर हल्ला करविला. हे सर्व वार व्यर्थ गेल्यावर, शेवटचा उपाय मिडीयाचा उपयोग करून अफवा: पसरविणे. सर्वात मोठी अफवा: म्हणजे आवळा ज्यूस फेल झाले. या प्रश्नावर एका मिडिया समूहला उत्तर देताना आचार्य बाळकृष्ण म्हणाले, आवळा आमचा पहिला उत्पाद. एका आर्मी अधिकार्याचा एक रिपोर्ट पाहून गैरसमज झाला. आर्मीप्रती निष्ठा असल्यामुळे याहून अधिक आम्ही काही बोलणार नाही. आम्ही तो गैरसमज तत्काळ दूर केला. पण मिडीयाने मात्र तो उचलून धरला. सत्य पडताळण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. आता सोशल मिडियावर तर रोजच नवीन कहाण्या येतात. देशात गायीच नाही (तब्बल १२ कोटीहून जास्त आहे) तर तूप कुठून, जमणारे मध नकली असते इत्यादी. या सर्वांच्या मागे कोण आहेत हे आम्हाला माहित आहे. असो.

नुकतेच filpkart या भारतीय कंपनीने वालमार्ट समोर शरणागती पत्करली. या सर्वांचा परिणाम, ती कंपनी सुरवातीला स्वस्त: आणि नंतर महागातला कचरा भारतीय ग्राहकांना विकणार. 

एमएनसीचे षडयंत्र असफल करायचे असेल तर आपण अधिकाधिक भारतीय कंपन्यांचे उत्पाद वापरले पाहिजे. शीतल पेयांच्या जागी ताजे फळांचे रस प्या. मैगी नुडलच्या जागी स्वदेशी कंपनींचे खा. खाद्य पदार्थ, तेल,पर्यावरण अनकूल स्वदेशी प्रसाधन सामग्री वापरा. एवढे तरी आपण निश्चित करू शकतोच.

शेवटी सर्वांना स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा.


Monday, August 13, 2018

शतशब्द कथा: हडताल


शर्माजी एका  फैक्टरीत २० वर्षांपासून सुपरवायझर. "शर्माजी, मुलाला नौकरी पाहिजे असेल तर आमचा साथ द्यावा लागेल. उद्या हडताल" - नेताजी. 

फैक्टरीच्या बाहेर "जिंदाबाद मुर्दाबाद, नेताजी जिंदाबाद". पोलिसांनी शर्माजीसह ४०-५० कर्मचार्यांना बस मध्ये कोंबले. थोड्यादूर नेल्यावर सर्वांना सोडून हि दिले. आपण नेताजींना साथ दिला, उद्या मुलाला हि याच फैक्टरीत नेताजी निश्चित नौकरी लाऊन देतील.

दुसर्या दिवशी सकाळी, फैक्टरीच्या गेटवर गार्डने एक लिफाफा शर्माजींचा हाती दिला. "फैक्टरीत तोडफोड, दंगा"....शर्माजी बरखास्त. "तोडफोड करणारे आमचे लोक नव्हतेच"- इति नेताजी.  शर्माजींच्या डोळ्यांसमोर अंधार. पगार नाही, पेन्शन नाही, कोर्ट-कचेरी...जेल. शर्माजीचा  संसार उध्वस्त झाला.

४० कंत्राटी कामगार कमी पगारावर, फैक्टरीत रुजू झाले.


Friday, August 10, 2018

लघु कथा: आरशा कधीच खोट बोलत नाही


तिने आरश्यात डोकावले, निस्तेज चेहरा, पांढरे होणारे डोक्यावरचे केस, डोळ्यांखाली मोठे काळे वर्तुळ, चेहऱ्यावर सुरकत्या.. आज पार्लर मध्ये जावेच लागेल. "ए म्हातारी, किती वेळ आरश्यात डोकावणार". मी म्हातारी, अजून वय काय माझे, नुकतीच पन्नासी उलटली आहे. खोटारडा..."हा! हा! हा! आम्ही आरशे कधीच खोटे बोलत नाही, ए म्हातारी....." 

ब्युटी पार्लरमध्ये तिने केस रंगविले, गोल्ड फेशियल, मसाज....पूर्ण ब्युटी  ट्रिटमेंट घेतली. तोंड रंगवून आरश्यासमोर गुणगुणू लागली 'बिजली गिराने  मैंं तो आई, कहतेंं हैं लोग मुझे हवा हवाई'  ए आरश्या आता चूप का आहे, सांग कशी मी दिसते? "ए म्हातारी.....". चल खोटारडा फिरकी घेतो आहेस माझी...एक ठोसा देईल. "हा! हा! हा! तुझाच हात रक्त बंबाळ होईल. माझे काय, दुसरा आरशा हि हेच म्हणेल  तोंडावर कितीही बुरखे घातले तरी म्हातारपण लपणार आहे का? ए म्हातारी....." 


Tuesday, August 7, 2018

उलूक परिवार कथा


बालीत कपडे स्वस्त मिळतात. सरकारी कामातूनवेळ काढून खरीदारी करायला गेलो. मालमध्ये  फिरताना, लाकडाचे आई, बाबा आणि बाळ  या उलूक परिवाराने ध्यान आकर्षित केले. खरीदारी पूर्ण झाली, तरीही सारखे-सारखे लक्ष त्या उलूक परिवाराकडे जायचे, जणू ते म्हणत होते, आम्हाला हि तुझ्या सोबत यायचे आहे. अखेर राहवले नाही, भारतीय मुद्रेत फक्त ८० रुपये देऊन उलूक परिवार खरेदी केला. काही सहकार्यांनी  माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एक दुसर्याच्या कानात, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाला, "शायद  दिल के साथ दिमाग भी खराब हो जाता है" दुसरा उद्गरला "नहीं यार, पटाईतजी पठिया (सठिया) गए है". तीसरा म्हणाला "शेवटी बालीत हि पटाईतजींनी आपल्याला नातेवाईकांना शोधून काढले, आता घर वापसी". आजकाल पटाईतजी काहीशे विचित्र वागतात, या बाबत सर्व सहकारी एकमत होते. विमानातून उतरण्याआधीच, पटाईतजी आणि त्यांचे उल्लू हि कथा, सचिवालयात पसरली. घरी येताच, सौचे लक्ष हि उल्लू परिवाराकडे गेले. "मला १०० टक्के खात्री होती, तुमचे बाबा  काही तरी विचित्र वस्तू घरी घेऊन येतील." असो. तिच्या बडबडीकडे लक्ष न देता उलूक परिवार बैठकीच्या खोलीत शोकेसमध्ये  विराजमान झाले. 

शेजारची वर्षभराची रिया, संध्याकाळी घरी पोहचताच, समोरच्या दादू सोबत(मी) खेळायला यायची. "पोटावर उड्या मारणे, खांद्यावर लटकणे,अकुंच्या पकुंच्या पिकले पान कोण खाणार..." तास-दीड तास कसे निघून जायचे, कळायचे नाही. एक दिवस तिचे लक्ष उल्लू परिवाराकडे गेले. शोकेसमधून उल्लू परिवार तिच्या हाती आला. तिच्यासाठी उल्लू परिवाराचे नामकरण केले. मम्मी उल्लू, डैडी उल्लू आणि रिया उल्लू. आता तिचे मन उल्लू परिवारासोबत खेळण्यात रमले.  त्यांना हातात घेऊन इकडून-तिकडे हुदळायची.

एक दिवस सौच्या हातून डैडी उल्लू खाली पडला. त्याच्या कान तुटला. संध्याकाळी रियाने विचारले, "दादू डैडी उल्लूचा कान कोणी तोडला". मी उत्तर दिले 'डैडी उल्लू अणि मम्मी उल्लूचे भांडण झाले. मम्मीला उल्लूला राग आला आणि तिने डैडी उल्लूचे कान तोडले'. त्याच रात्री काही कारणामुळे तिच्या आई बाबांमध्ये वाद झाला. त्यांना भांडताना पाहून रिया म्हणाली "डैडी, मम्मी से झगड़ो मत, वर्ना कान तोड़ देगी"....त्यांचे भांडण तिथेच संपले. शेजारी काही तरी बिनसले आहे....

दुसर्या दिवशी मी कार्यालयात गेल्यावर तिची आई घरी आली. सौला विचारले. "अंकलजी ठीक है क्या". सौने उत्तर दिले, "उन्हें क्या होना था, अच्छे-भले ठीक-ठाक है". "रिया कह रही थी, उनका कान...".  सौला हसू आले, तिला कान तुटलेले डैडी उल्लू दाखविले. "अंकलजी क्या-क्या सिखाते रहते हैं."

काळ कुणाच साठी थांबत नाही, रिया मोठी होऊ लागली आणि गल्लीत खेळायला अनेक मित्र-मैत्रिणी तिला भेटल्या. हळू-हळू तिचे घरी येणे कमी झाले. एक दिवस संध्याकाळी घरासमोर रिया तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती. तिलाच पाहत दरवाज्यावर उभा होतो. तिची आईहि बाहेरच उभी होती, तिच्या हे लक्षात आले. ती रियाला म्हणाली,  रिया देखो, सामने वाले दादू आले आहेत. तिने आईकडे पाहत डोळे मिचकावत उत्तर दिले,  आता मला दादूशी काय मतलब.....आणि खेळण्यात दंग झाली. काळ बदलला आणि भातुकलीच्या खेळातील पात्र हि बदलले. 

उल्लू परिवार पुन्हा शोकेस मध्ये विराजमान झाला. 


Monday, August 6, 2018

क्षणिका : नकविता




छंद अलंकार आणि मीटर इत्यादी वस्त्रांची गरज नसणारी नकविता -
 

ओबड-धोबड चेहरा
आडव्या-तिरक्या रेषा
बाहेर चौकटीच्या
विवस्त्र, नकविता.




Saturday, August 4, 2018

आज जडी-बूटी दिवस

वर्षाऋतुत आकाशातून अमृत धारा बरसतात. धरतीच्या कोखातून जीवनदायनी वनस्पती प्रगट होतात. भारतात १८,००० च्या वर औषधी वनस्पती आहेत. पण दुर्भाग्य या घटकेला फक्त ११०० वनस्पतींचा उपयोग आयुर्वैदिक औषधीत वापर होतो. याचा विपरीत चीन मध्ये तिथल्या १३००० वनस्पतींचा उपयोग चीनी हर्बल मेडीसीन मध्ये होतो. आज आयुर्वैदिक औषधींना जागतिक मान्यता नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या कसौटीवर औषधी वनस्पतींना पारखण्याचा प्रयत्न झाला नाही. जास्तीस्जास्त फूड सप्लीमेंट रुपात आयुर्वेदिक औषधी निर्यात होतात.  

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती. 

आपले सौभाग्य आजच्या दिवशी आचार्य बाळकृष्ण प्रगट झाले. (महान लोक प्रगट होतात). केवळ कागदी शिक्षण नव्हे तर गंगोत्री ते आसाम पर्यंतच हिमालय, उत्तर ते दक्षिण भारतातील जंगले, आपल्या पायदळी तुटवली. स्थानीयस्तरावर वापरल्या जाणार्या अनेक वनस्पती औषधींचे ज्ञान प्राप्त केले. आजच्या दिवशी त्यांनी आयुर्वेदिक अनुसंधान केंद्र उभारण्याचा संकल्प केला होता. आज पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ३००च्या वर वैज्ञानिक आयुर्वेदात प्रयोग होणार्या वनस्पती आणि इतर घटक द्रव्यांवर अनुसंधान कार्य करीत आहे. ३००० जवळ वनस्पतींवर सध्या प्रयोग सुरु आहे. पतंजलि फूड पार्क मध्ये होणार्या नफ्याचा एक भला मोठा हिस्सा यावर खर्च होतो. एलोपेथी औषधीत प्रयोग होणारे घटक पदार्थ मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, त्यांचे चांगले व वाईट परिणाम, औषध घेणार्याला माहित असते. त्याच प्रमाणे आयुर्वेदिक औषधांत वनस्पती मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, हे कळल्यावर उत्तम दर्जाच्या औषधींंचे निर्माण शक्य होईल. लोकांचा आयुर्वेदावर विश्वास वाढेल. कमी खर्चात रोगराई दूर होईल. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळेल. भारताचा औषधी निर्यात हि मोठ्या प्रमाणावर वाढेल.  

आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेदावर तथा औषधी वनस्पतींवर अनेक पुस्तके तर लिहली आहेच. त्यांच्या पुस्तकांचे अनेक विदेशी भाषांत अनुवाद हि झालेले आहे. या शिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली ५०,००० पेक्षा जास्त जुन्या संस्कृत आणि आयुर्वेदावर असलेल्या ग्रंथांचे डीजीटलाइजेशन झाले आहे, अजूनही कार्य सुरु आहे. अनेक जुन्या पांडुलिपींचे प्रकाशन झाले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली World Herbal Encyclopedia ज्यात जगातल्या ६०,००० हून औषधी वनस्पतींचे वर्णन असेल, जगातील सर्वात मोठा ग्रंथ  (जवळपास १०० खंड) प्रकाशाचे कार्य सुरु आहे. पहिला खंड प्रधानमंत्रीच्याहस्ते काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला होता. भारतातील औषधीय वनस्पतींच्या क्षेत्रात आचार्य बाळकृष्णच्या योगदानाच्या प्रीथर्थ त्यांचा जन्मदिवस जडी-बुटी दिवस म्हणून साजरा करणे सुरु केले आहे. आजच्या दिवशी पतंजलिचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती वितरीत करतात. आज सामान्य जनतेच्या घरातल्या गमल्यांत गिलोय, एलोविरा पोहचली आहे.  

आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवस निमित्त सर्वांना जडी-बूटी दिवसाच्या शुभेच्छा. 




Friday, August 3, 2018

काही क्षणिका: कविता



 (१)
मायेच्या धुक्यात 
हृदयाच्या कप्यात
लपलेली.

 (२) 
थकल शरीर 
रिक्त झाले मन 
आठवण आली.

(३)
हळूच  डोकावली 
हृदयातुनी
प्रियसखी.

(४)
कल्पनेच्या रथात 
स्वप्नांच्या गावात 
भेटली सखी.



 

Thursday, August 2, 2018

लघु कथा : मोगरा फुलांचा सुवास


बसची वाट पाहत तो उभा होता. त्याच्या शेजारी उभी होती ती. मोगरा फुलांची वेणी घातलेली. रिमझिम पाऊस सुरु होता. अचानक धडाssssम वीज कडकली. आई,ग! म्हणत ती त्याला बिलगली. क्षणभरासाठीच.  सॉरी, हं! म्हणत ती झटक्यात दूर झाली. तेवढ्यात तिची बस हि आली. एक नजर त्याच्या कडे टाकत ती बस मध्ये चढली.  तो अवाक! तिच्या कडे बघतच राहिला. ती गेली सोबत त्याचे हृदय घेऊन. देऊन गेली त्याला, तिचा स्पर्श, शरीराचा गंध आणि मोगरा फुलांचा सुवास. त्याच्या आयुष्याच्या घड्याळ्याचे काटे तिथेच थांबले. आज हि श्रावणात जेंव्हा मेघ गर्जना करतात, वीज कडकते, त्या बस स्थानकावर दिसेल, हातात मोगरा फुलांचा गजरा घेतलेला. प्रतीक्षारत एक म्हातारा....


 

Wednesday, August 1, 2018

क्षणिका - फुलांचा सुगंध



सुगंध फुलांचा
चेहऱ्यावर दरवळला 
फेसक्रीमची 
महिमा सारी .


सुगंधी साठी 
हत्या फुलांची 
डाग रक्ताचा 
चेहऱ्यावर दिसला.






Tuesday, July 31, 2018

वात्रटिका : फाटके कपडे


पूर्वी मध्यमवर्गीय रफू करून तेच कपडे पुन्हा-पुन्हा  वापरायचे. जास्ती जुने व फाटके कपडे मोलकरीणला किंवा भिकार्याला दान म्हणून देत होते. आज फाटलेले कडे माल व उच्चभ्रू शॉप मध्ये महागात विकले जातात.  त्या अनुषंगाने हि क्षणिका:


*रफू कारीगर 
झाला बेरोजगार
फाटक्या कपड्यांची 
फैशन आज आली. 


 रफू कारीगर :फाटके कपडे  दुरुस्त करणारा . 


Monday, July 30, 2018

वात्रटिका (शतशब्द) - : काही मुली कधीच मोठ्या होत नाही


 मेट्रोत डुलक्या घेता-घेता ऐकू आलेले आजच्या तरुणींचे  संवाद:
 
पहिली: हाय, भारीच दिसते आहे, कुणी मित्र भेटला का. 

दुसरी: अजून तरी नाही. 

पहिली: तू सेकंड ईअर मध्ये गेलीस, ना. अजूनही मित्र नाही भेटला, कमाल आहे, काही प्रोब्लेम? 

दुसरी: नाही यार, इथे नुसते कुणाला हाय केली किंवा स्मायली दिली तर तो चक्क गळ्यात पडायला कमी करत नाही. त्या पेक्षा शाळेतील मित्र बरे होते. 

पहिली: खरंच ग! शाळेतील मित्र कधीच गळ्यात पडायचे नाही. भित्रे भागुबाई होते ते. मला तर बाई आवडेल कुणी गळ्यात पडलेले? 

दुसरी: तुझे पहिले वर्ष आहे, म्हणून तू असे म्हणते. बघ लवकरच या मजनुंचे खरे स्वरूप तुला कळेल. मग तू हि म्हणशील शाळेतलेच बरे होते.

पहिली: स्वाती म्हणते तेच खरं! काही मुली कधीच मोठ्या होतच नाही. ....

Friday, July 27, 2018

आठवणीतून -कामधेनू


 
चार वर्षांपूर्वी जुलै महिन्यात हॉस्पिटलच्या बेड वर, मनात आलेले विचार....
हक्काची गाय आणली
पुढ्यात चारा टाकला
तिने भरपूर दूध दिले.
सखी, भार्या, माता
कर्तव्य चोख बजावली.
चाऱ्याच्या बदल्यात कर्तव्य
त्यात कसले आले प्रेम
माझा शुद्र पुरुषी विचार.
त्या दिनी हॉस्पिटल मध्ये
दोन्ही हातानी मला
बेड वर बसविले.
  सहज तिच्या डोळ्यांत पाहिलं
तिथे दिसले केवळ
निखळ निरागस प्रेम.
स्वत:ची लाज वाटली
का ओळखू नाही शकलो
प्रेम तिचे?
थरथरत्या हातानी
तिचा हात घट्ट पकडला
कापऱ्या आवाजात म्हणालो
भीती वाटते मला.
खंबीर आवाजात ती म्हणाली
काही नाही होणार तुम्हास्नी
मी आहे ना.
त्या क्षणी  ती मला
यमराजाशी झुंज देणारी
सावित्री सम भासली.
प्रेमाच्या  माणसांसाठी
सर्वस्व अर्पण करणारी
संसारात सुखाचे
रंग भरणारी.
खरोखरीची
कामधेनूच ती.
 

Wednesday, July 25, 2018

जशी दुकान तसा भाव


एका लग्नात गेलो होतो. मोठ्या FMCG कंपनीच्या मोठ्या हुद्द्यावर असलेले एक सज्जन भेटले. जेवायला वेळ होता. सहज एका स्वदेशी कंपनीचा विषय काढला. ते म्हणाले समजा तुमची कंपनी आहे. तुमचे उत्पादन सर्वोत्तम, तुम्ही नफा कमी घेणार उत्तम. ग्राहकाला उत्तम दर्जेची वस्तू स्वस्त मिळणार उत्तम. पण एक महत्वाची गोष्ट तुम्ही विसरता. प्रत्यक्ष ग्राहकाला समान विकणार्या दुकानदाराला जर कमी कमिशन देत असाल तर तुमची कंपनी जास्त पुढे जाऊ शकत नाही. त्याचे एक कारण ९९ टक्के ग्राहकांना पेकिंगच्या आत वस्तू कुठल्या दर्ज्याची आहे, हे माहित नसते व ते तपासण्याचे कष्ट हि तो घेत नाही.  "क्या चल रहा है" सारखे विज्ञापन पाहून तो निर्णय घेतो. ग्राहक नेहमीच उत्तम दर्जेची आणि स्वस्त वस्तू घेईल हि धारणा काही अंशीच ठीक आहे. तुमच्या कंपनीची वस्तू विकण्याची इच्छा दुकानदाराच्या मनात असेल तरच तो तुमच्या कंपनीच्या वस्तू दुकानात ठेवेल, अन्यथा नाही. जी कंपनी जास्त कमिशन देत असेल तिचे उत्पाद चांगले हे ग्राहकच्या डोक्यात भरण्याचा प्रयास तो नक्कीच करणार. चांगल्या दर्जाच्या वस्तूसाठी ग्राहक पंचवीस-पन्नास रुपये जास्त द्यायला नेहमीच तैयार असतोच.
  
त्या सदगृहस्थाने, पुढे माहिती दिली. आपल्या इथे सामान्यत: ४ प्रकारची दुकाने आहेत. महानगरात VVIP भागातील दुकाने. तू दिल्लीचा, सीपी, साउथ एक्स. अश्या ठिकाणी दुकानांचे भाडे जास्त असते. दुकान एसी असते. आंग्ल भाषा बोलणारे कर्मचारी असतात. अर्थात खर्च जास्त. इथे समाजातील उच्चभ्रू लोक समान घ्यायला येतात. भीडभाड जास्त रहात नाही. ग्राहकांना पैश्यांची चिंता नसते. हा दुकानदार त्याच वस्तू विकणार ज्यात त्याला जास्तीसजास्त कमिशन मिळणार. मग तो ७० रुपयात मिळणारे मध नव्हे तर १५०-२०० रुपयांत उत्तम पेकिंग केलेले मध विकणार हे साहजिक आहे. हा दुकानदार तुमचे उत्पादन कदापि ठेवणार नाही. इथे उत्तम पेकिंग मध्ये गुंडाळून ठेवलेला विदेशी कचरा हि चांगल्या भावात विकल्या जातो.

दुसर्या प्रकारची दुकाने म्हणजे मोठे-मोठे माल. हे हि एसी असतात. पण इथे भरपूर ग्राहक येतात. देशी-विदेशी सर्व प्रकारचे ब्रांड इथे मिळतील. इथे येणारे अधिकांश ग्राहक आंग्ल भाषा शिक्षित तरुण असतात. टीवी, हॉलीवूड, बॉलीवूडचा प्रभाव या ग्राहकांवर असतो. सामान्यत: त्यातहि अधिकांश आंग्ल शिक्षित तरुण ग्राहकांच्या मनात विदेशी वस्तू उत्तम हि धारणा. ग्राहक स्वत: उत्पादन निवडतो.  काही ग्राहकांना तुमची उत्पादने पाहिजे असतील, त्याहि या माल मध्ये मिळतील. पण सर्वांना सहज न दिसेल अश्या रीतीने ठेवलेली. 

तिसर्या प्रकारची दुकाने, म्हणजे गल्ली-बोळातील छोटी-छोटी दुकाने. इथे किराणाच्या सामानासोबत, दूध, अंडी, ब्रेड, तंबाकूच्या पुड्या, छोट्याशा फ्रीज मध्ये काही थंड पेयांच्या बाटल्या इत्यादी वस्तू मिळतात. सकाळी दूध-ब्रेड विकल्यानंतर. दिवसभरात काही जास्त धंधा होत नाही. ग्राहक हि निम्नवर्गीय असतात. गरीब ग्राहक पाव-अर्धा किलो समान गुणवत्ता न पाहता घेतात. पाचशे-हजार रुपयांची उधारी नेहमीच असते. या दुकानात हलक्या प्रतीचे व डुप्लिकेट समान गरीब ग्राहकांना विकल्या जाते. इथे तुमचे उत्पादन चुकूनही कुणी ठेवणार नाही. 

शेवटचा प्रकार म्हणजे, किराणाचे दुकान जेथून मध्यमवर्ग महिन्याचे राशन उचलतो. इथे हि ग्राहक उधार घेतात. हजार ते पाच हजार पर्यंत उधारी असणे सामान्य बाब आहे. वर्षानुवर्षे समान घेणारे ग्राहक इथे असतात. नेहमीचाच दुकानदार असल्यामुळे, दुकानदाराचे मत व सिफारीशी वर ग्राहक विश्वास ठेवतो. हा दुकानदार हि तुमचे उत्पादन ठेवेल, ग्राहकांच्या मागणीनुसार. तुमच्या उत्पादनाची शिफारीश, स्वत: वापरात असेल, तरी हि ग्राहकाला कधीच करणार नाही. तुमचे प्रतिस्पर्धी, जास्त मुनाफा घेणारे, या दुकानदाराला अधिक कमिशन देऊन, तुमचे उत्पादन ठेवायला हतोत्साहित करतील. अनेक अफवाः पसरविल्या जातील. शेवटी धंद्यात सर्व काही उचित असते.

तुम्हाला स्वत:ची दुकाने काढून उत्पादने विकावी लागतील. पण अश्यारीतीने तुम्ही जास्तीसजास्त १०टक्के ग्राहकांपर्यंत पोहचू शकाल. 

त्यांच्या सोबत झालेल्या चर्चा झाल्यावर प्रत्यक्ष परिस्थिती तपासून बघितली. सीपीतील विभिन्न राज्यांचे इम्पोरिअम व उच्चभ्रू ग्राहक ज्या दुकानांत येतात. तिथे किमंती बर्या पैकी जास्त होत्या. मीठ हि किमान २७ रु किलो वाले दिसले. 

गल्लीत एक विधवा छोटेखानी दुकान चालविते, तिच्या दुकानातून सकाळी फक्त दूध घेतो. सहज तिला विचारले, तांदूळ काय भाव. ती उतरली, साहेब, तुमच्या खाण्यालायक नाहीत. गल्लीत एका रूमच्या भाड्याच्या खोलीत संसार थाटणारे, तिचे ग्राहक. 

उच्चभ्रू ग्राहकांसाठीच काही कंपन्या चांगली पेकिंग करून वस्तू भारी किमतीत  विकतात, दुकानदाराला ५०टक्के किंवा त्याहून जास्त  कमिशन देतात. २०० रुपयांत मिळणारा एलोविरा ज्यूस इथे ५००-१००० रुपयाहून कमी किमतीत मिळणार नाही.  

चर्चेतून निष्पन्न काढले. 

१. किराणा विकणारा दुकानदार, fmcg सेक्टर मध्ये सर्वात महत्वाचा व्यक्ती आहे. तो प्रसन्न राहिला पाहिजे. दुसरे ३० टक्के कमिशन देत असेल तर तुम्ही किमान २० टक्के कमिशन  दिले पाहिजे. अन्यथा एका बिंदू वर आल्यावर तुमची विक्री वाढणार नाही किंवा दुसर्यांपेक्षा कमी गतीने वाढेल.  शिवाय दुकानदार ग्राहकांचे सहज लक्ष जाईल अश्या ठिकाणी तुमच्या वस्तू ठेवणार नाही. 

२. दुकानदाराला कमिशन व्यतिरिक्त हि अनेक भेटवस्तू दिल्या पाहिजे

३.  अधिकांश उत्पादक वस्तू कुठे विकायची आहे, कोण ग्राहक आहे, या निकषावर किमंत ठरवितात. गुणवत्तेच्या आधारावर नाही. समानदर्जाच्या वस्तूंची किमंत वेगवेगळी असते.

ग्राहकांसाठी: 

१.गुणवत्ता आणि किमंत या बाबतीत ग्राहकाला जागृत करणे गरजेचे. 

2. महागातली वस्तू उत्तम हे खूळ डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे.  

३.पेकिंगच्या आत काय आहे, याची तुलना करून वस्तू घेणे शिकले पाहिजे. त्यासाठी  स्वत: खरीदारी करावी लागेल. घरात बसून किराणा मागवत असाल तर दुकानदार तुम्ही सांगितलेली वस्तू अन्यथा ज्यात  कमिशन  जास्त असेल तीच वस्तू तुम्हाला  पाठवेल. 

४. शक्यतो प्रसाधन सामग्री  साबण, शेम्पू, क्रीम इत्यादी इत्यादी हिरवे टॅग वाली विकत घ्यायची.

५. शाकाहारी  ग्राहकांनी बिस्कूट इत्यादी हि हिरवे टॅग वाले विकत घेतले पाहिजे. 

बाकी गेल्या काही वर्षांपासून मी फक्त स्वदेशी, सर्वोत्तम व कमी भाव असलेले उत्पाद विकत घेतो.  

Tuesday, July 24, 2018

काही क्षणिका : राख




जाळल्या स्मृती 

हृदयी उरली

राख विस्मृतीची.




धरती जळाली

 सवे राख झाली 

वीज फिदायनी.




मेघांच्या अश्रूंत

भिजली राख 

प्रगटले चैतन्य. 


कितीही विसरण्याच्या प्रयत्न केला तरी राखेच्या रुपात स्मृती आपल्या हृदयात ठाण मांडून बसतीलच.


किती हि वीज पडली, उध्वस्त झाले जीव तरीहि धरतीच्या कोखात जीवन हे निजपणारच. राखेतून पुन:जीवित होणार्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे. 


 

Monday, July 23, 2018

आज आषाढी एकादशी, विठ्ठल नाही पंढरपुरी


आज आषाढी एकादशी 
विठ्ठल नाही पंढरपुरी 
भक्ताच्या दर्शनासी 
गेला तो मुंबापुरी

मला वाटते कधी-कधी इतिहासाची पुनरावृत्ती होते. महाराजांची कुलदैवत आई तुळजा भवानी. आसुरी शक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अफजल खानाने आईची विटंबना केली. महाराजांच्या जागी दुसरा कुणी असता तर त्वेषाने खानवर तुटून पडला असता. हजारो मावळे शहीद झाले असते. स्वराज्याचे स्वप्न हि भंगले असते. अश्या प्रसंगी हि महाराज शांत राहिले. स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. 

विठ्ठल तर भक्तांचा देव. भक्तांचे कष्ट पाहून तो नाथा घरी पाणी भरायला गेला. भानुदासाला वाचविण्यासाठी शुष्क काष्ठाला हिरवे केले. जिथे  कठोर तपस्येनंतर देवांचे दर्घडते इथे पंढरीत तर साक्षात पांडुरंग भक्तांच्या दर्शनासाठी विटेवर उभे आहेत, अनेक युगांपासून. आपल्या एका भक्ताला इथे येण्यापासून आसुरी शक्तींनी  रोखले आहे, हे पांडुरंगाला कळणारच. मग त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी पांडुरंग त्याच्या घरी जाणारच. अर्थात हि साधी सौपी गोष्ट आसुरी शक्तींच्या अधीन असणार्या मूर्खांना कळणे अशक्यच. आज पांडुरंग चरणी एकच प्रार्थना. पांडुरंगा तू दयाळू आहे, आपल्या सर्व अज्ञ लेकरांना  क्षमा कर, क्षमा कर. 

Friday, July 20, 2018

काही क्षणिका : श्रावणात



गंगा आली 
अमृत पाणी 
श्रावणात.
 
पृथ्वी न्हाली 
हिरवी नटली
 श्रावणात.

ऊन- पाऊस 
 लग्न भुताचे
श्रावणात.


सोनेरी ढगांचा 
सतरंगी साज
श्रावणात.




Thursday, July 19, 2018

पाऊस - काल आणि आज



द्वाड पोरांनी 
मटकी फोडली 
अमृताची.



  टेंकर फोडले 
 कान्हा उपाशी 
दुधाविना. 




मेघ (द्वाड पोरे) आकाशातून अमृताचा वर्षाव करतो. इथे जाणते टेंकर फोडतात, तेही दुसर्यांचे. दुधाविना तान्हा कसा जगेल एक क्षण हि हा विचार जाणत्यांच्या मनात येत नाही. बहुतेक समर्थांनी अश्या लोकांसाठी पढत मूर्ख हा शब्द वापरला असेल.