Tuesday, June 2, 2026

“गुरुकुलांचा उजेड आणि ब्रिटीशांचा अंधार”


(ब्रिटिश सर्व्हे वर आधारित कविता)




देशात गावोगावी होते
गुरुकुल सहा लाखांहून जास्त
शिकत होते तिथे सारे
ब्राम्हण, दलित, शूद्र, स्त्री–पुरुष.
 
जगात होते सर्वात जास्त
साक्षर जनतेचे प्रमाण
ज्ञानाचा दीप उजळत होता
भारत होता शिक्षणधाम.
 
शिक्षक असो वा विद्यार्थी,
शूद्रच होते जास्त तिथे,
वैद्यकीय शिक्षणातही,
वाजत होता त्यांचा दणका!
 
मनुस्मृतीच्या नावाने
खोटी आवई उठवली
ब्रिटीशांनी बंद केले
गुरुकुल सारेच्या सारे.
 
दलितांना केले वंचित
शिक्षणाच्या हक्कापासून
हेच आहे सत्य इतिहासाचे
डोळे उघडा, तपासा दस्तावेज  
असत्यात जगणाऱ्यांनो!
 

No comments:

Post a Comment