ज्ञान प्राप्ती हे मानवी जीवनातील सर्वोच्च आणि अत्यंत महत्त्वाचे ध्येय आहे, जे प्राचीन वैदिक काळापासून ते आधुनिक युगापर्यंत सांगितले गेले आहे. ज्ञान हे फक्त बौद्धिक माहिती गोळा करणे नव्हे, तर ते जीवनात उतरवून आत्मसाक्षात्कार, संसारिक यश आणि समाजकल्याण साधण्याचे साधन आहे. वैदिक परंपरेत ज्ञान प्राप्तीचा उद्देश अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त होऊन सत्य, धर्म आणि मोक्षाकडे वाटचाल करणे हा आहे. उदाहरणार्थ, अथर्ववेदातील (१.१.५) एक ऋचा-
वैदिक काळात ज्ञानप्राप्तीचे दोन प्रकार होते-अपरा विद्या (संसारिक कौशल्ये) आणि परा विद्या (ब्रह्मज्ञान), ज्यांचा उद्देश जीवनात संतुलन, मोक्ष आणि समाजोपयोगिता साधणे हा होता.
द्वे विद्या वेदितव्ये इति ह स्म यद् ब्रह्मविदो वदन्ति परा चैवापरा च तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छन्दो ज्योतिषमिति । अथ परा यया तदक्षरमधिगम्यते॥(मुंडक उपनिषद)
अपरा विद्या म्हणजे वेद, व्याकरण, ज्योतिष इत्यादी असून ती लौकिक यशासाठी उपयुक्त आहे, तर परा विद्या आत्मा-ब्रह्माची एकता जाणून मोक्ष प्राप्त करण्यासाठी आहे. छांदोग्य उपनिषदातील “तत् त्वम् असि” हे महावाक्य आत्मा आणि ब्रह्म एकच असल्याचे सांगते, तर ईशावास्य उपनिषदात “विद्या च अविद्या च...” या मंत्राद्वारे कर्माने दुःख ओलांडून आत्मज्ञानाने अमृतत्व प्राप्त करण्याचा मार्ग दिला आहे. अविद्या/अपरा विद्या संसारात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व ज्ञान. उदाहरण, जर तुम्ही आजारी पडला तर वैदयाकडे जावे लागेल. म्हणूनच तैत्तिरीय उपनिषदात सत्य, धर्म, स्वाध्याय, गुरुसेवा आणि समाजधर्म यांचा अभ्यास आवश्यक मानला आहे. समर्थ रामदासस्वामींच्या “ज्ञात्यावांचूनि नाहीं ज्ञानमार्ग” या ओवीतून गुरुच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित होते, तर “संसारत्याग न करितां...” या विचारातून विवेकाने संसारातच सार्थकता साधण्याचा संदेश मिळतो.
आधुनिक काळात स्वामी रामदेव यांनी योग-आयुर्वेदाचे प्राचीन ज्ञान समाजोपयोगी व्यवसायात उतरवून आरोग्य व रोजगार दिला, तर आचार्य बालकृष्ण यांचे अथर्ववेदातील गुरु-शिष्य बंधनाचे विवेचन आजच्या शिक्षणपद्धतीतही लागू होते. यावरून स्पष्ट होते की ज्ञानाचा खरा उद्देश आत्मिक उन्नती, जीवनातील संतुलन आणि समाजाची सेवा हा आहे. जो वैदिक आणि आधुनिक दोन्ही दृष्टिकोनांतून सुसंगत आहे.
No comments:
Post a Comment