पाद सेवन तेंचि जाणवें.
काया वाचा मनोभावें.
सद्गुरूचे पाय सेवावे.
सद्गतीकारणे.
(दासबोध ४/२)
पाद सेवन भक्ति म्हणजे गुरूचे पाय चेपणे नव्हे. समर्थ म्हणतात सद्गुरूने दिलेल्या मंत्राचा अर्थात ज्ञानाचा, काया वाचा मनोभावे जप करणे अर्थात त्यावर मनन चिंतन करणे. प्राप्त ज्ञानाचा उपयोग कसा करवा हे जाणून घेणे. सद्गुरूने दिलेल्या ज्ञानाचा संसारीक जीवनात आणि अध्यात्माच्या प्रवासात उत्तम रीतीने वापर केल्यानेच आध्यात्मिक आणि संसारीक मार्ग सुकर होतो. समर्थ पुढे म्हणतात,
जें अभ्यासें अभ्यासितां नये.
जें साधनें असाध्य होये.
तें हें सद्गुरूविण काये.
उमजों जाणे.
(दासबोध ४/२०)
अभ्यास करून, पुस्तके वाचून, यूट्यूब, एआईची मदत घेऊन ज्ञान प्राप्ती होऊ शकते. पण ज्ञानाचा वापर कसा करावा हे कळू शकत नाही. त्यासाठी त्या क्षेत्रातील सद्गुरू शोधावा लागतो आणि त्याच्या कडून ज्ञानाचा सांसारिक पक्ष शिकवा लागतो. त्यासाठी भगवद्गीतेत, भगवंत म्हणतात:
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया |
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: || 34 ||
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिन: || 34 ||
आयटीआय मधून एकाने ऑटोमोबाइल मध्ये डिप्लोमा घेतला. लगेच गराज उघडून तो गाड्या ठीक करू शकणार का? उत्तर नाही. त्याला त्या क्षेत्रातील उत्तम उस्तादाकडे जावे लागेल. श्रद्धापूर्वक त्याची सेवा करावे लागेल. विनम्रतेने प्रश्न विचारून मनातील शंका दूर करून घ्यावा लागतील. या साठी त्याला सतत उस्तादच्या सांधित्यात राहावे लागेल. त्याला रोज 18 तास काम करावे लागले तरी त्याने ते पूर्ण श्रद्धेने केले पाहिजे. तेंव्हाच त्याला उस्ताद कडून कामाचे बारकावे शिकायला मिळेल. त्यानंतरच तो स्वत:चे गराज उघडून गाड्या दुरुस्तीचे काम उत्तम रीतीने करू शकेल.
डॉक्टर असो, वकील असो किंवा किराण्याची दुकान उघड्याची असेल, सर्वांना सद्गुरूची (त्या क्षेत्रातील जाणकार) सेवा करून प्राप्त विद्येचा उपयोग कसा करवा हे शिकावे लागते. सद्गुरूच्या चरणी बसूनच सांसारिक उन्नतीचा मार्ग आपल्याला सापडतो. हेच पाद सेवन भक्तीचे सांसारिक महत्व आहे.
No comments:
Post a Comment