Monday, August 23, 2021

दारुण अंत : राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपाल आणि दानिश सिद्दिकी

मंत्री रतिपाल आणि दानिश दोघांचा दारुण अंत झाला. दोघांची कथाही एक सारखी. पहिली कथा आहे रणथम्बौरचे राजा हम्मीरदेवचा मंत्री रतिपालची. दिल्ली सुल्तान अल्लाउद्दीन खिलजीने रणथम्बौर वर आक्रमण केले. अनेक महीने झाले तरी रणथम्बौर दुर्ग शरण आला नाही. अल्लाउद्दीनच्या सेनेत रसदची टंचाई जाणवू लागली. त्याच्या मंत्र्यांनी सल्ला दिला. जर आपली अशी परिस्थिति आहे तर दुर्गात परिस्थिति यापेक्षा ही बिकट असेल. काफिर चंद चांदीच्या तुकड्यांसाठी देशाची गद्दारी करतात. हीच योग्य वेळ आहे, आपण दगाबाज काफिरांचा वापर करू शकतो. अल्लाउद्दीनचे गुप्तचर कामावर लागले. त्यांनी मंत्री रतिपालला  बूंदीची   लालच देऊन फोडले. मंत्री रतिपालाने दुर्गाच्या एका भागाची रक्षा करणार्‍या सेनापति रणमलला (काहींच्या मते हाही मंत्री होता) आपल्या षडयंत्रात शामिल केले. अल्लाउद्दीनचे सैन्य रणथम्बौर दुर्गात शिरले. महाराणी रंगादेवी, पौत्री देवल देवी सहित 12000 राजपूत स्त्रियांनी जौहर केले. पुरुषांनी केसरिया करून आपल्या प्राणांची आहुति दिली. अल्लाउद्दीनने  मंत्री  रतिपाल आणि रणमलचे डोके हतीच्या पायाखाली चिरडन्याचा आदेश दिला. अल्लाउद्दीन त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या राजाचे आणि राज्याचे झाले नाही तर आमचे काय होणार. तुमच्यासारख्या फितुरांसाठी हेच इनाम उचित आहे. 

दानिश सिद्दिकीचे म्हणाल विदेशात भारताविरुद्ध दुष्प्रचार करण्यासाठी विदेशी मालकांचा चाकर झाला. स्मशानात जळणार्‍या चित्ता म्हणजे करोनाने मेलेल्या लोकांचे फोटो, असा विदेशी मालकांना रुचणारा प्रचार. कश्मीर मध्ये 370 धारेचा गैर वापर करून जिहाद्यांनी  हजारो निर्दोष नागरिकांची हत्या केली. लाखो हिंदूंना घाटीतून पळवून लावले. रोशनी अक्टच्या तहत हजारो लोकांच्या घरदारावर कब्जा केला. जम्मू आणि लद्दाखच्या नागरिकांना गुलाम बनवून ठेवले होते. धारा 370 गेली. लद्दाख आणि जम्मूच्या नागरिकांना खर्‍या अर्थाने स्वतंत्रता मिळाली. काश्मिरी हिंदूंच्या मनात मायदेशी परतण्याची आशा बलवती झाली.  दानिश खरच फॉटोग्राफर असता तर लद्दाखच्या जनतेची प्रसन्नता दाखवू शकत होता. काश्मिरी हिंदूंचे आनंदाश्रू दाखवू शकत होता. पण भारत विरोधी विदेशी मालिकांना जे पाहिजे होते त्यासाठी दिहाडीवर दगड फेकणारे म्हणजे काश्मीरची जनता असे फोटो काढले. साहजिकच आहे त्याला बक्षिसी मिळाली. दानिश अफगाणिस्तानात गेला. बहुतेक तालिबानची विजय यात्रा कवर करायची असेल. पण त्याचे दुर्भाग्य तालिबानने त्याला पकडले. दानिश  पत्रकार होता हे माहीत असूनही तालिबानने त्याला  गोळीने उडविले. त्याचे डोके जीप खाली चिरडले अशी वाच्यता आहे. मला त्यात काहीच आश्चर्य वाटले नाही. चांदीच्या तुकड्यांसाठी गद्दारी करणार्‍यांना हेच बक्षीस मिळते. 


No comments:

Post a Comment