Monday, June 13, 2011

शेतकऱ्याची आत्महत्या


शेतकऱ्याने आत्महत्या केली

सरकार दफ्तरात तो
एक 'आंकड़ा' झाला.

विरोधी पक्ष नेत्यांसाठी तो
विधानसभेत 'गोंधळाचा' विषय झाला.
 
मुख्यमंत्र्यांसाठी तो
मुआवजेची 'घोषणा' झाला.
 
वृतपत्र - वाहिनीं साठी तो
एक 'ज्वलंत समस्या' झाला.

माझा सारख्या कवींसाठी तो
कवितेचा 'कच्चामाल' झाला.
 
पण त्या बळीराजासाठी
एक अश्रु
कुणी ही नाही गाळला.

No comments:

Post a Comment